केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे बाल विवाह कायद्यात सुधारणा करून मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१वर्ष करण्याचा! भारतीय संस्कृती आणि जुनाट रूढी परंपरा मध्ये स्त्रीवर अन्यायच झालाय. तिला चूल आणि मुल यात अडकवून ठेवण्यात आले होते.आणि सगळ्यात जर भयंकर काय असेल तर एखाद्या आठ नऊ वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा बालविवाह तोही कुठल्या तरी वयस्कर माणसाबरोबर लावला जायचा त्यामुळे त्या बालिकेच्या आयुष्याची होळी व्हायची ज्याच्याशी त्याचे लग्न व्हायचे तो तिला कोवळ्या वयात कुस्करून टाकायचा.तिचे लैंगीक शोषण सुरू असतानाच पुढे दोनतीन वर्षात तिला मासिक धर्म सुरू झाला की तिच्यावर अकाली मातृत्व लादले जायचे.लहान वयात गर्भधारणा झाल्यास गर्भाशय कमजोर होऊन स्त्रीला पुढे वेग वेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागायचे .आणि लग्नाची टी बायको लहान वयातच शारीरिक दृष्ट्या कमजोर झाली की मग पुरुष पुन्हा कुठल्या तरी कोवळ्या मुलीला लग्न करून घरात आणायला मोकळा असे सगळे दुष्टचक्र सुरू होते.वास्तविक लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे लग्नासाठी स्त्री असो की पुरुष त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमताही विचारात घेणे गरजेचे असते .खास करून स्त्रीच्या बाबतीत याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण गर्भधारणेसाठी तिची शारीरिक क्षमता असणे गरजेचे असते कारण बाळंतपण आणि प्रसूती नंतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो असे म्हणतात ते काही खोटे नाही .कारण नऊ महिन्याचा तो काळ स्त्रीसाठी एकप्रकारचे अग्निदिव्य असते.म्हणूनच लग्नाचे वय किमान २० वर्ष तरी असावे अशी मागणी केली जात होती ती अखेर सरकारने मान्य केली असून मुलीचे लग्नाचे वय यापुढे २१वर्ष इतके असावे असा सरकार कायदा करणार आहे. त्यासाठीचे एक विधेयक तयार करण्यात आले असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे आता याच अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले जाईल. हे विधेयक जेंव्हा संसदेत मंजुरीसाठी येईल तेंव्हा विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये.तर सामाजिक जबाबदारी समजून ते मंजूर करण्यास मदत करावी.आपल्याकडे सध्या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क आहे महिलांचा विकास आणि सुरक्षेसाठी बेटी बचाव बेटी pdhao यासारखे महत्वकांक्षी अभियान चालवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मुलीचे लग्नाचे वय २१करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Similar Posts
निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट
निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज वर्षा येथे भेट घेतली. यावेळी सकारात्मक चर्चा होऊन पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मार्डने मांडलेल्या मुद्द्यांवर योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक, संचालक, वैद्यकीय शिक्षण डॉ दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय…
चेन्नई सुपरकिंग्सने सामना एकहाती जिंकला.
IPL 2021 Final: इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला.
सपा आणि काँग्रेसने माफियाना साथ दिली संभल ची डेमोक्रसी बदलण्याचा प्रयत्न केला – योगींचा विरोधकांवर आरोप
लखनौ/समाजवादी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकाळात हिंदूंना ठरवून लक्ष्य करण्यात आले. तेव्हा, हिंदूंची लोकसंख्या कमी करून डेमोग्राफी बदलण्याचा कट रचण्यात आला. आज हे डबल इंजिनचे सरकार कुठल्याही परिस्थितीत अशा प्रकारची फुटीर राजकारण होऊ देणार नाही. जे कुणी राज्यातील डेमोग्राफी बदलण्याचा प्रयत्न करेल, त्याला स्वतःलाच पलायन करावे लागेल, अशा शब्दात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सपा…
साकीनाका बलात्कार हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या मुलींना सरकार देणार 20 लाखांची मदत
: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी…
इकबाल सिंग चहल याना केंद्रात प्रमोशन
मुंबई/ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी अशी ओळख आलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आता केंद्रात सचिवपदी नियुक्ती होणार आहे कोविड काळात चहल यांनी केलेल्या कामाची संपूर्ण देशाने दाखल घेतली होती त्यामुळे त्यांना केंद्राच्या अपाईटमेंट कमिटीने केंद्रात सचिव पदी बढती दिली आहे एकूण 9 अधिकाऱ्यांचे देशभरातील राज्या मधून केंद्रात प्रमोशन झाले आहे…
ठराविक दुकानातून मुलांचे गणवेश घेण्याचीसक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार
मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरु झाल्यात . त्यामुळे मुलांचे शाळेचे गणवेश घेण्याची पालकांची लगबग सुरु आहे.मात्र काही शाळांची दुकानदारनबरोबर शर्टींग असल्याने ठराविक दुकानातूनच गणवेश घेण्याची शाळांकडून सक्ती केली जाते. त्याविरुद्ध आता सरकारने कठोर पावले उचलली असून असे करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहेजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक काढून ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार…
