|

यंदाच्या दिवाळीत फटाक्यामुळे आगीच्या ५८ दुर्घटना

Similar Posts

  • भिवंडीत मैत्रिणी सोबत कारमधून जाणाऱ्या तरुणावर जीवघेणा हल्ला करून लुटणारे लुटारू गजाआड..

    भिवंडी दि २० मैत्रिणी सोबत कार मधून जाणाऱ्या तरुणावर अचानक जीवघेणा हल्ला करून  त्याच्या व मैत्रणीकडील मोबाईल व सोन्याचे दागिने  घेऊन फरार झालेल्या चोरट्यांना कोनगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अब्दुल कादिर अबरार शेख (वय २४ वर्षे, रा. मोईवाडा, कल्याण,प) , उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ( वय २४ वर्षे, रा. गोविंदवाडी, कल्याण, प), निहाल नजीर शेख (वय २३ वर्ष रा, गोविंदवाडी, कल्याण,प) अशी अटक केलेल्या लुटारूंची नावे आहेत. तर या चोरट्यांकडून चोरीचा मुद्देमाल घेणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. आकाश राजेश कंडारे (वय २४ वर्षे),सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख (वय २७ वर्ष)  असे चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्या अटक आरोपींचे नावे आहेत.  कार समोर दुचाकी आडवी लावून लुटमारी .. ठाणे शहरातील पाचपाखाडी भागात राहणारे दर्शिल हितेश गुढ़का वय २७ वर्ष ) हे त्यांच्या मैत्रिणीसोबत १२ आक्टोंबरच्या मध्यरात्री मारुती  रिटस कारने  भिवडी  पाईपलाईन रोडने डोगराळीकडुन घरी ठाणे येथे जात होते. त्यावेळी अचानक रेल्वे पुलाखाली अनोळखी तिन जणांनी त्याच्या कार समोरच दुचाकी आडवी  लावून उभी केली. विचारपूस करण्यासाठी  दर्शिल कार मधून बाहेर पडताच  तिघा  चोरटयांनी  त्याचा  मोबाईल हिसकावला तसेच  मैत्रीणकडीलही  मोबाईल, तिच्या गळ्यातील सोन्याची चेन व  हातातील सोन्याची अंगठी असा एकूण ८३ हजार रुपयांचा  मुद्देमाल जबरीने  काढून घेतला.  त्यावेळी दर्शिलने  चोरट्यासोबत  प्रतिकार केला असता त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार प्रहार करून  मुद्देमाल घेऊन घटनस्थळावरून फरार झाले. तर  चोरट्यांच्या  हल्ल्यात दर्शिल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात विविध भादवि कलमानुसार  गुन्हा दाखल  केला. मात्र याघटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातारवण  निर्माण झाले.   तीन पोलीस पथकाने शोध घेऊन आरोपीसह मुद्देमाल केला हस्तगत .. चोरटयांनी गुन्हा करताना निर्जनस्थळ व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन केला होता. त्यामुळे पोलिसांकडे हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी कुठलाही सुगावा नसल्याने पोलिसांसोर  मोठ आव्हान होते. या  गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पोलीस पथके नेमली होती. त्यांनतर पोलीस  तपासात व गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे  गुन्हयातील अब्दुल कादिर अबरार शेख,  उमर अब्दुल रहेमान मन्सुरी, निहाल नजीर शेख, यांना कल्याणमधून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, तिघांनाही गुन्हा केल्याचे कुबल केले. मात्र लुटमारीतील मुद्देमाल इतर दोघांना विक्री केल्याने मुद्देमाला हस्तगत करण्यासाठी पोलिसांनी सापळा रचून  आकाश राजेश कंडारे, आणि  सलमान उर्फ नजीब मस्जीद शेख दोघांनाही अटक करून त्यांच्याकडून चोरीचा विकत घेतलेला मुद्देमाल जप्त केला. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली आहे.  पाचही आरोपी सराईत गुन्हेगार ..  गुन्हयाच्या प्रकरणी  अटक केलेल्या पाचही आरोपींचा कोनगाव पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले. आरोपी अब्दुल कादिर अवरार शेख ३ गंभीर गुन्हे,   उमर अब्दुल रहेमान मन्सुरी ३ गुन्हे ,  निहाल नजीर शेख १४ गुन्हे आणि चोरीचा मुद्देमाला विकत घेणाऱ्या आकाश याच्यावर तब्बल  १४  गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. तर हा गुन्हा उघडकीस  सपोनि किरणकुमार वाघ आणि  गुहे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक पराग भाट यांच्यासह पथकाने कामगीरी बजावली आहे. 

  • हिंदी विरुद्ध मनसेची मराठी जागर परिषद

    मुंबई/केंद्र सरकारने हिंदी भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य केल्यामुळे मनसेने केंद्राच्या या निर्णयाच्या विरोध करून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. दरम्यान हिंदी भाषेचा विरोध कायम ठेवून मनसेने आता मराठी जागर परिषद सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक भागात मराठीचा आग्रह धरला जाणार आहे. मराठीच्या व्याप्तीसाठी मराठी साहित्यिकांची मदत घेतली जाणार आहे .हिंदी विरुद्ध अशा तऱ्हेने…

  • | |

    लोढा यांच्या जागी आशिष शेलारणा भाजपाने पुढे आणले

    मुंबई/ आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेला तोडीस तोड टक्कर देण्याची तयारी भाजपने केली आहे त्यासाठी मवाळ स्वभावाचे असलेले मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या जागी आशिष शेलार यांनी आनले आशिष शेलार हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत आणि सध्या फडणवीस यांच्या बरोबरीने शिवसेनेचा मुकाबला करीत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बरोबर झालेल्या वादात ते…

  • ३० जूनच्या आत शेतकऱ्यांच्या; yकर्जमाफीचा निर्णय! सरकारचे बच्चू कडू यांना आ श्वासन

    मुंबई /३०जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. आज शेतकीर नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेत्यांची भूमिका काय आहे?…

  • |

    बुधवारी अनिल देशमुख ई डी समोर आत्मसमर्पण करणार?

    मुंबई/ शंभर कोटींच्या खंडणी चे गंभीर आरोप असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ई डी ने पाचव्यांदा समन्स बजावले असून ते ई डी समोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे .अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिलेला नाही त्यामुळे आता त्यांच्या समोर आत्मसमर्पण हाच एकमेव पर्याय आहे त्यातच इडी…

  • पुढील मकरसंक्राती पर्यंत ठाकरे – फडणवीस एकत्र येणार – आमदार रवी राणा यांचा खळबळजनक दावा

    अमरावती – विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी वाढल्या आहेत. शिवाय जो आक्रमकपणा होता तोही थोडासा मावळला आहे.त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची पुन्हा युती होणार, अशा चर्चा असातानाच ‘ पढील मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय…