उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे उर्फ शिवड्या आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता.यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.हेडफोन मागण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि याच किरकोळ वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तिथेच टाकून सूरज पसार झाला. सकाळी याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आणि या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली.तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली.त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्ह्याया थोरात, गुन्हे प्रकटीकरण हर्षल राजपूत,निलेश तायडे, रोहितदास बुधवंत, हरिश्चंद्र घाणे,पांडुरंग पथवे,समीर गायकवाड,गणेश राठोड, वैजीनाथ राख,कृपाल रोकडे,हनुमंत सानप,मंगेश वीर यांनी कामगिरी केली आहे.
Similar Posts
भिवंडीत गौरीपाडा व अंबिका नगरात सुरु झाले श्रावणी तीन पत्ती काठी लाठी जुगार, राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग, पोलीस निंद्रावस्थेत …
भिवंडी (प्रतिनिधी ) दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी भिवंडी शहरातील काही महत्त्वाच्या ठिकाणी तीन पत्ती श्रावणी क्लब लाठी क्लब काठी आणि पत्ते क्लब भोईवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गौरीपाडा याठिकाणी भिवंडीतील जुगार माफिया यांच्या संयुक्त भागीदारीतून खुलेआम तीन पत्ती जुगार सुरू झाला आहे.खासकरून मुंबई, उल्हासनगर,ठाणे आणि गुजरात वरूनही खास महिला खेळाडू यात सहभाग घेत आहे….
डिलाईल रोडच्या कडदोडी चाळीत, एकाच रात्री दोन घरफोड्या
मुंबई- दिवाळीच्या तोंडावर आजकाल मुंबईत चोर्या लुटमार घरफोड्या यांचे प्रमाण वाढले असून डिलाई रोड येथील कडदोडी चाळीत बुधवारी दिंनाक- 27 आक्टोबर 2021 रोजी एकाच रात्री दोन घरात घरफोडी होऊन रोकड आणि मौल्यवान वस्तू चोरट्याने पळवल्या त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणी ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी…
गुजरातच्या किनाऱ्यावर ३०० किलो ड्र्ग आणि शस्त्रांसह १० पाकिस्तान्यांना अटक
ओखा – गुजरातच्या किनाऱ्यावरून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा प्रयत्न फसला आहे. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त मोहिमेत एक पाकिस्तानी बोट गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर पकडण्यात आली असून त्यातून शस्त्रास्त्रे ,दारुगोळा आणि ३०० किलो अमली पदार्थांसह १० पाकिस्तानी अतिरेक्यांना अटक करण्यात आली गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले…
अतिरेकी संघटनेशी संबंधिताना अटक
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
बाल हत्याकांडातील दोन बहिणीना फाशी ऐवजी जन्मठेप
मुंबई/संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ९ मुलांच्या हत्याकांडातील क्रूर आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी फाशी रद्द करून न्यायालयाने त्यांना जाठेपेची शिक्षा ठोठावली आहेे.दरम्यान, महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीने विविध भागातून १३ बालकांचे अपहरण करून त्यापैकी ज्या मुलांनी…
दहिसर मध्ये डान्सबार वर छापा
मुंबई -चिरंजीव अँड रेस्टॉरंटआणि जयप्रीत या डान्स बार वर समाजसेवा शाखेच्या अधिकार्याने छापा टाकून कारवाई केली .त्यामध्ये पोलिसांनी 34 बारबालाची सुटका तर दोन मॅनेजर सर्व अटक करून कारवाई केली .दोन्ही ठिकाणावरील कारवाईमुळे डान्सबार चालकांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे .चिरंजीव बारमध्ये पहिल्या मजल्यावरील मेकअप रूमच्या लगत सोळा बाय आठ फुटाच्या रूममध्ये 17 बारबाला सापडल्या .
