उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे उर्फ शिवड्या आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता.यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.हेडफोन मागण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि याच किरकोळ वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तिथेच टाकून सूरज पसार झाला. सकाळी याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आणि या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली.तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली.त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्ह्याया थोरात, गुन्हे प्रकटीकरण हर्षल राजपूत,निलेश तायडे, रोहितदास बुधवंत, हरिश्चंद्र घाणे,पांडुरंग पथवे,समीर गायकवाड,गणेश राठोड, वैजीनाथ राख,कृपाल रोकडे,हनुमंत सानप,मंगेश वीर यांनी कामगिरी केली आहे.
Similar Posts
व्हीजीएन ज्वेलर्स चा मालक याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक
ठाणे: गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची जवळपास ८ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘ व्हीजीएन ज्वेलर्स मालक विरीथगोपालन नायर याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने नायर याला ९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
बीड मध्ये सख्ख्या बहिणींचे मृतदेह सापडले- हत्या की आत्महत्या?
बीड/ मैत्रिणीच्या वाढ दिवसाला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींच्या आत्महत्येने बीड हादरले असून या आत्महत्येची पोलीस चौकशी करीत आहेत कारण ही अत्यंत गंभीर घटना आहे बीडच्या फ्लावर्स काँटर भागात राहणारे अल्ताफ शेख यांनी आपल्या दोन मुली सानिया आणि नीता यांना त्यांच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्यामुळे सकाळी मोरेवाडीतील यशवंतराव चव्हाण चौकात सोडले होते. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता स्वाराती…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईनगरमध्ये लव्ह जिहाद – चौघांना अटक
अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादची धक्कादायक घटना घडली आहे. लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये जिल्ह्यातील मुलगी सापडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलं, तसंच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे तरुणी धास्तावली यानंतर तिचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख…
धक्कादायक ! बोरिवलीत भाजप च्या कार्यालयातच महिलेचा विनयभंग आणि मारहाण–खासदार गोपाल शेट्टी व आमदार सुनील राणे यांना पत्र लिहून मदत मागितली होती .
मुंबई – महिलांवरील अत्याचारा बाबत आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवणार्य भाजप नेत्यांना त्यांच्या पक्षाच्या कार्यालयात काय चालले आहे याचीही कल्पना असला हवी भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणार्या बोरिवलीत एका भाजप नगरसेविकेच्या कार्यालयातच कार्यालयातच एका महिलेचा लैंगिक छळ झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली असून ए एन आय या वृत्त संस्थेने या बाबतचे वरुन दिल्याने मुंबईत मोठी…
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
मुंबई ( कुर्लात) सामूहिक बलात्कार
मुंबई – राजधानी मुंबई आता खरोखरच महिलांसाठी सुरक्षित राहिलेली नाही . कारण शक्ती मिल आणि साकीनाका येथील बलात्काराची घटना ताजी असताना आता पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने महिलांमध्ये भीती आणि संतापाची लाट पसरली आहे महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुंबईमध्येही अशा घटनांचं प्रमाण वाढीस लागलं आहे. अशीच एक धक्कादायक आणि संतापजनक…
