भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासाला आणि न्याय हक्काला कुठेही तदा जाणार नाही याची संविधानात काळजी घेतली होती पण आज मात्र तोच सामान्य माणूस कट्टरपंथीय लोकांच्या नादी लागून देशाच्या सुरक्षेसामोर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहिलाय आणि हीच खरी चिंतेची बाब आहे.शनिवारी मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मोर्चा निघाला आणि नंतर सभा झाली त्यातील नेत्यांची भाषणे ऐकून या देशात जर हे असेच चालू राहिले तर शांततेने जगणाऱ्या माणसाने करायचं तरी काय? धर्माच्या नावाने जातीच्या नावाने अशा प्रकारचे मोर्चे निघणे आणि त्यातून सरकार किंवा विरोधकांना धमकीवजा इशारे देणे हे कशाचे द्योतक आहे? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.भारताचा खरा चेहरा अर्थातच सेक्युलर आहे. पण आज देशातील किती पक्ष सेक्युलॅरिझम मानतात ? भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सोडा पण काँग्रेस,समाजवादी,राष्ट्रवादी, सपा,बसपा,आणि इतर पक्ष तरी सेक्युलर म्हणवून घेण्याचा पात्रतेचे आहेत का? तसे असते तर त्यांनी निवडणुकीत केवळ त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर लोकांकडे मते मागितली असती पण तसे न करता आज प्रत्येक पक्षाला जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवण्याची पाळी यावी यातच सर्व काही आले.मात्र हे कुठे तरी थांबायला हवं ओवेसी असो की योगी धर्माचा अजेंडा पुढे रेटणारे हे लोक लोकशाहीसाठी घटक आहेत त्यामुळे अशा लोकांच्या मागे फरफटत जाणे म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे.ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायलाच हवी.मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण यासारख्या वादग्रस्त विषयांमध्ये स्वतःला गुरफटून घेणे म्हणजे जातीय तणावाला रान मोकळे करून देण्यासारखे आहे.आजचे युग हे विज्ञान युग आहे तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या निक्षावर तपासली जाते त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जाती धर्म आणि त्यातील रूढी परंपरांना कवडीची किंमत नाही .आणि म्हणूनच हिंदुत्ववादी असोत की मुस्लिम कट्टर पांठी असोत या लोकांच्या विरोधात उभे राहून हा देश,हे स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे.
Similar Posts
संभाजी भिडे याला महिला आयोगाची नोटीस
मुंबई/ तू अगोदर कुंकू लाव मगच तुझ्याशी बोलेन असे एका महिला पत्रकाराला सांगणाऱ्या संभाजी भिडे याला राज्य महिला आयोग नोटीस पाठवणार आहे.संभाजी भिडे यांनी काल मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यापूर्वी तुम्ही मंत्रालयात कोणाला भेटायला आले होते असता प्रश्न एका महिला पत्रकाराने संभाजी भिडे याना विचारताच ती अगोदर कुंकू लाऊन ये.प्रत्येक स्त्री भारतमाता आहे आणि भारतमाता…
निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला – उद्धव ठाकरे
मुंबई -मराठी भाषादिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका करताना निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला आहे असे सांगितलेठाकरे म्हणाले की, पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने या गोष्टी करायला नको होत्या. रामविलास पासवान यांच्या मुलाला एक आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिली, पण ते दोघेही…
महाविकास आघाडीचा भाजपला मोठा दणका –पिंपरी चिंचवड महापालिकेवर ए सी बी चा छापा- खळबळजनक
पुणे/ना खाऊंगा ना खाणे दुंगा अशा बढाया मारणाऱ्या भाजपचा काल पिंपरी चिंचवड महापालिकेत पर्दाफाश झाला आहे .भाजपची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत चक्क स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे आणि त्यांच्या स्विय सहायकला दोन लाखांची लाच घेताना अटक झाली. या घटनेमुळे श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेची आणि सत्ताधारी भाजपची मोठी नाच्चकी झाली आहे.काल…
मुख्यमंत्री फडणवीस यांचे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिपादन
मुंबई, : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रधान यांनी देशाच्या शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पीएम श्री स्कूल्स उपक्रम, परदेशात आयआयटींचा विस्तार, आणि १९ भाषांमध्ये प्रवेश परीक्षांचे आयोजन यासारख्या अनेक सुधारणा प्रधान यांनी घडवून आणल्या. व्यापक जनहिताप्रती…
ठाकरे बंधूंची पुन्हा भेट! पाऊण तास चर्चा
मुंबई/महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गोठी हालचाल निर्माण करणारी घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले, विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी भेट आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले, काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील तेथे दाखल झाले आणि…
संदीप बाळासाहेब बर्गे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात…
