मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात पाणी येत नाही या बाबत पालिकेकडे विचारणा केली असता पालिका अधिकारी तांत्रिक बिघाड झाला आहे असे सांगतात तांत्रिक बिघाड हा काय फक्त एकच ठिकाणी होतो का? या भागातून अनेक नामचीन लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यात स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर असे तीन महापौर याच भागातले तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ असे असताना इथल्या लोकांना जर पाणी मिळत नसेल तर काय फायदा बरे या वर्षी अफाट पाऊस पडतोय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव ओव्हरफ्लो झालेत तरी डिलाईरोडच्या जनतेला पाणी नसल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथल्या लोकांची अवस्था झाली आहे
Similar Posts
वांद्रयातील ठाकरे गटाच्या शाखेवर पालिकेची कारवाई
मुंबई-ठाकरे गटाच्या वतीने उभारण्यात आलेले ऑटो ड्रायव्हर्स वेल्फेअर असोसिएशनचे कार्यालय अनधिकृत असल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. त्यामुळे या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. कारवाईच्या दरम्याने पालिका अधिकारी उपस्थित होत. तसेच मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला होता. शाखेवर कारवाई होताच अनेक शिवसैनिकांनी तेथे गर्दी केल्याचे दिसून आलेमिळालेल्या माहितीनुसार,…
पवार काका पुतण्यांमधला वाद चिघळला- एकच दिवशी दोघांच्या दोन बैठका अजित पवार नव्या राष्ट्रवादीचा अध्यक्ष
मुंबई/ राष्ट्रवादी मधील फुटिनंतर पवार काका पुतण्याने काल मुंबईत आप आपल्या पक्षाच्या बैठका घेतल्या शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सभागृहात तर अजितदादांनी बाद्र्यात बैठक घेतली दोघांनीही आपालल्या कार्यकर्त्यांकडून शपथपत्र भरून घेतली.अजित दादांनी तर स्वतःला आपल्या पक्षाचा अध्यक्ष घोषित केले तसेच निवडणूक चिन्हावर दावा केला तर काही झालं तरी निवडणूक चिन्ह सोडणार नाही असा निर्धार शरद पावर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअहमदनगरचे अहिल्यादेवी नगर असे नामांतर
अहमदनगर: संभाजीनगर नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली. आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या…
औरंगजेबाचे फोटो झळकावणे सहन केले जाणार नाही -फडणवीस
अहिल्या नगर – अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार नगर शहरातील फकीरवाडा परिसरात घडला. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.नगर शहरातील फकीरवाडा परिसरात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या मिरवणुकीत काही तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल…
पालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने करण्याचे आदेश
मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
मुंबईतील मालाड कुर्ला भागात मतदारांची संख्या प्रचंड वाढली! तर दक्षिण मुंबईत घट
मुंबई/यावेळीमुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील घोळ अजूनही संपलेला नसल्याचे दिसते. शहरातील २२७प्रभागातील मतदारांच्या संख्येत एकूण १२.६७ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मुंबईतील काही भागात मतदारांचा महापूर आला आहे. तर काही भागात मतदारांच्या संख्येत मोठी घसरण झाल्याचे दिसून आले. पश्चिमी आणि मध्य उपनगरांमध्ये मतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तर दक्षिण मुंबईतील काही जुन्या भागात मतदारांच्या…
