आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय आणि वाढत्या लोकसंख्येच्या बरोबरीने समस्या सुधा वाढत आहेत.आणि याची अनेक कारणे आहेत त्यातले पाहिले कारण म्हणजे लोकांच्या मेहनतीचा पैसा देव, धर्म, पुतळे, स्मारके यासारख्या अनावश्यक गोष्टींवर खर्च केला जातोय आणि जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांसाठी कर्ज काढले जातेय आणि ही परिस्थिती असताना पंतप्रधान देशाला आर्थिक महासत्ता बनवायला निघालेत .वर्षाच्या ३६५ दिवसांपैकी २०० दिवस आम्ही सुट्ट्या घेऊन काम धंदे बंद ठेवतोय त्यामुळे देशाचे उत्पादन आणि सरकारचा महसूल बुडतो आहे असे असताना देश कसा महासत्ता बनणार याचे उत्तर पंतप्रधान मोदींकडे नाही ..वास्तविक या देशात सर्व काही आहे विपुल खनिज संपत्ती आहे मोठ्या प्रमाणात अन्न धान्याचे उत्पादन होतेय प्रचंड असे मनुष्यबळ आहे बऱ्यापैकी उद्योगधंदे आहेत पण या सर्वातून मिळणाऱ्या पैशाचा योग्य वापर होत नाही. एक लाख कोटी धर्म ,स्मारके,आणि इतर अनावश्यक गोष्टींसाठी अब्जावधी रुपयांची उधळपट्टी पण यातून काय मिळणार आहे ? हाच पैसा जर उद्योग धंद्यासाठी वापरला असता तर लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता या पैशातून शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या असत्या तर त्याचा 18 मुलांना उच्च शिक्षित होण्यासाठी लाभ मिळाला असता याच पैशातून जर देशाच्या वेगवेगळ्या भागात अत्याधुनिक रुग्णालये उभी राहिली असती तर त्याचा जनतेच्या आरोग्याला फायदा झाला असता पुतले,स्मारके आणि बुलेट ट्रेन सारख्या अनवाह्या गोष्टींचा लोकांना काय फायदा ? सरकार मध्ये के कुणी बसले आहेत त्यांच्या जुनाट धार्मिक मानसिकतेत कधी परिवर्तन होणार आहे कुणास ठाऊक? जोवर आम्ही शाश्वत गोष्टींमध्ये विश्वास मानून त्यात परिवर्तनाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणार नाही तोवर या देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास होणार नाही आणि तसे झाले तरच आपल्याला सारे जहसे अच्छा हिंदुस्तान हमारा असे म्हणण्याचा अधिकार असेल
Similar Posts
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाला जगज्जेता
महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला जगज्जेतेपद जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये भारताला जिंकून दिले सुवर्ण कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा केला पराभव.विनिपेग (कॅनडा), दि.३० (क्री.प्र.)- महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या…
शिंदे गटाचा जल्लोष तर ठाकरे गटाची तोडफोड
मुंबई-राहुल नार्वेकर यांनी आमदार पात्र- अपात्रतेवर निकाल देताना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करण्यास नकार दिला तसेच खरी शिवसेना शिंदेंचीच आहे असे जाहीर करताच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फटाके लावून तसेच पेढे वाटून आनंद साजरा केला तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारले . वर्ध्यात एसटी बसेसवर दगडफेक केली…
पहिल्या टप्प्यात देशभर उत्साही मतदन महाराष्ट्रात ५५.२९ टक्के
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदार संघात सरासरी ५५.२९ टक्के मतदान झालेमहाराष्ट्रात सर्वाधिक ६५ ट क्के मतदान गडचिरोली_ चिमूर मध्ये झाले.तर सर्वात कमी मतदान नागपूर मधे ४७ ट क्के झाले.महाराष्ट्रात जरी कमी मतदान झाले असले तरी ईशान्य भारतात ६५ ट क्क्याहून अधिक मतदान झाले पश्चिम बंगाल मधे…
ग्राहकांच्या हक्क संरक्षणासाठी लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा
दिल्ली/ सरकार कधी कधी जनतेच्या हित लक्षात घेऊन कायदे करीत असते पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने असे चांगले कायदेही परिणामकारक ठरत नाहीत उत्पादक विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील समंव्यासाठी सरकार लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा आणणार आहे.या कायद्या नुसार उत्पादक किंवा विक्रेता जी वस्तू ग्राहकाला विकेल त्या वस्तूची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक असेल उदाहरणार्थ एखाद्या…
राममंदिराच्या उदघाटन सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. बुधवारी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आणि उडिपी शंकराचार्य गोविंद गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोदींनी त्यांनी आमंत्रित केले. पंतप्रधानांनी देखील त्यांचे निमंत्रण स्वीकारले असून कार्यक्रमाला हजर राहण्याचे त्यांनी आश्वासित केले. चंपत राय…
शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन कायदे करणार कृषी मंत्र्यांची घोषणा
बस्तर/राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही…
