मुंबई – मुंबई महानगर पालिकेतील घोटाळेबाजणा पालिका प्रशासन कशा प्रकारे पाठीशी घालते याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर पालिकेने केलेली थातुर मातुर करवाई ! वास्तविक कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटे लोटे असताना निविदा प्रक्रीये पासून प्रत्यक्ष कामा पर्यन्त कंत्राटदार पालिका अधिकार्यांचे खिसे गरम करीत असतात .आणि हे तोडबाजीचे व्यवहार लाखोंच्या पटीत असतात त्यामुळे घोटाळा उघडकीस आल्यावर शिक्षाही तेवढीच कठोर व्हायला हवी परंतु पालिकेत चोर चोर मौसेरे भाई असा प्रकार असल्याने स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत दोषी आढळलेल्या कर्मचार्यांवर बाळा पुन्हा असे करू नको असे म्हणत एक नाजुक चपटी मारली आणि त्यांना सोडून दिले .अत्यंत नगणी अशी दंडात्मक कारवाई झाल्याने हे भ्र्ष्टाचार सही सलामत सुटले असे म्हणाला हरकत नाही . या घोटल्याची चौकशी करण्यासाठी पालिकेने उपायुक्त स्तरावरील त्रिदलीय समिति नेमली होती .दोन वर्षांनंतर या समितीचा अहवाल स्थायी समितीत मांडण्यात आला एकूण 83 जणांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये 69 दोषी आढळले . 50 अभियंता कर्मचार्यांवर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे . उर्वरित 13 पैकी एकाचा मृत्यू झाला उर्वरित 12 जणांवर कारवाई काय तर कोणाचे एका महिन्यासाठी तर कोणाचे कायमस्वरूपी 1500 ते 3 हजार रुपये वेतनातून कापून घेतले जाणार .म्हणजे सेवाकालीन त्यांनी कंत्र दाराकडून लाखोंच्या पटीत पैसे कमावले .आणि त्यांची चोरी पकडल्यावर पालिका त्यांच्या वेतनातून कापणार किती तर 1500 ते तीन चार हजार याला कारवाई म्हणायची की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन म्हणायचे तेच काळात नाही .घोटाळेबाजांवर जर अशा थातुर मातुर कारवाया व्हायला लागल्या तर पालिकेत आणखी लुटारू तयार होतील आणि मुंबईकरांच्या पैशाची लूटमार करतील अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .
Similar Posts
पालिका शाळेतील विध्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालोपयोगी वस्तू
मुंबई – महानगरापालिकेच्या शाळा गुरुवार, १५ जूनपासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तू सुमारे ९० टक्के शाळांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी निम्मे शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही विद्यार्थ्यांना वस्तू मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले होते.मुबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या…
दादर मधील भूखंड पालिकेने गमावला
मुंबई – पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबईतील अनेक सरकारी भूखंडावर अतिक्रमणे झालेली आहेत. आणि हे भूखंड पालिकेला गमवावे लागले आहेत . आताही दादर सारख्या मध्य मुंबईतील २ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. कारण १० वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देऊनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली नाही त्यामुळे या भूखंडावरील आरक्षण रद्द…
पालिकेचे दवाखाने भूमाफियांच्या रडारवर -पवईतील प्रयत्न हाणून पाडला
मुंबई -सध्या मुंबईत भूमाफियांचा सुळसुळाट झाला असून मोकळे आणि आरक्षित भूखंड हडपण्याची जणू स्पर्धा लागली आहे. आणि आता तर पालिकेचे दवाखाने हडपण्याचे प्रयत्न सुरु झाले असून पवईच्या तुंग गाव येथील एक दवाखाना हडपण्याचा भूमाफियांनी प्रयत्न केला पण पालिका अधिकाऱ्यांनी तो हाणून पाडला . दवाखान्याची जागा भूमाफिया जागा हडपण्याचा प्रयत्न करीत आहेत.असाच एक प्रयत्न पवई येथील…
उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150
मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहेमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन…
दोन लाचखोर पालिका अभियंत्यांना ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई/ ओसी नसलेल्या इमारती मध्ये बेकायदेशीर नळजोडणी करून देण्यासाठी प्लंबर कडे अडिच लाखांची लाच मागणाऱ्या पालिकेच्या ई विभागातील दोन अभियंत्यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना ६ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.या घटनेमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहेभायखळा येथील एका इमारतीमध्ये नळजोडणी करायची होती त्यामुळे कंत्राटदार असलेल्या पलबरणे ई…
पालिका अधिकारी संजय जयस्वाल यांची अकरा तास ईडी कडून चौकशी
मुंबई/कोविड घोटाळ्यात महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त व म्हाडाचे बडे अधिकारी संजीव जैस्वाल त्याचबरोबर कंत्राटदार आणि मध्यस्थी यांचे आता दिवस भरलेले आहेत कारण त्यांच्या ईडीने संपत्तीचा पंचनामा करायला सुरुवात केली आहे . संजीव जयस्वाल आणि इतर लोकांच्या घरावर ईडीने छापे टाकले होते या छाप्यानंतर संजीव जयस्वाल यांची ११ तास इडीने चौकशी केली या छाप्यात संजीव जयस्वाल…
