सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना तोंड देत रोजच्या गरजा भागवताना पैशाची भासणारी चणचण ! या सर्वातून वाटचाल करताना माणसाची चांगलीच दमछाक होते आहे .आणि असे असतानाही माणूस जगण्यासाठी रोजच्या रोज परिस्थितीशी संघर्ष करीत आहे .आणि हे सर्व प्रत्येक वर्षी तो अनुभवत असल्याने आता ही सगळी संकटे त्याच्या रोजच्या जिवणाचाच एक भाग बनली आहेत. या संकटाचा माणूस कसाही सामना करू शकतो पण समोर आणखी एक भयानक संकट उभे आहे आणि ते म्हणजे कोरोणाचे संकट! कोरोणाची तीव्रता किती भयंकर असते ते माणसाने 2020 पासून तब्बल दीड वर्ष अनुभवली भारतात जवळपास दीड कोटी लोकांना करोन झाला होता त्यातील साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला .ज्यांचा कोरोनातून मृत्यू झाला ते सुटले पण त्यांच्या कुटुंबाचे जे हाल, झाले त्याच्या आठवणीने सुधा अंगावर काटा येतो, कोरोनाच्या वेळी झालेल्या लोकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली . पैसा अभावी मुलाबाळांचे शिक्षण बुडाले.जे लोक भाड्याने राहत होते त्यांना घरभाडे थकल्याने बेघर व्हावे लागले त्यातच कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी डॉक्टर लोकांना लुबडत होते त्यामुळे जगणे मुश्किल झाले होत 2021 चां शेवटच्या टप्प्यात लसीकरण सुरू झालं आणि हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध उठवले आणि 2022 पासून जनजीवन पूर्वपदावर आले. करोनातून जे वाचले त्यांच्यासाठी उर्वरित आयुष्य हा एक प्रकारे बोनस च म्हणावा लागेल आणि म्हणूनच वर्षभराने पुन्हा करोना परतल्याने जगातील प्रत्येक माणूस भयभीत आहे.पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येऊ नये यासाठी माणूस ईश्वराकडे प्रार्थना करतोय
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्र्यांच्या सांगली दौर्यात सेना- भाजपा मध्ये धमासान
भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारण्यास उद्धव ठाकरे यांनी स्वीकारली नाहीतसांगली/ सध्या सेना भाजपातील कटुता आतापर्यंत मुंबई सारख्या शहरातच दिसत होती. पण आता ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुधा दिसायला लागली आहे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पूरग्रस्त सांगली जिल्ह्याच्या दौर्यावार असताना त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांची निवेदने घेतली नाहीत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिवसेना व उद्धव ठाकरेंच्या…
राणेंना मैदानात उतरवून भाजपने सेने विरुद्ध रणशिंग फुंकले; जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी
शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतलेमुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृती ठिकाणी राणेंना येऊ देणार नाही अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी माघार घेत राणेंना वाट मोकळी करून दिली त्यामुळे राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेता आले यावेळी आज…
राज्यपालांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना उल्लेखनीय समाज सेवेसाठी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ एपीजे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शमीम खान प्रामुख्याने उपस्थित होते. सनदी लेखापाल विजयशरद…
वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याचा आदेश मागे
मुंबई – हिंदुत्वाचाअजेंडा राबवताना काहीही निर्णय घ्यायचे आणि नंतर लोकांकडून विरोध झाल्यावर माघार घ्यायची यामुळे सरकारच्या विश्वसनीयतेलाच कुठेतरी तडा जातो.असाच काहीसा प्रकार वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याच्या आदेशाबाबत झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे जण माणसात हसे होताच हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश…
ओला कार चालकाच्या हत्येच्या गुन्ह्यात फिर्यादी पत्नीच निघाली मुख्य आरोपी ,घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या
भिवंडी :(आकाश गायकवाड ) मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून कार चालकाची हत्या केल्याची घटना 1 ऑगष्ट रोजी उघडकीस आल्या नंतर पत्नी च्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे .पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरा सोबत विवाह करण्यासाठी पती…
बेटिंग ऍप प्रकरणी अनेक बेड सेलिब्रिटी ईडीच्या जाळ्यात
नवी दिल्ली/ऑनलाइन बेटिंग ॲप १xबेट च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे, काही सेलिब्रिटींनी १x betॲपद्वारे मिळवलेल्या जाहिरातींच्या पैशाचा वापर विविध मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला आहे. हे गुन्ह्यांचे उत्पन्न मानले गेले आहे.सेलिब्रिटींच्या या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ईडी लवकरच…
