मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. शहीद कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी मंगलाताई खाडिलकर यांच्या शुभहस्ते आणि कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील मागाठाणे पोलीस बीट चौकीजवळील सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता ‘ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
Similar Posts
आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !
55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य, आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि…
कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे ‘मळभ कोरोना’चे वाचनीय पुस्तक ; आशुतोष कुंभकोणी ; माजी आरोग्य मंत्र्यांच्या अनुभवातून झालेली निर्मिती
मुंबई, दि. (प्रतिनिधी) :-गेली दीड वर्षे भारतासह जग कोरोनाशी लढा देत आहे.मात्र याबद्दल अचूक व अभ्यासपूर्ण माहिती असणाऱ्या लेखांचा संग्रह असणारे लेखक व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लिहिलेले कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे मळम कोरोनाचे पुस्तक आहे अश्या शब्दात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी गौवोद्गार काढले.विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ हॉल मध्ये कोरोनाचे नियम…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
नव्या पिढीसाठी ज्ञानाचे भांडार लाभणारे “गुरुजी” पुस्तकाचे धन..!
राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधी, पत्रकार, राजकीय अभ्यासक यांच्यासाठी विविध राजकीय विश्लेषण करणारे आणि ज्ञानाचे गुरुत्व लाभलेले “गुरुजी”नावाचे संग्राह्य पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. सदर पुस्तक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि व्यासंगी पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांनी लिहिले आहे.इंटरनेटच्या जगात पुस्तक वाचून संस्कृती संपत चाललेली असतांना आणि त्यामध्ये सध्या लॉकडाऊनच्या काळात एखादे पुस्तक प्रकाशित करणे हे…
‘मराठी भाषे’ला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळण्यासाठी अमराठी खासदाराचा ‘संघर्ष
‘ ; महाराष्ट्राने मला भरपूर दिल्याची गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांची कृतज्ञता ! भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी जोरदार आवाज उठवला. मला महाराष्ट्राने खूप काही दिले आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करतांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त…
अवघे गर्जे पंढरपूर
चला हो पंढरी जाऊ ।जिवाच्या जिवलगा पाहू ।।असे गात प्रवास केलेले वारकरी पंढरपूरच्या वेशीत पोहचले असते. वाखरीच्या घोड्याच्या गोल रिंगणाचा सोहळा पार पडला असता. कळस पाहिल्याबरोबर विरहाचा क्षण संपून मायेहून मायाळ, चंद्राहून शीतळ, पाण्याहून पातळ, कनवाळू, भक्तजन प्रतिपालक पाडुरंगाच्या भेटीचा आनंद वारकर्यांना झाला आहे. पण कोरोनामुळे अनेक वारकर्यांची ही वारी सलग दुसर्यांदा चुकली आहे. ‘चुकलिया…
