सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .
Similar Posts
पाकिस्तान चे लोकांना ही आता मोदीजी ची आवश्यकता भासते
मुंबई: वरिष्ठ भाजपा नेता आणि मुंबई पूर्व उपमहापौर बाबूभाई भवानजी म्हणाले की आज पाकिस्तान गंभीर परिस्थीती तून जात आहे. बरेच लोकाना एक वेळचे जेवणाची भ्रांत आहे, त्यामुळे पाकिस्तान चे जनतेला ही मोदी यांची आवश्यकता भासू लागली आहे. आज एक कथन करताना भवानजी नी म्हटले आहे की, आमच्या शेजारी पाकिस्तान देशात आज जी परिस्थिती दिसत आहे…
अजित पवार गटाला शरद पवारांचा फोटो लावण्यास मनाई
मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंडखोरी करून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये सामील झाले आहे. आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाच्या कार्यालयात उद्घाटन पार पडले. यावेळी कार्यालयामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. यावेळी काही कार्यकर्त्यांनी तर दार तोडून प्रवेश केला आहे.मात्र अजित पवार गटाला आपला फोटो लावण्यास शरद पवारांनी मनाई केली…
५०० कोटीच्या बिलासाठी साखळी उपोषण
मुंबई / मुंबई सार्वजनिक बांधकाम विभाग, मुंबई अंतर्गत कामे करणाऱ्या कंत्राटदारांची प्रलंबित ५०० कोटींची बिले मिळावी म्हणून ” मुंबई कॉन्टॅक्टर्स असोसिएशन ” च्या वतीने सोमवार पासून आझाद मैदानात साखळी उपोषण सुरू केले आहे. सरकारने आमची बिले लवकरात लवकर मिळावी असे असोसिएशनचे कार्याध्यक्ष दादा इंगळे यांनी यावेळी सांगितले. मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात येणाऱ्या ४ विभागात इलाखा…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश -कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा- तातडीने युद्ध पातळीवर कारवाई करा
वॉर्डनिहाय पथके नेमून डेब्रीज टाकण्याचे प्रकार रोखामुंबई हे देशातले सुंदर, स्वच्छ बनविण्यासाठी मैदानात उतरा मुंबई दि २०: अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या…
मिडलाईनची जेतेपदाला गवसणी मिडलाईनने राजाभाऊ देसाई चषक जिंकला _ राजाभाऊ देसाई स्मृती चषक कबड्डी
मुंबई, दि. १२ (क्री.प्र.)- स्पर्धेतील आपल्या पहिल्याच साखळी सामन्यात पराभवाची झळ सोसणार्या रायगडच्या मिडलाइन अॅकॅडमीने ठाणे महानगरपालिकेला धक्का देत स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक व्यावसायिक कबड्डी स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली. मिडलाइनने ठाणे महानगर पालिकेचे आव्हान ३२-२२ असे सहज परतावून लावत प्रभादेवीत पहिल्यांदाच जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत जयश्री सावंत क्रीडानगरीत अंतिम सामना…
चार राज्यांच्या विधासभां निवडणुकीत भाजपची बंपर जीत – काँग्रेसला केवळ तेलंगणात यश
भोपाळ/ गेल्या महिन्यात झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले भाजपने मध्य प्रदेशातील आपली सत्ता कायम राखली पण राजस्थान आणि छतीसगड ही काँग्रेसकडे असलेली राज्य सुधा हिसकावून घेतली तर तेलंगणात सत्ता धारी बी आर एसचा धुव्वा उडवून काँग्रेसने तेलंगणा वर झेंडा फडकवलाराजस्थानातील 199 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ 70…
