भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासाला आणि न्याय हक्काला कुठेही तदा जाणार नाही याची संविधानात काळजी घेतली होती पण आज मात्र तोच सामान्य माणूस कट्टरपंथीय लोकांच्या नादी लागून देशाच्या सुरक्षेसामोर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहिलाय आणि हीच खरी चिंतेची बाब आहे.शनिवारी मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मोर्चा निघाला आणि नंतर सभा झाली त्यातील नेत्यांची भाषणे ऐकून या देशात जर हे असेच चालू राहिले तर शांततेने जगणाऱ्या माणसाने करायचं तरी काय? धर्माच्या नावाने जातीच्या नावाने अशा प्रकारचे मोर्चे निघणे आणि त्यातून सरकार किंवा विरोधकांना धमकीवजा इशारे देणे हे कशाचे द्योतक आहे? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.भारताचा खरा चेहरा अर्थातच सेक्युलर आहे. पण आज देशातील किती पक्ष सेक्युलॅरिझम मानतात ? भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सोडा पण काँग्रेस,समाजवादी,राष्ट्रवादी, सपा,बसपा,आणि इतर पक्ष तरी सेक्युलर म्हणवून घेण्याचा पात्रतेचे आहेत का? तसे असते तर त्यांनी निवडणुकीत केवळ त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर लोकांकडे मते मागितली असती पण तसे न करता आज प्रत्येक पक्षाला जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवण्याची पाळी यावी यातच सर्व काही आले.मात्र हे कुठे तरी थांबायला हवं ओवेसी असो की योगी धर्माचा अजेंडा पुढे रेटणारे हे लोक लोकशाहीसाठी घटक आहेत त्यामुळे अशा लोकांच्या मागे फरफटत जाणे म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे.ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायलाच हवी.मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण यासारख्या वादग्रस्त विषयांमध्ये स्वतःला गुरफटून घेणे म्हणजे जातीय तणावाला रान मोकळे करून देण्यासारखे आहे.आजचे युग हे विज्ञान युग आहे तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या निक्षावर तपासली जाते त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जाती धर्म आणि त्यातील रूढी परंपरांना कवडीची किंमत नाही .आणि म्हणूनच हिंदुत्ववादी असोत की मुस्लिम कट्टर पांठी असोत या लोकांच्या विरोधात उभे राहून हा देश,हे स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे.
Similar Posts
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
पालिकेच्या आरोग्य विभागात 75 हजार रुपये पगाराची नोकरी
मुंबई/ पालिकेच्या आरोग्य विभागात बालरोगतज्ज्ञ,मानसोपचारतज्ज्ञ ,सल्लागार तसेच वैद्यकीय व्यवस्थापक आदी पदांसाठी भरती होणार असून 6 मे पर्यंत ऑफ लाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत या पदांसाठी एम बी बी एस,एम डी या वैद्यकीय अभ्यासक्रमातील विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्ष कामाचा अनुभव असे प्रमुख निकष असून ही पदे मर्यादित असल्याने ती लवकर भरली…
आरक्षण बाबत केंद्राकडून फसवणूक
मुंबई/ केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी राज्यांचे आरक्षण बाबतचे अधिकार काढून घेतले होते आणि आता १२७ वी घटना दुरुस्ती करून राज्यांना ओबीसी ची यादी निश्चित करण्याचे अधिकार बहाल केले आहेत पण जोवर ५० टक्क्यांची अत आहे तोवर काहीच होणार नाही.केंद्र सरकार राज्यांची फसवणूक करीत आहे असा थेट आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहेराज्यात मराठा…
काँग्रेसच्या राज्यात मुख्यमंत्री पदाचा भाव ५०० कोटी नवज्योत सिद्धूच्या विधानाने खळबळ
चंदिगढ/काँग्रेसच्या नेत्या आणि पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी ५०० कोटी रुपये लागतात असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टीने यामुळे काँग्रेसची कार्यपद्धतीचे काळे सत्य…
भ्रष्टाचार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना २ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई – राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.दरम्यान, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन तासांतच कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. १५ हजार रुपयांच्या…
पुण्यातील हॉटेल्स मध्ये ड्रग्ज साठा जप्त ५ जणांना अटक
पुणे : शहरात एका आमदाराच्या पुतण्याने मध्यरात्री बेदरकारपणे गाडी चालवत एका दुचाकीला उडवल्याची भीषण घटना घडली. त्यानंतर, पुन्हा एकदा पुण्यातील मध्यरात्री सुरू असलेल्या पब्ज आणि बारचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासोबत, पुण्यात अवैधपणे विक्री होत असलेल्या ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या वापरावरुनही राजकीय वॉर सुरू झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्जप्रकरणावरुन गंभीर आरोप…
