मुंबई – मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याच्या पालिकेच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत . प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत .मात्र एखाद्याच्या फायद्यसाठी प्रदूषण हटवण्यासाठी काहीतरी करतोय असा देखावा मात्र केला जातो त्याचे एक जीवंत उदाहरण समोर आले आहे . पालिकेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली . पण एकीकडे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायची आणि दुसरीकडे पेट्रोल डीझेलवर उधळपट्टी करायची हे पालिकेचे काहीसे विचित्र धोरण म्हणावे लागेल .पालिकेच्या ताब्यात सध्या 966 वाहने आहेत त्यात पेट्रोल डिझेल आणि सी एन जी वर चालणार्या वाहनांचा समावेश आहे .आणि याच ताफ्यात 5 इलेक्ट्रिकल वाहनांचा समावेश करण्यात आला त्यातील एक वाहन महापौरांच्या ताफ्यात आहे टाटा नेकसोन इव्ही एक्स्जेड्प्लसया मॉडलच्या पाच ही कार या क्ंद्रच्या अखत्यारीतील एनर्जी एफिश्येंसी सर्व्हिसेस य कंपनिकडून ड्रायलीज पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत .मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी यापुढे अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासन सांगते . मग पेट्रोल डिझेल च्या वाहन खरेदीवर उधळपट्टी का?
Similar Posts
अखेर पेंग्विन 15 कोटीची निविदा रद्द- विरोधकांच्या दणक्यापुढे पालिका प्रशासन नमले
जिजामाता भोसले उद्यान मध्ये पेंग्विनच्या तीन वर्षाच्या देखभालीसाठी 15 कोटी रुपये खर्चाची निविदा मागवली होती .त्यावरून विरोधकांनी आणि सत्ताधारी शिवसेनेसह पालिका प्रशासनाला धारेवर धरले. सन 2018 – २०२० या कालावधित देखभालीसाठी १० कोटी खर्चे आला होता . या खर्चात आणखी ५ कोटीची वाढ कशी झाली असा सवाल विरोधकांनी केला . काढलेल्या निवेदा रद्द कराव्यात अशी…
परळ उड्डाण पूल १ जूनपासून दुचाकी व अवजड वाहनांना बंद
मुंबई – मुंबई शहर आणि पूर्व उपनगर यामधील महत्वाच्या दुवा असणाऱ्या परळ टीटी उड्डाणपूलाच्या डागडुजीचे काम मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळी कामांसाठी उड्डाणपूलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपूलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या 1 जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे….
उल्हासनगर महापालिका शिक्षण समितीच्या सभापतीना धमकीचे पत्र .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार चव्ह्याट्यावर आणणारे मनविसे चे शहर अध्यक्ष मनोज शेलार यांच्या वर प्राण घातक हल्ला झाला होता त्याच पध्दतीने तुम्ही काम केले तर तुम्हाला ही मनोज शेलार प्रमाणेच धडा शिकवु असे धमकीचे पत्र शिक्षण विभागाच्या सभापती शुभांगी बेहनवाल याना त्यांच्या कार्यालयात मिळाले आहे. या पत्रामुळे महापालिका क्षेत्रात…
मुंबई महापालिकेकडून काळया यादीतील दोन कंत्राटदारांना पुन्हा रस्त्याच्या कामांचे कंत्राट
मुंबई/ एखाद्या कंत्राटदारांनी चुकीचे काम केले तर पुन्हा आपण त्याला काम देत नाही मात्र मुंबई महापालिका त्याला अपवाद आहे कारण कंत्राटदारांनी कितीही निकृष्ट दर्जाचे काम केले आणि त्यात मुंबईकरांच्या घामाचा कितीही पैसा लुटला तरी पालिकेत सत्ताधारी,कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची जी युती आहे त्या युतीकडून ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा कामे दिली जातात आतहीआतही मुंबईच्या रस्त्यावर…
महाराष्ट्रात पुन्हा मास्क
मुंबई – राज्यात सध्या कोरोना हद्दपार झाल्यासारखे वाटत असल्याने अनेकजण बिनधास्त वावरताना दिसत आहेत.मात्र राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली,नोएडा,एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता…
चौकाच्या नामकरणाच्या निमित्ताने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे ‘हम साथ साथ है’ ; बोरिवलीत भाजपचे गोपाळ शेट्टी आणि शिवसेनेच्या विशाखा राऊत, विश्वनाथ नेरुरकर एका मंचावर
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’ च्या…
