मुंबई-केंद्रीय गृहमंत्री अमित शहायांच्या मुंबई दौऱ्यात त्यांनी मुंबई महापालिकेचे रणशिंग फुंकले आहे त्यासाठी त्यांनी शिंदे भाजप मिळून मिशन 150 चे टार्गेट भाजप कार्यकर्त्यांना दिले . 227 पैकी 150जागा जिकणे भाजपने मुंबईकरांसाठी असे काय केले आहे ते मात्र सांगितले नाही . त्यांनी मुंबईकरांना गृहीत धरले आहेत पण मुंबईकर अंधभक्त नाही त्यामुळे तो कुणाच्याही मागे फरफटत जाणार नाही . त्यामुळे 150 जागा जिंकण्याचा कल्पना विलास हास्यास्पद आहे .अमित शहा यांनी मुंबईकरांना अजून पुरते ओळखलेले नाही .त्यांना हे ठाऊक नसेल की मुंबईकरांचा भाजप वर किती राग आहे . ज. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली आहे त्यासाठी 105 आंदोलकांनी प्राणाचे बलिदान केलेय . पण मुंबईला केंद्राकडून कधीच न्याय मिळाला नाही देशातील एकूण महसुलाच्या 40 टक्के महसूल एकट्या मुंबईतून देशाला मिळतोय त्या बदल्यात मुंबईला काय मिळतेय .आज मुंबईतील अनेक विकास योजना पैशा अभावी पडून आहेत पण त्याकडे केंद्राचे लक्ष नाही उलट मुंबईला आर्थिक राजधानीचा जो बहुमान प्राप्त आहे तो भाजपच्या डोळ्यात खुपतोय .त्यामुळे आर्थिक राजधानी मुंबई ऐवजी अहमदाबादला करण्याचा घाट घातला जातोय .त्यासाठी मुंबईतील काही महत्वाच्या संस्था अहमदाबादला शिफ्ट करण्याचा खटाटोप सुरू आहे . मुंबईतून मराठी माणसाला हद्दपार करण्यासाठी मोदी आणि अमितशहांचे गुजराती मारवाडी टपून बसले आहेत . त्यांना मुंबईतून मराठी माणसाला घालवायचे आहे म्हणून त्यांना मुंबई महापालिका हवी आहे .पण या मुंबईत इथला मुंबईकर मराठी माणूस त्यांचा हा डाव यशस्वी होऊ देणार नाही शिवसेनेतल्या दोन चार फितुरांना हाताशी धरून मुंबई जिंकण्याचे स्वप्न जर कुणी पाहत असेल तर त्यांचे ते स्वप्न कदापि सत्यात उतरणार नाही .
Similar Posts
महापालिका निवडणुकीनंतर वापरून ते मनसेला फेकून देतील! रामदास कदमांचा दावा
मुंबई : राज आणि उद्धव भलेही एकत्र आले तरी त्यात राजच्या मनसेचे नुकसान आहे.त्यातच मी उद्धवला जवळून ओळखतो तो राजचा घातपात करण्याचीही शक्यता आहे असा अजब दावा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला आहे.महाराष्ट्रात शिवसेना-मनसे म्हणजेच ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा जोरदार सुरू असून ५ जुलै रोजी विजयाचा जल्लोष साजरा केला दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते…
नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार-पंतप्रधान नरेंद्र मोदींची भविष्यवाणी
नाशिक/उद्धव ठाकरे यांची नकली शिवसेना आणि शरद पवार यांची नकली राष्ट्रवादी या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये विलीन होणार अशी भविष्यवाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे मोदींचा हा दावा उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनीही खोडून काढला आहेआज नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली नाशिकमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरीतील भाजपा उमेदवार…
नागपुरात 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम_ छावा पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा
मुंबई/ छावा चित्रपट पाहून लोकांच्या औरंगजेबाविरुद्धच्या भावना प्रज्वलित झाल्या मात्र काही लोकांनी तू नियोजित पणे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मात्र अशा लोकांना सरकार सोडणार नाही ते कोणत्याही जाती धर्माच्या असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात झालेल्या राड्याचे तीव्रप्रसाद विधानसभेत उमटले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र…
इंडिया आघाडीची दिल्लीत डिनर डिप्लिमेसी
नवी दिल्ली/राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका दिवाळीनंतर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे हेही असणार आहेत. हे दोन्ही नेते राहुल गांधी यांची वैयक्तिक भेटही घेणार आहेत. राहुल…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईक्रूरकर्मा आफताबला फासावर लटकवा- महिलांची मागणी
दिल्ली/ आपल्या प्रेयसीला ठार मारून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते जंगलात टाकणाऱ्या क्रूरकर्मा आफताब याला फासावर लटकवा अशी मागणी देशातील महिला संघटनांनी केली आहे .सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून वसई येथील श्रद्धा वळकर ही तरुणी आफताब पूनावला याच्या प्रेमात पडली आणि घरच्या लोकांचा विरोध डावलून त्याच्या सोबत दिल्लीला पाळून गेली . त्याच्या सोबत लिव्ह एन…
ज्युनियर मुंबई श्री’ साठी आज मालाडमध्ये पिळदार युद्ध
‘ दिव्यांग, मास्टर्स, महिलांच्या शरीरसौष्ठवासह फिजीक स्पोर्ट्सचाही समावेश मुंबई, दि.२२ (क्री.प्र.)- उदयोन्मुख आणि ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंच्या हक्काचे व्यासपीठ असलेली ‘ज्यूनियर मुंबई श्री’ उद्या रविवारी २३ फेब्रूवारीला मालाड पूर्वेला कासम बागेत असलेल्या दीनदयाल उपाध्याय मैदानावर आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत सुमारे १००-१२० खेळाडू आपल्या नव्या कोर्या शरीरयष्टीला लोकांसमोर फुगवणार असून या स्पर्धेतूनच मुंबई शरीरसौष्ठवाचे भवितव्य पाहायला…
