मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला. अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की, राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत, याचे जरा नियोजन करा . साकी नाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.
Similar Posts
राज ठाकरे झाले कोरोनामुक्त
मुंबई/ महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे आणि भगिनी जयवती ताई देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना २३ऑक्टोबरला लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आणि शुक्रवारी त्यांची पुन्हा करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने सर्वांनी ईश्वराचे आभार मानले करोना मुळेच राज…
माहीमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा, न हटवल्यास- गणपती मंदिर उभारणार- राज ठाकरेचा इशारा
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खळबळजनक व्हिडीओ दाखवत शिवाजी पार्क येथील सभेत गौप्यस्फोट केला. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. हे अनधिकृत बांधकाम एका महिन्यात न पाडल्यास त्याच्या बाजूला गणपती मंदिर उभे करू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. एकदा माहीम समुद्रात लोकांची गर्दी दिसली. त्यावेळी…
समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून सत्कार
मुंबई/ समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद विकोपाला गेलेला आहे मलिक रोज वानखेडे यांच्यावर नवनवे आरोप करीत असताना . आज शिवप्रतिष्ठान या संघटनेकडून एन सी बी कार्यालयाजवळ समीर वानखेडे यांच्यावर फुले उधळून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांना शिवप्रतीमेची एक भेटही देण्यात आली . यावेळी वानखेडे सारख्या प्रामाणिक आणि धाडसी अधिकाऱ्यांच्या मागे सर्वांनी एकजुटीने…
अर्थव्यवस्थेला शिस्त लावायची” का “रेवडी संस्कृती चालू ठेवायची हे ठरवणे महत्त्वाचे “
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. समाजातील विविध घटकांपासून राजकारणी, विरोधक, सर्व सामान्य अशा सर्वांनाच अंदाजपत्रकाकडून अपेक्षा असतात. मात्र अर्थव्यवस्थेतील शिस्तीच्या दृष्टीकोनातून अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांचा हा वेध. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील अर्थव्यवस्थेची स्थिती कशी काय आहे याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला.२०२२ हे वर्ष…
लग्नाचा चोर बाजार
लग्न हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे.कारण या टप्प्यावर माणसाचं संपुर वैवाहिक जीवन अवलंबून असते त्यामुळे लग्न करताना दोन्हीकडचे लोक वधुवरांची सर्व पार्श्वभूी पाहूनच पुढे पाय टाकतात.आणि गेले वर्षणवर्ष हीच पद्धत आहे .यातील देण्याघेण्याच्या व्यवहारिक बाबी म्हणजे हुंडा वैगेरे सारखे प्रकार सोडल्यास लग्न जुळवण्याची ही पद्धत योग्यच आहे.पण आजकाल मोठ्या प्रमाणावर प्रेमविवाह होत असल्याने…
सोशल मीडियावर बंदी घालण्याची आवश्यकता
सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्या माध्यमातून केवळ या देशातीलच नव्हे तर जगातील माणसे जोडता येतात.आणि त्यातून व्यापार ,उद्योग,सांस्कृतिक,आर्थिक,सुरक्षा विषयक अशा अनेक गोष्टींची देवाणघेवाण करता येते.जगातील घडामोडी कळू शकतात त्यावर भाष्य करता येते.मित्रपरिवार जोडत येतो असे कितीतरी सोशल मीडियाच्या फायदे आहेत.पण दुर्दैवाने कुठल्याही गोष्टीला दुसरी बाजूही असते.आणि ती अर्थातच चांगली नसते .सोशल मिडयाला…
