मुंबई/महापुरुषांचे वारंवार होणारे अपमान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोमई याची महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून जेजे हॉस्पिटल ते सी एस टी दरम्यान महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात शिवसेना ‘काँग्रेस ‘ राष्ट्रवादी ‘ समाजवादी पार्टी ‘ दोन्ही कम्युनिस्ट ‘ बसपा ‘ शेकाप आणि या पक्षांशी सलग्न असलेल्या सर्व कामगार संघटना सामील होणार आहेत दरम्यान या महामोर्चाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही . मात्र हा महामोर्चा होणारच आणि तो यशस्वी करून दाखवा अशी सूचना महाविकस आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक शरद पवार यांनी दिल्या आहेत . गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली . यात उद्वव ठाकरे आणि अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली आणि मोर्चा होणारच असा निर्धार व्यक्त केला .
Similar Posts
पालिका आयुक्त चहल- किरण दिघावकर स्पिरिट ऑफ मुंबई पुरस्काराने सन्मानित
माया नगरी नव्हे; मुंबई तर मानवता नागरी – राज्यपाल रमेश बैस* अनेकदा लोक मुंबईला मायानगरी म्हणतात; परंतु एक दुसऱ्यांना मदत करणे आपल्या डीएनएमध्ये असलेली मुंबई ही खऱ्या अर्थाने मानवता नगरी असून शहराचा हा मानवतेचा भाव करोना काळात विशेषत्वाने पाहायला मिळाला, असे गौरवोद्गार राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे काढले. राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि….
मुंबईकर मतदारांच्या जबाबदारीची कसोटी.
मुंबई-( किसनराव जाधव ) – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात, महाराष्ट्रात मुंबई सह 13 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे, यातील मुंबईच्या सहा जागांवरील मतदान खूपच महत्त्वाचे मानले जात आहे. याचे कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि देशाच्या एकूण महसुलापैकी ४०% महसूल एकट्या मुंबईतून केंद्राला जातो. परंतु त्या बदल्यात मुंबईला काय मिळते? हा खरोखरच संशोधनाचा…
केंद्र सरकारच्या गृह विभागानं 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा
धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण, भगतसिंह कोश्यारी यांना पद्मभूषण, रघूवीर खेडकर, अशोक खाडे, रोहित शर्माला पद्मश्री, 131 जण :मुंबई : केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून 2026 साठी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातून 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विविध क्षेत्रातील त्या मान्यवरांचं प्राविण्य आणि सेवेसंदर्भात पद्म पुरस्कार जाहीर…
फ्रिज मधून खोके कुठे गेले याची चौकशी करणार – मुख्यमंत्री
मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता…
तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये !
मुंबई, दि. १८ डिसेंबर २५छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत,असा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत केली. ते म्हणाले,”जमिनीचा डाटा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी. महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी…
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिरघर खरेदीदारांना मिळणार उभारी
मुंबई, : राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला मोठा दिलासा देत फडणवीस सरकारने नवीन सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी रेडी रेकनरच्या दरांमध्ये कोणतीही वाढ न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयामार्फत १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारे हे दर मागील वर्षाप्रमाणेच (सन २०२५-२६) ‘जैसे थे’ ठेवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
