आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल
Similar Posts
घोषित झालेल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू नका सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी- ओबीसी आरक्षणा बाबत राज्य सरकारला दणका
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यानंतर अगोदर घोषित झालेल्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता त्यावरून न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले असून घोषित झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षण शिवाय घ्या असे आदेश दिलेत . या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवायच होणार आहेत राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच…
लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका
मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून…
गणेश भक्तांना खुश खबर पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू तर मुंबई गोवा महा मार्गावर अवजड वाहनांना नो एंट्री
मुंबई/ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात.त्यांच्या प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत करोना मुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दिवा ‘मडगाव,दिवा रत्नागिरी,मुंबई सावंतवाडी, आदी पॅसेंजर गाड्या ७ सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार फेस्टिवल स्पेशल म्हणून कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या धावणार आहेत त्यामुळे चाकरमान्यांचा गणेशोत्सवातील प्रवास सुकर होणार…
सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार घरातीलच उमेदवार उभा करणार
बीड: बारामती लोकसभेच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार त्यांच्याच कुटुंबातील एका व्यक्तीला उभा करतील असा मोठा दावा राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. अजितदादांनी बारामतीमध्ये रविवारी जे भाषण केलं त्यामध्ये अहंकार दिसत होता असंही ते म्हणाले. रोहित पवारांच्या या दाव्यानंतर आता अजित पवारांसोबतचा त्यांच्या संघर्षाला अधिक धार येण्याची चिन्हं आहेत. बीडमध्ये एका…
पालिका निवडणुकीची तयारी सुरू- २३६ वार्डचां सीमा बाबत हरकती व सूचना मागवण्याचा कार्यक्रम निश्चित
मुंबई/महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आला असून २३६ प्रभागांच्या आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे आता ज्या २३६ वार्ड क्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत त्यांच्या बाबत १ फेब्रुवारी ते १४फेब्रुवारी दरम्यान जनतेकडून सूचना आणि हरकती मागवल्या जाणार आहेत त्यासाठी १ फेब्रुवारीला संकेतस्थळावर २३६ प्रभागांच्या यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर १६ फेब्रुवारीला हरकती…
कबुतरांना कारच्या टपावरून दाणे घालणाऱ्या मुजोर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल
मुंबई/ कबुतरांना दाणे घालण्यास विरोध मनाई करण्याचा न्यायालयाचा आदेश डावलून, कबुतरांन दाणे घालणाऱ्या संकलेचा नावाच्या व्यापाऱ्यावर पालिकेने गुन्हा दाखल करून त्याची गाडी जप्त केलीमुंबई उच्च न्यायालयाने दादरमधील कबुतरखान्याच्या परिसरात पक्ष्यांना खाणे टाकण्यास मनाई केल्यानंतर आता जैन समाजातील काही लोकांनी एक नवीन पद्धत सुरु केली आहे. या परिसरातील कबुतरं उपाशी राहू नयेत, यासाठी दादरमध्ये कारच्या टपावर…
