मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या शोभा, मुलगा दिपक, जावई जीन डिसिल्वा, सून अनिता, नात साशा, आणि एँजल असा परिवार आहे. मीना वाजपेयी या काही वर्षे अंबरनाथ येथे वास्तव्यास होत्या. नंतर त्यांनी कुर्ला येथे आपली कर्मभूमी बनविली. शरद पवार, विलासराव देशमुख, मुरली देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अविरतपणे कार्य करतांना नेहरुनगर, कमानी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. मोहम्मद अरीफ मोहम्मद नसीम खान, कृपाशंकरसिंह, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदींच्या निवडणुकीत झपाटून काम केले. विशेष कार्यकारी अधिकारी, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अशा माध्यमातून त्यांनी नागरिकांची सेवा केली. गेल्या काही वर्षापासून आपली कन्या शोभा हिच्या माझगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. कुर्ला ही कर्मभूमी असल्याने त्यांच्या पार्थिवावरस्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपूत्र दिपकने अग्निसंस्कार केले. डॉ. आदित्य त्रिपाठी, माजी नगरसेवक ज्युलियस, सुहास साबट, बाबू कापडने, सुरेश सकपाळ, विनोद कोरी, लक्ष्मण बिश्त, मुनीलाल कनोजिया, पिंकू कलाम, जितेंद्र शर्मा, दान बहादूर सिंह, लाल बहादूर सिंह, मनोज थोरात, इक्बाल खान आदि मान्यता यावेळी उपस्थित होते. मीना वाजपेयी यांच्या कन्या शोभा वाजपेयी डिसिल्वा या पती जीं यांच्या सह जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून नशामुक्तीची चळवळ राबवीत आहेत.
Similar Posts
‘मराठी भाषे’ला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळण्यासाठी अमराठी खासदाराचा ‘संघर्ष
‘ ; महाराष्ट्राने मला भरपूर दिल्याची गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांची कृतज्ञता ! भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ चिन्नय्या शेट्टी यांनी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी जोरदार आवाज उठवला. मला महाराष्ट्राने खूप काही दिले आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करतांना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त…
शिवशाहीचे वारसदार
शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि…
माहिती संरक्षण विधेयकात सुधारणांची आवश्यकता!
मोदी सरकारने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी महत्वाच्या ठरणारे व्यक्तिगत माहिती ( डेटा -विदा) संरक्षण विधेयक पुन्हा सादर केले आहे. मात्र याबाबत अजूनही मोदी सरकार नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कसोटीवर पुरेसे संरक्षण देण्यात अपुरे पड़त असल्याची भावना सर्व सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्याचे नेमके महत्त्व विशद करणारा हा लेख. ऑगस्ट २०२२ मध्ये मोदी सरकारने डिजिटल पर्सनल…
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ : डॉ. मनोहर गजानन जोशी !
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी…
ताज्या बातम्या | मुंबई | राजकीय | विश्लेषणशुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!
शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला की मग त्याचे ब्रम्हणाकडून शुध्दीकरण करून घेतले जायचे.पण आता जग खूप पुढे गेले आहे .जात पात तर कुणी मनिताच नाही पण एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे हे समाज ठरवतो.कुठला एक पक्ष किंवा पंथ…
