मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल बोलताना या माणसाच्या पदाचा आणि वयाचा विचार करतो अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही असे सांगितले . उद्वव ठाकरे हे सतेसाठी कोणाचाही हातात हात घेतील . शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आता फिरत आहेत अशा शब्दात उद्धव वर टीका केली तसेच अजूनही काही मशिदींवरील भोगे मोठ्या आवाजात वाजत आहे तेंव्हा अगोदर पोलिसांकडे तक्रार करा आणि कारवाई झाली नाही तर जिथे हे भोंगे वाजतील तिथे ट्रक लावा आणि दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा असे आदेश कार्यकर्त्यांना दिले .
Similar Posts
विधानमंडळासाठी आधी बा.बा. नंतर इंटरनेट, गूगल, फाईल्स डाउनलोड सर्वकाही
–कराडमध्ये जसे पृथ्वीराजबाबा, कृष्णा मेडिकलमध्ये जसे सुरेशबाबा… विधानभवनात पाउल टाकले की… आमदार, मंत्री त्या सर्वांसाठी गं्रथालयातले बाबा….पण, गं्रथालयातले हे ‘बाबा’ पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी हे तसे ‘बाबा’ नाहीत. त्यांच्या अद्याक्षरात बा.बा. असा क्रम आहे. म्हणजे त्याच नाव आहे बाळासाहेब बाबूराव वाघमारे… या अद्याक्षरातून नाव तयार झालं…. बा.बा… पण विधानभवनात आमदार असो, मंत्री असो सर्वांनी अद्याक्षरातली…
सणांपेक्षा जीव महत्वाचा-मुख्यमंत्री
मुंबई/ सध्या करोनाचा संकट काळ सुरू आहे अशावेळी गर्दी करून कोरॉनाचा प्रादुर्भाव वाढवू नका सण काय नंतरही साजरे करता येतील पण सणापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी जनतेला आवाहन केले आहे त्याच बरोबर राजकीय पक्षांनी सुधा या संकट काळात कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेऊन गर्दी करू नये असेही म्हटले आहे मुख्यमंत्र्यांच्या…
राज्यातील गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी व अतिक्रमणे रोखण्यासाठी जिल्हास्तरीय कमिटी
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार मुंबई – गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्र राज्यात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत एकूण ४७ केंद्र संरक्षित किल्ले आणि पुरातत्व व वस्तुसंग्रहालये…
महायुतीत मुख्यमंत्री पदावरून धमासान सुरु ! फडणवीस कि शिंदे ?
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीने बम्पर यश मिळवले आहे. त्यामुळे त्यांचे सरकार येणार हे जवळपास नक्की असले तरी आता मुख्यमंत्री पदावरून वाद सुरु झाले आहेत. १३२ जागा जिंकणारी भाजपने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद सोडायला तयार नाही. त्यामुळे भाजपा नेत्यांकडून त्यांची समजूत काढण्याचे पयत्न सुरु आहेत तर अजित पवार गटाने भाजपला…
आरोप होऊनही अजित पवारांकडून पाठराखण – धनंजय मुंडेना पक्षात मानाचे स्थान
मुंबई : संतोष देशमुख हत्येप्रकरणी विरोधकांसह सहकारी पक्षांच्या आमदारांच्या निशाण्यावर असतानाही धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी पक्षात मानाचे स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी पक्षाकडून कोअर ग्रुप स्थापन करण्यात आला आहे. ज्यामध्ये दिग्गज नेत्यांच्या सोबतीने धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत पत्रक काढून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
मेट्रो वूमन ते कोस्टल रोड वूमन, आता मुंबई महापालिका ची पहिली महिला आयुक्त: आश्विनी भिडे
मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव घेताच ओठांवर येतात ‘मेट्रो वूमन’ हे शब्द. अभियांत्रिकी शिक्षण नसतानाही प्रशासकीय अनुभवाच्या बळावर त्यांनी मुंबई मेट्रो प्रकल्पाला गतिमान केले. कासवगतीने चाललेल्या या प्रकल्पाला त्यांनी वेग दिला, म्हणून अधिकाऱ्यांपासून जनतेपर्यंत सर्वांनी ‘मेट्रो वूमन’ ही पदवी दिली. आता त्यांची दुसरी ओळख ‘कोस्टल रोड वूमन’. मुंबई महापालिका (BMC) च्या प्रिन्सेस स्ट्रीट-वरळी…
