मुंबई, दि. (प्रतिनिधी) : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करुन विरोधी पक्षनेते आणि भारतीय जनता पक्ष यांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या बोलघेवड्या आणि प्रसिद्धीला हापापलेल्यांकडून करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या केसाला हात तर लावून बघा, भारतीय जनता पक्षाच्या रणरागिणी सळो की पळो करुन सोडल्याशिवाय राहणार नाहीत, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव यांनी दरेकरांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांचा समाचार घेतला. अभिनेत्री सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या टीकेच्या विरोधात थेट भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉ. उज्ज्वला जाधव या दरेकरांच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. पत्रकारांशी बोलतांना डॉ. उज्ज्वला जाधव यांनी सांगितले की, राजकारणाच्या या कुरणात चरून चरून कुणाचे कशा कशाने गाल रंगले आहेत हे सर्वांना माहीत आहे. आमच्या आदरणीय नेत्याने योग्य तेच वक्तव्य केलंय त्याचा एवढा कांगावा कशाला करीत आहात ? महिलांच्या आडून राजकारण करणे थांबवा आणि जनतेच्या हिताची कामे करा . ज्यांची “बुंद से गयी वो हौद से नाहीं आती ” महाराष्ट्रात सध्या जो प्रसिद्धीचा खटाटोप चाललाय तो थांबवा, महिलांच्या सुरक्षेच्या बाबत मौनी बाबा होणाऱ्या महिला एका वक्तव्याने एवढ्या जागृत कशा झाल्या हाच आता जनते साठी चर्चे चा विषय आहे.भ्रष्टाचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कोरोना नियंत्रण, आणि विशेष म्हणजे महिलांवर दिवसा गणिक होणारे अत्याचार बलात्कार थांबायला हवेत, याचे जरा नियोजन करा . साकी नाका येथे घडलेल्या महिला बलात्काराच्या नंतर रस्त्यावर उतरून आंदोलन करायला राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना वेळ नव्हता की त्यांना माहिती मिळाली नाही ? काय करायचे असते ते कळलेले दिसत नाही. ऊठ सूट विरोधी पक्ष नेत्यांच्या वक्तव्याला समजून न घेता वेगळे वळण देऊन त्याचा बाऊ करायचा एवढेच काम राष्ट्रवादीच्या महिला करणार आहेत कां? या मुळे तुमच्या बुद्धीची पण झलक महाराष्ट्राला कळतेय याचे भान ठेवा. महिलांच्या प्रश्नावर जाणीव पूर्वक काम करत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था कशी करण्यात येईल या बाबत शासनाला धारेवर धरून आक्रमक भूमिका घेणार आहेत की नाही ? असा सवालही डॉ. उज्ज्वला जाधव यांनी केला आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईशिवप्रताप गरुडझेप –
निर्माता -अभिनेता अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुड झेप हा चित्रपट बुधवारी 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे . शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका ही इतिहासातील सर्वात प्रेरणादायी व स्वाभिमान शिकवणारी घटना आहे . शिवाजी महाराजांची भूमिका अमोल कोल्हे यांनी केले असून औरंगजेबाची भूमिका यतीन कार्यकर यांनी सादर केली आहे .
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची मुंबईच्या महापौरांकडे मागणी
शीतल करदेकर यांचा आग्रह मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज काढले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या…
घर खरेदी नोंदणी करणाऱ्यांसाठी गुड न्युज- दुय्यम निबंधक कार्यालय सुट्टीच्या दिवशीही सुरु
मुंबई – सामान्य जनतेच्या सोयीसाठी जिल्हा मुख्यालय आणि महानगरपालिका क्षेत्रातील दुय्यम निबंधक कार्यालये शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार आहेत, त्यामुळे नागरिकांना दस्त नोंदणीत अडचण निर्माण होणार नाही आणि यापुढे नॉनस्टॉप दस्त नोंदणी होणार असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.खरेदी – विक्री व्यवहारामध्ये वाढ होत असल्याने नागरिकांना त्यांच्या…
परळ उड्डाण पूल १ जूनपासून दुचाकी व अवजड वाहनांना बंद
मुंबई – मुंबई शहर आणि पूर्व उपनगर यामधील महत्वाच्या दुवा असणाऱ्या परळ टीटी उड्डाणपूलाच्या डागडुजीचे काम मुंबई महानगरपालिकेच्या पूल विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी पावसाळी कामांसाठी उड्डाणपूलाच्या दोन्ही मार्गिकांवर जोडणीचे सांधे भरण्यासह रस्त्यावर असणारे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे या उड्डाणपूलावर दुचाकी आणि अवजड वाहनांना येत्या 1 जूनपासून बंदी घालण्यात येणार आहे….
करोना काळातील पालिकेच्या 12 हजार कोटींच्या घोटाळ्याची कॅग कडून चौकशी होणार
मुंबई/ कोरॉना काळात मुंबई महापालिकेत 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने कॅगला दिलेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ…
दादर उड्डाण पुलाखाली बनवलेल्या पालिकेच्या उद्यानाचे
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पणगार्डन सेल विभागाच्या अधिकार्यांची दिवसरात्र मेहनत फळालामुंबई (किसन जाधव) महानगरी मुंबई मध्ये इतक्या झोपडपट्ट्या आणि सिमेंटचे जंगल आहे की की मुंबईकरांचा श्वास गुदमरतो आहे अशावेळी दिवसभर कमधांद्यावरून दमून आल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी दोन घटका निवांत घालवता येतील अशी जागाही उपलब्ध नाही .मुंबईकरांची ही अडचण लक्षात घेऊन तसेच मुंबईला स्वच्छ…
