.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 19 हजार 632 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात १६ हजार १०५ रुग्ण आढळले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात १४ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ हजार २९० रुग्ण आढळले आहेत. अकोला जिल्ह्यात १२हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत १८८२ रुग्णांची नोंद झालीय.महाराष्ट्र शासनाकडून याबबात अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे येणे मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांमधून पिवळा द्रव बाहेर येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इत्यादी गोष्टींचा सवावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलिगीकरण करणे गरजेचं आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्र शासनाकडून डोळे आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतात धुवावे. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसून नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. उन्हात वापरण्यासाठी असलेल्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोताली परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औशधी डोळ्यात टाकावी, असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं आहे
Similar Posts
अनिल देशमुख यांचा सीबीआय अहवाल लिक – देशमुखांच्या वकिलास ,सीबीआय अधिकान्यालाही अटक
मुंबई/ माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाचा सीबीआय अहवाल लीक केल्या प्रकरणी देशमुख यांचा वकील आनंद डागा आनी सीबीआय मधील एक सब इन्स्पेक्टर अभिजित तिवारी यांना अटक करण्यात आली असून सीबीआय न्यायालयाने त्यांना ६ सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत त्यांची सध्या कसून चौकशी सुरु असून त्यांनी जर तोंड उघडले तर अनिल…
विरोधी नेत्यांवर इडीची उडी- मुश्किले बडी – किशोरी पेडणेकर , रोहित पवारांना इडीची नोटीस
मुंबई : ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना देखील ईडीकडून समन्स बजावण्यात आलं आहे. कथित बॉडी बॅग घोटाळ्याप्रकणी किशोरी पेडणेकर यांना हे समन्स बजावण्यात आलंय. दरम्यान किशोरी पेडणेकर यांना २५ जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे किशोरी पेडणेकर या चौकशीला हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.शुक्रवार १९ जानेवारी रोजी…
पश्चिम बंगाल मध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
कोलकत्ता/कोलकत्याच्या आरजीकर रुग्णालयात महिला डॉक्टर वर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी कलकत्त्यामध्ये भाजपा विरुद्ध तृणमूल त्काँग्रेस यांच्यात जो हिंसक संघर्ष सुरू आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे .म्हणूनच गुरुवारी भाजपाच्या शिष्टमंडळाने पश्चिम बंगालचे राज्यपाल एस व्हीं आनंद यांची भेट घेतली आणि आता तुम्हीच काहीतरी या प्रश्नावर करा अशी त्यांना विनंती केली त्यानंतर…
कोकाटेना अखेर अजितदादांचे अभय! मंत्रिपदी कायम
मुंबई/ विधानभवनात ऑनलाईन रमी खेळण्यावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर शनिदेव पावला.एखाद्या भुरट्या गुन्हेगाराला ज्याप्रमाणे पोलिस दम देऊन सोडून देतात अगदी त्याच पद्धतीने अजित पवारानी माणिकराव कोकाटेना केवळ तंबी देऊन सोडून दिले .त्यामुळे कोकाटेंचे मंत्रिपद बचावले आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकाटेबाबत मंगळवारी निर्णय घेणार होते. त्यानुसारवाज त्यांनी कोकाटेना बोलावून त्यांची कानउघडणी केली….
पेट्रोल डिझेल चां दराबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल-भवानजी
बाबूभाई,,म्हणतात की,सरकार जी एस टी मधून वेगवेगळ्या विकास कामांचा खर्च करते रेल्वे,रस्ते,पुल,संरक्षण आरोग्य शिक्षण यासारख्या जनहिताच्या योजनेवर खर्च केला जातो कोविड काळात केंद्र सरकारने कोविड रोखण्यासाठी अफाट खर्च केला हा सगळा खर्च जी एस टी सारख्या कारच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून केलावकातो शिवाय सरकार राज्यांना जी एस टी चां परतावा राज्यांना देते तरीही विरोधक केंद्राला…
ठाकरेंच्या १६ आमदारांना अपात्र करण्याच्या मागणीवरीलयाचिकेचा निर्णय १४ जुलैला
नवी दिल्ली – शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात १४ जुलैला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी तातडीने निर्णय घेण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. दोन महिने झाले तरी अध्यक्षांकडून निर्णयाबाबत हालचाल होत नसल्याचा दावा करत ठाकरे गटाच्या…
