लखनौ/बांगलादेशात एक दलित हिंदू मारला गेला त्याबाबत विरोधी पक्षातील लोक काहीच बोलायला तयार नाहीत. पण अल्पसंख्याकांवर अत्याचार झाला की सगळेच छात्या पिटाटायला लागतात. हे दुष्टीकरणाचं राजकारण बंद करा असे योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत बोलताना विरोधकांना सुनावले
लखनऊ मध्ये सध्या उत्तर प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात कायदा व सुव्यवस्थेबद्दल बोलताना योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की बांगलादेशात एका दलित हिंदूला जिवंत जाळण्यात आले, परंतु त्यावर विरोधी पक्षातले कोणीही काही बोलायला तयार नाहीत. याउलट अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात ज्या काही घटना घडल्या आहेत त्याबाबत हे लोक नेहमीच बोलत असतात. भारतात अल्पसंख्यांकांवर अन्याय झाला तर त्यावर गळे काढत असतात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवला की यांना राग येतो. परंतु बांगलादेशात हिंदू शीख यांच्यावर जे अन्याय सुरू आहेत, ज्या अत्याचार सुरू आहेत, त्याबद्दल या लोकांना काहीही पडलेली नाही .ही विरोधी पक्षाची दुहेरी भूमिका म्हणजे एक प्रकारे जनतेचा विश्वासघात आहे परंतु यापुढे आम्ही हे सगळं खपवून घेणार नाही बांगलादेशला जशास तसे उत्तर देण्याची क्षमता आमच्या मध्ये आहे असा इशाराही योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे

