मुंबई – मुंबईला प्रदूषणमुक्त करण्याच्या पालिकेच्या घोषणा फक्त कागदावरच आहेत . प्रत्यक्षात मात्र मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी फारसे प्रयत्न होताना दिसत नाहीत .मात्र एखाद्याच्या फायद्यसाठी प्रदूषण हटवण्यासाठी काहीतरी करतोय असा देखावा मात्र केला जातो त्याचे एक जीवंत उदाहरण समोर आले आहे . पालिकेने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाच इलेक्ट्रिक वाहने खरेदी केली . पण एकीकडे इलेक्ट्रिक वाहने खरेदी करायची आणि दुसरीकडे पेट्रोल डीझेलवर उधळपट्टी करायची हे पालिकेचे काहीसे विचित्र धोरण म्हणावे लागेल .पालिकेच्या ताब्यात सध्या 966 वाहने आहेत त्यात पेट्रोल डिझेल आणि सी एन जी वर चालणार्या वाहनांचा समावेश आहे .आणि याच ताफ्यात 5 इलेक्ट्रिकल वाहनांचा समावेश करण्यात आला त्यातील एक वाहन महापौरांच्या ताफ्यात आहे टाटा नेकसोन इव्ही एक्स्जेड्प्लसया मॉडलच्या पाच ही कार या क्ंद्रच्या अखत्यारीतील एनर्जी एफिश्येंसी सर्व्हिसेस य कंपनिकडून ड्रायलीज पद्धतीने खरेदी करण्यात आल्या आहेत .मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी यापुढे अशा प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर दिला जाणार असल्याचे पालिका प्रशासन सांगते . मग पेट्रोल डिझेल च्या वाहन खरेदीवर उधळपट्टी का?
Similar Posts
रुग्णालयात कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या व सफाई काम ठेकेदाराकडून पालिकेला चुना ! अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे च्या पाहणीत ठेकेदाराचे पितळ उघडकीस
मुंबई/आपली मुंबई महानगर पालिका ही कितीही श्रीमंत असली तरी पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे .पण याच पैशावर पालिकेतील काही कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसा डल्लं मारतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे.पालिकेच्या रुग्णालयामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत आणि हे कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना पालिका दरमहा लाखो रुपये देते पण त्या बदल्यात कंत्राटी…
.तर पुन्हा कडक लॉक डाऊन लावावा लागेल-मुख्यमंत्री
मुंबई/ कोरोंना अजूनही गेलेला नाही उलट तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी नागरिकांनी बेफिकीर राहू नये .सरकारने ज्या सूचना आणि नियम केले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे कारण आपल्या बेफिकीरी मुले पुन्हा कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा लॉक डाऊन लावावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे.आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राज्यातील…
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
समुद्राचे प्रदूषण महापालिकेला २८ कोटींचा दंड
मुंबई/ सांडपाण्याच्या द्वारे समुद्रात कचरा सोडल्या प्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगर पालिकेला २८ कोटीचा दंड ठोठावला आहे मुंबईच्या नाल्यांमधून समुद्रात जे सांडपाणी तसेच मलनिःसारण केले जाते त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्रात सोडला जातो अशी तक्रार शक्ती नावाच्या एका सामाजिक संघटनेने हरित लवादाकडे केली होती यावर चौकशी होऊन लवादाने पालिकेला हा दंड ठोठावला आहे
पालिकेच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या दोषी अधिकार्यांवर थातुरमातुर करवाई
मुंबई – मुंबई महानगर पालिकेतील घोटाळेबाजणा पालिका प्रशासन कशा प्रकारे पाठीशी घालते याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर पालिकेने केलेली थातुर मातुर करवाई ! वास्तविक कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटे लोटे असताना निविदा प्रक्रीये पासून प्रत्यक्ष कामा पर्यन्त कंत्राटदार पालिका अधिकार्यांचे खिसे गरम करीत असतात .आणि हे…
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती -शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक अशा पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष अर्थात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहेपदांची नावेकनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यकपद संख्या एकूण १५…
