मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या शोभा, मुलगा दिपक, जावई जीन डिसिल्वा, सून अनिता, नात साशा, आणि एँजल असा परिवार आहे. मीना वाजपेयी या काही वर्षे अंबरनाथ येथे वास्तव्यास होत्या. नंतर त्यांनी कुर्ला येथे आपली कर्मभूमी बनविली. शरद पवार, विलासराव देशमुख, मुरली देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अविरतपणे कार्य करतांना नेहरुनगर, कमानी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. मोहम्मद अरीफ मोहम्मद नसीम खान, कृपाशंकरसिंह, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदींच्या निवडणुकीत झपाटून काम केले. विशेष कार्यकारी अधिकारी, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अशा माध्यमातून त्यांनी नागरिकांची सेवा केली. गेल्या काही वर्षापासून आपली कन्या शोभा हिच्या माझगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. कुर्ला ही कर्मभूमी असल्याने त्यांच्या पार्थिवावरस्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपूत्र दिपकने अग्निसंस्कार केले. डॉ. आदित्य त्रिपाठी, माजी नगरसेवक ज्युलियस, सुहास साबट, बाबू कापडने, सुरेश सकपाळ, विनोद कोरी, लक्ष्मण बिश्त, मुनीलाल कनोजिया, पिंकू कलाम, जितेंद्र शर्मा, दान बहादूर सिंह, लाल बहादूर सिंह, मनोज थोरात, इक्बाल खान आदि मान्यता यावेळी उपस्थित होते. मीना वाजपेयी यांच्या कन्या शोभा वाजपेयी डिसिल्वा या पती जीं यांच्या सह जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून नशामुक्तीची चळवळ राबवीत आहेत.
Similar Posts
आता मुलींचे शोषण थांबेल!
केंद्रातील मोदी सरकारची आजवरची काही कामे भलेही वादग्रस्त असली तरी त्यांच्या सरकारने मागील सात वर्षात घेतलेले काही निर्णय निश्चितच समाजासाठी लाभदायी ठरलेत.मग तो जम्मू काश्मीर मधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय असो की ट्रीप ल तलकचा निर्णय असो!त्याचा निश्चितच देशातील जनतेला कुठेतरी फायदा होणार आहे. सरकारने असाच आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि तो…
आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !
55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य, आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि…
एशियन ग्रॅनिटोचा निव्वळ नफा ८.२८ कोटी रुपये
मुंबई, ता. ९ (प्रतिनिधी) : भारतातील आघाडीच्या टाइल ब्रँडपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ८.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला ७.५१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्षानुवर्षाच्या निव्वळ नफ्यात ५६३ टक्के वाढ झाली आहे. जून,…
संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ : डॉ. मनोहर गजानन जोशी !
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी…
संतांनी मानवी मूल्यांचा जागर केला तोच संविधानाचा गाभा झाला
ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नरमंगळूरपीर (प्रतिनिधी) : जाती-धर्माच्या आणि वर्णाच्या आधारे रुजविलेली वीषमता दूर करून मानवी मूल्यांचा जागर संतांनी केला. तीच मूल्य पुढे संविधानाचा गाभा झाली, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार, ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले. भारतीय संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधूत्व ही मूल्य आपल्याला संत साहित्यात दिसतात, असेही ते म्हणाले. संविधान दिनानिमित्त पाथ फाऊंडेशनच्या…
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
