सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .
Similar Posts
बारावीचा गणिताचा पेपर फुटला
बोर्डाकडून चौकशीचे आदेशबुलढाणा-सध्या महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरु आहे . यावेळी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सरकारने कायदे कठोर केले आहेत असे असतानाही बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे बारावीचा गणिताचा पेपर परीक्षाफुटला . परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ…
पुण्यातील हॉटेल्स मध्ये ड्रग्ज साठा जप्त ५ जणांना अटक
पुणे : शहरात एका आमदाराच्या पुतण्याने मध्यरात्री बेदरकारपणे गाडी चालवत एका दुचाकीला उडवल्याची भीषण घटना घडली. त्यानंतर, पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासोबत, पुण्यात अवैधपणे विक्री होत असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या वापरावरुनही राजकीय वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे दरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शिवसेनेला या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहेसंभाजी राजे यांनी हातावर शिवबंधन बांधण्यास…
जनतेला दिलासा देण्यासाठी जीएसटी स्लॅब मध्ये बदल
नवी दिल्ली/सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी १२टक्के आणि २८टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त ५ टक्के आणि १८ टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकाच घरात दोन दोन कायदे का – मोदींकडून समान नागरी कायद्याचे समर्थन
भोपाळ/एकाच घरात जेव्हा दोन दोन कायदे असतात त्यावेळेला ते घर व्यवस्थित चालू शकत नाही असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची वकालत केली आहे.भोपाळ मध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदींनी सांगितले की देशामध्ये मुस्लिमांना काही पक्षांकडून भीती दाखवली जात आहे परंतु प्रत्यक्षात तसे नाही उलट मुस्लिम माहिती आजची स्थिती खूपच वाईट आहे…
देशातील सर्व टोलनाके बंद करण्याचे नितीन गडकरींचे संकेत
मुंबई/टोल नाक्यावरील रांगा कमी करण्याकरता सरकारी पातळीवर अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्याकरता फास्ट टॅग पद्धत अनिवार्य करण्यात आली .परंतु तरीही टोलनाक्यावर गाड्यांना उभे राहावे लागते. त्यामुळे देशातील सर्व टोलनाके आता बंद करून नवीन यंत्रणा राबवण्याबाबत बाबत केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलेदादरच्या अमर हिंद मंडळाच्या वसंत…
