भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासाला आणि न्याय हक्काला कुठेही तदा जाणार नाही याची संविधानात काळजी घेतली होती पण आज मात्र तोच सामान्य माणूस कट्टरपंथीय लोकांच्या नादी लागून देशाच्या सुरक्षेसामोर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहिलाय आणि हीच खरी चिंतेची बाब आहे.शनिवारी मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मोर्चा निघाला आणि नंतर सभा झाली त्यातील नेत्यांची भाषणे ऐकून या देशात जर हे असेच चालू राहिले तर शांततेने जगणाऱ्या माणसाने करायचं तरी काय? धर्माच्या नावाने जातीच्या नावाने अशा प्रकारचे मोर्चे निघणे आणि त्यातून सरकार किंवा विरोधकांना धमकीवजा इशारे देणे हे कशाचे द्योतक आहे? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.भारताचा खरा चेहरा अर्थातच सेक्युलर आहे. पण आज देशातील किती पक्ष सेक्युलॅरिझम मानतात ? भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सोडा पण काँग्रेस,समाजवादी,राष्ट्रवादी, सपा,बसपा,आणि इतर पक्ष तरी सेक्युलर म्हणवून घेण्याचा पात्रतेचे आहेत का? तसे असते तर त्यांनी निवडणुकीत केवळ त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर लोकांकडे मते मागितली असती पण तसे न करता आज प्रत्येक पक्षाला जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवण्याची पाळी यावी यातच सर्व काही आले.मात्र हे कुठे तरी थांबायला हवं ओवेसी असो की योगी धर्माचा अजेंडा पुढे रेटणारे हे लोक लोकशाहीसाठी घटक आहेत त्यामुळे अशा लोकांच्या मागे फरफटत जाणे म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे.ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायलाच हवी.मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण यासारख्या वादग्रस्त विषयांमध्ये स्वतःला गुरफटून घेणे म्हणजे जातीय तणावाला रान मोकळे करून देण्यासारखे आहे.आजचे युग हे विज्ञान युग आहे तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या निक्षावर तपासली जाते त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जाती धर्म आणि त्यातील रूढी परंपरांना कवडीची किंमत नाही .आणि म्हणूनच हिंदुत्ववादी असोत की मुस्लिम कट्टर पांठी असोत या लोकांच्या विरोधात उभे राहून हा देश,हे स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे.
Similar Posts
सुधाकरराव, अधिस्वीकृती आणि विलासराव ! –
सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असतांना प्रकाश देशमुख हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो. रत्नागिरी येथे मंत्रिमंडळ बैठक होती. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत जिल्हा माहिती अधिकारी यांच्या सहीच्या प्रवेश पत्रिकेशिवाय प्रवेश नव्हता. प्रकाश देशमुख आणि योगेश त्रिवेदी यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वच अधिस्वीकृती पत्रिकाधारक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहिजाब चां धार्मिक स्फोट
या देशाची धर्माच्या आधारे फाळणी झालेली आहे .आणि फाळणीच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगलीत किती लोक मेले याचा हिशोब नाही.कारण धर्म ही तेंव्हाही अफूची गोळी होती आणि आताही आहे धर्माचं वेड डोक्यात शिरल की मग माणसाचा फालतू धार्मिक अभिमान जागा होतो आणि त्याला व्होट बँकेचं राजकारण बनवून पुढारी लोक आपली पोळी भाजून घेतात लोकांना हे सगळ…
यूपीतील धर्मांतर मास्टरमाइंड छागुर बाबाला अटक
लखनौ/उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला एटीएसने बलरामपुर येथून अटक केली त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हीलाही अटक करण्यात आली आहे सांगूर बाबा वर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस होतेतपास यंत्रणांनुसार, जमालुद्दीन स्वतःला हाजी पीर जलालुद्दीन म्हणवून घेत असे. तो मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यान भाग पाडत असे. त्याचे लक्ष्य हिंदू मुली होत्या….
पवार काका – पुतण्यांना मोठा धक्का – राष्ट्रवादीच्या फायरब्रॅन्ड नेत्या काँग्रेस मध्ये
महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. कारण राज्यात आगामी काळात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. असं असताना आता एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा झटका देणारी ही बातमी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेता तसेच लेडी जेम्स बॉन्ड म्हणून ख्याती असलेल्या सोनिया दुहान यांचा उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश…
सैफ अली प्रकरणात ५० जणांची चौकशी
मुंबई/बॉलीवूडमधील अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत ५० जणांची चौकशी केली आहे मात्र हल्लेखोर अजूनही मोकाट आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक टीम तैनात केलेल्या आहे परंतु अजून पर्यंत तरी पोलिसांना यश आलेले नाही.१४ जानेवारीच्या पहाटे पावणेतीन वाजता बांद्रातील एका उच्चभ्रू इमारतीत घुसून एका हल्ले खोराने प्रसिद्ध अभिनेते सैफ अली खान यांच्यावर चाकूने…
गणेश भक्तांना खुश खबर पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू तर मुंबई गोवा महा मार्गावर अवजड वाहनांना नो एंट्री
मुंबई/ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात.त्यांच्या प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत करोना मुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दिवा ‘मडगाव,दिवा रत्नागिरी,मुंबई सावंतवाडी, आदी पॅसेंजर गाड्या ७ सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार फेस्टिवल स्पेशल म्हणून कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या धावणार आहेत त्यामुळे चाकरमान्यांचा गणेशोत्सवातील प्रवास सुकर होणार…
