नवी दिल्ली/पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात एसआयआर च्या प्रक्रियेला विरोध केला जातोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेविरोधात थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी बॅनर्जी यांनी स्वत: आपली बाजू मांडली. पश्चिम बंगालमध्ये मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकली जात आहेत. पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय. त्यामुळे आम्हाला न्याय द्या, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेही थेट निडवणूक आोयगाला नोटीस बजावली असून उत्तर मागितले आहे. आता या प्रकरणावर ९ फेब्रवारी रोजी पुढील सुनावणी होईल.
सर्वोच्च न्यायालयात एसआयआर ला विरोध करणाऱ्या याचिकेवर महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीवेळी ममता बॅनर्जी यादेखील न्यायालयात उपस्थित होत्या. त्यांनी स्वत:देखील न्यायालयापुढे बाजू मांडली. पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय. मतदार याद्यांच्या फेरतपासणीला अनेक वर्ष लागतात. निवडणूक तोंडावर आलेली असताना एसआयआर प्रक्रियेला घाईगडबडीत लागू केले जात आहे, असा आरोप बॅनर्जी यांनी केला.विशेष म्हणजे सुनावणी सुरू असताना त्यांनी निवडणूक आयोगाची व्हॉट्सअॅप आयोग म्हणत निर्भर्त्सना केली. निवडणूक आयोगाकूडन अनेक लोकांची नावे मतदार यादीतून हटवली जात आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात न्यायासाठी आलो आहोत. याआधी आमचे आक्षेप आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलेले आहेत. परंतु तिथे आमचे कोणीही ऐकत नाहीये, अशी खंतही ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयापुढे बोलून दाखवली.

