मुंबई – मुंबई महानगर पालिकेतील घोटाळेबाजणा पालिका प्रशासन कशा प्रकारे पाठीशी घालते याचे जीवंत उदाहरण म्हणजे स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत घोटाळा करणार्या अधिकारी कर्मचार्यांवर पालिकेने केलेली थातुर मातुर करवाई ! वास्तविक कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांचे साटे लोटे असताना निविदा प्रक्रीये पासून प्रत्यक्ष कामा पर्यन्त कंत्राटदार पालिका अधिकार्यांचे खिसे गरम करीत असतात .आणि हे तोडबाजीचे व्यवहार लाखोंच्या पटीत असतात त्यामुळे घोटाळा उघडकीस आल्यावर शिक्षाही तेवढीच कठोर व्हायला हवी परंतु पालिकेत चोर चोर मौसेरे भाई असा प्रकार असल्याने स्थापत्य कंत्राट कामातील निविदा प्रक्रियेत दोषी आढळलेल्या कर्मचार्यांवर बाळा पुन्हा असे करू नको असे म्हणत एक नाजुक चपटी मारली आणि त्यांना सोडून दिले .अत्यंत नगणी अशी दंडात्मक कारवाई झाल्याने हे भ्र्ष्टाचार सही सलामत सुटले असे म्हणाला हरकत नाही . या घोटल्याची चौकशी करण्यासाठी पालिकेने उपायुक्त स्तरावरील त्रिदलीय समिति नेमली होती .दोन वर्षांनंतर या समितीचा अहवाल स्थायी समितीत मांडण्यात आला एकूण 83 जणांची चौकशी करण्यात आली त्यामध्ये 69 दोषी आढळले . 50 अभियंता कर्मचार्यांवर दंडात्मक करवाई करण्यात येणार आहे . उर्वरित 13 पैकी एकाचा मृत्यू झाला उर्वरित 12 जणांवर कारवाई काय तर कोणाचे एका महिन्यासाठी तर कोणाचे कायमस्वरूपी 1500 ते 3 हजार रुपये वेतनातून कापून घेतले जाणार .म्हणजे सेवाकालीन त्यांनी कंत्र दाराकडून लाखोंच्या पटीत पैसे कमावले .आणि त्यांची चोरी पकडल्यावर पालिका त्यांच्या वेतनातून कापणार किती तर 1500 ते तीन चार हजार याला कारवाई म्हणायची की भ्रष्टाचाराला प्रोत्साहन म्हणायचे तेच काळात नाही .घोटाळेबाजांवर जर अशा थातुर मातुर कारवाया व्हायला लागल्या तर पालिकेत आणखी लुटारू तयार होतील आणि मुंबईकरांच्या पैशाची लूटमार करतील अशी प्रतिक्रिया मुंबईकर व्यक्त करीत आहेत .
Similar Posts
कारण जोहरच्या पार्टीत दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक- अनेक सेलिब्रेटींना करोनाची लागण
मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स…
महाविजय 2024 भाजपचा नवा संकल्प
मुंबई/ यंदा नव राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत तर पुढील वर्षी लोकसभेसह महाराष्ट्रात सुधा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी भाजपने आता पासूनच कंबर कसली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२४चा निवडणूकी साठी महाविजय २०२४हा संकल्प हाती घेतला आहे त्यानुसार लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधानसभेसाठी मिशन २०० ची घोषणा करण्यात आली आहे. या संकल्पाची तयारी म्हणून…
खान बहादुर भाभा कुर्ला रुग्णालयात डॉक्टरांची मनमानी -छोट्या संस्थांच्या पोटावर पाय देऊन बड्याना कंत्राटे
मुंबई/ पालिकेतील टेंडर घोटाळे काही नावे नाहीत पण एखाद्या कामाचे तोंडी टेंडर काढून ते मंजूर करण्याचा भयंकर प्रकार पालिकेच्या भाभा कुर्ला रुग्णालयात सुरू आहे.आणि आता त्याविरुद्ध छोट्या कंत्राटदार सेवा संस्थांनी आवाज उठवून पालिका आयुक्तांकडे रीतसर तक्रार केली आहे . दिनांक ८ जून 2022 बहुउद्देशिय 33 कामगार पुरविण्याच्या कामाच्या कंत्राट बाबत असाच झोल झालेला आहे ….
मान्सून महाराष्ट्रात दाखल पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबाई
मुंबई :मुंबई – महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची वाट पाहत होती तो पाऊस रविवारी पहाटे पासून कोसळू लागला. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबले भायखळा.,परेल,मिलन , अंधेरी आणि दहिसर सबवेत पाणी तुंबल्याने तिथली वाहतूक बंद करण्यात आली होतीभारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश,…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई जनसत्ता न्यूज पोर्टलचे उध्दघाटन
मुंबई -प्रिट मीडिया मध्ये आपल्या धारदार लेखणीने गरीब,पिढीत आणि शोषितांना न्याय मिळवून देणार्या मुंबई जनसत्ताचे आता न्यूज पोर्टल ही सुरू झाले असून दिंनाक 28 जुलै 2021 संपादक किसन जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन झाले.यावेळी प्रसार माध्यमधील श्री बी.ए.जाधव, माजी पोलिस अधिकारी शिवाजी पोपळे, मेनेजर प्रविण शितोळे ,उद्योजक क्षेत्रातील अर्जुन गायकवाड,सत्तापा साळोखे आणि सामाजिक क्षेत्रातील चंद्रशेखर…
ऑन लाईन नोंदणीची दंडेली केल्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई शहर करोना मोठा हॉट स्पॉट बनलेले असताना मुंबई महानगर पालिकेच्या लसीकरण मोहिमेचा अक्षरशः फज्जा उडाला आहे एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडे लसिकरणासाठी जी ऑन लाईन नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे त्या शक्तीमुळे लोक हैराण झालेत कारण ऑन लाईन नोंदणी करूनही अनेकांना मॅसेज च आलेला नसल्याने अनेकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परत…
