मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या बांगल्याना किल्ल्यांची नावे देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो हास्यास्पद आणि महाराजांबद्दल दाखवलेला खोटा आदर आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पाली येथील सरस गडावर २०/२५ वर्षांपूर्वी थडगे बांधण्यात आले आता तिथे मुस्लिम नियमित उरूस भरवतात तर मंगळवार असलेल्या थडग्यावर चादर चाडवली जाते .हिरालोट येथे अगोदर थडगे बांधून आता त्याच्या बाजूला भिंती उभारून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले आहे. हिरकोट गडाचा सध्या कारागृह म्हणून वापर केला जातो. शिवडीतील दर्गा हे नवनाथ पैकी एका नाथाचे ठिकाण आहे असे वयोवृध्द जाणकारांचे मत आहे. शिवडीचा किल्ला १५०० वर्ष पुरातन आहे या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सय्यद जळल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढले आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण एक एकर जागेवर दर्गा शरीफ हजरत सय्यद जलाल शहा या नावाने दर्गा आहे तिथेही अनधिकृत बांधकामे झाली आहेत. महाराजांच्या इतर किल्ल्यांची सुधा दुरवस्था झालीय त्याकडे लक्ष देण्यास ऐवजी मंत्र्यांच्या बंग्ल्याना किल्ल्यांची नवे कशासाठी असा सवाल केला जात आहे.
Similar Posts
जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी
मुंबई, -तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच त्यांचे आभार मानले.ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झालं. माझा या कंपनीशी…
मोदी सरकारकडून दिवाळी भेट ! गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
मुंबई/अच्छे दिन ची स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने पुन्हा एकदा जनतेचा खिसा कापण्याचा निर्णय घेतला आहे मोदींनी गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहेसप्टेंबर मध्ये मोदी सरकारने व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरचा दर १६४४ पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर आता पुन्हा वाढ करण्यात आली असून एक…
मराठी एकजुटीचा दणक्यानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी मीरारोडमधे मराठ्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मीरा रोड/मराठीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांनी, मराठ्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच, संतप्त झालेला मराठी माणूस रस्त्यावर उतरला. इतकेच नव्हे तर मुंबईसह आसपासच्या शहरांमधील सर्व मराठी मीरारोडच्या दिशेने निघाले होते त्यामुळे घाबरलेल्या सरकारने अखेर मोर्चाला परवानगी दिली.मराठी माणसांच्या एकजुटीसमोर फडणवीस सरकारला दुसऱ्यांदा गुडगे टेकावे लागले.तर मराठ्यांच्या या अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाचा, मराठी विरुद्ध…
कर्नाटकातील संघावरील बंदीला न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती
बंगळुरु/सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी मालमत्तांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेणं आवश्यक असल्याचे आदेश प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटकउच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने काँग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र…
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचीएसीबी कडून साडेसहा तास चौकशी अटकेची शक्यता
राजापूर -तब्बल साडे सहा तास झाडाझडती घेतली. त्यानंतर एसीबीनं त्यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या शाखेत नेलं. तिथं त्यांची बँक खाती आणि लॉकरची चौकशी करण्यात येत आहे. राजन साळवी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये त्यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावाचाही समावेश आहे.आपल्याला अटक झाली तर आपण जामिनासाठी अर्ज करणार नाही, अशी भूमिका आमदार राजन साळवींनी घेतली…
जरांगे पाटील यांना सरकारची सुरक्षा मिळणार
मुंबई -मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जरांगे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलचा लावून धरला आहे. काही आठवड्यांपूर्वी जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पदयात्रा काढली होती. त्यावेळी शिंदे सरकारने सर्व मागण्याही मान्य केल्या होत्या. त्यानंतर आता शिंदे सरकारने मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याचा मोठा निर्णय घेतला आहेमराठा…
