मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या बांगल्याना किल्ल्यांची नावे देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो हास्यास्पद आणि महाराजांबद्दल दाखवलेला खोटा आदर आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पाली येथील सरस गडावर २०/२५ वर्षांपूर्वी थडगे बांधण्यात आले आता तिथे मुस्लिम नियमित उरूस भरवतात तर मंगळवार असलेल्या थडग्यावर चादर चाडवली जाते .हिरालोट येथे अगोदर थडगे बांधून आता त्याच्या बाजूला भिंती उभारून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले आहे. हिरकोट गडाचा सध्या कारागृह म्हणून वापर केला जातो. शिवडीतील दर्गा हे नवनाथ पैकी एका नाथाचे ठिकाण आहे असे वयोवृध्द जाणकारांचे मत आहे. शिवडीचा किल्ला १५०० वर्ष पुरातन आहे या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सय्यद जळल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढले आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण एक एकर जागेवर दर्गा शरीफ हजरत सय्यद जलाल शहा या नावाने दर्गा आहे तिथेही अनधिकृत बांधकामे झाली आहेत. महाराजांच्या इतर किल्ल्यांची सुधा दुरवस्था झालीय त्याकडे लक्ष देण्यास ऐवजी मंत्र्यांच्या बंग्ल्याना किल्ल्यांची नवे कशासाठी असा सवाल केला जात आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकोण होणार विधानसभा अध्यक्ष
मुंबई – अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . तसेच इतरही काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक मागील हिवाळी अधिवेशनात ,२८ डिसेंबर रोजी नव्या नियमानुसार आवाजी मतदानाने घेण्यात येणार होती .पण नव्या नियमाबाबत सरकारने आपल्याला कळवले नाही असे सांगून राज्यपालांनी निवडणुकीला विरोध केला होता….
खामेनी यांच्या मृत्यूनंतर आयातुला अली रेझा आराफी इराणचे सर्वोच्च नेते बनले
तेहरान/अमेरिका आणि इस्त्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर आता नव्या नेतृत्वाच्या हाती सत्ता हस्तांतर करण्यात आली आहे. खामेनी यांच्या निधनानंतर इराणने वरिष्ठ धर्मगुरू अयातोल्लाह अली रेजा अराफी यांची अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती केली आहे. संविधानानुसार नव्या सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत अंतरिम नेतृत्व परिषद देशाची जबाबदारी सांभाळणार आहे.इराणच्या संविधानानुसार…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा १० जानेवारीला फैसला
दिल्ली महाराष्ट्रात जो सत्ता संघर्ष सुरु आहे त्यावर सरवोचच न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र हि सुनावणी ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवावी अशी मागणी शैवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे त्यावर आता १० जानेवारीला सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे याच सुनावणीत तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा फैसला होण्याचीही शक्यता आहे ठाकरे गटाला ही केस…
बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती -शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत कनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यक अशा पदांच्या एकूण १५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रत्यक्ष अर्थात ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०२१ आहेपदांची नावेकनिष्ठ सल्लागार, कनिष्ठ आहार तज्ञ, ऑप्टोमेट्रिक, ऑडिओलॉजिस्ट, कार्यकारी सहाय्यकपद संख्या एकूण १५…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या भाषणाची शिवसेनेतील मराठी तरुणांना भूरळ
मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत असेल तरी सामान्य शिवसैनिक मात्र राजच्या भाषणाने प्रभार्वित झाला आहे .कारण मुस्लिमांच्या विरोधात प्रथमच एका मराठी नेत्याने जाहीरपणे आवाज उठवून मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केली आहे . त्यामुळें महाराष्ट्रातील सर्वच पक्षातील मराठी तरुण खुश…
राज ठाकरे- आशिष शेलार भेट
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराची सांगत झाल्यानंतर विधानपरिषद निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे, निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोप, राजी-नाराजीपासून काही वेळासाठी दूर झालेली राजकीय मंडळी पुन्हा विधानपरिषद निवडणुकांसाठी सज्ज झाली. त्यामुळे, पुन्हा एकदा महायुती व महाविकास आघाडीतील शीतयुद्ध समोर आल्याचं दिसून आलं. त्यातच, भाजप महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला. मनसेनं अभिजीत…
