नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया आघाडीसाठीआजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. हे विधेयक मंजूर झाल्याने आता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे देण्यात आले आहेत.दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कमी करण्यासंबंधी आणि ते केंद्राच्या हाती घेण्यासंबंधीत दिल्ली सेवा विधेयक 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावर बोलण्यासाठी उभे राहताच संपूर्ण विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी या विधेयकावर पुन्हा चर्चा झाली आणि लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांनी वॉकआऊट केले होते. त्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर राज्यसभेच्या सभापतींनी विधेयक मंजूरीसाठी सादर केल्यावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यानंतर मतदान घेण्यात आले.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्लीत भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासन हेच या विधेयकाचे एकमेव आणि एकमेव उद्दिष्ट आहे. या विधेयकावरील चर्चेत प्रत्येक सदस्याने आपआपल्या समजुतीनुसार विधेयकावर चर्चा केली.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्ली हे सर्व राज्यांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे राज्य आहे. या ठिकाणी संसद भवन देखील आहे, घटनात्मक संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय, दूतावास येथे आहेत आणि जगभरातील राष्ट्रप्रमुख येतात. त्यामुळे दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आहे. येथील सरकारला राज्य यादीतील मुद्द्यांवर मर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये विधानसभा आहे परंतु मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे ज्याला दिल्लीत निवडणूक लढवायची आहे त्यांनी दिल्लीचे चारित्र्य समजून घेतले पाहिजे असे म्हणत शाह यांनी केजरीवाल यांना टोला लगावला.यांनी म्हटले की, काँग्रेस विरोधाच्या सूत्रावर आम आदमी पक्षाचा जन्म झाला. त्यांनी (आप) काँग्रेसच्या विरोधात जवळपास तीन टन आक्षेपार्ह शब्द वापरले आणि त्यांचा पक्ष अस्तित्वात आला. आज ते या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा मागत आहेत. ज्या क्षणी हे विधेयक मंजूर होईल, अरविंद केजरीवाल मागे फिरतील, तुम्हाला रस्ता दाखवतील आणि काहीही होणार नाही, असेही शाह यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले. विरोधकांनी कितीही पक्ष एकत्रित केले तरी काहीच फरक पडणार नाही. 2024 मध्ये पंतप्रधान मोदीच होणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या काळात दिल्लीत विधानसभा अस्तित्वात आली. लालकृष्ण अडवाणी आणि मदनलाल खुराणा यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष केला. 1998 च्या जाहीरनाम्यात भाजपने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढा दिला होता. लाठ्या खाल्ल्या. तो दिवस आला जेव्हा वाजपेयी सरकारने विधेयक आणले, घटना दुरुस्ती विधेयक आणले, ज्याने दिल्लीला पूर्ण राज्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असे वक्तव्य हर्षवर्धन यांनी केले होते. हे विधेयक संविधानाचा आणि देशाचा अपमान करणारे आहे. हा अडवाणी, खुराणा, वाजपेयी यांचा अपमान आहे, असे चढ्ढा यांनी म्हटले.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की, तुम्ही अतिशय धोकादायक बिल आणले आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करणारे भारतमातेशी अप्रामाणिक असल्याचे ठरतील. भारताशी बेईमानी करणार. देशाच्या संघराज्य रचनेवर थेट हल्ला होत आहे. लोकशाही ही हत्या आहे. निवडून आलेले सरकार आहे, विधानसभा आहे, लोकांनी नायब राज्यपालांना मतदान केले नाही, मुख्य सचिवांना मतदान केले नाही. नायब राज्यपाल मत मागायला जात नाही. केजरीवाल किंवा कोणताही नेता मते मागतो. तुम्ही सहा वेळा निवडणूक हरलात, दिल्लीत तुमचे मोजके आमदार आहेत. दिल्ली असो, महाराष्ट्र असो, तामिळनाडू असो, प्रत्येक जागा तुम्हाला काबीज करायची आहे.
Similar Posts
निलेश दगडेचा स्पार्टन मुंबई श्रीवर कब्जा
मुंबई, दि. २ (क्री.प्र.)- तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणी नंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे मॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्री २०२३ च्या स्पर्धेत निवेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ८५ विणे वजनगटातील…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशनिवारी नव्या राज्यपालांचा शपथविधी
मुंबई – महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंग कोषारी यांनी राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी रमेश भैस यांची नियुक्ती होणार आहे रमेश भैस हे उद्या मुंबईत येणार असून शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेतील दरम्यान मावळते राज्यपाल कोषारी याना आज राजभवनाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने भावपूर्ण निरोप देण्यात आला .छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले आणि इतर महापुरुषांची बदनामी केल्यामुळे लोकांनी रस्त्यावर…
एस टी वर दगडफेकीचे प्रकार सुरूच
मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा…
महाराष्ट्रातील सहकार चळवळीला दिशा मिळेल
भाजपा विधानपरिषद गटनेतेआ. प्रविण दरेकरांना विश्वास पुणे- ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे पुण्यात बॅंकिंग व साखर उद्योगासाठी दोन दिवसीय ‘सहकार महापरिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आज या महापरिषदेचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरही उपस्थित होते. या महापरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर यांनी शरद पवार आणि…
दिशा सालियन कुटुंबाची राष्ट्रपतींकडे धाव
नवी दिल्ली : आरोप-प्रत्यारोपांमुळे गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू प्रकरण चर्चेत आहे. आता एक नवीन माहिती समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्यावर कारवाई करावी,अशी विनंती दिवंगत दिशा सालियानच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. आमच्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे, असा आरोप देखील दिशाच्या…
जरागे विरुद्ध भाजप नेते आक्रमक – आंदोलकांच्या शुक्रवारच्या मोर्चामुळे मुंबईत तणाव
मुंबई /मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २९ तारीखला मुंबईत धडकणाऱ्या जरांगेंच्या मराठी आंदोलकांविरुध आता भाजपा नेतेही आक्रमक झाले आहेत.फडणवीसांच्या आई बद्दल अपशब्द उच्चारणाऱ्या जरांगेना जीभ हासडून हातात देण्याचा इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.तर जरांगेना नक्षलवादी घोषित करा अशी मागणी ओबीसी नेत्यांनी केली आहे.दुसरीकडे सदावर्ते यांनी जरागे विरुद्ध पोलिस महासंचालकांकडे तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल…
