मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले . या अधिवेशनात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींवर केलेल्या अभद्र टिप्पणीचा मुद्दा गाजला. मात्र फडणवीसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही निवडणुकीला केंव्हाही तयार आहोत असे फडणवीसांनी सांगितले
Similar Posts
यवतमाळच्या शिवभोजन केंद्रात गरिबांची किळसवाणी थट्टा
शिवभोजान थाळीसाठी शौचालयाचे पाणीयवतमाळ / शिवसेनेची अत्यंत ड्रीम योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवभोजण थाळी बाबत एक भयंकर वास्तव समोर आले आहे .पाण्याची टंचाई असल्याचे कारण सांगून शीवभोजन केंद्रातील शिवभोजन् थाल्या चक्क शौचालयाच्या पाण्याने धुतल्या जात आहेत हा प्रकार उघडकीस येताच सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेतगोरगरीब जनतेसाठी शिवसेनेच्या प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरू केली…
रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढणार
मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे ….
कुडसावरेच्या डोंगरावर वृक्षारोपण.
गार्गी सोशल अकॅडमीने केले २०० वृक्षांचे रोपण बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर जवळील कुडसावरे परिसरात वनविभाग व गार्गी सोशल ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण मोहिमेत २००हुन अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.गार्गी सोशल ॲकेडमीतील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबाबत आवड निर्माण व्हावी तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ॲकेडमीच्या गार्गी चव्हाण यांच्या पुढाकाराने बदलापूर जवळील कुडसावरे येथे या…
राज्यपालांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना उल्लेखनीय समाज सेवेसाठी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ एपीजे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शमीम खान प्रामुख्याने उपस्थित होते. सनदी लेखापाल विजयशरद…
भाजपचा उमेदवाराची अखेर माघार – ऋतुजा लटके बिनविरोध
मुंबई/ अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. कारण भाजपचे उमेदवार मूर्जि पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तसेच इतर अपक्ष उमेदवारही माघार घेण्याचा तयारीत आहेत त्यामुळे श्रीमती लटके यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.अंधेरी पोटनिवडणूक अटीतटीची होणार असे वाटले होते कारण भाजपने त्यांचा उमेदवार उभा केला होता पण शरद पवार…
गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेची समुद्रात लक्ष्मण रेषा
मुंबई/गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेक जण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करतात. यामध्ये अपघाताचा धोका असतो, शिवाय नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात. यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी खोलवर विसर्जन होऊ शकणार नाहीमुंबई महापालिकेच्या…
