मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा श्रीमती मीना चंद्रकांत वाजपेयी यांचे माझगाव, मुंबई येथे त्यांची कन्या शोभा वाजपेयी यांच्या निवासस्थानी प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात कन्या शोभा, मुलगा दिपक, जावई जीन डिसिल्वा, सून अनिता, नात साशा, आणि एँजल असा परिवार आहे. मीना वाजपेयी या काही वर्षे अंबरनाथ येथे वास्तव्यास होत्या. नंतर त्यांनी कुर्ला येथे आपली कर्मभूमी बनविली. शरद पवार, विलासराव देशमुख, मुरली देवरा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काँग्रेस पक्षाचे अविरतपणे कार्य करतांना नेहरुनगर, कमानी, कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर परिसरात आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटविला. मोहम्मद अरीफ मोहम्मद नसीम खान, कृपाशंकरसिंह, एकनाथ गायकवाड, वर्षा गायकवाड आदींच्या निवडणुकीत झपाटून काम केले. विशेष कार्यकारी अधिकारी, नेहरुनगर तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा अशा माध्यमातून त्यांनी नागरिकांची सेवा केली. गेल्या काही वर्षापासून आपली कन्या शोभा हिच्या माझगाव येथील निवासस्थानी वास्तव्यास होत्या. कुर्ला ही कर्मभूमी असल्याने त्यांच्या पार्थिवावरस्वर्गीय मीनाताई बाळासाहेब ठाकरे हिंदु स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपूत्र दिपकने अग्निसंस्कार केले. डॉ. आदित्य त्रिपाठी, माजी नगरसेवक ज्युलियस, सुहास साबट, बाबू कापडने, सुरेश सकपाळ, विनोद कोरी, लक्ष्मण बिश्त, मुनीलाल कनोजिया, पिंकू कलाम, जितेंद्र शर्मा, दान बहादूर सिंह, लाल बहादूर सिंह, मनोज थोरात, इक्बाल खान आदि मान्यता यावेळी उपस्थित होते. मीना वाजपेयी यांच्या कन्या शोभा वाजपेयी डिसिल्वा या पती जीं यांच्या सह जीवनधारा संस्थेच्या माध्यमातून नशामुक्तीची चळवळ राबवीत आहेत.
Similar Posts
ताज्या बातम्या | मुंबई | राजकीय | विश्लेषणशुध्दीकरण मनाचे आणि विचारांचे व्हावे!
शुध्दीकरण हा प्रकार वर्ण व्यवस्थेतून पुढे आलाय.कारण पूर्वी एखाद्या हलक्या जातीतल्या माणसाचा एखाद्या वस्तूला किंवा उच्च वर्णीय व्यक्तीस स्पर्श झाला की मग त्याचे ब्रम्हणाकडून शुध्दीकरण करून घेतले जायचे.पण आता जग खूप पुढे गेले आहे .जात पात तर कुणी मनिताच नाही पण एखादा माणूस चांगला आहे की वाईट आहे हे समाज ठरवतो.कुठला एक पक्ष किंवा पंथ…
रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे आज प्रकाशन ; वीरमाता अनुराधा गोरे आणि मंगलाताई खाडिलकर यांचे मार्गदर्शन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. शहीद…
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कमिटी सदस्या प्रवीण दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात ; विरोधी पक्षनेत्यांच्या केसाला हात तर लावून दाखवा ; डॉ. उज्ज्वला जाधव यांचा इशारा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय…
मनाला आवरायला, जोडायला, सजवायला, सावरायला शिका तरच जीवन सुखी होईल ; जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाद दादा पै यांचे मार्गदर्शन ; अमेरिकेतील ‘आमी परिवार ग्लोबल टॉक शो’ फेसबुक लाईव्ह मध्ये विशेष अतिथी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अमेरिकेतील ‘आमी परिवार’ म्हणजेच अखिल आंतरराष्ट्रीय मराठी इंडियन्स परिवारातर्फे आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह ‘ग्लोबल टॉक शो’ मध्ये ‘मनावर घ्या’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी जीवनविद्येचे आजीव विश्वस्त आणि सदगुरू श्री. वामनराव पै यांचे सुपुत्र श्री. प्रल्हाददादा पै यांना निमंत्रित करण्यात आले होते. या टॉक शो मध्ये श्री. प्रल्हाददादा पै यांनी ‘मन’ ह्या…
एशियन ग्रॅनिटोचा निव्वळ नफा ८.२८ कोटी रुपये
मुंबई, ता. ९ (प्रतिनिधी) : भारतातील आघाडीच्या टाइल ब्रँडपैकी एक असलेल्या एशियन ग्रॅनिटो इंडिया लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत ८.२८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला ७.५१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता म्हणजेच या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वर्षानुवर्षाच्या निव्वळ नफ्यात ५६३ टक्के वाढ झाली आहे. जून,…
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ;. प्रल्हाददादा पै
स्वतः ऐवजी देशाचा विचार सर्वप्रथम केला तर सर्वच प्रश्न मार्गी लागतील ; भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारणासाठी श्री. प्रल्हाददादा पै यांची महत्वपूर्ण सूचना ; ‘गुरुजी’ चे प्रकाशन करतांना मांडला जीवनविद्या मिशनचा सिद्धांत मुंबई, दि. (विशेष प्रतिनिधी) : आपल्या देशात भय आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण योग्य पद्धतीने अंगिकारण्यात आले आणि स्वतः ऐवजी देश हा सर्वप्रथम असा…
