शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि एक लोक कल्याणकारी राजा अशी जगात आपली ओळख निर्माण केली .रयतेच्या भाजीच्या देठाला सुधा हात लावू नका असा महाराजांचा आपल्या सैनिकांना सक्त आदेश होता.महाराजांनी या मराठी मातीत खर्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले.आणि याच सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बळावर बलाढ्य अशा आदिलशहा, निजामशाह, आणि मोगल बादशहा यांच्याशी लढा दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे म्हणून इतिहासात अजरामर आहेत. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रायगडावरील सोहळ्यात भाग घेताना रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी 59 कोटी देण्याचे जाहीर केले. ही शिवसृष्टी कधी अस्तित्वात येईल तेंव्हा येईल पण तत्पूर्वी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे. गडावरील अरिक्रमणे काढली पाहीजे. कारण हे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौरशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत पण आज ते भग्नावस्थेत आहेत.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर या गडकिल्ल्यां कडे कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहिले नाही.त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांच्या नंतर आजही ते आहेत त्याच अवस्थेत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय दुकानदारी चालवली जाते पण महाराजांच्या या गडकिल्ल्यांचे भग्न अवस्थेतील हे स्वरूप पालटवून त्यांना नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. 300 च्या आसपास असलेल्या या छोट्या मोठ्या किल्ल्यांची जर व्यवस्थित डागडुजी केली तर हे किल्ले जागतिक पर्यटनाचे केंद्र बिंदू ठरतील आणि शिवशाहीचा इतिहास संपूर्ण जगभर पसरला जाईल. पण हे घडायला हवे त्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी पुढाकार घ्यायला हवा आज राज्यात आणि केंद्रात सुधा भाजपचे सरकार आहे त्यामुळे महाराजांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकासाला निधी कमी पडेल असे होणार नाही. फक्त इथल्या आणि दिल्लीतल्या सत्ताधारी लोकांची तशी मानसिकता असायला हवी.केवळ शिवजयंती आणि शिवराज्यभिषेक दिनाचे सोहळे साजरे करून चालणार नाही. काही पुढारी पुरातत्व विभागाच्या अडथल्या बद्दल बोलतात. महाराजांच्या गड किल्ल्यांची डागडुजी करू नका असे पुरातत्व विभागाने कधीही आणि कुठेही म्हटलेले नाही बरे पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे केंद्राकडून मंजुरी मिळणार नाही का ? विनाकारण कोणतीही न पटणारी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारीतून हात झ्टकुन मोकळे व्हायचे हे काही बरोबर नाही.सरकारने पुढाकार घेतल्यास लोक स्वतःहून पुढे येतील पैशाची जराही कमतरता भासणार नाही केवळ सरकारने इच्छाशक्ती दाखवायला हवी तरच हे महान कार्य पूर्ण होईल.शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक बांधन्या पेक्षा त्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले हे गडकिल्ले नव्याने उभे राहणे गरजेचे आहे तीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल.
Similar Posts
टोल भरुन प्रवास करता ना? हे अधिकार तुम्हाला माहिती असायलाच हवेत, होईल मोठा फायदा
मुंबई हायवेवरून प्रवास करताना टोल द्यावा लागतो. त्यामुळे खिशावर चांगलाच ताण येतो. चांगले रस्ते हवे असतील तर टोल भरणं भाग आहे असं सांगितलं जातं. आपण तो भरतोही. अनेकदा त्या बदल्यात खरोखरच चांगले रस्ते मिळतात का हा चर्चेचा विषय असू शकतो; पण टोल भरल्यानंतर तुम्हाला हायवेवरून प्रवास करताना इतरही काही सुविधा मिळू शकतात हे तुम्ही जाणता…
विरार मध्ये भिंत कोसळून 3 मजूर ठार
मुंबई: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजूरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी 3.30 तीन वाजताची आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम चालू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.विरारमध्ये आजचा दिवस कामगारांच्या…
पावसाळा आला ; शिवसेनेच्या छत्र्याही आल्या; बोरीवली पूर्व येथे समारंभपूर्वक वितरण
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : शाळा सुरू झाल्या, पावसाळा आला की विविध संस्था, राजकीय पक्ष वह्या पुस्तके आणि छत्र्यांचे वाटपाचे कार्यक्रम जोमाने हाती घेतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचे वाढदिवस योगायोगाने पावसाळ्यात येतात. मग काय. दे धम्माल ! १३ जून आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आणि १९ जून शिवसेनेचा…
लाडकी बहीण योजनेतील महिलांची छाननी सुरू – २६ लाख बोगस लाभार्थ्यांवर कारवाई होणार
मुंबई//राज्यातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या २६ लाख महिला या अपात्र ठरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपात्र लाभार्थ्यांची आता जिल्हास्तरीय सुक्ष्म छाननी सुरू असल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. या छाननीतून अपात्र ठरलेल्या महिलांवर योग्य ती कारवाई होईल असंही त्या म्हणाल्या.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या…
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांचा दिलासा धीर सोडू नका
मुंबई/ यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन त्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे prchand नुकसान झाले आहे.नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात गावेच्या गावे बुडाले शेतीवाडी घरदार सारेकाही उध्वस्त झाले या उध्वस्त शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन जिल्हावार नुकसानीचा आढावा घेऊन ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना तातडीने मदत करण्याचे…
तब्बल वीस तासानी गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत लालबागचा राजाचे विसर्जन
मुंबई/कोट्यावधी गणेश भक्तांच्या श्रद्धेचे स्थान असलेले लालबागच्या राजाचे बुधवारी सकाळी नऊ वाजता गिरगाव चौपाटीवर वाजत गाजत विसर्जन करण्यात आले .तब्बल वीस तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी सकाळी श्रींच्या मंडपातून निघालेली लालबागचा राजाची भव्य मूर्ती प्रचंड मोठ्या मिरवणुकीतून लालबाग ,भारत माता, चिंच पोकळी, बकरी अड्डा, भायखळा रेल्वे स्थानक, क्लेरोड, नागपाडा आदी मार्गाने आज…
