भिवंडी दि 24(प्रतिनिधी ) शहरासह भिवंडी ठाणे बायपास रस्ता ,भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी अंजुरफाटा खारबाव कामण या सर्वच बीओटी वरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी मुळे नागरीक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत.या समस्ये विरोधात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असतानाच वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कशेळी टोल नाका येथे या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात धरणे आंदोलन केले .स्थानिक पूर्णेश्वर टेम्पो मालक चालक संघटनेच्या सहकार्यांने करण्यात आलेल्या या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडावर हात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानावर हात तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे डोळ्यावर हात अशा स्वरूपाचे बॅनर झळकावीत शासनाकर्त्यांचा निषेध केला आहे .
Similar Posts
तर ऍक्शनला रियाक्षण होणारच शिवसेनेचा राणेंना इशारा
रत्नागिरी/ राणे हे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे जबाबदारीने वागायला हवे अन्यभा ऍक्शन ला रिअक्शन होणारच आणि त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची असेल असे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे हा एक प्रकारे राणेंना अप्रत्यक्ष इशाराच म्हणावा लागेलराणेंची जन आशीर्वाद यात्रा रत्नागिरीतून पुढे सिध्दु दुर्ग जिल्ह्यात गेल्यावर तिथे त्यांना चांगला प्रतिसाद…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व…
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयलोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
युक्रेनमध्ये अडकलेल्यांना आणण्यासाठी चार मंत्री रवाना
दिल्ली/ युक्रेन रशिया युद्धात आता रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे .त्यामुळे युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ऑपरेशन गंगा ही मोहीम तेज करण्यात आली असून या मोहिमेच्या अंतर्गत केंद्रातील चार मंत्री युक्रेनच्या शेजारील राष्ट्रात जाऊन या मोहिमेचे नेतृत्व करणार आहेत.रशिया युक्रेन युद्धाचा आजचा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकलत का ? 10 लाख नोकऱ्या..
राजकीय पुढाऱ्यांना आश्वासने द्यायला काही लागत नाही कारण दिलेली आश्वासने पाळायलाच हवीत असा काही नियम नाही आणि घटनेत तशी तरतूदही नाही त्यामुळे लोकांना आकर्षित करायला आश्वासनाची खैरात करावी लागते.काँग्रेसने गरिबी हटाव असे आश्वासन दिले होते पण गरिबी हटली काय? काँग्रेसने अशी कितीतरी आश्वासने दिली आहेत . त्या आश्वासनांचे काय झाले याची विचारपूस करायला कोणाला वेळही…
दौर्याचे राजकारण सुरू
पूरग्रस्त भागात पाहणी करण्याच्या निमित्ताने जे दौरे केले जात आहेत त्या दौर्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो म्हणून आता कुणी म्हणाले होते पण त्यावरून आता राजकारण तापले असून आम्ही दौरे केले नाही तर प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करणार नाही त्याच बरोबर तिथल्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या विरोधी पक्ष नेता म्हणून अधिवेशनात मांडण्यासाठी दौरे करावेच लागणार…
