शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि एक लोक कल्याणकारी राजा अशी जगात आपली ओळख निर्माण केली .रयतेच्या भाजीच्या देठाला सुधा हात लावू नका असा महाराजांचा आपल्या सैनिकांना सक्त आदेश होता.महाराजांनी या मराठी मातीत खर्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले.आणि याच सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बळावर बलाढ्य अशा आदिलशहा, निजामशाह, आणि मोगल बादशहा यांच्याशी लढा दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे म्हणून इतिहासात अजरामर आहेत. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रायगडावरील सोहळ्यात भाग घेताना रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी 59 कोटी देण्याचे जाहीर केले. ही शिवसृष्टी कधी अस्तित्वात येईल तेंव्हा येईल पण तत्पूर्वी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे. गडावरील अरिक्रमणे काढली पाहीजे. कारण हे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौरशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत पण आज ते भग्नावस्थेत आहेत.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर या गडकिल्ल्यां कडे कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहिले नाही.त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांच्या नंतर आजही ते आहेत त्याच अवस्थेत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय दुकानदारी चालवली जाते पण महाराजांच्या या गडकिल्ल्यांचे भग्न अवस्थेतील हे स्वरूप पालटवून त्यांना नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. 300 च्या आसपास असलेल्या या छोट्या मोठ्या किल्ल्यांची जर व्यवस्थित डागडुजी केली तर हे किल्ले जागतिक पर्यटनाचे केंद्र बिंदू ठरतील आणि शिवशाहीचा इतिहास संपूर्ण जगभर पसरला जाईल. पण हे घडायला हवे त्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी पुढाकार घ्यायला हवा आज राज्यात आणि केंद्रात सुधा भाजपचे सरकार आहे त्यामुळे महाराजांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकासाला निधी कमी पडेल असे होणार नाही. फक्त इथल्या आणि दिल्लीतल्या सत्ताधारी लोकांची तशी मानसिकता असायला हवी.केवळ शिवजयंती आणि शिवराज्यभिषेक दिनाचे सोहळे साजरे करून चालणार नाही. काही पुढारी पुरातत्व विभागाच्या अडथल्या बद्दल बोलतात. महाराजांच्या गड किल्ल्यांची डागडुजी करू नका असे पुरातत्व विभागाने कधीही आणि कुठेही म्हटलेले नाही बरे पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे केंद्राकडून मंजुरी मिळणार नाही का ? विनाकारण कोणतीही न पटणारी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारीतून हात झ्टकुन मोकळे व्हायचे हे काही बरोबर नाही.सरकारने पुढाकार घेतल्यास लोक स्वतःहून पुढे येतील पैशाची जराही कमतरता भासणार नाही केवळ सरकारने इच्छाशक्ती दाखवायला हवी तरच हे महान कार्य पूर्ण होईल.शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक बांधन्या पेक्षा त्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले हे गडकिल्ले नव्याने उभे राहणे गरजेचे आहे तीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची मुंबईच्या महापौरांकडे मागणी
शीतल करदेकर यांचा आग्रह मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज काढले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या…
भाजपच्या माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार -मलिक
मुंबई/ सध्या रोजच्या रोज पत्रकार परिषदा घेऊन विरोधकांचे घोटाळे बाहेर काढणारे नवाब मलिक यांनी आता फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील एका माजी मंत्र्याचा मंदिर घोटाळा बाहेर काढणार असल्याचे सांगितले त्यामुळे तो मंत्री कोण आणि त्यांचा घोटाळा कोणता याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे दरम्यान मलिक यांना आता कुणीही गांभीर्याने घेत नाहीत त्यामुळे त्यांना काहीही बोलुदेत आम्हाला काहीही…
पुण्यात मॉल चां स्लॅब कोसळून ७ बिहारी मजुरांचा मृत्यू
पुणे/ आजकाल रात्री उशिरा पर्यंत इमारतींचे बांधकाम सुरू ठेऊन बांधकाम मजुरांना अक्षरशः गुलाम सारखे वागवले जाते मात्र युपी बिहार आणि पश्चिम बंगाल मधून पोट भरण्यासाठी महाराष्ट्रात आलेले मजूर नाईलाजाने बारा बारा तास काम करतात पुण्याच्या एरवडा भागात अशाच बांधकाम मजुरांवर काळाने घाला घातला असून निर्माण धिन मॉलचा स्लॅब कोसळून ७ मजूर ठार झाले तर तिघे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअयोध्या दौरा रद्द करण्याच्या कारणाचा राज ठाकरेंकडून खुलासा -आमच्यासाठी सापळा रचला होता
पुणे/ मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी सापळा रचण्यात आला होता आणि तसे झाले असते तर मुंबईत निवडणुकीच्या वेळी त्यांना मैदान मोकळे झाले असते म्हणूनच मी अयोध्या दौरा रद्द केला.असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे शरद पवार आणि एम आय एम यांच्यावरही कडाडून टीका केलीराजं ठाकरे यांनी सांगितले की सध्या पावसाळा…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
.तर सर्व मुंबईसह सर्व पालिका निवडणुका पावसाळ्यात होणार
दिल्ली – ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे. कारण आम्ही कधीही निवडणूक घेण्यास तयार आहोत असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सदर केले आहे . त्यामुळे पुढील सुनावणीत जर न्यायालयाने निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला तर पावसाळ्यात सुधा निवडणुका होऊ शकतात असे संकेत निवडणूक आयोगाने…
