बोरिवलीतील आर/मध्य प्रभागात महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आमदार संजय उपाध्ये यांच्यासोबत विविध गंभीर समस्याांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीत बोरिवलीकरांच्या दैनंदिन जीवनातील असुरक्षितता व अराजकता यांच्यावर ठोस उपाययोजनांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.मुख्य मुद्दे ज्यांच्यावर चर्चा झाली:अनधिकृत फेरीवाले व बांगलादेशी घुसखोर: रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढली असून, यामुळे रहिवाशांना त्रास होत आहे. बांगलादेशी घुसखोरांची उपस्थितीही चिंतेची बाब.खुल्याm जागांवर दारू विक्री: चायनीज फूड स्टॉल्सवरून उघड्यावर दारू विक्री, वाइन शॉपबाहेर दारू पिण्याच्या घटना वाढल्या आहेत.उद्याने व मैदानी ‘ओपन बार’: बोरिवलीतील उद्याने, खेळाची मैदाने व आडोशाच्या जागांवर रात्री ‘ओपन बार’ सारखी अवस्था. महिलांसाठी धोकादायक.अवैध विक्रीचा सुळसुळाट: रात्रीची अवैध दारू, गुटखा, सिगारेट्स व ई-सिगारेट्सची विक्री. दोन दिवसांपूर्वीच एक व्यक्ती गांज्यासह रंगेहात पकडली गेली.गोराईतील छेडखाणी: गोराई परिसरात एका मुस्लिम तरुणाने स्वतःला हिंदू भासवून स्थानिक मुलींची छेडखाणी केली. सामाजिक सलोखा धोक्यात.आमदार संजय उपाध्ये म्हणाले, “नागरिक व विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य! या सर्व समस्या तातडीने सोडवण्यासाठी महापालिका व पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करावी. नियमित तपासण्या, गुन्हेगारांवर दंड व कायदेशीर कारवाई अपरिहार्य आहे.”निर्देश व निर्णय:तातडीने संयुक्त पथक नेमून छापे मारणे.फेरीवाल्यांची यादी तयार करून परवानगी नसलेल्यांवर कारवाई.रात्रीच्या पेट्रोलिंग व सीसीटीव्ही वाढवणे.महिलांसाठी विशेष तक्रार केंद्र उघडणे.या प्रसंगी संयोजक दिनेश झाला, निरव मेहता, अमित व्यास व इतर कार्यकर्ते माझ्यासह उपस्थित होते. बोरिवलीकरांसाठी लढा सुरूच राहील!


