केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे बाल विवाह कायद्यात सुधारणा करून मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१वर्ष करण्याचा! भारतीय संस्कृती आणि जुनाट रूढी परंपरा मध्ये स्त्रीवर अन्यायच झालाय. तिला चूल आणि मुल यात अडकवून ठेवण्यात आले होते.आणि सगळ्यात जर भयंकर काय असेल तर एखाद्या आठ नऊ वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा बालविवाह तोही कुठल्या तरी वयस्कर माणसाबरोबर लावला जायचा त्यामुळे त्या बालिकेच्या आयुष्याची होळी व्हायची ज्याच्याशी त्याचे लग्न व्हायचे तो तिला कोवळ्या वयात कुस्करून टाकायचा.तिचे लैंगीक शोषण सुरू असतानाच पुढे दोनतीन वर्षात तिला मासिक धर्म सुरू झाला की तिच्यावर अकाली मातृत्व लादले जायचे.लहान वयात गर्भधारणा झाल्यास गर्भाशय कमजोर होऊन स्त्रीला पुढे वेग वेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागायचे .आणि लग्नाची टी बायको लहान वयातच शारीरिक दृष्ट्या कमजोर झाली की मग पुरुष पुन्हा कुठल्या तरी कोवळ्या मुलीला लग्न करून घरात आणायला मोकळा असे सगळे दुष्टचक्र सुरू होते.वास्तविक लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे लग्नासाठी स्त्री असो की पुरुष त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमताही विचारात घेणे गरजेचे असते .खास करून स्त्रीच्या बाबतीत याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण गर्भधारणेसाठी तिची शारीरिक क्षमता असणे गरजेचे असते कारण बाळंतपण आणि प्रसूती नंतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो असे म्हणतात ते काही खोटे नाही .कारण नऊ महिन्याचा तो काळ स्त्रीसाठी एकप्रकारचे अग्निदिव्य असते.म्हणूनच लग्नाचे वय किमान २० वर्ष तरी असावे अशी मागणी केली जात होती ती अखेर सरकारने मान्य केली असून मुलीचे लग्नाचे वय यापुढे २१वर्ष इतके असावे असा सरकार कायदा करणार आहे. त्यासाठीचे एक विधेयक तयार करण्यात आले असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे आता याच अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले जाईल. हे विधेयक जेंव्हा संसदेत मंजुरीसाठी येईल तेंव्हा विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये.तर सामाजिक जबाबदारी समजून ते मंजूर करण्यास मदत करावी.आपल्याकडे सध्या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क आहे महिलांचा विकास आणि सुरक्षेसाठी बेटी बचाव बेटी pdhao यासारखे महत्वकांक्षी अभियान चालवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मुलीचे लग्नाचे वय २१करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Similar Posts
अति.आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांचा बदल्या,बढत्या रॅकेटसला दणका – पालिकेतील बदल्या,बढत्या चे रॅकेटस उध्वस्त करण्याची गरज- एक अधिकारी त्याच मलईदार पदावर 30 वर्ष राहतोच कसा ?
मुंबई (किसन जाधव) महापालिकेची मुदत आता संपलेली असून मुंबईसह मुदत संपलेल्या सर्वच महापालिकांमध्ये प्रशासक आहे. अशावेळी मुंबई महापालिकेच्या बदल्या आणि बढत्यांमधले झोल हळू हळू उघडकीस येत आहेत. यात बड्या प्रशासकीय अधिकारी पासून अभियंते, लिपिक आणि शिपाई पर्यंत सर्वांनीच हात धुवून घेतले आहेत. पण पालिकेत जसे भ्रष्ट अधिकारी आहेत तसेच काही प्रमाणिक अधिकारी सुधा आहेत ….
पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
विरार मध्ये बविआ – भाजपात राडा
विनोद तावडेंवर पैसे वाट्ल्याचा आरोपविरार – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मतदाराना पैसे वाट्ल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. त्यानंतर बविआच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे व भाजप उमेदवार राजन नाईक ज्या हॉटेलवर थांबले होते तिथे जाऊन तावडेंना जाब विचारला तसेच राजन नाईक याना धक्काबुकी केली. या प्रकरणी पोलिसांनी विनोद तावडे…
उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले- देवेंद्र फडणवीस यांच्या टिके मुळे शिवसेना संतप्त
*मुंबई/मी ढेकणाच्या नादाला लागत नाही कारण ढेकणाला बोटानी चिरडलं जातं तुझ्या नादाला लागला एवढ्या कोटीचा तू नाहीस अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस वर टीका केली होती .त्या टिकेचा समाचार घेताना आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून हल्ला केला ते म्हणाले उद्धव ठाकरे हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले याचा आम्हाला खूप दुःख…
उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.संतोष रेवणकर सेवानिवृत्त
मुंबई/ मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ सेवा बजावणारे आणि जनतेचे डॉक्टर अशी ओळख निर्माण करणारे उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ संतोष रेवणकर हे सेवानिवृत्त नुकतेच झाले असून पालिकेचा आरोग्य विभाग आणि ज्या मुंबईकरांवर त्यांनी यशस्वी उपचार केले ते सर्वजण डॉ रेवणकर यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांनी आपल्या सेवा…
बिहारमध्ये सॅनिटरी नॅपकिनच्या पॅड वर राहुल गांधींचा फोटो भाजपकडून जोरदार टीका
पटना/बिहार प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कुमार यांनी शुक्रवारी पाटणा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही बिहारमधील महिलांसाठी विशेष तयारी केली आहे. घरोघरी जाऊन ५ लाख महिलांना सॅनिटरी पॅड वाटण्याचे आमचे लक्ष्य आहे.”भाजपने याला बिहारच्या महिलांचा अपमान म्हटले आहे. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते अजय आलोक म्हणाले की, हे जाणूनबुजून केलेले घृणास्पद कृत्य आहे. बिहारच्या महिला गरीब असू…
