मुंबई – मुंबई महानगर पालिकेतील घोटाळेबाजणा पालिका प्रशासन कशा प्रकारे पाठीशी घालते याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर पालिकेने केलेली थातुर मातुर करवाई ! वास्तविक कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटे लोटे असताना निविदा प्रक्रीये पासून प्रत्यक्ष कामा पर्यन्त कंत्राटदार पालिका अधिकार्यांचे खिसे गरम करीत असतात .आणि हे तोडबाजीचे व्यवहार लाखोंच्या पटीत असतात त्यामुळे घोटाळा उघडकीस आल्यावर शिक्षाही तेवढीच कठोर व्हायला हवी परंतु पालिकेत चोर चोर मौसेरे भाई असा प्रकार असल्याने स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत दोषी आढळलेल्या कर्मचार्यांवर बाळा पुन्हा असे करू नको असे म्हणत एक नाजुक चपटी मारली आणि त्यांना सोडून दिले .अत्यंत नगणी अशी दंडात्मक कारवाई झाल्याने हे भ्र्ष्टाचार सही सलामत सुटले असे म्हणाला हरकत नाही . या घोटल्याची चौकशी करण्यासाठी पालिकेने उपायुक्त स्तरावरील त्रिदलीय समिति नेमली होती .दोन वर्षांनंतर या समितीचा अहवाल स्थायी समितीत मांडण्यात आला एकूण 83 जणांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये 69 दोषी आढळले . 50 अभियंता कर्मचार्यांवर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे . उर्वरित 13 पैकी एकाचा मृत्यू झाला उर्वरित 12 जणांवर कारवाई काय तर कोणाचे एका महिन्यासाठी तर कोणाचे कायमस्वरूपी 1500 ते 3 हजार रुपये वेतनातून कापून घेतले जाणार .म्हणजे सेवाकालीन त्यांनी कंत्र दाराकडून लाखोंच्या पटीत पैसे कमावले .आणि त्यांची चोरी पकडल्यावर पालिका त्यांच्या वेतनातून कापणार किती तर 1500 ते तीन चार हजार याला कारवाई म्हणायची की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन म्हणायचे तेच काळात नाही .घोटाळेबाजांवर जर अशा थातुर मातुर कारवाया व्हायला लागल्या तर पालिकेत आणखी लुटारू तयार होतील आणि मुंबईकरांच्या पैशाची लूटमार करतील अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .
Similar Posts
महापालिका | महाराष्ट्र | मुंबईयशवंत जाधव ,महाडेश्वर ‘ अमेय घोले ; रवी राजा ‘ प्रभाकर शिंदे यांचे वार्ड महिलांसाठी राखीव आरक्षण सोडत जाहीर
मुंबई – आज मुंबई महानगर पालिकेसह १४ महापालिकांची आरक्षण सोडत जाहीर झाली . ओबीसी आरक्षणाशिवाय होणार्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे वार्ड महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना आता दुसरा वार्ड शोधावा लागणार आहे. ज्यांचे वार्ड महिलांसाठी राखीव झालेत त्यांच्यात शिवसेनेचे यशवंत जाधव , माजी महापौर महाडेश्वर , आरोग्य समितीचे अध्यक्ष आणि आदित्य ठाकरे यांचे खासम्खास अमेय घोले…
650 कोटींचा फेरफार रद्द झाल्याने सत्ताधारी शिवसेनेला मोठा धक्का
मुंबई/ दुधाने तोंड पोळलेला माणूस कधीकधी ताक सुधा फुंकून पितो असाच काहीसा प्रकार पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या बाबतीत झाला आहे एरव्ही भाजपच्या आरोपांवर थयथयाट करणारे पालिकेतील सेना नेते भाजपच्या तक्रारीमुळे 650 कोटींचा फेरफार रद्द झाला तरी फारसे बोलत नाहीत कारण स्थायी समितीच्या अध्यक्षा वर खात्याची पडलेली धाड आणि त्या धाडीत मिळालेले भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे यामुळे पालिकेतील…
भाजपा आमदराकडून मुंबईचा अपमान- गरीब की जोरू, सब की भाभी
मुंबई/ आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात मुंबई बद्दल किती प्रेम आणि किती आकस आहे हे काल भाजप आमदार योगेश सागर यांनी दाखवून दिले .विधानसभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अक्षरशः मुंबईच्या इज्जतीलाच हात घातला आणि मुंबईचा उल्लेख गरीब की जोरु सबकी भाभी असा केला . हा मुंबईचा अपमान असून मुंबईकर जनतेत…
उद्या मुंबईच्या काही भगत 10 टक्के पाणी कपात
: मुंबई- पांजरपोळ संकुळातील मुंबई तीन अ उदांचण केंद्रातील ९००मिमी व्यासाची झडप बसवण्याचे काम २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू करण्यात येणार आहे .या काळात २७ ऑगस्ट रोजी ८ वाजेपर्यंत उदचंद केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे या कलावधीत पश्चिम उपनगरे शहर भागातील सायन,परळ,वडाला वगळून सर्व विभाग तर पूर्व विभागातील कुर्ला व घाटकोपर…
वय आणि पदाचा मान राखतो नाहीतर महाराष्ट्रात शिव्यांची कमतरता नाही- राजने राज्यपालांना खडसावले
मुंबई/मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात आज राज ठाकरे यांनी सर्वांचीच हजेरी घेतली राज्यपाल कोशारि, उद्धव ठाकरे, राहुल गांधी सर्वांवर टीका केली आणि पालिका निवडणुकीसाठी पूर्ण शक्तिनिशी मैदानात उतरा मी तुम्हाला महापालिकेची सत्ता देतो असे कार्यकर्त्यांना सांगितले तर सावरकरांवर बोलण्याची राहुल गांधींची लायकी आहे का ? राहुल गांधी हा गुळगुळीत मेंदूचा माणूस आहे असे सांगितले तर राज्यपाल बद्दल…
राज्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी; सोमवारपासून कठोर निर्बंध
मुंबई/ कोरोना ची तिसरी लाट सुरू झाली असून राज्यात रोज ३५ ते ४० हजार कोरोना बाधित रुग्ण आढलू लागल्याने सरकारने १० जानेवारी पासून दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे आहे त्यानुसार दिवसा ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल तर रात्री ११ ते पहाटे ५ या काळात संचारबंदी असेल यावेळी फक्त अत्यावश्यक…
