आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल
Similar Posts
जातनिहाय जनगणना करून देशाचे विभाजन करण्याचा कॉंग्रेसचा डाव – योगी आदित्यनाथ
सांगली – २०१४ च्या आधी देशाचा सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. २०१४ नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झाल्या आहेत. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला असल्याचे प्रतिपादन सीएम योगी आदित्यनाथ यांनी केले. सांगलीमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना योगी यांनी…
एस टी कामगारांचा संप कामगार न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला
मुंबई/ एस टी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आहे कारण संपकरी कामगार संघटनांनी सह आठवडे पूर्वी संपाची नोटीस दिलेली नव्हतीी. त्यामुळे हा संप बेकायदेशीर आहे असे न्यायालयाचे म्हणणे आहे तर दुसरीकडे आमचा हा संप नसून दुखवटा आहे असे एस टी कामगारांचे म्हणणे आहे त्यामुळे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला आमचा हा संप सुरूच राहील असे…
‘गुलाबी कर’ नष्ट करण्यासाठी संवेदनशीलता, जागरूकता आवश्यक !
(प्रा. नंदकुमार काकिर्डे )* भारतासह जगभरात मार्च रोजी ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ साजरा करण्यात आला. सर्वत्र विविध कार्यक्रम, सत्कार, व्याख्याने यांची रेलचेल आढळली. महिलांना सन्मानाची, समानतेची वागणूक देण्याबद्दलच्या आणाभाका,शपथा, निर्धार जाहीर करण्यात आले. मात्र त्याचवेळी महिलांवर आर्थिक अन्याय करणाऱ्या ‘गुलाबी करा’ बद्दल मात्र कोणी चकार शब्द काढलेला दिसला नाही. हा गुलाबी कर नष्ट करण्यासाठी सर्व पातळ्यांवर…
रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण
मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या…
मराठा आंदोलकांना मुंबईत नो एन्ट्री! न्यायालयाचा निर्णय
मुंबई /ओबीसींच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देण्याचा बालहट्ट धरणाऱ्या, आणि त्यासाठी एन गणेशोत्सवाच्या काळात हजारो मराठा बांधवांना मुंबईत आणून आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या, मनोज जरांगे पाटलांना उच्च न्यायालयाने मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे.सरकारने त्यांना मुंबई बाहेर आंदोलन करण्यास सांगावे असे न्यायालयाने म्हटले आहे.त्यामुळे मनोज जरांगे यांची चांगलीच कोंडी झाली आहे.मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतरही ते मुंबईत आंदोलन…
माजी सरकारी डॉक्टरच्या लॉकर मधे ए के ४७ आयएसआयचां हस्तक असल्याचा संशय
श्रीनगर/ जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये खळबळ उडाली आहे. अनंतनागमध्ये माजी सरकारी डॉक्टर अदील अहमद रदर यांच्या लॉकरमधून एके-४७ जप्त करण्यात आली आहे. अदील २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जीएमसी अनंतनागमध्ये कार्यरत होते. ते जलगुंड अनंतनागचे रहिवासी आहेत.या प्रकरणी नौगाम पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. एफआयआर नंबर १६२/२०२५ च्या अंतर्गत भारतीय बंदूक अधिनियमच्या विविध कलमांसह यूएपीएच्या कलमांतर्गत…
