मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन मोहित कंबोज हाच या प्रकरणातला मास्टर माईंड असल्याचे सांगितले त्यावर पलटवार करताना मग मलिक इतके दिवस गप्प का राहिले . न्यायालयाच्या नोटिशिला त्यांनी उत्तर का नाही दिले असे म्हणत मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असून ते घाबरले असल्याचे मोहितेने सांगितले तर दुसरीकडे ज्या सुनील पाटीलचे सम डिसोजा याने नाव घेतले होते .त्याने आपल्याकडे क्रुझ वरच्यारेच पार्टी मध्ये भाग घेणाऱ्यांची लिस्ट आली होती . ती मला एम पी मधील एका भाजप नेत्याच्या नीरज यादव नावाच्या माणसाने दिली पण त्यात आर्यनचे नाव नव्हते शाहरुख खान कडून पैसे काढण्यासाठी किरण गोसावी भानुशाली आणि इतरांनी हा डाव रचला असावा .माझ्या जिवाला भाजप नेत्यांकडून धोका असल्याने मी घर सोडून गेलो होतो असे पाटील याने सांगितले त्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे
Similar Posts
ठाकरे -कोशारी यांच्यावर उच्च न्यायालय नाराज
मुूंबई-विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.या याचिकेत वैधता दिसत नसल्याचे हायकोर्टाने सांगत ही याचिका फेटाळून लावली, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही प्रमुख घटनात्मक पदं असून वैधानिक पदांवरील दोघांचा परस्परांवर विश्वास नाही,दोघांच्या वादातून सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. राज्यातील सध्याचे…
संसदेचे हिवाळी अधिवेशन वक्त बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा गाजणार
नवी दिल्ली/आज संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या अधिवेशनात महागाई बेरोजगारी चीन आणि पाकिस्तान बाबत देशाचे परराष्ट्र धोरण आणि बोर्डाच्या जमिनी बाबतचा मुद्दा गाजणार आहे व बोर्डाची जमीन खुली करण्याबाबत भारतीय जनता पार्टीचे सरकार खूप आग्रही आहे मात्र त्याबाबत एक संसदीय समिती स्थापन करण्यात आली आहे या संसदीय समितीच्या आजवर अनेक बैठका झाल्या परंतु…
कांद्यावरील २० टक्के निर्यात कर हटवला _ केंद्राचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
नवी दिल्ली/कांद्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात आले आहेत खास करून कांद्यावरील निर्यात बंदी नंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरले होते या सर्व पार्श्वभूमीवर आता कांद्यावरील 20 टक्के निर्यात कर मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे कांदा उत्पादकांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहेकांद्यावरून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी…
कोविड काळातील अपयशामुळे रुपानिणा हटविले भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
करोनाचा पहिला राजकीय बळीगांधीनगर/ गुजरात मधील भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली पक्षांतर्गत धुसफूस आणि करोना काळातील सरकारचे चुकलेले नियोजन याला तत्कालीन मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना जबाबदार धरून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवली आणि त्यांच्या जागी फारसे चर्चेत नसलेले पण पाटीदार समाजात चांगले वजन असलेले भूपेंद्र पटेल यांच्याकडे भाजप नेतृत्वाने गुजरातची धुरा सोपवली आहे . त्यामुळे भूपेंद्र…
भाजपा विधानसभेच्या १५५ ते १६० जागा लढवणार मुख्यमंत्री पदाबाबत ही अनिश्चितता
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे नुकत्याच दोन दिवसांच्या भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत यावर सविस्तर विचारमंथन झाले त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक भाजपाने १५५ पेक्षा कमी जागा लढवू नयेत असे सर्वच नेत्यांचे मत आहे त्यामुळे भाजपा १५५ ते १६० जागा लढवणार आहे त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण याच्या नावाची घोषणा केली जाते, परंतु यावेळी…
मालाड पूर्वेत प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन घोटाळा; चौकशी अहवालापर्यंत प्रकल्प स्थगित
मुंबई, – मालाड पूर्वेतील प्रकल्पग्रस्त (पीएपी) पुनर्वसन प्रकल्पात मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधानसभेत उपस्थित झाला. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्याची घोषणा केली असून, चौकशी अहवाल मिळेपर्यंत प्रकल्पाला पूर्ण स्थगिती देण्यात येईल.मालाड पूर्वेतील या पुनर्वसन प्रकल्पाबाबत आमदार अस्लम शेख यांनी लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर बोलताना राज्यमंत्री मिसाळ…
