उल्हासनगर / किरण तेलगोटे – किरकोळ वादातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. संबंधित घटना ही शनिवारी घडली. विशेष म्हणजे उल्हासनगर शहरात एका गुंडाची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना त्या घटनेनंतर अवघ्या २४ तासात शहरात हत्येची दुसरी घटना समोर आली. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.ज्ञानेश्वर सोनवणे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव होतं. ज्ञानेश्वर हा त्याचा मित्र सुरज शिंदे उर्फ शिवड्या आणि अन्य दोन जणांसोबत उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हनुमान टेकडी परिसरात दारु पिण्यासाठी गेला होता.यावेळी सुरज शिंदे याने ज्ञानेश्वर याचा मोबाईल आणि हेडफोन स्वतःकडे घेतला होता. दारु पिवून हे दोघे विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील त्यांच्या राहत्या घराच्या परिसरात परतत असताना सोंग्याची वाडी परिसरात ज्ञानेश्वर याने सुरज याच्याकडे आपला मोबाईल आणि हेडफोन परत मागितला.हेडफोन मागण्यावरुन त्या दोघांमध्ये वाद झाले आणि याच किरकोळ वादातून सुरजने ज्ञानेश्वरला चाकूने भोसकून त्याची हत्या केली. यानंतर ज्ञानेश्वरचा मृतदेह तिथेच टाकून सूरज पसार झाला. सकाळी याबाबतची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वरचा मृतदेह ताब्यात घेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला आणि या प्रकरणाच्या तपासाची चक्रे फिरवली.तपासादरम्यान ज्ञानेश्वर हा रात्री सुरजसोबत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सुरजला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने मोबाईल आणि हेडफोनच्या वादातून आपणच ज्ञानेश्वर याची हत्या केल्याची पोलिसांना कबुली दिली.त्यानुसार सूरज याच्याविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्ह्याया थोरात, गुन्हे प्रकटीकरण हर्षल राजपूत,निलेश तायडे, रोहितदास बुधवंत, हरिश्चंद्र घाणे,पांडुरंग पथवे,समीर गायकवाड,गणेश राठोड, वैजीनाथ राख,कृपाल रोकडे,हनुमंत सानप,मंगेश वीर यांनी कामगिरी केली आहे.
Similar Posts
स्वातंत्र्य दिनी महाराष्ट्रातील ७४ पोलीस कर्मचाऱ्यांच्या शौर्य पदक देऊन गौरव
नवी दिल्ली / महाराष्ट्र ही शुर वीरांची भूमी असून तिला शिवछत्रपतींच्या शौर्य शाली इतिहासाचा वारसा आहे आणि लष्कर असो की पोलीसदल आजही या दोन्ही ठिकाणी हा वारसा जपला जातोय.आणि महाराष्ट्रातील अनेक शूरवीर लष्कर आणि पोलीस दलात शौर्य गाजवत आहेत .पोलीस दलातील अशाच ७४ शुर विराना स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलीस पदक देऊन गौरवण्यात आले यात ४पोलीस अधिकाऱ्यांना…
अतिरेकी संघटनेशी संबंधिताना अटक
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
हाजीअली येथील हिरापन्ना मार्केट मधून सोळा लाखाचे बनावट घड्याळे हस्तगत
महालक्ष्मी – हाजीअली येथील हिरापंन्ना शॉपिंग सेंटर मध्ये गुन्हे नियंत्रण कक्षाने छापा घालून तब्बल सोळा लाखाची बनावट घड्याळे हस्तगत केली . या प्रकरणात दुकान क्रमांक 54, 68, 74 ,97 या ठिकाणी चा माल ताब्यात घेतला . राडो, ओमेगा, हबलॉट यासारख्या प्रसिद्ध महागडी घड्याळ वापरण्याची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ आहे या कंपनीचे घड्याळ स्वस्तात देण्याच्या बहाण्याने बनावट घडयाळे…
राणेंच्या पत्नी व मुला विरुद्ध लुक आऊट सर्क्युलर जारी
पुणे/ केंद्रीय लघु व सुष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध पुणे क्राईम ब्रांच ने लूक आऊट सर्कुलर जारी केले आहे .डी एच एल एफ या कंपनीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आर्ट लाईन प्रॉपर्टी या कंपनीकडून घेतलेल्या २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्याने ही कारवाई…
80 वर्षाच्या वृध्द बापाला मुलाने दीड कोटीना फसवले
मुंबई: एक जमाना असा होता मुले आई बापाच्या सेवेत आपले जीवन अर्पित करायची. वृद्ध मातापित्याची कावड घेऊन काशीला जायचे आणि तीर्थ यात्रा घडवायचे पण आता मात्र मुले पैशासाठी आईबापाला ठार मारायला तयार होत आहेत, त्यांना घराबाहेर काढून बेघर करीत आहेत, त्यांना फसवून त्यांची प्रॉपर्टी हडप करीत आहेत. बोरिवली मध्ये अशाच एका घटनेत बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा…
अहमदाबाद बॉम्ब स्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा
अहमदाबाद/ जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील 49 दोषींना काल न्यायालयाने शिक्षा सुनावली यामधे 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जनमठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे26 जुलै २००८ मध्ये अहमदाबाद शहरात २० साखळी बाँबस्फोट झाले होते यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जन जखमी झाले होते विशेष म्हणजे सुरत मध्ये…
