सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .
Similar Posts
स्तन कापले, गुप्तांगावर वार; हत्येपूर्वी यशश्रीवर बलात्कार झाला ? पोस्टमार्टम अहवाल
नवी मुंबई -उरणमधील एका २२ वर्षीय तरुणीची अतिशय क्रूर हत्या करण्यात आली. या तरुणीचे अवयव कापण्यात आल्याचे, चेहरा तसेच गुप्तांगावर जखमा आहेत. या घटनेमुळे उरण तालुका हादरला आहे. त्याचा सर्वत्र जाहीर निषेध केला जात आहे. दरम्यान एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आल्यानंतर या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी आरोपीवर २०१९ मध्ये हल्लाही केला होता….
मुंबईत आणखी एका आंदोलकांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
सरकार व जरांगे आपापल्या भूमिकेवर ठाम आंदोलन चिघळलेमुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेले आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे कारण जरांगे आणि सरकार आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत.शिंदे समितीच्या अध्यक्षाने जरांगे यांची भेट घेतली पण ओबीसीतून आरक्षण घेण्यावर रांगा ठाम असल्याने तोडगा निघू शकला नाही .दरम्यान आज एका आंदोलकांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाराजधानी मुंबईत सुरू असलेल्या मराठा…
पनवेल- इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इडस्ट्रीयल टाउनचा पदग्रहण सोहळा
पनवेल दि. १८ जुलै – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन चा पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक – ९ जुलै रोजी पनवेल येथे सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली व District ESO शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मावळत्या अध्यक्षा वृषाली सावळेकर यांनी आपल्या गतवर्षीच्या कार्यकाळातील कामाचा आढावा सादर केला व नूतन अध्यक्षा कल्पना…
छगन भुजबळ दंगल भडकविण्याचं काम करतायेत – मनोज जरांगे पाटील
अकोला : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांची अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या चरणगावात जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत जरांगेंनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. “हा दोन जातीत दंगल भडकवायला लागलाय. मराठा ओबीसीतच आहे हे माहिती झाल्याने तो दंगल भडकावण्याचे प्रयत्न करतोय. त्याचं स्वप्नं पूर्ण होऊ…
७२ तास कुठे निजल्या होत्या? महापौरांची थेट गृह मंत्र्यांकडे फिर्याद-आशीष शेलार अडचणीत
मुंबई/ राजकारणातील व्यक्तींनी किती जरी मतभेद असेल तरी महिलांविषयी अत्यंत जबाबदारीने बोलायचे असते पण सुसंस्कृत पना आणि शिस्तीचा ढोल वाजवणार भाजपच्या नेत्यांना आता याच गोष्टीचा विसर पडत चालला असून भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी चक्क मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणात ७२ तास कुठे निजला होता असा संतापजनक सवाल मुंबईच्या प्रथम नागरिक…
चारकोप, गोराई स्वयं पुनर्विकासाचे हब होतेय
भूमिपूजन सोहळ्यात आ. प्रविण दरेकरांचे विधान मुंबई- भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आज कांदिवली, चारकोप येथील ‘राकेश’ गृहनिर्माण सहकारी संस्थेचा स्वयंपुनर्विकासांतर्गत भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी चारकोप, गोराई हे स्वयंपुनर्विकासाचे हब होतेय, मुंबईला आदर्श घालून द्यायचा आहे, असे प्रतिपादन दरेकर यांनी केले. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर,…
