मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा दुपारी 12 वाजता निघाली आणि सायंकाळी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवर पोचली . मूर्ति चार फुटांचीच असल्याने तरफ्यावरून मोजक्याच लोकांच्या सहयाने 4 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले असे पहिल्यांदाच घडत असल्याने गणेश भक्त काहीसे नाराज दिसत होते . यंदा लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना फक्त ऑन लाइन दर्शन घेता आले
Similar Posts
साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणीला पैसे मिळणार”
मुंबई/लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींना दिले जाणारे पैसे अजिबात थांबणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनीही दिली आहे कालच त्यांनी साडेतीन हजार कोटींच्या चेकवर सही केली त्यामुळे पुढच्या आठवड्यात लाडक्या बहिणींना त्यांचा ठरलेला हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान अजित दादांच्या राष्ट्रवादीत परतुरचे माजी आमदार…
राज्यपालांच्या हस्ते ‘कोविड वॉरियर्स डायरीज’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
जनसामान्य करोना योद्ध्यांच्या अकथित अनुभवांचे संकलन असलेल्या ‘कोविड वॉरियर्स डायरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते शनिवारी (दि. २२) राजभवन येथे करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे लेखक मिहीर किसन भोईर, तसेच पुस्तकामध्ये उल्लेख असलेले लोकमान्य टिळक रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ सुलेमान मर्चंट, साई लीला फाउंडेशनच्या अध्यक्ष रश्मी उपाध्याय, डॉ चारुता मांडके, हृदयरोग तज्ज्ञ डॉ धीरज कुमार,डॉ शेफाली केशरवानी,…
मुंबईत झाले नालेसफाईचे दोन बळी
मुंबई/आज मुंबईच्या गोवंडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. सफाई करीत असताना नाल्यात पडून दोन कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.गोवंडीच्या शिवाजीनगर भागात एका नाल्याची सफाई करीत असताना रामकृष्ण आणि सुधीर दास हे दोन कंत्राटी कामगार नाल्यात पडले दरम्यान काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झालेली असल्यामुळे नाल्यात पाणी होते त्यामुळे या पाण्यात दोन्ही कामगार गुदमरले. या घटनेची माहिती अग्निशमन…
बंगालच्या राजकारणात परिवर्तनाची पहाट – ममता पर्वाचा अस्त, मोदी पर्वाचा उदय
पश्चिम बंगालच्या राजकीय इतिहासात ४ मे २०२६ हा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. तब्बल १५ वर्षांपासून सुरू असलेली तृणमूल काँग्रेसची एकछत्री अंमल आणि ममता बॅनर्जी यांची ‘अरेरावीची’ सत्ता या निवडणुकीने मोडीत काढली आहे . भारतीय जनता पक्षाने २९४ पैकी २०७ जागा जिंकून मिळवलेला हा विजय केवळ राजकीय सत्तांतर नाही, तर तो बंगालच्या संस्कृती आणि अस्मितेचा…
अशोक खरात प्रकरण: अंजली दमनियांचा खळबळजनक आरोप
नाशिकमधील अशोक खरात (विकृत भोंदूबा म्हणून ओळखले जाणारे) यांचे अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यांनी १ एप्रिल ते १७ मार्च या कालावधीतील फोन कॉल डेटा उघड करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.रुपाली…
मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत विजयी तर दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई विजयी
मुंबई, दि. ४ : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला. अरविंद सावंत यांना ३,९५,६५५ एवढी मते मिळाली तर यामिनी जाधव यांना ३,४२,९८२ एवढी मते मिळाली. या लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मुंबईतील शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे झाली….
