मुंबई – मुंबई महानगर पालिकेतील घोटाळेबाजणा पालिका प्रशासन कशा प्रकारे पाठीशी घालते याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर पालिकेने केलेली थातुर मातुर करवाई ! वास्तविक कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटे लोटे असताना निविदा प्रक्रीये पासून प्रत्यक्ष कामा पर्यन्त कंत्राटदार पालिका अधिकार्यांचे खिसे गरम करीत असतात .आणि हे तोडबाजीचे व्यवहार लाखोंच्या पटीत असतात त्यामुळे घोटाळा उघडकीस आल्यावर शिक्षाही तेवढीच कठोर व्हायला हवी परंतु पालिकेत चोर चोर मौसेरे भाई असा प्रकार असल्याने स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत दोषी आढळलेल्या कर्मचार्यांवर बाळा पुन्हा असे करू नको असे म्हणत एक नाजुक चपटी मारली आणि त्यांना सोडून दिले .अत्यंत नगणी अशी दंडात्मक कारवाई झाल्याने हे भ्र्ष्टाचार सही सलामत सुटले असे म्हणाला हरकत नाही . या घोटल्याची चौकशी करण्यासाठी पालिकेने उपायुक्त स्तरावरील त्रिदलीय समिति नेमली होती .दोन वर्षांनंतर या समितीचा अहवाल स्थायी समितीत मांडण्यात आला एकूण 83 जणांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये 69 दोषी आढळले . 50 अभियंता कर्मचार्यांवर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे . उर्वरित 13 पैकी एकाचा मृत्यू झाला उर्वरित 12 जणांवर कारवाई काय तर कोणाचे एका महिन्यासाठी तर कोणाचे कायमस्वरूपी 1500 ते 3 हजार रुपये वेतनातून कापून घेतले जाणार .म्हणजे सेवाकालीन त्यांनी कंत्र दाराकडून लाखोंच्या पटीत पैसे कमावले .आणि त्यांची चोरी पकडल्यावर पालिका त्यांच्या वेतनातून कापणार किती तर 1500 ते तीन चार हजार याला कारवाई म्हणायची की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन म्हणायचे तेच काळात नाही .घोटाळेबाजांवर जर अशा थातुर मातुर कारवाया व्हायला लागल्या तर पालिकेत आणखी लुटारू तयार होतील आणि मुंबईकरांच्या पैशाची लूटमार करतील अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .
Similar Posts
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील डिलाईरोड भागात नागरिक पाण्यासाठी त्रस्त पालिका अधिकारी सुस्त
मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात…
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
पुढील टार्गेट काँग्रेस राष्ट्रवादी!
या देशातून इंग्रज भलेही गेले असले तरी त्यांनी फोडा झोडा आणि राज्य करा या नीतीचा वारसा मात्र येथे ठेऊन गेलेत.त्यामुळेच भारतात फोडा फोडीचे राजकारण सुरू आहे .आणि आजकाल राजकारणात निष्ठा, नीतिमत्ता, चारित्र्य याना कावडीचीही किंमत राहिलेली नसल्याने कोण कधी कोणाशी सोयरिक करील याचा नेम नाही.तसेच राजकारणात सध्या सर्वच सत्तलोभी असल्याने निष्ठा वैगेरे सोडून सतेच्या मागे…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
400 अनधिकृत फेरीवाले हटविले-पालिकेच्या तीन वार्डची प्रथमच संयुक्त कार्रवाई मौलाना शौकत अली रोड वरील 400 अनधिकृत फेरीवाले हटविले
मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत संवेदनशील विभाग म्हणून संबोधल्या जाणार्या पालिकेच्या सी,डी आणि ई विभागात विभागलेल्या मौलाना शौकत अली रोड वरील जवळपास 70 अधिकारी कर्मचारी,10 वाहने यांनी 400 अनधिकृत फेरीवाले जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याने अनधिकृत फेरीवाले आणि रस्यावर अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.या कार्रवाईत अनधिकृतपणेरस्त्यावर अतिक्रमण करीत फेरीवाले,फर्निचर,लादी,भंगार चे साहित्य उभे करणा-या विक्रेत्यांवर जेसीबीच्या सहाय्याने तोड़क…
पालिका शाळेतील विध्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शालोपयोगी वस्तू
मुंबई – महानगरापालिकेच्या शाळा गुरुवार, १५ जूनपासून सुरू होत असून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तू सुमारे ९० टक्के शाळांमध्ये पोहोचल्या आहेत. त्यामुळे पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी निम्मे शैक्षणिक वर्ष सरल्यानंतरही विद्यार्थ्यांना वस्तू मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले होते.मुबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या…
