मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात पाणी येत नाही या बाबत पालिकेकडे विचारणा केली असता पालिका अधिकारी तांत्रिक बिघाड झाला आहे असे सांगतात तांत्रिक बिघाड हा काय फक्त एकच ठिकाणी होतो का? या भागातून अनेक नामचीन लोकप्रतिनिधी निवडून गेले त्यात स्नेहल आंबेकर, किशोरी पेडणेकर असे तीन महापौर याच भागातले तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ असे असताना इथल्या लोकांना जर पाणी मिळत नसेल तर काय फायदा बरे या वर्षी अफाट पाऊस पडतोय. मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्व तलाव ओव्हरफ्लो झालेत तरी डिलाईरोडच्या जनतेला पाणी नसल्याने धरण उशाला आणि कोरड घशाला अशी इथल्या लोकांची अवस्था झाली आहे
Similar Posts
राहुल गांधींचे पुन्हा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप – आयोगाने आरोप फेटाळले
नवी दिल्ली/ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मत चोरीचा आरोप केला आहे.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदार संघात ६८५० नवीन नवे घुसवण्यात आली तर कर्नाटकातील आळंद मतदार संघात ६०१८ नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप केला .त्यासाठी पुरावा म्हणून एका मतदारालाच पत्रकार परिषदेत हजर केले.त्यामुळे निवडणूक आयोगावरचा संशय वाढला…
प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास प्रारंभ
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटनउपनगरातील 200 शाळा आणि 6 हजार खेळाडूंचा सहभाग मुंबई – पश्चिम उपनगरातील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा 43 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवास आजपासून दणक्यात सुरुवात झाली. वांद्रे ते दहिसर या उपनगरातील 200 पेक्षा अधिक शाळा आणि सहा हजारांपेक्षा अधिक शालेय खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद या क्रीडा महोत्सवाला लाभला आहे….
रस्त्याच्या कामात कंत्राटदाराला निधी वाढवून देण्याचा पालिका अधिकाऱ्यांचा झोल फसला
मुंबई/ पालिकेत कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे मुंबईकरांचा पैसा कसा लुटला जातो हे अनेक वेळा उघडकीस आले आहे .आणि रस्त्याची कामे म्हणजे नोटा छापण्याची मशोनच असते.मुंनबईच्या रस्त्यांच्या कामात झालेला भ्रष्टाचार हा भारतातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे.रस्त्याच्या कामात असाच एक मोठा झोल होणार होता पण अतिरिक्त आयुक्तां मुळे तो फसला.नागरी सुविधांच्या विविध कामांसाठी रस्त्यावर…
तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल – अजित पवार गटाचा भाजपला इशारा
मुंबई : राज्यातील महायुतीत काहीही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित…
काँग्रेस नेते पवन खेरावर मत चोरीचा आरोप- २ मतदार ओळखपत्रे सापडली
नवी दिल्ली/भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी मंगळवारी सांगितले की, खेरा यांचे नाव जंगपुरा विधानसभा मतदारसंघ (पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघ) आणि नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघ (नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघ) च्या मतदार यादीत आहे. मालवीय म्हणालेपवन खेरा यांच्याकडे दोन मतदार ओळखपत्रे कशी आहेत आणि त्यांनी एकापेक्षा जास्त वेळा मतदान केले आहे का, हे आता निवडणूक…
आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न -निर्णयावर गुन्हा दाखल
आळंदी – संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत धर्मांतराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी अमिश दाखवून धर्मांतर करायला लावणाऱ्या ख्रिश्चन इसम विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुम्ही तुमचा धर्म सोडून द्या, आणि येशूची पूजा…
