शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि एक लोक कल्याणकारी राजा अशी जगात आपली ओळख निर्माण केली .रयतेच्या भाजीच्या देठाला सुधा हात लावू नका असा महाराजांचा आपल्या सैनिकांना सक्त आदेश होता.महाराजांनी या मराठी मातीत खर्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले.आणि याच सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बळावर बलाढ्य अशा आदिलशहा, निजामशाह, आणि मोगल बादशहा यांच्याशी लढा दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे म्हणून इतिहासात अजरामर आहेत. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रायगडावरील सोहळ्यात भाग घेताना रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी 59 कोटी देण्याचे जाहीर केले. ही शिवसृष्टी कधी अस्तित्वात येईल तेंव्हा येईल पण तत्पूर्वी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे. गडावरील अरिक्रमणे काढली पाहीजे. कारण हे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौरशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत पण आज ते भग्नावस्थेत आहेत.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर या गडकिल्ल्यां कडे कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहिले नाही.त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांच्या नंतर आजही ते आहेत त्याच अवस्थेत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय दुकानदारी चालवली जाते पण महाराजांच्या या गडकिल्ल्यांचे भग्न अवस्थेतील हे स्वरूप पालटवून त्यांना नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. 300 च्या आसपास असलेल्या या छोट्या मोठ्या किल्ल्यांची जर व्यवस्थित डागडुजी केली तर हे किल्ले जागतिक पर्यटनाचे केंद्र बिंदू ठरतील आणि शिवशाहीचा इतिहास संपूर्ण जगभर पसरला जाईल. पण हे घडायला हवे त्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी पुढाकार घ्यायला हवा आज राज्यात आणि केंद्रात सुधा भाजपचे सरकार आहे त्यामुळे महाराजांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकासाला निधी कमी पडेल असे होणार नाही. फक्त इथल्या आणि दिल्लीतल्या सत्ताधारी लोकांची तशी मानसिकता असायला हवी.केवळ शिवजयंती आणि शिवराज्यभिषेक दिनाचे सोहळे साजरे करून चालणार नाही. काही पुढारी पुरातत्व विभागाच्या अडथल्या बद्दल बोलतात. महाराजांच्या गड किल्ल्यांची डागडुजी करू नका असे पुरातत्व विभागाने कधीही आणि कुठेही म्हटलेले नाही बरे पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे केंद्राकडून मंजुरी मिळणार नाही का ? विनाकारण कोणतीही न पटणारी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारीतून हात झ्टकुन मोकळे व्हायचे हे काही बरोबर नाही.सरकारने पुढाकार घेतल्यास लोक स्वतःहून पुढे येतील पैशाची जराही कमतरता भासणार नाही केवळ सरकारने इच्छाशक्ती दाखवायला हवी तरच हे महान कार्य पूर्ण होईल.शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक बांधन्या पेक्षा त्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले हे गडकिल्ले नव्याने उभे राहणे गरजेचे आहे तीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल.
Similar Posts
धक्कादायक! शरद पवार यांना अटक करण्याची मागणी
मुंबई/मराठा आरक्षणाचे कडवे विरोधक अशी ओळख असलेले ज्येष्ठ वकील सदानंद गुंवर्ते यांनी आता करोनाचे नियम मोडून गर्दी जमावल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे .सदानंद गुंनवरते यांनी म्हटले आहे की करोना बाबत जे सरकारने नियम बनवलेले आहेत ते नियम तोडणाऱ्या सामान्य माणसांवर कारवाई केली जाते पण…
अशोक खरात प्रकरण: अंजली दमनियांचा खळबळजनक आरोप
नाशिकमधील अशोक खरात (विकृत भोंदूबा म्हणून ओळखले जाणारे) यांचे अनेक राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी बुधवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यांनी १ एप्रिल ते १७ मार्च या कालावधीतील फोन कॉल डेटा उघड करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. या प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन वाद निर्माण झाला आहे.रुपाली…
राजकारण म्हणजे फक्त निवडणूक लढवणे इतकेच नाही -राज ठाकरे
पुणे – राजकारण म्हणजे निवडणूक लढवणे इतकेच नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला राजकारणाशी संबंध येतो त्यामुळे सध्या राजकारणात जे काही सुरु आहे ते वाईट असले तरी राजकारणात यायला हवे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एका व्याख्यानमालेत बोलताना सांगितले ते म्हणाले, या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं…
दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा घोळ कायम
शरद पवारांचा पक्ष ९ तारखेला खुलासा करणारमुंबई/गेल्या काही काळापासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरु आहे. अनेक नेत्यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशातच आता शरद पवार यांच्या पक्षाने दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावर न बोलण्याच्या सूचना प्रवक्ते, नेत्यांना दिल्या आहेत. राष्ट्रवादी विलिनीकरणावरुन पवार गटाने ही सावध भूमिका घेतली आहे. आता ९ तारखेला रोहित पवार पत्रकार परिषद…
इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी शहरांवर तुफान हल्ले-भारत पाकिस्तान युद्ध सुरू
नवी दिल्ली/भारताने पाकिस्तानच्या नऊ लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या अत्याधुनिक एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीमने पाकचा हा क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावला. त्यानंतर भारताने लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त करून पाकिस्तानला अक्षरशा अपंग केले आहे. दरम्यान भारताने राजधानी इस्लामाबाद सह लाहोर,कराची,रावळपिंडी आदि पाकिस्तानातील…
तर टोल नाके जाळून टाकू – राज ठाकरेंचा सरकारला इशारा
. मुंबई – राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलनाक्याच्या प्रश्नावर सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तसेच टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. दरम्यान आज टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे“टोल…
