नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया आघाडीसाठीआजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. हे विधेयक मंजूर झाल्याने आता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे देण्यात आले आहेत.दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कमी करण्यासंबंधी आणि ते केंद्राच्या हाती घेण्यासंबंधीत दिल्ली सेवा विधेयक 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावर बोलण्यासाठी उभे राहताच संपूर्ण विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी या विधेयकावर पुन्हा चर्चा झाली आणि लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांनी वॉकआऊट केले होते. त्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर राज्यसभेच्या सभापतींनी विधेयक मंजूरीसाठी सादर केल्यावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यानंतर मतदान घेण्यात आले.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्लीत भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासन हेच या विधेयकाचे एकमेव आणि एकमेव उद्दिष्ट आहे. या विधेयकावरील चर्चेत प्रत्येक सदस्याने आपआपल्या समजुतीनुसार विधेयकावर चर्चा केली.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्ली हे सर्व राज्यांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे राज्य आहे. या ठिकाणी संसद भवन देखील आहे, घटनात्मक संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय, दूतावास येथे आहेत आणि जगभरातील राष्ट्रप्रमुख येतात. त्यामुळे दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आहे. येथील सरकारला राज्य यादीतील मुद्द्यांवर मर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये विधानसभा आहे परंतु मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे ज्याला दिल्लीत निवडणूक लढवायची आहे त्यांनी दिल्लीचे चारित्र्य समजून घेतले पाहिजे असे म्हणत शाह यांनी केजरीवाल यांना टोला लगावला.यांनी म्हटले की, काँग्रेस विरोधाच्या सूत्रावर आम आदमी पक्षाचा जन्म झाला. त्यांनी (आप) काँग्रेसच्या विरोधात जवळपास तीन टन आक्षेपार्ह शब्द वापरले आणि त्यांचा पक्ष अस्तित्वात आला. आज ते या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा मागत आहेत. ज्या क्षणी हे विधेयक मंजूर होईल, अरविंद केजरीवाल मागे फिरतील, तुम्हाला रस्ता दाखवतील आणि काहीही होणार नाही, असेही शाह यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले. विरोधकांनी कितीही पक्ष एकत्रित केले तरी काहीच फरक पडणार नाही. 2024 मध्ये पंतप्रधान मोदीच होणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या काळात दिल्लीत विधानसभा अस्तित्वात आली. लालकृष्ण अडवाणी आणि मदनलाल खुराणा यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष केला. 1998 च्या जाहीरनाम्यात भाजपने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढा दिला होता. लाठ्या खाल्ल्या. तो दिवस आला जेव्हा वाजपेयी सरकारने विधेयक आणले, घटना दुरुस्ती विधेयक आणले, ज्याने दिल्लीला पूर्ण राज्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असे वक्तव्य हर्षवर्धन यांनी केले होते. हे विधेयक संविधानाचा आणि देशाचा अपमान करणारे आहे. हा अडवाणी, खुराणा, वाजपेयी यांचा अपमान आहे, असे चढ्ढा यांनी म्हटले.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की, तुम्ही अतिशय धोकादायक बिल आणले आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करणारे भारतमातेशी अप्रामाणिक असल्याचे ठरतील. भारताशी बेईमानी करणार. देशाच्या संघराज्य रचनेवर थेट हल्ला होत आहे. लोकशाही ही हत्या आहे. निवडून आलेले सरकार आहे, विधानसभा आहे, लोकांनी नायब राज्यपालांना मतदान केले नाही, मुख्य सचिवांना मतदान केले नाही. नायब राज्यपाल मत मागायला जात नाही. केजरीवाल किंवा कोणताही नेता मते मागतो. तुम्ही सहा वेळा निवडणूक हरलात, दिल्लीत तुमचे मोजके आमदार आहेत. दिल्ली असो, महाराष्ट्र असो, तामिळनाडू असो, प्रत्येक जागा तुम्हाला काबीज करायची आहे.
Similar Posts
दोन बँकांच्या खाजगीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !
मोदी सरकारच्या आर्थिक धोरणानुसार सार्वजनिक क्षेत्रातील मध्यम किंवा छोट्या आकाराच्या दोन बँकाचे निर्गुंतवणूकीकरण म्हणजे खाजगीकरण येत्या आर्थिक वर्षात होणार आहे. मार्च 2023 अखेरच्या आर्थिक वर्षात अनेक मध्यम व छोट्या बँकांनी उत्तम नफा कमावलेला आहे. तसेच काही बँकांचे एकत्रीकरणही यशस्वी झालेले आहे. खाजगीकरण करण्यासाठी तज्ञांची एक समिती नेमण्याचे जाहीर करून याबाबतचे आवश्यक पाऊल केंद्राने नुकतेच टाकलेले…
राज्यपाल विरुद्ध सरकार मधील संघर्ष चिघळला
मुंबई/ विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे राजकारण आता भलतेच तापले असून सरकारने पाठवलेल्या प्रस्तावावर कायदेशीर चर्चा करायची असल्याचे कारण सांगून ताबडतोब सही करण्यास नकार दिला आहे .त्यामुळे विधानसभा अध्यक्षांची निवड आता लांबणीवर पडली आहे .राज्यपालांकडून महाविकास आघाडी सरकारला हा मोठा दणका आहेविधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊन अध्यक्ष निवडावा अशी सूचना दोन वेळा राज्यपालांनी केली होती पण…
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक कृत्रिम तलावांची उभारणी
महानगरपालिका आणि मुंबईतील गणेश समन्वय समितीची संयुक्त बैठक परळ येथील ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, समन्वय समिती सदस्य, पदाधिकाऱयांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या सूचना समजून घेतल्यानंतर उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून यंदाच्या गणेशोत्सवाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली….
संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्ट कमलखांवर कारवाईचे आदेश
संभाजी महाराजांवर वादग्रस्त पोस्टकमलखांवर कारवाईचे आदेशमुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट ४ दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. समीक्षक व प्रेक्षक या चित्रपटाचं भरभरून कौतुक करत आहेत. याचदरम्यान, बॉलीवूड अभिनेता केआरके म्हणजेच कमाल आर खान याने वादग्रस्त पोस्ट केली आहे. त्याच्या पोस्टनंतर मुख्यमंत्री…
सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही ; बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून हे पंधरा हजार कर्मचारी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोविड…
महाराष्ट्रात गोळीबाराच्या घटना सुरूच -पुण्यात पार्टनरला गोळी घालून मित्राची आत्महत्या
पुणे/पुण्यातील कुठल्या पासून सुरू झालेले गोळीबाराचे सत्र काही थांबायला तयार नाही चाळीसगाव मध्ये भाजपा नगरसेवकावर गोळीबार झाला होता त्याचा आज मृत्यू झाला तर गणपत गायकवाड च्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच अभिषेक कोसळकर ची हत्या झाली त्यानंतर आज पुण्यात दोन बिजनेस पार्टनर मधील वादातून एकाने दुसऱ्याला गोळ्या घातल्या आणि स्वतःही गोळ्या घालून आत्महत्या केली ज्याला गोळ्या…
