मुंबई – मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याच्या पालिकेच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत . प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत .मात्र एखाद्याच्या फायद्यसाठी प्रदूषण हटवण्यासाठी काहीतरी करतोय असा देखावा मात्र केला जातो त्याचे एक जीवंत उदाहरण समोर आले आहे . पालिकेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली . पण एकीकडे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायची आणि दुसरीकडे पेट्रोल डीझेलवर उधळपट्टी करायची हे पालिकेचे काहीसे विचित्र धोरण म्हणावे लागेल .पालिकेच्या ताब्यात सध्या 966 वाहने आहेत त्यात पेट्रोल डिझेल आणि सी एन जी वर चालणार्या वाहनांचा समावेश आहे .आणि याच ताफ्यात 5 इलेक्ट्रिकल वाहनांचा समावेश करण्यात आला त्यातील एक वाहन महापौरांच्या ताफ्यात आहे टाटा नेकसोन इव्ही एक्स्जेड्प्लसया मॉडलच्या पाच ही कार या क्ंद्रच्या अखत्यारीतील एनर्जी एफिश्येंसी सर्व्हिसेस य कंपनिकडून ड्रायलीज पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत .मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी यापुढे अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासन सांगते . मग पेट्रोल डिझेल च्या वाहन खरेदीवर उधळपट्टी का?
Similar Posts
सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ काम–साकेत इन्फ्रा ह्या कंपनीला अभय
सिमेंट रस्त्याचे निकृष्ठ कामामुळे पोलीस चौकी समोरच टेंपो अडकला खड्यात ! .. भिवंडी -भिवंडी – कल्याण – शीळ या रस्त्याच्या कामात ठेकेदाराने हलगर्जीपणा व मनमानी कारभार केला असून या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याची तक्रार मार्च २०२१ मध्ये नुकताच पंचायतराज राज्यमंत्री पदाचा पदभार घेणारे खासदार कपिल पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे भिवंडी तालुका अध्यक्ष…
गुजरात मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले -1आणि 5 डिसेंबरला मतदान- 8 तारखेला निकाल
गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017…
शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत – पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपाची लढाई
मुंबई/ शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या भारत- पाक प्रमाणे आरोप प्रत्यारोपणाची लढाई सुरू आहे शनिवारी उद्धव ठाकरे यांनी भाजपचे कपडे फाडले रविवारी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे कपडे फाडले. . बाबरी कोणी पडली यावरून हमरी तुमरी सुरू आहे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले होते की बाबरी पडायला फडणवीस गेले असते तर त्यांच्या वाजनानीच बाबरी पडली अस्ती त्यावर…
वय आणि पदाचा मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही- राजने राज्यपालांना खडसावले
मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल…
कुलाबा फेरीवाल्यांवर कारवाईचे नाटक
मुंबई/ सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई असा नारा देणाऱ्या महापालिकेने मुंबईतील फुटपाथ आणि काही ठिकाणचे रस्ते सुधा जणू काही फेरीवाल्यांच्या नावे केले आहेत त्यामुळे मुंबई दिवसेंदिवस बकाल होत चालली आहे. पालिकेचा अतिक्रमण विभाग केवळ देखल्या दंडवत या म्हणी प्रमाणे नावाला कारवाई करतो पण पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती! ६ डिसेंबर रोजी पालिकेच्या ए विभाग अतिक्रमण…
पालिका निवडणूक पुढे ढकलण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आग्रह
मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी…
