मुंबई दिं-19 सप्टेबर- गेल्या काही वर्षांपासून मुंबई मधील डान्स बार बंद आहेत दिवंगत आर आर पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी कायदा करून डान्स बार मधील नाच बंद केले. मात्र स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादाने मुंबई सह राज्यातील अनेक शहरांमध्ये डान्स बार सुरू आहेत. मुंबईतील ताडदेव ‘ इडियाना रेस्टॉरंट बार ‘ नावाचा बार असून त्यात बेकायदेशीरपणे अश्लील डान्स सुरू असतो. त्यामुळे या बार मध्ये तुफान गर्दी असते या गर्दीत काही चोर, दखलेबाज गुंड,बिल्डर यांच्यासारखे लोक मोठ्या प्रमाणात येत असतात अशी माहिती तिथल्या काही ग्राहकांनीच उघड केली आहे. त्यामुळे या बारवर तत्काळ कारवाई करावी आणि त्याचा परवाना रद्द करावा कारण या बारमुळे या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेला धोका होऊ शकतो असे इथल्या जनतेचे म्हणणे आहे. हा बार ताडदेव पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याने ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करतात काय? असा सवाल इथल्या जनतेने केली आहे.
Similar Posts
देशभरातील अनेक मेडिकल कॉलेजवर इंडीचे छापे
मुंबई/प्रवर्तन निदेशालयाच्या अनेक टीम्सनी गुरूवारी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश ,छत्तीसगढ़, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या राज्यातील १५ ठिकाणी छापे टाकले. कथित भ्रष्टाचार आणि लाचखोरीप्रकरणी हे छापे टाकण्यात आले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांचे नियमन करणाऱ्या नियामक चौकटीत फेरफार करण्यात आल्याचा आरोप होता, त्यानतंर ही कारवाई झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ईडी ने १५…
भाजपकडून शिवसेनेला मोठी चपराक-पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्याचा सत्कार
पुणे/ पुण्यात शिवसैनिकांच्या धक्काबुक्की मध्ये ज्या पायरीवर पाडून सोमय्या जखमी झाले होते त्याच पायरीवर काल भाजपने पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्या यांचा सत्कार केला शिवसेनेला ही एक चपराक म्हणावी लागेल.आठ दिवसांपूर्वी सोमय्या संजय राऊत यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी पुण्यात आले होते.यावेळी पालिका आयुक्तांना भेटायला जाताना काही शिवसैनिक त्यांच्याकडे निवेदन घेवून गेले मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही…
अखेर तब्बल एक वर्षा नंतर शेतकरी आंदोलन स्थगित शेतकऱ्यांनी सरकारला हरवले
दिल्ली/तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या ३८० दिवसांपासून शेतकऱ्यांचे जे आंदोलन सुरू होते ते अखेर काल स्थगित करण्यात आले पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वीच शेतकऱ्यांची माफी मागून तिन्ही कृषी कायदे मागे घेतले होते मात्र शेतकऱ्यांच्या ज्या इतर मागण्या होत्या त्याही मागण्या मान्य करण्यावर शेतकरी अडून बसले होते अखेर या मागण्या बाबत नेमलेल्या पाच सदस्यीय समितीशी…
राहुल सोलापूरकर यांचा भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा
पुणे – अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर अनेक संघटनांनी, शिवप्रेमींकडून आंदोलन करत त्यांना विरोध केला. सर्वांच्याच संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्यात आता सोलापूरकर ज्या भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदी होते त्या पदाचा त्यांच्याकडून राजीनामा मागण्यात आला होता. अखेर त्यांनी राजीनामा दिला असून संस्थेनं त्यांचा राजीनामा स्विकारला आहेअभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती…
मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला – दोन जवान शहीद
इम्फाळ : मणिपूर राज्यातील विष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी ६ वाजता घडली. आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णूपूरला निघाले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.प्रकरणाची…
बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीशकुमार यांचा शपथविधी
नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीए भाजप आघाडीला मोठं बहुमत मिळालं असून २४३ जागांपैकी २०२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामध्ये, नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने येथील निवडणुका लढवल्या होत्या. मात्र, भाजप सर्वाधिक जागा जिंकत येथे मोठा भाऊ बनल्याचं दिसून आलं. त्यामुळे, बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता देशाला होता. अखेर, बिहारचे मुख्यमंत्री म्हणून…
