मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला. अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की, राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत, याचे जरा नियोजन करा . साकी नाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउदयपूर हत्या प्रकरणी तीन अतिरेक्यांना अटक
उदयपूर / नूपुर शर्मा हीचे समर्थन करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या 8 वर्षाच्या मुलाच्या बापाची हत्या केल्या प्रकरणी आणखी तीन अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे तर तात्या करणाऱ्या दोघांना या पूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या सर्वांचे कराचीतील 2 दहशतवादी संघटनांशी संबंध आहेत त्यामुळे आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे दरम्यान उदयपूर मधील संचारबंदी…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईशिवप्रताप गरुडझेप –
निर्माता -अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट बुधवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे . शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व स्वाभिमान शिकवणारी घटना आहे . शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केले असून औरंगजेबाची भूमिका यतीन कार्यकर यांनी सादर केली आहे .
डिसेंबर अखेर राज्यात दीड लाख नोकऱ्या- मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई/ आश्वासने द्यायला पैसे लागत नाहीत आणि दिलेली आश्वासने पूर्ण करायला हवीत असाही काही नियम नाही.त्यामुळे राज्यकर्ते आश्वासनांची खैरात करीत आहेत .महाराष्ट्राच्या तिजोरीत भलेही छादम नसला तरी सरकारकडून आश्वासने देण्याचा सिलसिला काही थांबायला तयार नाही .शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून आश्र्वनांचा पावूस पडतो आहे.मोठमोठ्या प्रकल्पांची घोषणा केली जातेय आताही मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर पर्यंत दीड…
शिवसेनेच्या सह्यांच्या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई- १९४७ साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य ही भीक होती खाते स्वातंत्र्य २०१४ आली मिळाले असे जे वादग्रस्त विधान केले होते त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली झाली असून कांग्नचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा तसेच तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी शिवसेनेने जी सह्यांची मोहीम सुरू केलीय तिला प्रचड प्रतिसाद मिळत आहे लोक स्वतःहून पुढे येऊन कांग्नच्या विरोधात…
भाजपकडून शिवसेनेला मोठी चपराक-पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्याचा सत्कार
पुणे/ पुण्यात शिवसैनिकांच्या धक्काबुक्की मध्ये ज्या पायरीवर पाडून सोमय्या जखमी झाले होते त्याच पायरीवर काल भाजपने पोलीस बंदोबस्त झुगारून सोमय्या यांचा सत्कार केला शिवसेनेला ही एक चपराक म्हणावी लागेल.आठ दिवसांपूर्वी सोमय्या संजय राऊत यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी पुण्यात आले होते.यावेळी पालिका आयुक्तांना भेटायला जाताना काही शिवसैनिक त्यांच्याकडे निवेदन घेवून गेले मात्र त्यांनी ते स्वीकारले नाही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयलव्ह जिहाद
जात धर्म आणि त्याच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण यामुळे देश आज धार्मिक ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभा आहे.त्यामुळे धार्मिक तणाव वाढवणाऱ्या गोष्टींना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे होते पण या देशाच्या दुर्दैवाने आज केंद्रात देव धर्म श्रद्धा आणि आस्था यांनी महत्व देणारे सरकार असल्याने धार्मिक विद्वेशाची भावना समाजात रुजायला लागली आहे लव्ह जिहाद हा त्याचाच…
