भारतात लोकशाही फक्त नावाला आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही कारण लोकशाहीचा लोकांनी आणि इथल्या राज्यकर्त्यांनी इतका गैफायदा घेतला आहे की आता लोकशाही नको वाटायला लागलीय भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात प्रत्येक राज्याची बोलीभाषा आणि संस्कृती सुधा वेगळी आहे परंतु बाबासाहेबांनी संविधानात सर्वांना सारखा न्याय दिलाय त्याच बरोबर सामान्य माणसाला केंद्र बिंदू मानून त्याच्या विकासाला आणि न्याय हक्काला कुठेही तदा जाणार नाही याची संविधानात काळजी घेतली होती पण आज मात्र तोच सामान्य माणूस कट्टरपंथीय लोकांच्या नादी लागून देशाच्या सुरक्षेसामोर एक प्रश्नचिन्ह बनून उभा राहिलाय आणि हीच खरी चिंतेची बाब आहे.शनिवारी मुंबईत मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर जो मोर्चा निघाला आणि नंतर सभा झाली त्यातील नेत्यांची भाषणे ऐकून या देशात जर हे असेच चालू राहिले तर शांततेने जगणाऱ्या माणसाने करायचं तरी काय? धर्माच्या नावाने जातीच्या नावाने अशा प्रकारचे मोर्चे निघणे आणि त्यातून सरकार किंवा विरोधकांना धमकीवजा इशारे देणे हे कशाचे द्योतक आहे? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.भारताचा खरा चेहरा अर्थातच सेक्युलर आहे. पण आज देशातील किती पक्ष सेक्युलॅरिझम मानतात ? भाजप सारख्या हिंदुत्ववादी पक्षाचे सोडा पण काँग्रेस,समाजवादी,राष्ट्रवादी, सपा,बसपा,आणि इतर पक्ष तरी सेक्युलर म्हणवून घेण्याचा पात्रतेचे आहेत का? तसे असते तर त्यांनी निवडणुकीत केवळ त्यांच्या सामाजिक कामाच्या बळावर लोकांकडे मते मागितली असती पण तसे न करता आज प्रत्येक पक्षाला जाती धर्माच्या नावावर निवडणुका लढवण्याची पाळी यावी यातच सर्व काही आले.मात्र हे कुठे तरी थांबायला हवं ओवेसी असो की योगी धर्माचा अजेंडा पुढे रेटणारे हे लोक लोकशाहीसाठी घटक आहेत त्यामुळे अशा लोकांच्या मागे फरफटत जाणे म्हणजे आपली फसवणूक करून घेण्यासारखे आहे.ही गोष्ट लोकांनी लक्षात ठेवायलाच हवी.मराठा आरक्षण किंवा मुस्लिम आरक्षण यासारख्या वादग्रस्त विषयांमध्ये स्वतःला गुरफटून घेणे म्हणजे जातीय तणावाला रान मोकळे करून देण्यासारखे आहे.आजचे युग हे विज्ञान युग आहे तिथे प्रत्येक गोष्ट पुराव्याच्या निक्षावर तपासली जाते त्यामुळे आजच्या विज्ञान युगात जाती धर्म आणि त्यातील रूढी परंपरांना कवडीची किंमत नाही .आणि म्हणूनच हिंदुत्ववादी असोत की मुस्लिम कट्टर पांठी असोत या लोकांच्या विरोधात उभे राहून हा देश,हे स्वातंत्र्य वाचवण्याची गरज आहे.
Similar Posts
देशातील सर्व भ्रष्टाचाराच्या तुलनेत पालिकेतील भ्रष्टाचार मोठा- फडणवीस
मुंबई/ देशात जेवढे भ्रष्टाचार झाले आहेत त्यात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार खूप मोठा आहे आणि त्याविरुद्ध आम्ही आवाज उठवणाराच असे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेफडणवीस यांनी पालिकेवर गंभीर आरोप केले आहेत ते म्हणाले नाले सफाई आणि इतर कामांमध्ये तर घोटाळे झालेच आहेत पण रस्त्यांच्या कामात सर्वात जास्त घोटाळे झाले आहेत .जे रस्ते नवीन आहेत त्यांच्याही…
पालिकांच्या प्रभाग रचनेचे नव्याने करण्याचे आदेश
मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
भ्रष्टाचार प्रकरणी आघाडी सरकारचे २० मंत्री रडारवर
ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
ईडीमुळे विरोधक एकत्र आले आहेत -पंतप्रधान
दिल्ली – राहुल गांधी यांच्या आरोपाना लोकभेत उत्तर देताना मोदींनी अदाणींचा उल्लेखच केला नाही . उलट विरोधकांवर टीका करताना विरोधक ईडीमुळे एकत्र आले आहेत अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. काल लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही पंतप्रधानांनी पलटवार केला….
अमोल मिटकरीची गाडी फोडणाऱ्या – मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अकोला -अ राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी एक असलेले मनसेच्या कार्यकर्ते जय मालोकार यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या राड्यात जय मालोकार सहभागी होते.राज ठाकरेंवर केलेल्या आरोपानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली. त्यामध्ये जय मालोकार यांचाही सहभाग होता….
पालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू एफ – नॉर्थ प्रभागात तीनशे किलोचा साठा जप्त
मुंबई/प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांना बंदी घातली होती तरीसुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या इतर वस्तू विकल्या जातात .त्यामुळे या बेकायदा प्लास्टिक विक्रीला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाने प्लास्टिक विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. पालिका एफ नॉर्थ प्रभागाच्या अनुज्ञापन विभागाने माटुंगा येथे…
