आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल
Similar Posts
राहुल गांधीच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली
मुंबई/ काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या निमित्त म्हणजेच २८ डिसेंबर रोजी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांची एक भव्य सभा होणार होती पण पोलीस आणि महापालिका दोघांनीही या सभेला परवानगी नाकारली आहे त्यामुळे काँग्रेसने न्यायालयात धाव घेतली आहे तसेच महाराष्ट्रात काँग्रेस सत्तेत असूनही राहुल गांधींच्या सभेला परवानगी नाकारण्यात आल्याने काँग्रेस नेते गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर…
उद्या मुंबईच्या काही भगत 10 टक्के पाणी कपात
: मुंबई- पांजरपोळ संकुळातील मुंबई तीन अ उदांचण केंद्रातील ९००मिमी व्यासाची झडप बसवण्याचे काम २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे .या काळात २७ ऑगस्ट रोजी ८ वाजेपर्यंत उदचंद केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे या कलावधीत पश्चिम उपनगरे शहर भागातील सायन,परळ,वडाला वगळून सर्व विभाग तर पूर्व विभागातील कुर्ला व घाटकोपर…
मविआ महिलांना दरमहा ३ हजार देणार – महिलांना मोफत एसटी प्रवास पंचसूत्री जाहीर
मुंबई – महाविकास आघाडीची मुंबईतील बीकेसी येथे प्रचार सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीचे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील उपस्थित राहिले. यावेळी महाविकास आघाडीकडून ५ मोठी आश्वासनं देण्यात आली. आगामी काळात जनतेने महाविकास आघाडीला सर्वाधिक मतदान करुन सरकार स्थापन करुन दिलं तर महाविकास आघाडीचं सरकार राज्यात या ५ योजना जाहीर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशनिवारी नव्या राज्यपालांचा शपथविधी
मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस हे उद्या मुंबईत येणार असून शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेतील दरम्यान मावळते राज्यपाल कोषारी याना आज राजभवनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्यामुळे लोकांनी रस्त्यावर…
सरकारचे आडमुठे धोरण-साध्या बारला परवाना तर ऑर्केस्ट्रा बारवर अन्याय
माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणीची काळी छाया ? ऑर्केस्ट्रा बार कामगारांची उपासमारितून कधी सुटका ?—-बार बंदीच्या विरोधात”आहार” ची न्यायालयात धाव ! मुंबई -( प्रतिनिधी ) कोरोंनाची भीती दाखवून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लावले आहेत त्याचा उद्योग धंद्यांना जबरदस्त फटका बसला आहे .या उद्योगांचे आर्थिक नुकसान तर होतंच आहे पण या उद्योगांवर…
ऑनलाईन लॉटरी मुळे तरुण पिढी बरबाद होण्याच्या मार्गावर
मुंबई/ सध्या मुंबईच्या शहर, पूर्व उपनगरात ऑनलाइन लॉटरी वाल्यांनी हैदोस घातला असून शाळा कॉलेजातील लाखो मुले या ऑनलाईन लॉटरीच्या विळख्यात सापडली आहेत. काही मुले तर या ऑनलाईन लोटरी साठी चोऱ्या करीत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने पालक हादरले आहेत तर पोलिस प्रशासनही सतर्क झाले आहे परिमंडळ पोलिस उपयुक्त यांच्याकडे सामाजिक संघटनांनी या ऑन लाईन लाट्रिवाल्यांवर…
