नवी दिल्ली – दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर करण्यात आले. विधेयकाच्या बाजूने १३१ तर विरोधात १०२ मते पडली. 2024 च्या निवडणुकीआधी विरोधकांनी उभारलेल्या इंडिया आघाडीसाठीआजचे राज्यसभेतील मतदान आवश्यक होते. यातून इंडिया आघाडीतील एकजूट किती आहे, हे दिसून आले. हे विधेयक मंजूर झाल्याने आता दिल्ली सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार राज्य सरकारऐवजी नायब राज्यपालांकडे देण्यात आले आहेत.दिल्ली सरकारचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार कमी करण्यासंबंधी आणि ते केंद्राच्या हाती घेण्यासंबंधीत दिल्ली सेवा विधेयक 2 ऑगस्ट रोजी लोकसभेत मांडण्यात आले होते. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यावर बोलण्यासाठी उभे राहताच संपूर्ण विरोधकांनी गदारोळ सुरू केला. यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. 3 ऑगस्ट रोजी या विधेयकावर पुन्हा चर्चा झाली आणि लोकसभेत विधेयक मंजूर करण्यात आले. यावेळी विरोधकांनी वॉकआऊट केले होते. त्यानंतर आज राज्यसभेत हे विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर राज्यसभेच्या सभापतींनी विधेयक मंजूरीसाठी सादर केल्यावर विरोधकांनी मतदानाची मागणी केली. त्यानंतर मतदान घेण्यात आले.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्लीत भ्रष्टाचारमुक्त आणि लोकाभिमुख प्रशासन हेच या विधेयकाचे एकमेव आणि एकमेव उद्दिष्ट आहे. या विधेयकावरील चर्चेत प्रत्येक सदस्याने आपआपल्या समजुतीनुसार विधेयकावर चर्चा केली.अमित शाह यांनी म्हटले की, दिल्ली हे सर्व राज्यांपेक्षा अनेक प्रकारे वेगळे राज्य आहे. या ठिकाणी संसद भवन देखील आहे, घटनात्मक संस्था आहे. सर्वोच्च न्यायालय, दूतावास येथे आहेत आणि जगभरातील राष्ट्रप्रमुख येतात. त्यामुळे दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आहे. येथील सरकारला राज्य यादीतील मुद्द्यांवर मर्यादित अधिकार देण्यात आले आहेत. दिल्ली हा एक केंद्रशासित प्रदेश आहे ज्यामध्ये विधानसभा आहे परंतु मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे ज्याला दिल्लीत निवडणूक लढवायची आहे त्यांनी दिल्लीचे चारित्र्य समजून घेतले पाहिजे असे म्हणत शाह यांनी केजरीवाल यांना टोला लगावला.यांनी म्हटले की, काँग्रेस विरोधाच्या सूत्रावर आम आदमी पक्षाचा जन्म झाला. त्यांनी (आप) काँग्रेसच्या विरोधात जवळपास तीन टन आक्षेपार्ह शब्द वापरले आणि त्यांचा पक्ष अस्तित्वात आला. आज ते या विधेयकाला विरोध करण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा मागत आहेत. ज्या क्षणी हे विधेयक मंजूर होईल, अरविंद केजरीवाल मागे फिरतील, तुम्हाला रस्ता दाखवतील आणि काहीही होणार नाही, असेही शाह यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले. विरोधकांनी कितीही पक्ष एकत्रित केले तरी काहीच फरक पडणार नाही. 2024 मध्ये पंतप्रधान मोदीच होणार असल्याचा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या काळात दिल्लीत विधानसभा अस्तित्वात आली. लालकृष्ण अडवाणी आणि मदनलाल खुराणा यांनी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष केला. 1998 च्या जाहीरनाम्यात भाजपने दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी लढा दिला होता. लाठ्या खाल्ल्या. तो दिवस आला जेव्हा वाजपेयी सरकारने विधेयक आणले, घटना दुरुस्ती विधेयक आणले, ज्याने दिल्लीला पूर्ण राज्याचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देऊ, असे वक्तव्य हर्षवर्धन यांनी केले होते. हे विधेयक संविधानाचा आणि देशाचा अपमान करणारे आहे. हा अडवाणी, खुराणा, वाजपेयी यांचा अपमान आहे, असे चढ्ढा यांनी म्हटले.शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजपवर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की, तुम्ही अतिशय धोकादायक बिल आणले आहे. या विधेयकाच्या बाजूने मतदान करणारे भारतमातेशी अप्रामाणिक असल्याचे ठरतील. भारताशी बेईमानी करणार. देशाच्या संघराज्य रचनेवर थेट हल्ला होत आहे. लोकशाही ही हत्या आहे. निवडून आलेले सरकार आहे, विधानसभा आहे, लोकांनी नायब राज्यपालांना मतदान केले नाही, मुख्य सचिवांना मतदान केले नाही. नायब राज्यपाल मत मागायला जात नाही. केजरीवाल किंवा कोणताही नेता मते मागतो. तुम्ही सहा वेळा निवडणूक हरलात, दिल्लीत तुमचे मोजके आमदार आहेत. दिल्ली असो, महाराष्ट्र असो, तामिळनाडू असो, प्रत्येक जागा तुम्हाला काबीज करायची आहे.
