मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला तपासात मदत करावी असे त्यांनी आव्हान केली तर नवाब मलिक यांच्या तक्रारी नंतर मुंबईच्या चार पोलीस ठाण्यात एन सी बी विरुद्ध आणि खास करून समीर वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्यात दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री कीर्ती रेडकर यांनी सांगितले की वानखेडे यांनी धर्म बदलले नाही त्यांचे पहिले लग्न ज्या मुस्लिम महिला सोबत झाले त्यावेळी केवळ त्यांच्या मुस्लिम आईच्या आग्रह खातर निकह केला . मात्र आजही ते हिंदूच आहेत तसेच नवाब मलिक यांचाही कीर्तीने समाचार घेतला .
Similar Posts
मराठी शाळा बंद करून शाळांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे कारण मुंबईतील जागेला प्रचड भाव आहे त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर यांची अभद्र युती मुंबईत सतत जागेच्या शोधात असतात पण आता मुंबईत जागाच शिल्लक नसल्याने शैक्षणिक संस्थेसाठी, स्पोर्ट साठी,रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भुखंदांवरचे आरक्षण हटवून त्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर हा जननायक कुणाला भारी पडेल ?
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे भाजपला करता आले नाही ते राज ठाकरे यांनी एका सभेत करून दाखवले.त्यामुळे भाजपतील स्थानिक नेते धास्तावले आहेत.कारण महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणे इथल्या भाजप नेत्यांना शक्य नाही याची आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलीच प्रचती आली.कारण काँग्रेस राष्ट्रवादी मधून भाजपात जे उपरे आले .ते बिनकामाचे ठरले.फक्त तोंडाच्या वाफा घालवण्या पलीकडे त्यांच्या हातून काहीच…
अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला
मुंबई/ शिंदे सरकार सतेवर आले तरी अजून मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.त्यामुळे या विस्तरकडे डोळे लाऊन बसलेले आणि मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची आणि त्यांच्या समर्थकांनी सध्या मुंबई मध्ये भाऊगर्दी वाढली आहे.दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार सोमवारी होण्याची शक्यता आहेनव्या मंत्रिमंडळात संख्या भाजपचे सर्वाधिक म्हणजे जवळपास 27 मंत्री असतील तर शिंदे गटाला 12 ते 15 मंत्रिपदे दिली जातील तसेच…
ना कोरोनाची भीती ,ना सरकारच्या नियमांची पर्वा, मोठ्या संख्येने भीमसैनिक चैत्यभूमीवर
मुंबई/ आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दीन आहे.त्यामुळे कोरोणाची भीती न बाळगता तसेच सरकार आणि पालिकेच्या आवाहनाला न जुमानता बाबासाहेबाना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने भीमसैनिक तसेच महिला चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. महापालिकेने त्यांच्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या असून महापरिनिर्वान दीन शांततेत पार पडावा यासाठी मोठ्या…
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा महाराष्ट्रालाही फायदा होणार
मध्य प्रदेशात ओबीसींना राजकीय आरक्षणदिल्ली/ मध्य प्रदेश सरकारने मागासवर्ग आयोगाचा जी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता मान्य करून न्यायलयाने मध्य परदेशात ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यास हिरवा कंदील दाखवला आहे .त्यामुळे या निकालाने महाराष्ट्राच्या सुधा आशा पल्लवित झाल्या असून महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षणा नुसताच आगामी निवडणुका होतील असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला आहे .मध्य प्रदेशात…
बाप्पा निघाले- विसर्जनासाठी 18000 पोलिसांची सुरक्षा
मुंबई – आज अनंत चतुर्थी आहे . शहरातील छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आज विसर्जन होणार आहे . मुंबईत विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणूक निघतात . या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून मुंबईत प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या १८ तुकड्यांसह मुंबई पोलीस दलातील १८ हजार…
