सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .
Similar Posts
भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
पुणे/भाजपाचे पुण्याचे माजी खासदार आणि विद्यमान उपाध्यक्ष संजय काकडे यांच्या पत्नी उषा काकडे यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सध्या त्यांच्यावर पुण्याच्या हृदयी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.संजय काकडे हे बांधकाम व्यावसायिक असून सध्या ते भाजपाचे उपाध्यक्ष पुण्यामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी पार पडली होती शिवाय त्यांच्यावर सोपवण्यात आलेली…
जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्धासाठी सज्जपृथ्वीराज आणि शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने जामनेरमध्ये दिग्गजांच्या लढती
जळगाव, दि. १३ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जामनेरमध्ये कुस्तीच्या…
राममंदिराच्या उदघाटन सोहळ्याचे पंतप्रधान मोदींना निमंत्रण
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. बुधवारी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य चंपत राय, नृपेंद्र मिश्रा आणि उडिपी शंकराचार्य गोविंद गिरी महाराज यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोदींनी त्यांनी आमंत्रित केले. पंतप्रधानांनी देखील त्यांचे निमंत्रण स्वीकारले असून कार्यक्रमाला हजर राहण्याचे त्यांनी आश्वासित केले. चंपत राय…
यूपीतील धर्मांतर मास्टरमाइंड छागुर बाबाला अटक
लखनौ/उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला एटीएसने बलरामपुर येथून अटक केली त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हीलाही अटक करण्यात आली आहे सांगूर बाबा वर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस होतेतपास यंत्रणांनुसार, जमालुद्दीन स्वतःला हाजी पीर जलालुद्दीन म्हणवून घेत असे. तो मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यान भाग पाडत असे. त्याचे लक्ष्य हिंदू मुली होत्या….
‘क्रिप्टो करन्सी’ स्वनाशाच्या मार्गावर?
गेल्या सप्ताहात अमेरिकेतील ‘एफटीएक्स ‘ नावाचा आभासी चलनाचा म्हणजे क्रिप्टो करन्सी चे व्यवहार करणारा बाजार एका रात्रीत उध्वस्त झाला. एफटीएक्स ने दिवाळे जाहीर केले. लाखो गुंतवणूकदारांच्या आभासी चलनातील गुंतवणूकीची माती झाली. जगभर खळबळ माजली. मात्र या घटनेनंतर तरी आभासी चलनाच्या मृगजळामागे धावणारा भारतीय गुंतवणूकदार, त्याचे देशातील नियंत्रक जागे होतात किंवा कसे हे पहाणे महत्वाचे आहे. त्याचा…
मुंबईकरांना महापालिकेचा मोठा दिलासा;एक डोस घेतलेल्यांना सुधा सवलत- मुंबईत कोरोणाची तिसरी लाट नाही
मुंबई- महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि कोरोणाचा पूर्वीच्या तुलनेत कमी झालेला प्रभावी यामुळे मुंबई सारख्या शहरात भलेही काही प्रमाणात रुग्ण वाढ झालेली असली तरी कोरोनची तिसरी लाट आलेली नाही असा खुलासा मुंबई महानगर पालिकेने केला आहे. .तसेच आता एक डोस घेतलेल्यांना सुधा सर्व आस्थापनांमध्ये मुभा असेल आणि याबाबतचा निर्णय लवकरच टास्क फोर्स बरोबर चर्चा…
