मुंबई/वरळीतील गोमाता एस आर ए इमारती मधील किशोरी पेडणेकर यांच्या ताब्यात असलेल्या चार सदनिका बाबत एस आर ए चां कलम 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेऊन या सदनिका ताब्यात घ्याव्यात असे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत .एस आर ए चां नियमानुसार झोपू योजने अंतर्गत मुळ लाभार्थ्याला मिळालेले घर 10 वर्ष भाड्याने देता येत नाही या प्रकरणात कलम 3 अ चे उल्लंघन झाल्याचे झोपू प्राधिकरणाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे त्यामुळे आता मूळ भाडेकरू विरोधात निषकासणाची कारवाई करून या सदनिका ताब्यात घेतल्या जाणार आहेत .आणि ही कारवाई मुंबई महापालिकेकडून केली जाणार आहे . वरळीतील झोपू योजनेतील 4 सदनिका किशोरी पेडणेकर यांनी बळकवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता त्यांच्या तक्रारीनंतर झोपू प्राधिकरणाने या प्रकरणाची चौकशी केली तसेच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात सदनिकांची पाहणी केली असता . त्या सदनिका इतरांच्या ताब्यात असल्याचे दिसून आल्यानंतर एस आर ए ने नोटीस बजावून कारवाई केली किशोरी पेडणेकर याना हा मोठा धक्का आहे
Similar Posts
दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटही शिवाजी पार्कच्या मैदानात
मुंबई/ खरी शिवसेना कोणाची यावरून आता ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यात न्यायालयीन लढाई बरोबरच रस्त्यावरची लढाई सुधा अटळ आहे आणि त्याला निमित्त ठरणार आहे दसरा मेळावा हा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत दोन्ही गट आता ठाम आहेतदसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे आणि शिवसेनेच्या स्थापनेपासून सुरू आहे पण शिवसेनेतील बँडच्या नंतर आता खरी शिवसेना कोणाची यावरून…
केंद्र सरकारच्या श्रमिक योजनेचे शिवसेनेकडून नामांतर; शिव आधार नावाने जिल्ह्यात उपक्रम सुरु ..
भिवंडी (आकाश गायकवाड महाविकास आघाडी राज्यात ठाकरे सरकारच्या रूपात आली. तेव्हापासून केंद्र व राज्य सरकारमध्ये विविध नागरिक सुविधा अथवा विकासनिधीसह मदत निधीवरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. त्यातच कोरोना काळात केंद्र सरकारने श्रमिकांसाठी विविध लाभदायी योजना म्हणून ई श्रमिक रोजगार योजना देशातील ४७ कोटी नागरिकांसाठी जाहीर केली. मात्र हिच ई श्रमिक रोजगार योजनेचे नामांतर ई – शिव आधार कार्ड योजना करून आजपासून ठाणे जिल्ह्यात हजारो नागरिकांना लाभ देण्यासाठी ग्रामिण शिवसेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील कशेळी येथून आज सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना काळात लाखो नागरिक बेरोजगार कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात देशभरातील लाखो रोजगाराचे जाऊन बेरोजगार झाले आहेत. अश्या नागरिकांसाठी भारत सरकारने ई श्रमिक रोजगार योजना नुकतीच सुरु केली आहे. मात्र हि योजना खऱ्या लाभार्थीपर्यत अद्यापही शासनस्तरावरून घरोघरी पोहचली नाही. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे ग्रामीण उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो लाभार्थना लाभ देण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला भरघोस प्रतिसाद लाभला असून शेकडो नागरिकांनी ई – श्रमिक रोजगार ही योजना ई – शिव आधारच्या वतीने ऑनलाईन पद्धतीने नोंद करून कार्ड मिळविली आहेत. असा मिळतो योजनांचा लाभ .. अपघाती विमा १ लाख . आरोग्य कुटूंब विमा २ लाख बेरोजरांना रोजगार भत्ता तसेच सर्वच शासकीय योजनेचा लाभ मिळतो. या योजेनसाठी वयोमर्यादा १६ ते ५९ वयाच्या नागरिकांसाठी असून या योजनाचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन मार्फत नाव नोंदणी केली जाते. यासाठी केवळ आधारकार्ड बँकेचे पासबुक नंबर आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे. बाईट – १ देवानंद थळे , ठाणे ग्रामीण शिवसेना उपजिल्हा प्रमुख बाईट – २ कृष्णकांत कोंडलेकर (कामगार सेना, माजी राज्य सरचिटणीस )
कुंभ मेळ्यातील तंबूत आग अनेक तंबू जाळून खाक
प्रयागराज – उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्यात अचानक लागलेल्या आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणचा नजरा थरकाप उडविणारा होता. सुदैवाने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. या घटनेत कोणतीही प्राणाहानी झाली नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. या सेक्टर -१९…
देशातील ३३४ पक्षांची मान्यता रद्द!निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली/केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून देशातील ३३४ नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना (आर यू पी पी एस) निवडणूक यादीतून वगळले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ पक्षांचाही समावेश आहे. जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई…
मुंबईकर रेल्वे प्रवाशांना मोठे गिफ्ट-२३८ नव्या एसी लोकल मुंबईत धावणार
दिल्ली – मुंबईकरांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे, मुंबईत लवकरच २३८ नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत. रेल्वेने तसा निर्णय जाहीर केला आहे. रेल्वेनं तसा निर्णयच जाहीर केला आहे. मुंबईत सध्या धावत असलेल्या एसी लोकल नेहमी बिघडत असून त्यांचे स्वयंचलित दरवाजे देखील नेहमीच बिघडत असतात, त्यामुळे या एसी लोकलची पुढील आवृत्ती म्हणून वंदे भारत…
प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय सोहळ्यात राज्यपाल राधाकृष्णन यांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
देशाच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी रविवारी (दि. २६) शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला उद्देशून संबोधित केले. राज्यपालांच्या भाषणाचा…
