मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला. अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की, राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत, याचे जरा नियोजन करा . साकी नाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.
Similar Posts
आता मुंबई महापालिका जिकण्या पासून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही -बाबूभाई भवानजी
मुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबईत जो प्रचंडप्रतिसाद मिळाला आहे तो पाहता आता मुंबई महापालिका जिंकण्यापसून भाजपला कुणीही रोखू शकतं नाही असे माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हटले आहे. आज राणे यांचे मुंबई विमानतळावर भव्य स्वागत करण्यात आले .यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर ,आशीष…
गुजरातच्या किनाऱ्यावर ३०० किलो ड्र्ग आणि शस्त्रांसह १० पाकिस्तान्यांना अटक
ओखा – गुजरातच्या किनाऱ्यावरून भारतात घुसण्याचा पाकिस्तानी अतिरेक्यांचा प्रयत्न फसला आहे. कोस्ट गार्ड आणि गुजरात एटीएस यांच्या संयुक्त मोहिमेत एक पाकिस्तानी बोट गुजरातच्या ओखा किनाऱ्यावर पकडण्यात आली असून त्यातून शस्त्रास्त्रे ,दारुगोळा आणि ३०० किलो अमली पदार्थांसह १० पाकिस्तानी अतिरेक्यांना अटक करण्यात आली गुजरातमध्ये पाकिस्तानी बोटीतून दारु गोळा, हत्यारांसह 300 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आले…
पत्रकार आणि राज्यशास्त्राच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक : ‘गुरुजी’ !
-विक्रांत विजय वैद्य (बोरीवली, मुंबई). ज्येष्ठ पत्रकार श्री. योगेश त्रिवेदी यांच्या अतिशय लोकप्रिय झालेल्या ‘पासष्टायन’ या पुस्तकानंतर ‘गुरुजी’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे, ही आत्यंतिक आनंददायी घटना आहे. पण एका गोष्टीची खंत मात्र मनात जाणवतेय, श्री. योगेश त्रिवेदी यांना ‘गुरुजी’ ही उपाधी देणारे ज्येष्ठ पत्रकार सदानंद शिंदे यांचा या कोरोनाकाळात करुण अंत झाला. आज ‘गुरुजी’…
समुद्राचे प्रदूषण महापालिकेला २८ कोटींचा दंड
मुंबई/ सांडपाण्याच्या द्वारे समुद्रात कचरा सोडल्या प्रकरणी हरित लवादाने मुंबई महानगर पालिकेला २८ कोटीचा दंड ठोठावला आहे मुंबईच्या नाल्यांमधून समुद्रात जे सांडपाणी तसेच मलनिःसारण केले जाते त्यातून मोठ्या प्रमाणावर कचरा समुद्रात सोडला जातो अशी तक्रार शक्ती नावाच्या एका सामाजिक संघटनेने हरित लवादाकडे केली होती यावर चौकशी होऊन लवादाने पालिकेला हा दंड ठोठावला आहे
साहित्य संमेलनात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक
नाशिक/गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या विषयावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या नाशिक येथील ९४वया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शेवटही मोठ्या वादनेच झाला .समारोपाच्या दिवशी परिसंवादात भाग घेण्यासाठी आलेले लोकसत्ता या आघाडीच्या दैनिकाचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहेगिरीश कुबेर हे परिसंवाद आटोपून बाहेर पडत असताना अचानक त्यांना…
रेल्वेच्या जनथाळीचा प्रवाशांना दिलासा
मुंबई/लांब पडल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये जनरल डब्यातून प्रवास करणे फार मोठे जीकरी चे असते कारण एकीकडे प्रचंड गर्दी तर दुसरीकडे खाण्यापिण्याचे हाल अशा परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. परंतु आता रेल्वेने जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी जन थाळीचे योजना सुरू केली आहे त्यानुसार वीस रुपयात पुरी भाजी तर पन्नास रुपयात संपूर्ण पॅकबंद भोजन ज्यामध्ये पाण्याच्या बाटलीचा…
