भिवंडी दि 24(प्रतिनिधी ) शहरासह भिवंडी ठाणे बायपास रस्ता ,भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी अंजुरफाटा खारबाव कामण या सर्वच बीओटी वरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी मुळे नागरीक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत.या समस्ये विरोधात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असतानाच वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कशेळी टोल नाका येथे या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात धरणे आंदोलन केले .स्थानिक पूर्णेश्वर टेम्पो मालक चालक संघटनेच्या सहकार्यांने करण्यात आलेल्या या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडावर हात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानावर हात तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे डोळ्यावर हात अशा स्वरूपाचे बॅनर झळकावीत शासनाकर्त्यांचा निषेध केला आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनीतेश राणे यांना दिलासा
ओरस – संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी , गेल्या आठवडाभरापासून न्यायालयीन कोठडीत असलेल,भाजपा आमदार नितेश राणे, यांना अखेर आज सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने ३० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला . नितेश राणे यांच्या सह त्यांचा स्वीय सहाय राकेश परब यालाही जमीन मंजूर करण्यात आला आहे.मात्र त्यांना आरोपपत्र दाखल होईपर्यंत कणकवली तालुक्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे४ फेब्रुवारी…
शरद पवार यांना माझा सवाल आहे की शेतकऱ्यांचे किती कारखाने आपल्याकडे आहेत ते सांगावं – श्रीमती शालिनीताई पाटील
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काही कंपन्यांवर आजही आयकर विभागाचा छापा सुरुच आहे. या प्रकरणी माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झालाय. अजित पवार खोटं बोलत आहेत. ते खोटी माहिती देत आहेत, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केलाय. जरंडेश्वर साखर कारखान्याचा व्यवहार कायद्याप्रमाणे झालेला नाही….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजपच्या घोडेबाजारचां विजय
राजकारणात आजकाल नीतिमत्ता जराही शिल्लक राहिलेली नाही .त्यामुळे काहीही करत्ता येते कुठलेही विधिनिषेध पाळण्याची राजकारण्यांना आवश्यकता भासत नाही.राज्यसभेच्या निवडणुकीत हेच बघायला मिळाले निवडणूक 4 वाजता पार पडली आणि निकाल मध्यरात्री लागला 2017 मध्ये असेच घडले होते तेंव्हाही भाजप आणि काँग्रेस आमने सामने होते आणि यावेळीही काँग्रेसचा सहभाग असलेली महा विकास आघाडी भाजपच्या समोर होती या…
१२ खासदारांचे निलंबन मागे घेण्यास सभापतींचा नकार
दिल्ली – पावसाळी अधिवेशनात गोंधळ घालणाऱ्या त्या १२ खासदारांना त्यांनी केलेल्या कृत्याचा अजिबात खेद वाटत नाही . त्यामुळे ते माफीही मागायला तयार नाहीत . म्हणूनच आपण त्यांचे निलंबन मागे घेणार नाही असे आज राज्यसभेचे सभापती व्यंकाया नायडू यांनी सांगितले . त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहातून विरोधकांनी सभात्याग केला तसेच निलंबन मागे घेतले नाही तर संपूर्ण अधिवेशनावर…
माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?
मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल माघार घेतली असून माझ्याकडे देशमुख यांच्या विरोधातील कुठलेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र त्यांनी काल चौकशी आयोगाच्या समोर सादर केले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे .परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांचे आवाहन- राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र -अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध ?
मुंबई/ संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेली अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत .त्यासाठी राज ठाकरे यांनी फडणवीस याना पत्र पाठवून तशी विनंती केली आहे तर शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध करा असे भाजपला आवाहन केले आहे.रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभेची पोट निवडणूक पुढील महिन्याच्या 3 तारखेला होणार आहे या…
