सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .
Similar Posts
अनिल परब यांची १० कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांची १० कोटी २०लाखांची मालमत्ता जप्त केली आहे . उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का आहे. अनिल परब यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार असल्याचे समजते….
आणखी एक इलेक्शन गिफ्ट ! डबेवाले आणि चर्मकारांसाठी १२ हजार घरे
मुंबई -लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे आता लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारकडून लोकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत लाडकी बहीण योजनेस आता डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी १२ हजार घरांची योजना राबवली जाणार आहेमुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाबांधवांसाठी राज्य सरकारने १२ हजार घरांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आज (१३ सप्टेंबर) विकासक आणि शासनामार्फत एका सामंजस्य करारावर…
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्षपदी महेश पवार तर कार्यवाहीपदी प्रविण पुरो
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – मंत्रालय आणि विधिमंडळ वर्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते) तर कार्यवाह पदी ‘रायगड टुडे’चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्ष पदी ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते)…
महापालिकेच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढणार
मुंबई – विधानसभा निवडणुकीत महायुतीनं २८८ पैकी 230 जागा जिंकत महाविकास आघाडीची दाणादाण उडवली.त्यात महायुतीत भाजपनं १४९ पैकी तब्बल १३२ जागा जिंकून युतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले आहे. या घवघवीत यशानंतर आता भाजपचा कॉन्फिडन्स जबदस्त वाढला आहे.त्याचमुळे आता २०२९ च्या विधानसभा निवडणुकीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप नेत्यांकडून दिले…
महाविकास आघाडीच्या मोर्चाला पोलिसांची सशर्त परवानगी
मुंबई -महाराष्ट्रातील थोर पुरुषांचा वारंवार होणार अपमान आणि कर्नाटक- महाराष्ट्र सीमा वादात कर्नाटक कडून सुरु असलेली दंडेली याच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडी कडून जेजे हॉस्पिटल जवळील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाची इमारत या मार्गावर जो महामोर्चा काढण्यात येणार आहे त्याला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरूषांबाबत होत असलेली…
ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी दूर ठेवले त्याच काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी युती केली – राज ठाकरे
मुंबई- दुसऱ्याला गद्दार भरणारे उद्धव ठाकरे हेच मोठे गद्दार आहेत त्यांच्यामुळेच नारायण राणे मी स्वतः आणि शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले असा थेट आरोप मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी शिवडी मतदार संघात प्रचार सभा घेतली होती या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला…
