ठाणे – रस्त्यावरील खड्डे हे पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांचे पाप आहे पण यावेळी लोकांनी आवाज उठवतच अनेकांचे बळी घेणार्या भिवंडी पढघा रस्त्यावरच्या खड्ड्यांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना पाहणी करावी लागली आणि या प्रकरणी ठाणे पालिका प्रशाशनातील 4 अभियंताना निलंबित करण्यात आले तर ठेकेदाराणाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . ठाण्यात जशी कारवाई झाली तशी मुंबईत का नाही असा सवाल मुंबईकर विचारीत आहेत ? मुंबईच्या रस्त्यांवरही खड्ड्यांचे साम्राज्य आहे आणि ते खड्डे भरण्यासाठी पालिकेला पुन्हा पुन्हा खर्च करावा लागतोय यात पालिका अधिकारी आणि ठेकेदारांची चांदी होतेय .सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी कधी तरी मुंबईच्या रस्त्यांकडेही पाहावे कारण रस्त्याचे निकृष्ट काम करून मुंबई महापालिकेला चुना लावणारे पालिका अधिकारी आणि कंत्राटदार हे काही सरकारचे जावई नाहीत मग त्यांना कशासाठी सरकार अभय देते .एकदा त्यांचीहि चौकशी सरकारने सुरू करावी आणी .त्यांच्यावरी कारवाई करावी अशी मागणी मुंबईकर करीत आहेत .
Similar Posts
राज्यपालांच्या हस्ते केईएम, नायर, कूपर हॉस्पिटल अधिष्ठाता सन्मानित-
राज्यपालांच्या उपस्थितीत महिला बाउन्सर पथक निर्मितीची घोषणा मुंबई-करोनाच्या कठीण काळात डॉक्टर, नर्सेस, समाजसेवक, शासकीय अधिकारी, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आदी सर्वांनी अंतःकरणपूर्वक प्रशंसनीय काम करून करोनावर मात केली. मात्र करोनाचा धोका अद्याप पूर्णपणे टळला नाही. यासाठी मास्क परिधान करणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम सातत्याने पाळल्यास करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका राहणार नाही, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह…
उद्धव ठाकरेनी करून दाखवले — मंत्रालयातील ३०० अधिकाऱ्यांच्या फेरबदल्यामुळे पालिका अधिकाऱ्यांची घबराट
मुंबई/ वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या मंत्रालयातील ३०० सरकारी बाबूंच्या बदल्या करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी मुजोर प्रशासनाला चांगलाच दणका दिला आहे.त्यामुळे आता मुंबई महानगर पालिकेत एकाच विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या पालिका अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच घबराट माजली आहे .कारण दोन्ही ठिकाणी शिवसेनाच सतेत आहे कारण जर मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येने अन्य खात्यात…
सरकार असो की विरोधी पक्ष या लोकांना जनतेच्या प्रति त्यांची असलेली जबाबदारी कधी कळणार?
भारतीय लोकशाहीत आता सर्वसामान्य माणसाला फारशी किंमत राहिलेली नाही कारण राजकारण आणि राजकीय पक्ष याचे पूर्णपणे व्यावसायिकरण झालेले आहे त्यामुळे सामान्य माणूस केवळ निवडणुकीत मतदान करण्या पुरताच उरला आहे.लोकांच्या प्रश्नांची कुणाला काहीही पडलेली नाही आता हेच बघान राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला आहे त्यावर चर्चा करायची सोडून विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून…
अतिक्रमण हटवण्यासाठी लाच मागणाऱ्या पालिकेच्या अभियंत्याला अटक
मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार…
पालिका अधिकाऱ्यांमुळे फेरीवाल्यांच्या दिवाळीला चार चांद! -ग्रँट रोड आणि फॅशन स्ट्रीट वर नियमांची पायमल्ली-अतिक्रमण निर्मूलन खात्याचा आशीर्वाद
मुंबई/ अतिक्रमण करणाऱ्या झोपडपट्टी वासियानी ज्याप्रमाणे मुंबईतील फुटपाथ व्यापल्या आहेत . त्याच प्रमाणे फेरीवाल्यांनी सुधा आपल्या मालाचा बाजार मांडून अर्धे रस्ते व्यापले आहेत ग्रँट रोड मध्ये जे छोटे स्टॉल वाले आहेत त्यांनी स्टॉलचा बाहेर खोके टाकून अर्धे रस्ते अडवले आहेत त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या लगतचे रस्ते असोत की डी बी मार्ग पोलिस स्टेशन समोरचा फूटपाथ ‘…
कुलाब्यातील पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईच्या देखाव्यातून मुंबईकरांची फसवणूक
मुंबई/ पालिका अधिकारी आणि फेरीवाल्यांचेेे साटेलोटे असतातच पण मुंबईतले फेरीवाले सुधा पालिका अधिकाऱ्यांचे इन्कम सोर्स बनले आहेत त्यामुळेच मुंबईतील अनेक रस्ते फेरीवाल्यांनी आपल्या नावावर केलेत पूर्वी फुटपाथ त्यांच्या नावावर असायच्या आता रस्तेही त्यांच्या मालकीचे झालेत आणि त्यामुळेच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे काही दिवसांपूर्वी मुंबई जनसत्त्ता नळ बाजार मधील मंडई जवळचा रस्ता…
