मुंबई वाचवायची असेल तर त्वेषाने लढा कारण ही शेवटची लढाई- राज ठाकरे
मुंबई/महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्कवरुन मुंबईकरांना आवाहन केलं. आदित्य ठाकरेंनी आपल्या आक्रमक शैलीतून भाषण केल्यानंतर राज ठाकरेंनीही विविध मुद्दयावरुन भाजपला लक्ष्य केलं. एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत…
