शिवप्रभुचा हा महारष्ट्र लढवय्या शूरवीरांचां म्हणून ओळखला जातो इथे गवतालाही भाले फूटतात अशी या मराठी मातीची ओळख आहे . मोडेल पण वाकणार नाही असा स्वाभिमानी मराठी माणूस या महाराष्ट्रात रहातो आणि याच स्वाभिमानी लढवय्या मराठी माणसाने अटकेपार झेंडा रोवला अशी इतिहासात नोंद आहे .छत्रपती शिवाजी महाराजांनी मोठ्या कष्टाने आणि जिद्दीने हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले आणि एक लोक कल्याणकारी राजा अशी जगात आपली ओळख निर्माण केली .रयतेच्या भाजीच्या देठाला सुधा हात लावू नका असा महाराजांचा आपल्या सैनिकांना सक्त आदेश होता.महाराजांनी या मराठी मातीत खर्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्माच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले.आणि याच सर्व जाती धर्माच्या लोकांच्या बळावर बलाढ्य अशा आदिलशहा, निजामशाह, आणि मोगल बादशहा यांच्याशी लढा दिला. थोडक्यात सांगायचे झाल्यास रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श राजे म्हणून इतिहासात अजरामर आहेत. त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रायगडावरील सोहळ्यात भाग घेताना रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारण्याची घोषणा केली. त्यासाठी 59 कोटी देण्याचे जाहीर केले. ही शिवसृष्टी कधी अस्तित्वात येईल तेंव्हा येईल पण तत्पूर्वी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत त्यांची डागडुजी होणे गरजेचे आहे. गडावरील अरिक्रमणे काढली पाहीजे. कारण हे गडकिल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या शौरशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत पण आज ते भग्नावस्थेत आहेत.स्वातंत्र्य प्राप्ती नंतर या गडकिल्ल्यां कडे कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टीने पाहिले नाही.त्यामुळे स्वातंत्र्य प्राप्तीच्या 75 वर्षांच्या नंतर आजही ते आहेत त्याच अवस्थेत आहेत. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकीय दुकानदारी चालवली जाते पण महाराजांच्या या गडकिल्ल्यांचे भग्न अवस्थेतील हे स्वरूप पालटवून त्यांना नवे स्वरूप देण्यासाठी कुणीही पुढे आलेले नाही. 300 च्या आसपास असलेल्या या छोट्या मोठ्या किल्ल्यांची जर व्यवस्थित डागडुजी केली तर हे किल्ले जागतिक पर्यटनाचे केंद्र बिंदू ठरतील आणि शिवशाहीचा इतिहास संपूर्ण जगभर पसरला जाईल. पण हे घडायला हवे त्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी पुढाकार घ्यायला हवा आज राज्यात आणि केंद्रात सुधा भाजपचे सरकार आहे त्यामुळे महाराजांच्या किल्ल्यांच्या पुनर्विकासाला निधी कमी पडेल असे होणार नाही. फक्त इथल्या आणि दिल्लीतल्या सत्ताधारी लोकांची तशी मानसिकता असायला हवी.केवळ शिवजयंती आणि शिवराज्यभिषेक दिनाचे सोहळे साजरे करून चालणार नाही. काही पुढारी पुरातत्व विभागाच्या अडथल्या बद्दल बोलतात. महाराजांच्या गड किल्ल्यांची डागडुजी करू नका असे पुरातत्व विभागाने कधीही आणि कुठेही म्हटलेले नाही बरे पुरातत्व विभाग हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो त्यामुळे केंद्राकडून मंजुरी मिळणार नाही का ? विनाकारण कोणतीही न पटणारी कारणे सांगून आपल्यावरील जबाबदारीतून हात झ्टकुन मोकळे व्हायचे हे काही बरोबर नाही.सरकारने पुढाकार घेतल्यास लोक स्वतःहून पुढे येतील पैशाची जराही कमतरता भासणार नाही केवळ सरकारने इच्छाशक्ती दाखवायला हवी तरच हे महान कार्य पूर्ण होईल.शिवाजी महाराजांचे समुद्रात स्मारक बांधन्या पेक्षा त्यांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेले हे गडकिल्ले नव्याने उभे राहणे गरजेचे आहे तीच महाराजांना खरी आदरांजली ठरेल.
Similar Posts
खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरे !
आश्चर्य वाटलं नां शीर्षक वाचून ? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी ? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे 1955 साली ‘श्याम’ हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. मधु दंडवते, प्रमिला दंडवते यांनी निवडणुकीत युती…
शिराळा मतदार संघाची निवडणूक संघर्षमय
नवी मुंबई- शिराळा विधान सभा मतदार संघाचे भाजप आमदार पदाचे उमेदवार सत्यजित देशमुख यांना भाजपा कडून तिकीट मिळालेली आहे. रविवार दि. 27/10/2024 रोजी नवी मुंबई येथे शिराळा विधान सभा मतदार संघातील रहिवाशी यांची बैठक विष्णुदास भावे नाट्य गृह नवी मुंबई येथे आयोजित केलेली होती. मुंबई, ठाणे कल्याण , डोंबिवली येथुन रहिवाशी उपस्थित होते. सभेला शिराळकर…
अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
मुंबई-राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली.राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती…
उद्धव ठाकरेंना मुंबई उच्चं न्यायालयाचा दिलासा- संपत्तीच्या चौकशीच्या मागणीची याचिका फेटाळली
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली असून गौरी भिडे यांना हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. गौरी भिडे यांनी जी याचिका न्यायालयात दाखल केली होती, त्या याचिके संदर्भात सबळ पुरावे देण्यात त्या अपयशी ठरल्या आहेत. त्यांनी जे आरोप केले होते, ते आरोप सिद्ध करण्यास त्या कमी पडल्या आहेत, असं मत न्यायालयाने आपल्या निकाल…
मनसेचे प्रकाश महाजन शिंदे सेनेच्या वाटेवर
मुंबई/महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ सोडल्यानंतर प्रकाश महाजन नेमका काय निर्णय घेणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं होतं. पण अखेर त्यांनी निर्णय घेतला आहे. प्रकाश महाजन हे उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज प्रकाश महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी शिंदेंच्या शिवसेना पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, उद्या दुपारी साडेबारा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट
दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार असून त्यासाठी देश विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोडीन ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांनी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली त्यामुळे काँग्रेससह 15…
