सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण इलेक्ट्रॉनिक मीडिया वरून या सगळ्या दंगलीचे चित्रीकरण करून दे सतत बातम्यांच्या नावाखाली टेलिकास्ट केले जात आहेत त्यामुळे देशाच्या इतर भागातील लोकांची सुधा माथी भडकत आहेत आणि ते लोकही हातात दगड घेण्यास प्रवृत्त होत आहेत.त्यामुळे अशा गोष्टी इलेक्ट्रॉनिक मीडियावर दाखवण्यास बंदी घालणे गरजेचे आहे.जर तुम्ही सोशल मीडिया वरील वादग्रस्त पोस्ट बाबत एखाद्याला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करू शकता तर तोच न्याय इलेक्ट्रॉनिक मीडियाला लाऊन त्यांच्यावर कारवाई का करीत नाही.कारण आपल्या चॅनलवर काय दाखवावे आणि काय दाखवू नये याची जराही अक्कल न्यूज चॅनल चालवणाऱ्या लोकांना नसेल तर तर ते समाजासाठी देशाच्या सुरक्षेसाठी हानिकारक ठरू शकते.स्वतःच्या टी आर पी चां विचार करून हे लोक जर त्यांच्या चॅनल वर काहीही भडकाऊ गोष्टी दाखवत असतील तर त्याचे पडसाद समाजात उमटणार च ! आणि त्यातून सामाजिक एक्याला तड जाणारच .आज मशिदिवरचा भोंग्यावरून देशात धार्मिक तणाव निर्माण झालाय आणि त्यातून केंव्हाही जातीय दंगल भडकू शकते.त्यामुळे जाती धर्माच्या नावाने भडकाऊ भाषणे ठोकून लोकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना न्यूज चॅनल वाल्यांनी ब्लॉक करणे गरजेचे होते .पण तसे होताना दिसत नाही त्यामुळे प्रसिद्धीला हपापलेले राजकीय नेते रोज न्यूज चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर येऊन आपली प्रसिद्धीची हौस भागवून घेतात.त्यामुळे लोकांना अक्षरशः या सगळ्या गोष्टींचा वीट आलाय. .म्हणूनच देशात धार्मिक भावना भडकवणाऱ्या नेत्यांना सतत प्रसिध्दी देणाऱ्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर सरकारने सेन्सॉरशिप लावावी अशी लोकांची मागणी आहे कारण देशातील वातावरण बिघडवयला इलेक्ट्रॉनिक मीडियाच जबाबदार आहे. या देशात आज अनेक गोष्टी आहेत भ्रष्टाचार,महागाई,बेरोजगारी,महिलांवरील अत्याचार,शैक्षणिक क्षेत्रातील अनागोदी,शासकीय क्षेत्रातील लाचखोरी वीज टंचाई आणि त्याचा जनतेवर होणार परिणाम या सर्व गोष्टींचा जनतेच्या दैन दिनी जीवनाशी संबंध आहे त्यावर फोकस करायचे सोडून रोज राजकारण्यांचे सुतकी आणि सुडाने पेटलेले खुनशी चेहरे रोज टीव्ही वर बघायला मिळत आहेत त्यामुळे न्यूज चॅनल बघणाऱ्या लोकांचं डोकं खराब झालंय रोज उठून या दोघांचे च चेहरे बघायचे का ? असा सवाल लोक विचारात आहेत.अरे जनाची नाय निदान मनाची तरी लाज बाळगा.लोक बघतात म्हणून काहीपण दाखवायचं? या देशाची सुरक्षा धार्मिक सद्भाव याबाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाची काहीच जबाबदारी नाही का ? आणि त्यांना जर त्यांच्या जबाबदारीचा विसर पडला असेल तर सरकारने आपली जबाबदारी पार पाडावी आणि जाती धर्माच्या भडकाऊ बातम्या दाखवायला बंदी घालावी. अन्यथा या लोकांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात येईल .
Similar Posts
विरोधी पक्षाच्या दबावाला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये ! -संजीव पोतनीस (नाशिक) एसटी महामंडळातील
कर्मचाऱ्यांचा संप आणि वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एसटी महामंडळामध्ये जो सध्या कामगारांनी संप पुकारला आहेत त्याच्यामागे भाजपचे पडळकर आणि इतर मंडळी यांचा पाठिंबा आहे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की गेली दोन वर्ष भारतामध्ये करोना या रोगाने थैमान घेतले आहे अशा परिस्थितीत सर्व सरकारी संस्था या आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. एसटी महामंडळाचे सांगायचे झाल्यास या…
जो मनसेच्या नादाला लागला ,त्याची सत्ता गेली -राज ठाकरे
ठाणे – जो मनसेच्या नादाला लागला त्याची सत्ता गेली अशा शब्दात आज राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच महाराष्ट्रात मनसेची सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला ज्याने हल्ला केला त्याला आधी कळेल आणि मग सगळ्यांना कळेल, संदीप देशपांडे हल्लाप्रकरणी राज ठाकरेंचा इशारामनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला…
Covhidshild लशीच्या दोन डोस मधील अंतर वाढविण्याचा सल्ला
नवी दिल्ली :कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतराबाबत महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला असून, कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिला असून, आता कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.सध्याच्या घडीला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते…
५ ते ६ फेब्रुवारी मुंबईच्या काही भागातील पाणी पुरवठा 30 तास बंद राहणार
मुंबई/पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जल बोगदा दरम्यान मुंबई महानगरपालिकेतर्फे नवीन 2400 मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे 1800 मिलिटरी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन 2400 मिलिमीटर वासाची जलवाहिनी कार्य करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे त्यामुळे 5 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान तीस तास…
राजकीय बॉम्ब हल्ल्यात फडणवीसांचा बार फुसका- उद्या मलिक हायड्रोजन बॉम्ब टाकणार
मुंबई / महाराष्ट्रात एकीकडे अतिवृष्टी मुले बरबाद झालेला शेतकरी मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसला आहे तर दुसरीकडे सरकार आणि विरोधी पक्षात बॉम्ब वार सुरू आहे आज फडणवीसांनी मलिक आणि अंडरवर्ल्डचा संबंधाबाबत धमाका केला मात्र तो फुसका असल्याचे सांगून आपण बुधवारी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे मलिक यांनी जाहीर केले आहे .काल फडणवीस यांनी मालिकांवर बॉम्ब टाकताना…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | मुंबईकुर्ला येथे कंत्रादारांवर गोळीबार
मुंबई/ आजकाल व्यावसायिक वादातून हल्ले होण्याचे प्रकार मुंबईत वाढत चालले आहेत कुरल्यात अशाच एका घटनेत कामाचे टेंडर मागे घ्यावे यावरून एका कंत्राट दारावर दोन इस्मानी गोळीबार केला यात सुदैवाने तो बचावला असून या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहेदहिसर येथे राहणारे सूरज प्रताप सिंग देवडा हे कंत्राटदार आहेत आणि त्यांची धरम कन्स्ट्रक्शन…
