केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे बाल विवाह कायद्यात सुधारणा करून मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१वर्ष करण्याचा! भारतीय संस्कृती आणि जुनाट रूढी परंपरा मध्ये स्त्रीवर अन्यायच झालाय. तिला चूल आणि मुल यात अडकवून ठेवण्यात आले होते.आणि सगळ्यात जर भयंकर काय असेल तर एखाद्या आठ नऊ वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा बालविवाह तोही कुठल्या तरी वयस्कर माणसाबरोबर लावला जायचा त्यामुळे त्या बालिकेच्या आयुष्याची होळी व्हायची ज्याच्याशी त्याचे लग्न व्हायचे तो तिला कोवळ्या वयात कुस्करून टाकायचा.तिचे लैंगीक शोषण सुरू असतानाच पुढे दोनतीन वर्षात तिला मासिक धर्म सुरू झाला की तिच्यावर अकाली मातृत्व लादले जायचे.लहान वयात गर्भधारणा झाल्यास गर्भाशय कमजोर होऊन स्त्रीला पुढे वेग वेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागायचे .आणि लग्नाची टी बायको लहान वयातच शारीरिक दृष्ट्या कमजोर झाली की मग पुरुष पुन्हा कुठल्या तरी कोवळ्या मुलीला लग्न करून घरात आणायला मोकळा असे सगळे दुष्टचक्र सुरू होते.वास्तविक लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे लग्नासाठी स्त्री असो की पुरुष त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमताही विचारात घेणे गरजेचे असते .खास करून स्त्रीच्या बाबतीत याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण गर्भधारणेसाठी तिची शारीरिक क्षमता असणे गरजेचे असते कारण बाळंतपण आणि प्रसूती नंतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो असे म्हणतात ते काही खोटे नाही .कारण नऊ महिन्याचा तो काळ स्त्रीसाठी एकप्रकारचे अग्निदिव्य असते.म्हणूनच लग्नाचे वय किमान २० वर्ष तरी असावे अशी मागणी केली जात होती ती अखेर सरकारने मान्य केली असून मुलीचे लग्नाचे वय यापुढे २१वर्ष इतके असावे असा सरकार कायदा करणार आहे. त्यासाठीचे एक विधेयक तयार करण्यात आले असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे आता याच अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले जाईल. हे विधेयक जेंव्हा संसदेत मंजुरीसाठी येईल तेंव्हा विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये.तर सामाजिक जबाबदारी समजून ते मंजूर करण्यास मदत करावी.आपल्याकडे सध्या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क आहे महिलांचा विकास आणि सुरक्षेसाठी बेटी बचाव बेटी pdhao यासारखे महत्वकांक्षी अभियान चालवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मुलीचे लग्नाचे वय २१करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Similar Posts
रुग्णसंख्या कमी झाल्यास दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल सुरू करणार
मुंबई/ करोना आता हळू हळू आटोक्यात येत आहे त्यामुळे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे .मात्र तो आणखी आटोक्यात आला तर दिवाळी नंतर सर्वांसाठी लोकल ट्रेन च्या प्रवासास मुभा दिली जाईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलेमार्च २०२० मध्ये लॉक डाऊन सुरू झाल्यापासून लोकल ट्रेन बंद होती मात्र काही महिन्यांनी…
पंतप्रधान मोदींना मातृशोक
गांधीनगर – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे ३. ३० वाजता गांधी नगर येथील एक रुग्णालयात श्वसनाच्या विकाराने मृत्यू झाला त्या १०० वर्षांच्या होत्या. त्यानंतर सकाळी ९. ३० वाजता गांधी नगर येथील स्मशान भूमीत अत्यंत साधेपणाने आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले मोदींचे जेष्ठ बंधू सोमाभाई मोदी आणि नरेंद्र मोदी…
काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा मुंबईच्या म्हाडा मध्ये जमीन घोटाळा -सोमय्या यांच्याकडून 8 बेकायदा स्टुडिओची पाहणी
मुंबई/ मालाड पश्चिमेचे काँग्रेस आमदार अस्लम शेख यांचा समुद्र किनाऱ्यावरील जमीन घोटाळा उघडकीस आला असून या ठिकाणी बांधलेल्या बेकायदेशीर 8 स्टुडिओच भाजपा नेते किरीट सोमय्या आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी पाहणी करून कारवाईची मागणी केली आहेसी आर झेड कायद्या नुसार समुद्रापासून 500 मीटरच्या अंतरावर कोणतेही बांधकाम करता येत नाही असे असताना सतेचा दुरुपयोग करून शेख…
बाबासाहेब पुरंदरे : अगणितांचा आधारवड ! –
श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या वयाच्या बरोब्बर शंभराव्या वर्षी देह ठेवला आणि छत्रपती शिवरायांच्या शिवस्रुष्टीत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे उभ्या हिंदुस्थानातच नव्हे तर साऱ्या जगभरात पारायण केले. घरोघरी शिवरायांचे शौर्य, शिवनीति, शिवविचार, शिवचरित्र पोहोचविले. महाराष्ट्रात शिवसृष्टी उभी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. बाबासाहेब अक्षरशः शिवकाळ जगले. स्वतः बरोबरच शिवभक्तांना…
२५ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई/मुंबई महापालिका अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होतो. मात्र महापौर निवडणुकीसह, स्थायी समिती व अन्य समिती अध्यक्ष तसेच सदस्य निवडणूक प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. अखेर हा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नव्या स्थायी समिती अध्यक्षांसोबत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समिती सभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे….
अडाणी समूहाला मोठा झटका नार्वे वेल्थ फंडाने सर्व शेअर विकले
नॉर्वे वेल्थ फंडचे ईएसजी रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ईएसजी शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ईएसजी म्हणजे,…
