मुंबई -तब्बल दीड वर्ष ज्या कोरोनाने संपूर्ण जगाचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली त्याने पुन्हा एकदा आपल्या दारावर टक टक करायला सुरुवात केली आहे .अशावेळी गेल्या दीड वर्षात जे लोकांनी भोगले ते पुन्हा नशिबी येऊ नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेला सावध केले जात आहे.लसीकरण आणि मास्क किती आवश्यक आहे हे सांगितले जात आहे.अशावेळी सरकारच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे एक प्रकारे कोरोनाला निमंत्रण देण्यासारखे आहे.विज्ञानाच्या जोरावर जगाने कोरोणावर मात केली हे खरे असले तरी कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होण्यापूर्वीच करोना गेला अशी समजूत करून घेऊन आपण सर्व निर्बंध हटवून पूर्वीसारखे कामाला लागलो .यात कुठेतरी आपली आणि सरकारची सुधा चूक झाली होती हे आता आपल्या लक्षात आले आहे. भारता पुरते बोलायचे झाले तरी भारतात जवळपास 4 लाख लोकांचा कोरोणाने बळी घेतला होता .शिवाय कोरोना काळात लागलेले लोकडाऊन आणि त्यामुळे बंद पडलेले उद्योग धंदे याने आर्थिक नुकसान झाले ते वेगळेच!पण त्याही पेक्षा लोकांना जो मानसिक त्रास भोगावा लागला त्याच्या आठवणीने अंगावर शहारे येतात.आणि म्हणूनच प्रत्येक जण ईश्वराकडून हीच प्रार्थना करीत आहेत .
Similar Posts
पालिकेचे जंबो कोविड सेंटर कोणासाठी – रुग्णांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी भाजपचा सवाल
मुंबई/ कोरोणाच्य संकट काळात जनतेचे जरी हाल झाले असले तरी कमावणाऱ्या लोकांनी भरपूर कमावले.पालिका अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी तर अक्षरशः वाहत्या गंगेत हात धुवून घेतले असा मुंबईकर आरोप करीत आहेत आणि आता तर भाजपनेही आरोप केलंय की कोविड सेंटर नक्की कोणासाठी होते रुग्णांसाठी की पालिकेच्या सत्तेत बसलेल्या लाभार्थी लोकांसाठी? करोना काळात पालिकेचे जवळपास २ हजार कोटी…
भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
जामनेरमध्ये भारतातील सर्वात मोठा ‘नमो कुस्ती महाकुंभ’ जामनेर, दि. ५ (क्रीडा प्रतिनिधी)- महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख विरुद्ध भारत केसरी बिनिया मिन, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी विरुद्ध जम्मू केसरी मुस्तफा खान अशा एकापेक्षा एक अशा १३ कुस्ती दंगली आणि त्याचबरोबर खानदेश आणि परिसरातील १०० पेक्षा अधिक पैलवानांचे द्वंद्व पाहाण्याचे भाग्य येत्या ११ फेब्रूवारीला जामनेरकरांना लाभणार…
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार) कधी होणार याच्या तारखांवर तारखा समोर येत असताना भाजपमध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शांतता आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत शपथविधीची लगबग सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख अद्याप समोर आली नसली तरी चर्चा मात्र जोरदार सुरु झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत लॉबिंगसाठी ठाण मांडून आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मत आमदार…
संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ :. डॉ. मनोहर गजानन जोशी ! –
कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी विराजमान…
हेलिकॉप्टर किती सुरक्षित?
भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा…
जामनेरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल
‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा मंत्र जळगांव, (क्रीडा प्रतिनिधी) : आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ आणि खेळाडूंना स्फूर्ती देणारी कुस्ती आता देशाच्या नव्या पिढीला निर्व्यसनी करण्यासाठी कुस्ती दंगल करणार आहेत. कुस्तीच्या माध्यमातून निर्व्यसनी पिढीचा संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे ‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद…
