उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे उर्फ शिवड्या आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता.यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.हेडफोन मागण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि याच किरकोळ वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तिथेच टाकून सूरज पसार झाला. सकाळी याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आणि या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली.तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली.त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्ह्याया थोरात, गुन्हे प्रकटीकरण हर्षल राजपूत,निलेश तायडे, रोहितदास बुधवंत, हरिश्चंद्र घाणे,पांडुरंग पथवे,समीर गायकवाड,गणेश राठोड, वैजीनाथ राख,कृपाल रोकडे,हनुमंत सानप,मंगेश वीर यांनी कामगिरी केली आहे.
Similar Posts
पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
तरुणाचा गळा आवळून खून; कर्जत तालुक्यात खळबळ! नेरळ पोलिसात गुन्हा नोंद; पोलिस करतात तपास!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यातील बोरगाव येथें एका तरुणाचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.34 वर्षीय जगदीश अंकुश पाटील असे या मयत तरुणाचे नाव असून घटनास्थळी नेरळ पोलीस हजार झाले होते.दरम्यान या घटनेने कर्जत तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.ओलमान ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या बोरगाव गावात राहणारा जगदीश पाटील हा पहाटे साडेपाचच्या सुमारास गावाबाहेर…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईकानपूर ची दंगल पूर्वनियोजित 40 जणांना अटक
कानपूर/ राष्टपती आणि पंतप्रधान यांच्या सारख्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या दौऱ्याच्या काही तास अगोदर कानपूर मध्ये जी हिंसाचार झाला तो पूर्वनियोजित होता त्यामुळे या हिंसाचाराच्या प्रकरणी मुख्य मास्टर माईंड हाय्यात अहमद यांच्यासह 40 जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपची महिला प्रवाक्ता शर्मा हिने मोहंमद पैगंबर विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काही मुस्लिम संघटनांनी कानपूर मध्ये शुक्रवारी…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपुन्हा अंबानी कुटुंब टार्गेट- ठार मारण्याची धमकी
मुंबई/ भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे उद्योग जगतात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी दहिसर मधून एका संशयिताला अटक केली आहेसंपूर्ण देश काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत होता याच दरम्यान सकाळी 8 चां सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील रुग्णालयात फोन आला आणि फोन करणाऱ्याने…
एन सी बी ची धडक कारवाई सुरूच मुंबई विमानतळावर पकडले ४कोटींचे ड्रग
मुंबई-क्रुझ वरील रेव्ह परीवरील रेड संशयाच्या भोवऱ्यात सापडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यानंतर त्यांची चौकशीही झाली मात्र एन सी बी ची कारवाई थांबली नाही काल एन सी बी ने मुंबई विमानतळावर ७०० ग्राम ड्रग जप्त केली ज्यांची किंमत ४कोटी आहे इतर नॅशनल कुरिअर टर्मिनल सहर कार्गो कॉम्प्लेक्स येथून ७०० ग्राम ड्रग जप्त केले…
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
