मुंबई दिं-19 सप्टेबर- गेल्या काही वर्षांपासून मुंबई मधील डान्स बार बंद आहेत दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी कायदा करून डान्स बार मधील नाच बंद केले. मात्र स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील ताडदेव ‘ इडियाना रेस्टॉरंट बार ‘ नावाचा बार असून त्यात बेकायदेशीरपणे अश्लील डान्स सुरू असतो. त्यामुळे या बार मध्ये तुफान गर्दी असते या गर्दीत काही चोर, दखलेबाज गुंड,बिल्डर यांच्यासारखे लोक मोठ्या प्रमाणात येत असतात अशी माहिती तिथल्या काही ग्राहकांनीच उघड केली आहे. त्यामुळे या बारवर तत्काळ कारवाई करावी आणि त्याचा परवाना रद्द करावा कारण या बारमुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका होऊ शकतो असे इथल्या जनतेचे म्हणणे आहे. हा बार ताडदेव पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतात काय? असा सवाल इथल्या जनतेने केली आहे.
Similar Posts
स्वराज्य फाऊंडेशनच्या आरती संग्रहाचे यशवंत जाधव यांच्याहस्ते अनावरण
मुंबई – : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना, शासनाने आखून दिलेल्या नियमांप्रमाणे यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे. सर्वत्र श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी आबालवृद्ध करत आहेत. घराघरांत उत्सवाचं वातावरण तयार होत आहे. सार्वजनिक मंडळांचे गणपती मंडपात दाखल झाले असून सजावट अंतिम टप्यात पोहचली आहे. पण त्याच्याच जोडीने आरती संग्रहांची गरज देखील भासत आहे. हीच गरज ओळखून “स्वराज्य…
वाहतूकदारांच्या संप चिघळणार पेट्रोल पंपावर रांगा – पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ट्रकचालकांना अटक
नवी दिल्ली : रस्ते अपघातानंतर वाहनचालक पळून गेला तर (हिट अँड रन) त्याला कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या नव्या कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहतूकदार आणि ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचा दावा राष्ट्रीय वाहतूकदार संघटनांनी सोमवारी केला आहे.अलीकडेच संसदेत मंजूर झालेल्या भारतीय न्यायिक संहिता २०२३ या कायद्यानुसार, हिट अँड रन प्रकरणांत संबंधित दोषी चालकाला पकडल्यावर ७ लाख…
मोदी- शहावर टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना नारायण राणेंचा इशारा
मुंबई/ पहिल्याच पावसात मुंबईत पाणी तुंबल्याने मुंबईकरांची दाणा दान उडाली होती .त्यावरून आता राजकारण पेटले आहे.आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारसह केंद्रीय नेत्यांवरही टीका केली होती त्यावर पलटवार करताना मुंबईतील परिस्थितीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी शहा यांच्यावर टीका केलीस तर याद राख अशी नारायण राणे यांनी आदित्य ठाकरें इशारा दिली आहे.राजधानी मुंबईत सोमवारी…
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
गडकरींच्या लेटर बॉम्ब नंतर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुंबई/ वाशिम जिल्ह्यात रस्त्यांच्या कामात शिवसेना कार्यकर्त्यांनी अडथळे आणल्यामुळे कामे रखडत आहेत ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री समजताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत.दरम्यान या घटनेची काँग्रेसने सुधा गंभीर दखल घेतली असून या मुद्द्यावर गडकरींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय…
तुकाराम महाराज शेतकरी बीज महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ !
शेतकरी कीर्तन महोत्सवात शाश्वत शेतीवर चिंतन _ प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासहमान्यवरांचा सहभाग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शेतकरी केंद्र बिंदू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षी शाश्वत शेती विषयावर दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अध्यात्मिक चळवळीतू शेतकऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि भौतिक विकासाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या…
