भिवंडी दि 24(प्रतिनिधी ) शहरासह भिवंडी ठाणे बायपास रस्ता ,भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी अंजुरफाटा खारबाव कामण या सर्वच बीओटी वरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी मुळे नागरीक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत.या समस्ये विरोधात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असतानाच वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कशेळी टोल नाका येथे या रस्त्याच्या दुरावस्थे विरोधात धरणे आंदोलन केले .स्थानिक पूर्णेश्वर टेम्पो मालक चालक संघटनेच्या सहकार्यांने करण्यात आलेल्या या आंदोलनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे तोंडावर हात, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे कानावर हात तर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांचे डोळ्यावर हात अशा स्वरूपाचे बॅनर झळकावीत शासनाकर्त्यांचा निषेध केला आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउत्तर प्रदेशातील उमेदवार दिल्याने काँग्रेस नेते नाराज – राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेस मध्ये क्रॉस व्होटिंग होणार?
मुंबई/ शिवसेना आणि भाजपने एक एक उमेदवार जादा दिल्यामुळे अगोदरच राज्यसभा निवडणुकीचे वातावरण तापलेले आहे त्यात आता काँग्रेसने उत्तर प्रदेशातील उमेदवार पडल्याने काँग्रेसचे नेते आणि आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे परिणामी काँग्रेस कडून क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहेराज्यसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेस मधून संजय निरुपम मिलिंद देवरा मुकुल वासनिक आदी नेते इच्छुक होते पण त्यांना डावलून उत्तर प्रदेशच्या…
मुंबई जनसत्ताच्या बातमीचा इफेक्ट -मासे विक्रीसाठी कोळी बांधवाणा मुंबई बाहेर जावे लागणार नाही -इथेच त्यांना जागा मिळेल ;आदित्य ठाकरेंचा दिलासा
मुंबई -कोळी बांधव हा खर्या अर्थाने मुंबईचा मालक आहे. त्याच्यामुळेच मुंबईची आर्थिक सामाजिक आणि संस्कृतिक प्रगती झाली असे असताना मुंबईतील मासे विक्रेत्याना मुंबईच्या मंडई मधून हद्दपार करण्याचा काही बिल्डर, धांदेवाईकाचा डाव आहे. त्याविरुद्ध कोळी बांधवांनी मोर्चा कडून आवाज उठवला. कोळी बांधवांचा हा आवाज मुंबईकर जनतेपर्यंत तसेच सरकार दरबारी पोहचवण्याचे काम मुंबई जनसत्ता न्यूज पोर्टल्ंने केले…
देशातील प्रत्येक टोल नाक्यावर चिप्स (ऍप) बसवण्याची मागणी
दिल्ली/ भारतातील सर्व छोट्या मोठ्या शहरांच्या जे झपाट्याने औद्योगीकरण होत आहे त्यामुळे सुलभ वाहतूक व्यवस्थेची आवश्यकता आहे त्यादृष्टीने भारतातील सर्व राज्यांमध्ये रस्त्यांचे रुंदीकरण सुरू आहे शिवाय एक्स्प्रेस वेंची संख्या ही वादात आहे अशा परिस्थितीत टोल नाक्यांवर होणारी वाहतूक कोंडी एक मोठी समस्या बनलेली आहे आणि ती सोडवण्यासाठी सर्व टोल नाक्यांवर चिप्स(ऍप) बसवावे आणि महा मार्गांवरील…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईकर जनता व भाजपच्या आंदोलनामुळे सरकार झुकले लोकल ट्रेनचा निर्णय दोन दिवसात
मुंबई/ मुंबईतील कोरोंनाची पोजिविटी रेट कमी झालेला असतानाही केवळ टास्क फोर्स च्या सांगण्यावरून मुंबईकरांचा लोकल प्रवास रोखणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात काल भाजपच्या नेतृत्वाखाली मुंबईकर रेल्वे प्रवासी रस्त्यावर उतरताच महा विकास आघाडी सरकारच्या पायाखालची जमीन सरकली त्यामुळे सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय सरकार येत्या दोन दिवसात घेणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली.लॉक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएनआयटी जमीन घोटाळा- मुख्यमंत्रीच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर – एनआय टी ची नागपूर मधील ८६ कोटीची जमीन बिल्डरांना २ कोटींना दिल्या प्रकरणी न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. तसेच त्या व्यवहाराला स्थगिती दिली आहे त्यावरून आज अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक यांच्यात जोरदार हंगाम झाला आणि विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 1980 च्या दशकात नागपूर (Nagpur) उमरेड रोडवरील मौजा हरपुर येथे नागपूर सुधार प्रन्यासने झोपडपट्टी…
मावळ गोळीबारानंतर उत्तर प्रदेश बंद होता का?
मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायवतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला होता का? जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा, पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली दुटप्पी भूमिका? लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना आता बंदची गरज आहे की नाही हे आधी पटवून…