Similar Posts
त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार -मंत्री संजय शिरसाठ
मुंबई/ज्या शहरांच्या नावांमध्ये बाद असा उल्लेख आहे त्या सर्व शहरांची नावे आम्ही बदलणार असून खुलताबाद शहराचही नाव बदलून रत्नपुर असं करणार आहोत असे विधान राज्याचे मंत्री संजय शिरसाठ यांनी केले होते त्यावर बोलताना एका शहराचं नाव काय बदलतात अख्ख्या देशाचाच नाव बदलून टाका अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे नेते केली होती त्यांच्या या प्रतिक्रियेवर देशभर संतापाची…
मी मोदींचा द्वेष करीत नाही पण त्यांच्या विचारांशी सहमत नाही – तरीही मोदी मला आवडतात – राहुल गांधींचे आश्चर्यकारक वक्तव्य
न्यूयॉर्क – काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठ वक्तव्य केलं आहे. पीएम मोदी मला आवडतात असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी त्यांच्या या विधानाने अनेकांना चक्रावून टाकलय. “भारत भाषा, परंपरा, धर्माचा एक संघ आहे. भारतीय लोक आपल्या धार्मिक स्थळांवर जातात,…
पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजना ?
टक्केवारीचा दुसरा अध्यायपालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा टॅब पुरवण्याची ३ कोटींची योजनामुंबई/ पालिका शाळेतील मुलाना निकृष्ट दर्जाचे टॅब पुरवून स्वतःचे हसे करून घेतलेल्या पालिकेने पुन्हा एकदा पालिका शाळेतील मुलाना टॅब देण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी पालिका ३ कोटी खर्च करणार असून कोविड काळात अशा प्रकारची अनावश्यक कामे पालिका का काढते आहे.कदाचित यामागे कंत्राटदारांचे खिसे भरून त्यातून…
अक्षय शिंदेंचे एन्काउंटर संशयास्पद – न्यायालयाने ५ पोलिसांना दोषी ठरवले
मुंबई – अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांना जबाबदार धरलं आहे. पाच पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. बदलापुरात शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलींवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता. ठाण्यातील मॅजिस्ट्रेटने बंद लिफाफ्यातून चौकशी अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. फॉरेन्सिकच्या अहवालात बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिन्टस…
युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे परीक्षांत नापास झाल्याचा दावा करून ७५ लाख मागणाऱ्याला २५ हजारांचा दंड
मुंबई – युट्युब वरील अश्लील जाहिराती मुळे लक्ष विचलित होऊन पोलीस भरती परीक्षेत मी नापास झालो . त्यामुळे मला ७५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उंचच न्यायालयात दाखल करण्यात आली होती . पण न्यायालयाने ती फेटाळली असून याचिकाकर्त्यालाच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशरद पवार सरकार वाचवणार ?
मुंबई/ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आता शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी कायद्याची आणि रस्त्यावरच्या लढाईची सुधा आमची तयारी आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे . त्यामुळे हा संघर्ष वाढणार आहे दरम्यान काळ प्रथमच उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्वर हल्ला करताना मी मुख्यमंत्री असतानाही तुम्हाला नगरविकास खाते दिले आणखी काय…
