केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे बाल विवाह कायद्यात सुधारणा करून मुलींचे लग्नाचे वय १८ वरून २१वर्ष करण्याचा! भारतीय संस्कृती आणि जुनाट रूढी परंपरा मध्ये स्त्रीवर अन्यायच झालाय. तिला चूल आणि मुल यात अडकवून ठेवण्यात आले होते.आणि सगळ्यात जर भयंकर काय असेल तर एखाद्या आठ नऊ वर्षाच्या कोवळ्या बालिकेचा बालविवाह तोही कुठल्या तरी वयस्कर माणसाबरोबर लावला जायचा त्यामुळे त्या बालिकेच्या आयुष्याची होळी व्हायची ज्याच्याशी त्याचे लग्न व्हायचे तो तिला कोवळ्या वयात कुस्करून टाकायचा.तिचे लैंगीक शोषण सुरू असतानाच पुढे दोनतीन वर्षात तिला मासिक धर्म सुरू झाला की तिच्यावर अकाली मातृत्व लादले जायचे.लहान वयात गर्भधारणा झाल्यास गर्भाशय कमजोर होऊन स्त्रीला पुढे वेग वेगळ्या व्याधींना तोंड द्यावे लागायचे .आणि लग्नाची टी बायको लहान वयातच शारीरिक दृष्ट्या कमजोर झाली की मग पुरुष पुन्हा कुठल्या तरी कोवळ्या मुलीला लग्न करून घरात आणायला मोकळा असे सगळे दुष्टचक्र सुरू होते.वास्तविक लग्न हा आयुष्यातला एक महत्वाचा टप्पा असतो त्यामुळे लग्नासाठी स्त्री असो की पुरुष त्यांची मानसिक आणि शारीरिक क्षमताही विचारात घेणे गरजेचे असते .खास करून स्त्रीच्या बाबतीत याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा कारण गर्भधारणेसाठी तिची शारीरिक क्षमता असणे गरजेचे असते कारण बाळंतपण आणि प्रसूती नंतर स्त्रीचा दुसरा जन्म होतो असे म्हणतात ते काही खोटे नाही .कारण नऊ महिन्याचा तो काळ स्त्रीसाठी एकप्रकारचे अग्निदिव्य असते.म्हणूनच लग्नाचे वय किमान २० वर्ष तरी असावे अशी मागणी केली जात होती ती अखेर सरकारने मान्य केली असून मुलीचे लग्नाचे वय यापुढे २१वर्ष इतके असावे असा सरकार कायदा करणार आहे. त्यासाठीचे एक विधेयक तयार करण्यात आले असून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजुरीही मिळाली आहे आता याच अधिवेशनात हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले जाईल. हे विधेयक जेंव्हा संसदेत मंजुरीसाठी येईल तेंव्हा विरोधकांनी त्याचे राजकारण करू नये.तर सामाजिक जबाबदारी समजून ते मंजूर करण्यास मदत करावी.आपल्याकडे सध्या स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने काम करण्याचा हक्क आहे महिलांचा विकास आणि सुरक्षेसाठी बेटी बचाव बेटी pdhao यासारखे महत्वकांक्षी अभियान चालवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून मुलीचे लग्नाचे वय २१करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
Similar Posts
लाड़ली बहन योजना के खिलाफ हाई कोर्ट में याचिका
मुंबई – लोकसभा चुनाव में हुए नुकसान की भरपाई विधानसभा चुनाव में करने के लिए महायुति ने प्रयास शुरू कर दिए हैं और सभी महिलाओं का समर्थन हासिल करने के लिए हर महीने 1500 रुपये देने के लिए लड़की बहन योजना शुरू की गई है लेकिन यह योजना शुरू होने से पहले ही कानूनी पचड़े…
“प्रशासकीय नेतृत्व देणाऱ्या संस्थेची (युपी एससी) यशस्वी शताब्दी !”
देशावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी स्थापन केलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाला (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन- युपीएससी) नुकतीच 100 वर्षे पूर्ण झाली. देशाला प्रशासकीय नेतृत्व देण्याचे मोलाचे काम ही संस्था यशस्वीपणे करत आहे. शताब्दी निमित्त आयोगाच्या कामगिरीचा घेतलेला धावता आढावा. केंद्र सरकार किंवा विविध राज्यांचे प्रशासन अत्यंत कणखरपणे चालवण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली. भारतातील…
हाजी अल्ली दर्ग्यात बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल
मुंबई :फेक कॉल करून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार आता वाढीस लागले आहेत . आणि आता तर धार्मिक द्वेषातून धार्मिक स्थळांना टार्गेट करू अशा प्रकारच्या धमक्या देणे सुरु आहे. हाजी अल्ली दर्ग्यात बोंब ठेवल्याचा कॉल करण्यात आल्याने खळबळ माजली होती हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात एक धमकीचा फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने हाजी अली दर्ग्यात…
जुनी पेन्शन सरकारला टेन्शन- उपमुख्यमंत्र्यांनी हात झटकले
मुंबई – जुनी पेन्शन योजना घाईघाईने लागू करणे आर्थिक दृष्ट्या योग्य ठरणार नाही त्यावर व्यापक चर्चा करणे आवश्यक आहे ज्या राज्यांनी तसे केले त्यांचा अभ्यास करायला हवा असे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हात झटकलेजुनी पेन्श योजनेत निवृत्तीवेळचा जो पगार होता त्याच्या पन्नास टक्के पगार निवृत्तीनंतर मिळायचा. नवीन पेन्शन स्किम मध्ये पहिल्यांदा सरकारने 10 टक्के आणि…
बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांचा बंदोबस्त करा- मंगल प्रभात लोढा मुंबई – मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय धोक्याची गोष्ट आहे. खोटे आधार कार्ड घेऊन बांगलादेशी आणि रोहिंग्या हे घुसखोर आपल्या देशात येत आहेत, फेरीवाले, भाजीवाले, छोटे विक्रेते म्हणून आपल्यात वावरत आहेत आणि आपल्याच नागरिकांना धमकावत आहेत. आज जर यावर कारवाई केली गेली नाही तर हे घुसखोर संपूर्ण…
महायुतीच्या नेत्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार
मुंबई – सध्या निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय पक्ष एकमेकांवर आचारसंहिता भगांच्या तक्रारी करीत आहेत.पंत प्रधान मोदिवर निवडणुकीची मेच फिक्सिंग केल्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींच्या विरुद्ध भाजपने तक्रार केली आहे तर स्टार प्रचारकांच्या यादीत महायुतीतील पक्षांनी एकमेकांच्या नेत्यांची नवे समाविष्ट केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुती विरुद्ध आचार संहिता भंगाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. या सर्व धामधुमीत…
