.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 19 हजार 632 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात १६ हजार १०५ रुग्ण आढळले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात १४ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ हजार २९० रुग्ण आढळले आहेत. अकोला जिल्ह्यात १२हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत १८८२ रुग्णांची नोंद झालीय.महाराष्ट्र शासनाकडून याबबात अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे येणे मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांमधून पिवळा द्रव बाहेर येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इत्यादी गोष्टींचा सवावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलिगीकरण करणे गरजेचं आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्र शासनाकडून डोळे आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतात धुवावे. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसून नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. उन्हात वापरण्यासाठी असलेल्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोताली परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औशधी डोळ्यात टाकावी, असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं आहे
Similar Posts
नाशिकमध्ये काँग्रेस तोंडघशी- बापाची माघार – बेटा अपक्ष
नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेसने सुधीर तांबे याना उमेदवारी दिली होती पण त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलेच नाही त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि आपण महाविकास आघाडीचाच उमेदवार आहोत असे सांगू लागले इतकेच नव्हे तर पाठींब्यासाठी आपण भाजप नेत्यानाही आग्रह करणार आहोत असे सांगितले आहे त्यामुळे…
पत्रकारांनाचा लसिकरण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…-नाबाद १०५….
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित कोविड प्रतिबंधक लसिकरण शिबीराला सदस्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तब्बल १०५ जणांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन शिबीराचा लाभ घेतला. या शिबीराचे उद्घाटन सर जे.जे. रुग्णालयाच्या डीन डॉ. पल्लवी सापळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिझवी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अख्तर रिझवी , संचालक रुबीना रिझवी आणि कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ….
बारा लाखांपर्यंत करमुक्ती
नवी दिल्ली/यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 12 लाखांपर्यंत उत्पन्न भलेही करमुक्त करण्यात आलेला असलं तरी देशात वाढत्या बेरोजगारी बाबत कोणतीही ठोस आश्वासने नाही कोणत्याही नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद नाही त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये फार मोठा खर्च करण्यात निर्मलाताईंनी हात आकडा घेतलाय आरोग्यावर दरडोई 2300 रुपयांचा खर्च करण्याची गरज असताना केवळ सातशे रुपयांची…
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात
लखनौ – उत्तर प्रदेशात भाजपच्या पाठोपाठ कॉंग्रेसनेही आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला . उन्नती विधान जन घोषणापत्र २०२२ या नावाने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच २० लाख तरुणांना रोजगार देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे . .कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज कॉंगेसचे तिसरे घोषणापत्र…
अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान
टाटा उद्योग समूहाच्या एअर इंडिया या कंपनीने गेल्या सप्ताहात जागतिक पातळीवर आर्थिक इतिहास नोंदवला. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर युरोपातही लाखो रोजगारांची निर्मिती होणार आहे. याबरोबरच भारताने तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे एक मोठे पाउल टाकले आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक घडामोडीचा हा धांडोळा. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये गेल्या सप्ताहात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दैदिप्यमान इतिहास…
औरंगजेबाच्या कबरीवरून नागपुरात राडा__ ५० हून अधिक दंगलखोरांना अटक
नागपूर/औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात जबरदस्त राडा झाला तोडफोड आणि जाळपोळ झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीमार केला यावेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली या दगडफेकी मध्ये काही पोलीस जखमी झाले आहेत दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक घेऊन सर्व पोलीस अधिकाऱ्यांना सक्त कारवाईचे आदेश दिले आहेतऔरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर…
