.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 19 हजार 632 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात १६ हजार १०५ रुग्ण आढळले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात १४ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ हजार २९० रुग्ण आढळले आहेत. अकोला जिल्ह्यात १२हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत १८८२ रुग्णांची नोंद झालीय.महाराष्ट्र शासनाकडून याबबात अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे येणे मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांमधून पिवळा द्रव बाहेर येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इत्यादी गोष्टींचा सवावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलिगीकरण करणे गरजेचं आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्र शासनाकडून डोळे आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतात धुवावे. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसून नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. उन्हात वापरण्यासाठी असलेल्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोताली परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औशधी डोळ्यात टाकावी, असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं आहे
Similar Posts
कबड्डी कबड्डी’च्या जयघोषात श्रमिकच्या मातीत पुन्हा धडधडले सहा दशकांचे हृदय
‘ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कबड्डी दिग्गजांना मानाचा मुजरामुंबई, दि. १२ (क्री.प्र.) : ‘कबड्डी कबड्डी’च्या घुमणार्या जयघोषात श्रमिक जिमखान्याच्या लाल मातीत जणू काळ थांबला आणि सहा दशकांच्या आठवणी पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मनात दरवळल्या. कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या श्रमिक जिमखान्याने आपल्या हीरक महोत्सवी सोहळ्यात केवळ कार्यक्रम नाही, तर एक जिवंत इतिहासच साकारला. विशेष…
हिमाचलच्या मंडी मध्ये किंग विरुद्ध क्वीन कंगना राणावत च्या विरोधात विक्रमादित्य
मंडी/हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभा मतदार संघात भाजपाने कंगना राणावत याना तिकीट दिले आहे तर काँग्रेसने माझी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य याना मैदानात उतरवले आहे विक्रमादित्य हे राज घराण्यातील असल्याने मंडी मध्ये किंग विरुद्ध kveen असा मुकाबला होणार आहे.2021 साधी झालेल्या पोटनिवडणुकी या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजय झाल्या होत्या पण जिजामाता त्याने…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून नुपूर शर्मा प्रकरण अधिवेशनात गाजणार
दिल्ली – आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे मात्र नुपूर शर्माच्या वादग्रस्त विधानावरून झालेल्या दोन हत्या आणि त्यानंतर निर्माण झालेला धार्मिक तणाव यामुळे विरोधक आज सरकारला धारेवर धरणार आहेत कारण नुपूर शर्माच्या अटकेची विरोधकांनी केलेली मागणी सरकारने फेटाळली होती त्याचे आज तीव्र पडसाद संसदेच्या अधिवेशनात उमटण्याची शक्यता आहे . त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार…
मुंबई – जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करणारी याचिका मुंबई उच्चं न्यायालयाने फेटाळली
मुंबई – मराठा आंदोलक मराठा आरक्षणासाठी २० तारखेला मुंबईत येऊन आंदोलन करणार आहेत या आंदोलनामुळे मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्चं न्यायालयात दाखल करण्यात आली होती पण न्यायालयाने ती फेटाळली आहेमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने…
गुन्हे | ताज्या बातम्या | मुंबई | राजकीयसचिन वाझेला माफीचा साक्षीदार करण्यास न्यायालयाची मंजुरी
मुंबई – अनिल देशमुख यांच्या शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणात सीबीआयला सर्व प्रकारची माहिती माहिती पुरवून चांगली मदत केल्याबद्दल सीबीआयच्या शिफारशीवरून सत्र न्यायालयाने सचिन वाझे यांना माफीचा साक्षीदार बनवले आहे. दरम्यान या निर्णयाला विरोध करणारा या प्रकरणातील एक आरोपी कुंदन शिंदे याची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. सचिन वाझे माफीचा साक्षीदार झाल्याने १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल…
118 बडतर्फ एसटी कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या…
