मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला. अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की, राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत, याचे जरा नियोजन करा . साकी नाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन
दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि…
राज्यपालांच्या हस्ते ‘कर्मयोद्धा राम नाईक’ पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांच्यावरील विविध मान्यवरांच्या लेखांचे संकलन असलेल्या ‘कर्मयोद्धा राम नाईक’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी (दि. १०) राजभवन येथे संपन्न झाले. कार्यक्रमाला राम नाईक, खासदार गोपाळ शेट्टी, माजी मंत्री विनोद तावडे, आमदार मंगल प्रभात लोढा, नवभारत टाइम्सचे माजी संपादक शचिंद्र त्रिपाठी, इंकिंग इनोव्हेशन प्रकाशन संस्थेचे आनंद लिमये…
आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !
55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य, आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि…
क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे भव्य प्रकाशन!
वसई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात घडणार्या गुन्हेगारी विषयक तसेच सामाजिक घडामोडींचा वेध घेत वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘क्राईम संध्या’ वृत्त पत्राच्या 2022 च्या दैनंदिनी डायरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते या क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे प्रकाशन करण्यात आले. पोलीस आणि जनता…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकोल्हापूर दौर्यात सोशल डिसटिंगचा फज्जा
आजी माजी मुख्यमंत्री आमने सामने कोल्हापूर/ कोरोंनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकांना सोशल डिस्टिंग बाबत उपदेश करणारे नेते स्वतः मात्र या नियमाचे पालन करीत नाहीत काल कोल्हापूर मध्ये हेच बघायला मिळाले कोल्हापूरच्या पाहणी दौर्यावर आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मोठा फौज फाटा होता. मात्र त्याच वेळी देवेंद्र फडणवीस हे सुधा कोल्हापूरच्या पाहणी दौर्र्यावर होते .या दोन्ही…
साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
नाशिक/गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक येथील ९४वया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवटही मोठ्या वादनेच झाला .समारोपाच्या दिवशी परिसंवादात भाग घेण्यासाठी आलेले लोकसत्ता या आघाडीच्या दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहेगिरीश कुबेर हे परिसंवाद आटोपून बाहेर पडत असताना अचानक त्यांना…
