.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 19 हजार 632 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात १६ हजार १०५ रुग्ण आढळले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात १४ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ हजार २९० रुग्ण आढळले आहेत. अकोला जिल्ह्यात १२हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत १८८२ रुग्णांची नोंद झालीय.महाराष्ट्र शासनाकडून याबबात अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे येणे मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांमधून पिवळा द्रव बाहेर येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इत्यादी गोष्टींचा सवावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलिगीकरण करणे गरजेचं आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्र शासनाकडून डोळे आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतात धुवावे. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसून नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. उन्हात वापरण्यासाठी असलेल्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोताली परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औशधी डोळ्यात टाकावी, असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं आहे
Similar Posts
तनिषाच्या कुटुंबाकडे दहा लाख मागितल्याची मंगेशकर रुग्णालयाची कबुली डॉक्टर घैसास यांचा राजीनामा
पुणे/मंगेशकर रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या तनिषा भिसे या महिलेच्या कुटुंबीयांकडे दहा लाख रुपये मागितल्याची कबुली मंगेशकर रुग्णालयाने दिली आहे एका पत्रकार परिषदेत अधीक्षक डॉ.केळकर यांनीच ही माहिती दिली.दरम्यान या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार असणारे डॉ.घैसास यांनी राजीनामा दिला आहे.डिपॉझिट आम्ही मागत नाही पण आमचे ग्रह फिरले म्हणून…पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे या गर्भवती…
महाराषट्रात एकाच पक्षाचे सरकार येऊ शकत नाही – अमित शहाना अजित पवार यांचे सडेतोड उत्तर
मुंबई – २०२९ मध्ये राज्यात एकट्या भाजपचे सरकार आणायचे आहे त्यामुळे कामाला लागा असे आवाहन गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले आहे . त्याला सडेतोड उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले महाराष्ट्रात कुठल्याही एका पक्षाचे सरकार येऊ शकत नाही हा ४० वर्षांचा इतिहास आहे . अजित पवारांच्या या विधानामुळे महाराष्ट्रात महायुतीतील मतभेद चव्हाट्यावर आले…
रेल्वेच्या जनथाळीचा प्रवाशांना दिलासा
मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा…
वीरेंद्र शास्त्रींच्या चमत्कारांना शंकराचार्यांचे आव्हान
दिल्ली – दरबार भरवून लोकांचा भूतकाळ आणि भविष्यकाळ सांगणाऱ्या बागेश्वर बाबा अर्थात वीरेंद्र शास्त्री याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तर जाहीर आव्हान केलेलेच आहे पण आता शंकराचार्य यांनीही बॅगेशवरला खुले आव्हान केले आहेआज परमपूज्य शंकराचार्य स्वामी म्हणाले कि चमत्कार जर लोकांच्या भल्यासाठी असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे पण बागेश्वरच्या बाबतीत तसे काही दिसत नाही. बागेश्वर…
उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचा महाडच्या पुरग्रस्ताना मदतीचा हात .
उल्हासनगर / प्रतिनिधी : गेल्या दीड हप्त्या पुर्वी महाड येथे कोसळलेल्या धुव्वाधार पावसाने महाड च्या सावित्री नदीला आलेल्या पुरा मुळे महाड शहरातील नागरिक व व्यापारी पुर्णता उध्वस्त झाला असुन या पुरग्रस्तांचे सर्वच होत्याचे नव्हते झाले आहे . तेव्हा या पुरग्रस्त नागरिकाना एक हात मदतीचा म्हणुन उल्हासनगर येथिल वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते ॲड अनिल बागुल…
झोपडीदादाचे षडयंत्र हाणून पाडा-
मुंबई(प्रतिनिधी) तत्कालीन सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरूरकर यांनीही अशीच कार्रवाई सरदार वल्लभ भाई पटेल रोडवरील अनधिकृत झोपडया तोड़त पालिकेचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्या निवृत्ती नंतर आता त्याच ठिकाणी झोपडया पुन्हा उभ्या राहिलेल्या आहेत. तेथील झोपडीदादा दलालाची नंबर टाकण्यासाठी पालिका खात्यात प्रयत्न चालू केला आहे. त्यासाठी राजकिय पाठबळ वापरण्यासाठी खेळी खेळली जात आहे. आताचे सहाय्यक आयुक्त…
