आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल
Similar Posts
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा प्रताप! कुख्यात गुंड निलेश धायवळच्या भावाला शस्त्र परवाना
पुणे/ कांदिवलीतील बारमुळे अगोदरच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले रामदास कदम यांचे चिरंजीव आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. कदम यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांचा आदेश डावलून पुण्यातील कुख्यात गुंड निलेश धायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याचे उघडकीस आले आहे.आता या संपूर्ण प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून योगेश कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी विरोधकांनी केली…
हिंदू मारला जातो तेव्हा तुमची तोंड बंद का असतात ? योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांना सवाल
लखनौ/बांगलादेशात एक दलित हिंदू मारला गेला त्याबाबत विरोधी पक्षातील लोक काहीच बोलायला तयार नाहीत. पण अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला की सगळेच छात्या पिटाटायला लागतात. हे दुष्टीकरणाचं राजकारण बंद करा असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांना सुनावलेलखनऊ मध्ये सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून…
अचानक बेस्ट बसेसचे 25 मार्ग बदलले तर 45 खंडित केले- प्रवाशांकडून संताप व्यक्त
मुंबईतील बेस्टची बससे सेवा शिस्तबध म्हनुण प्रसिध्द आहे .या सेवाचे देशभर कौतुक होते . कोविड काळात बेस्टने मुंबईकरांना दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. मुंबईची रेल्वे सेवा बंद असताना बेस्टने उतम सेवा दिली . परतू बेस्टच्या अध्यक्षपदावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा सोयीचा माणूस आणि महाव्यवस्थापक बसवला जाऊ लागला त्यापासून या सेवेचे अध;पतन सुरू झाले .अचानक बेस्टने प्रवाशांचे अनेक…
आदित्य ठाकरे यांचे वरळी मतदार संघात संपर्क अभियान सुरू
मुंबई/ शिवसेनेत मोठी फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेतले अनेक नेत्या आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत त्यामुळे ही पडझड थांबवण्यासाठी आता ठाकरे गटाचे नेते आपल्या उरलेल्या पदाधिकाऱ्यांना भेटून गळती थांबवण्याचा प्रयत्न करीत आहेत .वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ सध्या या मतदारसंघात आदित्य ठाकरे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत…
२७ वर्षांची लढाई अखेर संपली – लोकसभेत महिला आरक्षण विधेयक ४५४ मतांनी मंजूर
नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात फक्त दोन सदस्यांनी मतदान केले. महिला आरक्षण विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर घटनादुरुस्ती होईल.महिला आरक्षण कायद्याची १९९६…
पालिका घोटाळ्यातील पैशांचे मनी लोडरिंग सेनेचे काही नेते एडी रडारवर
मुंबई/ पालिकेत टेंडर आणि इतर कामांमध्ये जे घोटाळे झाले आहेत त्यातील पैशाचे मनी लोद्रिंग झाल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे दरम्यान स्थाई समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर नुकताच आयकर विभागाने छापा टाकला नंतर आता एडी कडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांची आर्थिक व्यवहाराची माहिती ई डी गोळा करीत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे सोमय्या केलेल्या आरोपांची छाननी…
