मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात पाणी येत नाही या बाबत पालिकेकडे विचारणा केली असता पालिका अधिकारी तांत्रिक बिघाड झाला आहे असे सांगतात तांत्रिक बिघाड हा काय फक्त एकच ठिकाणी होतो का? या भागातून अनेक नामचीन लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यात स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर असे तीन महापौर याच भागातले तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ असे असताना इथल्या लोकांना जर पाणी मिळत नसेल तर काय फायदा बरे या वर्षी अफाट पाऊस पडतोय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव ओव्हरफ्लो झालेत तरी डिलाईरोडच्या जनतेला पाणी नसल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथल्या लोकांची अवस्था झाली आहे
Similar Posts
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
पालघर साधू हत्याकांडातील चौघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला
मुंबई / पालघर हत्याकांडातील चौघांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. प्रथमदर्शनी आरोपींविरोधात पुरेसे पुरावे असल्याचं सांगत न्यायालयानं हा जामीन अर्ज फेटाळला. १६ एप्रिल २०२० रोजी, राज्यात कोरोना लॉकडाऊन सुरू असताना गडचिंचले गावातील जमावाने दोन साधूंसह त्यांच्या चालकाची हत्या केली होती. याप्रकरणी राजेश राव, सजनुआ बुरकुड, सुनील दळवी आणि विनोद राव या चौघांवर आरोप आहे….
उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढणार निवडणूक आयोग कारवाईच्या तयारीत
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी मतदानाच्या दिवशीच पत्रकार परिषद घेतली होती. त्यामुळे भाजपने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.मतदानाच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेवरुन उद्धव ठाकरे अडचणीत येताना दिसत आहेत. २० मे रोजीची मतदान संपण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर…
“मटण खा त्याचं पण बटण दाबा आमच- शिंदेंच्या मंत्र्यांचा मतदारांना सल्ला
जळगाव/राज्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात व्यस्त आहेत. शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आज प्रचारासाठी नाशिकमधील भगूर येथे आले होते. यावेळी बोलताना पाटील यांनी मतदारांना एक अजब सल्ला दिला आहे. विरोधकांच मटण खा आणि बटण आमचं दाबा असं पाटील यांनी म्हटले आहे. त्यांच्या भाषणातील…
राष्ट्रीय पदक विजेत्या शरीरसौष्ठवपटूंच्या पाठीवर कौतुकाची थाप
कुणाल केरकर यांच्या आयर्न पॅराडाईज जिम च्या वतीने शनिवारी सत्कार सोहळामुंबई, — राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचावर मुंबईकरांनी पुन्हा एकदा ताकदीचा तडाखा देत प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः चीत केले. “मुंबई म्हणजे बॉडीबिल्डिंगचा बालेकिल्ला” ही ओळख ठणकावून सांगताना मुंबईच्या शरीरसौष्ठवपटूंनी तब्बल १४ पदकांची दणदणीत कमाई करत देशभरात आपला दबदबा प्रस्थापित केला. या झंझावाती यशाच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी आणि…
मराठा आरक्षण आंदोलनाला मुंबईत केवळ एका दिवसाची सशर्त परवानगी
मुंबई/ मराठा आंदोलकांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची सशर्त परवानगी दिली आहे. २९ तारखेला केवळ एकच दिवस सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मनोज जरांरे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. आंदोलनकर्त्यांची वाहनांना फ्री-वे ने केवळ वडीबंदर जंक्शनपर्यंत येण्याची मुभा देण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या…
