पुणे/ मुंबई पुणे महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ गॅसचा टँकर उलटून वायू गळती झाल्याने या मार्गावर २५ तास वाहतूक कोंडी झाली असून शेकडो लोक या वाहतूक कोंडीत अडकले आहेत.या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बसेसना बसला असून १६३ बसेस या वाहतूक कोंडीत अडकल्या आहेत परिणामी एसटीच्या १५० हून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्यात.त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे मुंबई-पुणे महामार्गावरी गेल्या २४ तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अशातच पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. वाहतूक कोंडी कायम असल्यानं एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. मुंबई-पुणे महामार्गावर आडोशी बोगज्याजवळ प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याने मोठी गळती सुरु होती. यामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. अद्यापही मोठी वाहतूक कोंडी असल्याचे असटी प्रशासनाने बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवली कडे जाणाऱ्या सर्व एस टी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
-मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे. तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे

