आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल
Similar Posts
उल्हासनगरात अजुन एका इमारतीचा स्लॅब पडला .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरुच आहे . काल कॅंप ४ येथिल सुभाष टेकडी परिसरातील एका तीन मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे . मात्र या इमारतीत कुटुंबे कमी राहत असल्याने कोणती ही जिवीत हानी झाली नाही . ही इमारत महापालिकेने खाली करुन ताबडतोब सील केली आहे . उल्हासनगर शहरात दिवसे…
दुबार मुस्लीम मतदारांकडे मनसे, मविआचे दुर्लक्ष का?भाजपाचा ठाकरे बांधून सवाल
मुंबई प्रतिनिधी:राज ठाकरे यांना दुबार मतदार असलेले हिंदू आणि मराठी माणसे दिसतात. मात्र अनेक मतदारसंघातील दुबार नावे असलेले मुस्लीम दिसत नाहीत. राज ठाकरे यांनाही व्होट जिहादचे दुखणे जडले आहे, असा घणाघात सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन उपस्थित…
भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा भव्य समारोप
मुंबई : भायखळा येथे आयोजित झालेल्या ‘आई प्रिमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी समारोप झाला. या स्पर्धेत सहा संघांनी सहभाग घेतला असून, प्रथम क्रमांक आई महालक्ष्मी संघाला तर द्वितीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला मिळाला. तृतीय क्रमांक आई तुळजाभवानी संघाला लाभला.स्पर्धक संघ आणि त्यांचे मालक १) आई महालक्ष्मी (मालक: शुभम गावकर) – प्रथम क्रमांक२) 2) आई तुळजाभवानी…
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी समारंभाला माजी केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार !
मुंबई – महाराष्ट्र जरी आज ल़ोकमान्य टिळकांना विसरला असला तरी देश लोकमान्य टिळकांना विसरला नाही. स्वातंत्र्याची ती धग आजही ऊराशी बाळगुन असलेले माजी केंद्रीय मंत्री आशीष कुमार चौबे पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानी दर्शनासाठी स्वराज्यभूमी ( गिरगाव चौपाटी ) येथे येत आहेत. त्यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांवर अनेक नाटकं सादर करीत देशभर जन जागृती करणारे…
भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुंबई महानगरपालिकेचे ९६ अधिकारी पुन्हा पालिकेच्या सेवेत
माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती उघडकीसमुंबई/भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण अशी ओळख असलेल्या मुंबई महानगरपालिकेत, काहीही घडू शकते. कधीही कामावर न जाणारे पालिका अधिकारी किंवा कर्मचारी यांची आपोआप पालिकेत हजेरी लागते. आणि त्यांना पगारही मिळतो. अशा घटनाही यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत. आणि आता तर ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले असे ९६ अधिकारी कर्मचारी पुन्हा पालिकेच्या सेवेत घेण्यात आले अशी…
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
