मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या शोभा, मुलगा दिपक, जावई जीन डिसिल्वा, सून अनिता, नात साशा, आणि एँजल असा परिवार आहे. मीना वाजपेयी या काही वर्षे अंबरनाथ येथे वास्तव्यास होत्या. नंतर त्यांनी कुर्ला येथे आपली कर्मभूमी बनविली. शरद पवार, विलासराव देशमुख, मुरली देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अविरतपणे कार्य करतांना नेहरुनगर, कमानी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. मोहम्मद अरीफ मोहम्मद नसीम खान, कृपाशंकरसिंह, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदींच्या निवडणुकीत झपाटून काम केले. विशेष कार्यकारी अधिकारी, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अशा माध्यमातून त्यांनी नागरिकांची सेवा केली. गेल्या काही वर्षापासून आपली कन्या शोभा हिच्या माझगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. कुर्ला ही कर्मभूमी असल्याने त्यांच्या पार्थिवावरस्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपूत्र दिपकने अग्निसंस्कार केले. डॉ. आदित्य त्रिपाठी, माजी नगरसेवक ज्युलियस, सुहास साबट, बाबू कापडने, सुरेश सकपाळ, विनोद कोरी, लक्ष्मण बिश्त, मुनीलाल कनोजिया, पिंकू कलाम, जितेंद्र शर्मा, दान बहादूर सिंह, लाल बहादूर सिंह, मनोज थोरात, इक्बाल खान आदि मान्यता यावेळी उपस्थित होते. मीना वाजपेयी यांच्या कन्या शोभा वाजपेयी डिसिल्वा या पती जीं यांच्या सह जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून नशामुक्तीची चळवळ राबवीत आहेत.
Similar Posts
आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !
55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य, आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि…
दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील मध्यम किंवा छोट्या आकाराच्या दोन बँकाचे निर्गुंतवणूकीकरण म्हणजे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात होणार आहे. मार्च 2023 अखेरच्या आर्थिक वर्षात अनेक मध्यम व छोट्या बँकांनी उत्तम नफा कमावलेला आहे. तसेच काही बँकांचे एकत्रीकरणही यशस्वी झालेले आहे. खाजगीकरण करण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमण्याचे जाहीर करून याबाबतचे आवश्यक पाऊल केंद्राने नुकतेच टाकलेले…
आषाढी एकादशी निमित्त-खेळ मांडियेला
महाराष्ट्रीयन समाज मनावर संत विचारांचा खोलवर परिणाम झालेला आहे. संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा,परंपरा इतकेच नव्हे सामाजिक चळवळीमध्येही पहायला मिळते. आणखी स्पष्ट शब्दांत सांगायचे झाले तर महाराष्ट्रीयन समाज मनाची मशागत समताधिष्टित संतविचाराने केली. म्हणूनच इथे सामाजिक बदलांच्या चळवळी उभ्या राहिल्या आणि त्यांनी समृद्ध महाराष्ट्र उभा केला. या संत विचारांचा जागर आपण करणार आहोत.मध्ययुगीन प्रबोधन…
पेट्रोल डिझेल चां दराबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल-भवानजी
बाबूभाई,,म्हणतात की,सरकार जी एस टी मधून वेगवेगळ्या विकास कामांचा खर्च करते रेल्वे,रस्ते,पुल,संरक्षण आरोग्य शिक्षण यासारख्या जनहिताच्या योजनेवर खर्च केला जातो कोविड काळात केंद्र सरकारने कोविड रोखण्यासाठी अफाट खर्च केला हा सगळा खर्च जी एस टी सारख्या कारच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून केलावकातो शिवाय सरकार राज्यांना जी एस टी चां परतावा राज्यांना देते तरीही विरोधक केंद्राला…
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे आज प्रकाशन ; वीरमाता अनुराधा गोरे आणि मंगलाताई खाडिलकर यांचे मार्गदर्शन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. शहीद…
