मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या शोभा, मुलगा दिपक, जावई जीन डिसिल्वा, सून अनिता, नात साशा, आणि एँजल असा परिवार आहे. मीना वाजपेयी या काही वर्षे अंबरनाथ येथे वास्तव्यास होत्या. नंतर त्यांनी कुर्ला येथे आपली कर्मभूमी बनविली. शरद पवार, विलासराव देशमुख, मुरली देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अविरतपणे कार्य करतांना नेहरुनगर, कमानी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. मोहम्मद अरीफ मोहम्मद नसीम खान, कृपाशंकरसिंह, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदींच्या निवडणुकीत झपाटून काम केले. विशेष कार्यकारी अधिकारी, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अशा माध्यमातून त्यांनी नागरिकांची सेवा केली. गेल्या काही वर्षापासून आपली कन्या शोभा हिच्या माझगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. कुर्ला ही कर्मभूमी असल्याने त्यांच्या पार्थिवावरस्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपूत्र दिपकने अग्निसंस्कार केले. डॉ. आदित्य त्रिपाठी, माजी नगरसेवक ज्युलियस, सुहास साबट, बाबू कापडने, सुरेश सकपाळ, विनोद कोरी, लक्ष्मण बिश्त, मुनीलाल कनोजिया, पिंकू कलाम, जितेंद्र शर्मा, दान बहादूर सिंह, लाल बहादूर सिंह, मनोज थोरात, इक्बाल खान आदि मान्यता यावेळी उपस्थित होते. मीना वाजपेयी यांच्या कन्या शोभा वाजपेयी डिसिल्वा या पती जीं यांच्या सह जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून नशामुक्तीची चळवळ राबवीत आहेत.
Similar Posts
अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील विविध घटकांपासून राजकारणी, विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष…
३० वर्षांच्या न्यायालयीन सेवेतून सूर्यकांत बंडू जाधव निवृत्त
सातारा- औद्योगिक व कामगार न्यायालय सातारा येथे ३० वर्ष सेवा बजावल्यानंतर सूर्यकांत बंडू जाधव हे सेवेतून निवृत्त झाले आहेत. आपल्या सेवा काळात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि सर्वांशी आपुलकीचे संबंध ठेऊन सेवा बजावली . अध्यात्म आणि भक्ती मार्गातील सूर्यकांत जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी आपल्याभोवती मोठा जनसमुदाय गोळा केलेला आहे. निवृत्ती नंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा सत्कार…
बाबासाहेब पुरंदरे : अगणितांचा आधारवड ! –
श्रीमंत बळवंत मोरेश्वर उपाख्य बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या वयाच्या बरोब्बर शंभराव्या वर्षी देह ठेवला आणि छत्रपती शिवरायांच्या शिवस्रुष्टीत प्रवेश केला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचे उभ्या हिंदुस्थानातच नव्हे तर साऱ्या जगभरात पारायण केले. घरोघरी शिवरायांचे शौर्य, शिवनीति, शिवविचार, शिवचरित्र पोहोचविले. महाराष्ट्रात शिवसृष्टी उभी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. बाबासाहेब अक्षरशः शिवकाळ जगले. स्वतः बरोबरच शिवभक्तांना…
रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे आज प्रकाशन ; वीरमाता अनुराधा गोरे आणि मंगलाताई खाडिलकर यांचे मार्गदर्शन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. शहीद…
काँग्रेस पक्षाने नेहरु गांधी परिवाराच्या जोखडातून बाहेर येण्याची गरज !
विदर्भातील एकेकाळचे जबरदस्त नेते, माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांचे पिताश्री सतीश चतुर्वेदी यांनी काही वर्षापूर्वी आम्हा काही पत्रकारांबरोबर गप्पा मारतांना काँग्रेस पक्षाची परिस्थिती सांगितली होती. महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्ताने आम्ही नागपूर येथे गेलो असतांना शनिवार रविवारी नागपूरच्या बाहेर जाण्याचा एक प्रघात आहे. अशाच एका दौऱ्यावर सतीश चतुर्वेदी यांच्या समवेत गप्पा रंगल्या…
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ;. प्रल्हाददादा पै
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा…
