ठाणे – रस्त्यावरील खड्डे हे पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे पाप आहे पण यावेळी लोकांनी आवाज उठवतच अनेकांचे बळी घेणार्या भिवंडी पढघा रस्त्यावरच्या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाहणी करावी लागली आणि या प्रकरणी ठाणे पालिका प्रशाशनातील 4 अभियंताना निलंबित करण्यात आले तर ठेकेदाराणाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . ठाण्यात जशी कारवाई झाली तशी मुंबईत का नाही असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत ? मुंबईच्या रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे आणि ते खड्डे भरण्यासाठी पालिकेला पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतोय यात पालिका अधिकारी आणि ठेकेदारांची चांदी होतेय .सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कधी तरी मुंबईच्या रस्त्यांकडेही पाहावे कारण रस्त्याचे निकृष्ट काम करून मुंबई महापालिकेला चुना लावणारे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार हे काही सरकारचे जावई नाहीत मग त्यांना कशासाठी सरकार अभय देते .एकदा त्यांचीहि चौकशी सरकारने सुरू करावी आणी .त्यांच्यावरी कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .
Similar Posts
मुंबई महापालिकेसाठी भाजपचे मिशन १५०- भाजपला ६० मध्ये ऑल आऊट करू – संजय राऊत
मुंबई/ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, मुंबई महापालिका निवडणूक घेण्यासाठी हे सरकार घाबरत आहे. हे सरकार निवडणुकीपासून पळ काढत आहे. त्यांनी १५० जागा जिंकण्याची भाषा केली आहे, पण आम्ही त्यांना ६० च्या आत आऊट करू. याला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते मनोज कोटक म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे. कोटक यांच्यापाठोपाठ आता…
अति.आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांचा बदल्या,बढत्या रॅकेटसला दणका – पालिकेतील बदल्या,बढत्या चे रॅकेटस उध्वस्त करण्याची गरज- एक अधिकारी त्याच मलईदार पदावर 30 वर्ष राहतोच कसा ?
मुंबई (किसन जाधव) महापालिकेची मुदत आता संपलेली असून मुंबईसह मुदत संपलेल्या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहे. अशावेळी मुंबई महापालिकेच्या बदल्या आणि बढत्यांमधले झोल हळू हळू उघडकीस येत आहेत. यात बड्या प्रशासकीय अधिकारी पासून अभियंते, लिपिक आणि शिपाई पर्यंत सर्वांनीच हात धुवून घेतले आहेत. पण पालिकेत जसे भ्रष्ट अधिकारी आहेत तसेच काही प्रमाणिक अधिकारी सुधा आहेत ….
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसुरक्षा वाटपाचा बाजार
सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा हा एक प्रकारे अन्याय आहे असे वाटायला लागते .आणि जे लोक चर्चेत राहण्यासाठी मुद्दाम वाद निर्माण करतात आणि आपल्या अवतीभोवती नवेनवे शत्रू निर्माण करीत असतात अशा लोकांना सुरक्षा का दिली जाते? कंगना राणावत,नवनीत कौर,किरीट सोमय्या…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
यशवंत जाधव याना ईडी चे समन्स
मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
