भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासाला आणि न्याय हक्काला कुठेही तदा जाणार नाही याची संविधानात काळजी घेतली होती पण आज मात्र तोच सामान्य माणूस कट्टरपंथीय लोकांच्या नादी लागून देशाच्या सुरक्षेसामोर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहिलाय आणि हीच खरी चिंतेची बाब आहे.शनिवारी मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मोर्चा निघाला आणि नंतर सभा झाली त्यातील नेत्यांची भाषणे ऐकून या देशात जर हे असेच चालू राहिले तर शांततेने जगणाऱ्या माणसाने करायचं तरी काय? धर्माच्या नावाने जातीच्या नावाने अशा प्रकारचे मोर्चे निघणे आणि त्यातून सरकार किंवा विरोधकांना धमकीवजा इशारे देणे हे कशाचे द्योतक आहे? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.भारताचा खरा चेहरा अर्थातच सेक्युलर आहे. पण आज देशातील किती पक्ष सेक्युलॅरिझम मानतात ? भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सोडा पण काँग्रेस,समाजवादी,राष्ट्रवादी, सपा,बसपा,आणि इतर पक्ष तरी सेक्युलर म्हणवून घेण्याचा पात्रतेचे आहेत का? तसे असते तर त्यांनी निवडणुकीत केवळ त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर लोकांकडे मते मागितली असती पण तसे न करता आज प्रत्येक पक्षाला जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवण्याची पाळी यावी यातच सर्व काही आले.मात्र हे कुठे तरी थांबायला हवं ओवेसी असो की योगी धर्माचा अजेंडा पुढे रेटणारे हे लोक लोकशाहीसाठी घटक आहेत त्यामुळे अशा लोकांच्या मागे फरफटत जाणे म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे.ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायलाच हवी.मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण यासारख्या वादग्रस्त विषयांमध्ये स्वतःला गुरफटून घेणे म्हणजे जातीय तणावाला रान मोकळे करून देण्यासारखे आहे.आजचे युग हे विज्ञान युग आहे तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या निक्षावर तपासली जाते त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जाती धर्म आणि त्यातील रूढी परंपरांना कवडीची किंमत नाही .आणि म्हणूनच हिंदुत्ववादी असोत की मुस्लिम कट्टर पांठी असोत या लोकांच्या विरोधात उभे राहून हा देश,हे स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे.
Similar Posts
एक पडदा चित्रपट गृहांसाठी सवलत योजनेचा मसुदा तयार करा !
सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार मुंबई _ तुळजापुरच्या आई भवानी माता मंदिर जिर्णोद्धार, रायगड किल्ला संवर्धन आणि परिसराचा विकास, आणि मराठी चित्रपटांसाठी एक पडदा चित्रपटगृहे उपलब्ध करुन देणे या तिन्ही विषयात आज सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या दालनात बैठका झाल्या. या तिन्ही विषयांत पुढील पंधरा दिवसांत स्वतंत्र बैठका घेण्याचा निर्णय झाला. सांस्कृतिक…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईबोगस प्रमाणपत्राच्या आधारे स्पोर्ट कोट्यातून मिळवल्या सरकारी नोकऱ्या- सरकारी सेवेत स्पोर्ट माफिया
मुंबई/ शिक्षण परीक्षा भरती घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्यानंतर आता तसाच एक भयंकर घोटाळा उघडकीस आला असून खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र घेऊन काहींनी सरकारच्या विविध खात्यात नोकऱ्या मिळवल्या होत्या त्यांची आता चौकशी सुरु झाली असून आता पर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे तर अजून आणखी काही सरकारी नोकरी मिळवणाऱ्या लोकांना अटक होण्याची शक्यता…
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू सत्ताधारी व विरोधक आमने सामने
मुंबई/महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आता विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेतला जात आहे त्यामुळे या नव्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेतशिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न करण्याची घोषणा करतात नव्या वादाला तोंड फुटले आहे कारण सीबीएसई पॅटर्नमुळे एस एस…
सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
मुंबई – आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्र सराकरच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यातही शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळ बैठक मंजुरी देण्यात आली आहे. तसेच केवळ एक रुपयात पीक विमा योजना या अर्थसंकल्पातील घोषणेला आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…
भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेचे १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर
मुंबई -पालिकेतील भ्रष्टाचाराच्या हिरव्यागार कुरणावर चरणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आता दिवस भरले म्हणायला काही हरकत नाही कारण भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेच्या तब्बल १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यातील ५५ जणांना बडतर्फ तर ५३ जणांना निलंबित करण्यात आले आहे शिवाय २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या१२४ प्रकरणात २०० कर्मचारी समाविष्ट…
निवडणूक आयोगाच्या आदेशा नंतर लाडकी बहीण योजनेला स्थगिती
मुंबई/महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तिच्या कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 तारखेला मतदान आणि 23 तारखेला निकाल आहे. ज्या दिवशी निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केली त्या दिवसापासून राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. याच आचारसंहितेच्या कारणावरून निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व प्रशासकीय विभागांसाठी एक महत्त्वाचा आदेश काढला आहे. त्यानुसार मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या सर्व योजनांना स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत….
