.मुंबई |- महाराष्ट्रात डोळे येणाऱ्या आजाराने अक्षरश: थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून डोळे येणाऱ्या आजाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालीय. विशेष म्हणजे डोळे येण्याचा आजाराचे आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७०३ रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णां चा समावेश आहे.बुलढाणा जिल्ह्यात तब्बल ३५ हजार ४६६ रुग्ण आढळले आहेत. त्यापाठोपाठ जळगाव जिल्ह्यात 19 हजार 632 रुग्ण आढळले आहेत. पुणे जिल्ह्यात १६ हजार १०५ रुग्ण आढळले आहेत. तर नांदेड जिल्ह्यात १४ हजार ९६ रुग्ण आढळले आहेत. अमरावती जिल्ह्यात १२ हजार २९० रुग्ण आढळले आहेत. अकोला जिल्ह्यात १२हजार १३४ रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईत आतापर्यंत १८८२ रुग्णांची नोंद झालीय.महाराष्ट्र शासनाकडून याबबात अधिकृत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे येणे मुख्यत्वे अॅडीनो वायरसमुळे होते. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्यांमधून पिवळा द्रव बाहेर येणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. हा आजार होवू नये म्हणून जनतेने वैयक्तिक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. यामध्ये वारंवार हात धुणे, डोळ्यांना हात न लावणे इत्यादी गोष्टींचा सवावेश आहे. तसेच डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलिगीकरण करणे गरजेचं आहे, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे.महाराष्ट्र शासनाकडून डोळे आल्यास काय काळजी घ्यावी याबाबत माहिती जारी करण्यात आली आहे. डोळे आल्यास योग्य ती काळजी घ्यावी. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतात धुवावे. इतर व्यक्तींच्या रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने आपले डोळे पुसून नये. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये. उन्हात वापरण्यासाठी असलेल्या चष्म्यांचा वापर करावा. आपल्या सभोताली परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यामुळे त्यावर माशा बसतात ज्या डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औशधी डोळ्यात टाकावी, असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलं आहे
Similar Posts
अहमदाबाद बॉम्ब स्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा
अहमदाबाद/ जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील 49 दोषींना काल न्यायालयाने शिक्षा सुनावली यामधे 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जनमठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे26 जुलै २००८ मध्ये अहमदाबाद शहरात २० साखळी बाँबस्फोट झाले होते यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जन जखमी झाले होते विशेष म्हणजे सुरत मध्ये…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाराष्ट्रात शिंदे शाही
देशाच्या राजकारणात आघाडी सरकारला फारसे भवितव्य नसते आणि जनता पक्षाच्या राजवटीपासून हे चित्र भारतीय जनतेने पाहिले आहे . सतेसाठी एकत्र यायचे आणि जो काही दोन चार वर्षाचा काळ मिळेल त्यात उभा आडवा हात मारून पुन्हा आपापल्या मार्गाने जायचं याच धोरणाच्या आधारे आघाडी सरकारे बनतात आणि कोसळतात आधीची वर्षांपूर्वी अनैसर्गिक आघाडीतून तयार झालेले महाविकास आघडीचे सरकार…
शेलाराना भाजपात कुणीही विचारात नाही – आदित्य ठाकरे
मुंबई: भाजपशी दगाफटका करणाऱ्या पक्षांना दंडित करा, असा आदेश अमित शाह यांनी दिला होता. त्यानुसार आमच्याशी दगाबाजी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांना आम्ही दंडित केले, असे वक्तव्य करणारे भाजप नेते आशिष शेलार यांना आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. मला आशिष शेलारांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे नाही. कारण मला मनापासून त्यांच्याविषयी वाईट वाटते. मी त्यांना सांगितलं की,…
पुण्यातील हॉटेल्स मध्ये ड्रग्ज साठा जप्त ५ जणांना अटक
पुणे : शहरात एका आमदाराच्या पुतण्याने मध्यरात्री बेदरकारपणे गाडी चालवत एका दुचाकीला उडवल्याची भीषण घटना घडली. त्यानंतर, पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासोबत, पुण्यात अवैधपणे विक्री होत असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या वापरावरुनही राजकीय वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप…
मुलांच्या लसीकरण मोहिमेचा मार्ग मोकळा
मुंबई/ भारत बायोटेक चां कोव्हाक्सिन लासिला डी सी जी आय ने परवानगी दिल्यामुळे मुलांच्या लसीकरणाच्या मार्ग मोकळा झाला असून केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील मुलांचे ३जानेवारीपासून लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना १० जानेवारी पासून बूस्टर डोस दिला जाणार आहे कोरोंनाचा सर्वाधिक धोका वयोवृध्द व्यक्तींना असतो त्यामुळे ६० वर्षांवरील व्यक्तींना त्यांच्या डॉक्टरांच्या…
निवडणुकीत केले काम दिसण्यासाठी -नगरसेवकांची विकास निधी वापरण्याची घाई
मुंबई/ नगरसेवक इतर वेळी त्यांच्या वार्ड मध्ये फारशी कामे करीत नसले तरी निवडणुका आल्यावर मात्र विकास कामांचा सपाटा लावतात कारण लोकांना दिसायला हवेना ! नगरसेवकाने काहीतरी केले आहे.यंदाही तसाच प्रकार सुरू आहे पुढील वर्षी होणारी महापालिका निवडणूक लक्षात घेऊन इतर योजनांसाठी पडून असलेला निधी आता पायाभूत विकासकामांसाठी वळवला जात आहेबोरिवली प्रभाग नऊच्या काँग्रेस नगरसेविका १…
