सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना तोंड देत रोजच्या गरजा भागवताना पैशाची भासणारी चणचण ! या सर्वातून वाटचाल करताना माणसाची चांगलीच दमछाक होते आहे .आणि असे असतानाही माणूस जगण्यासाठी रोजच्या रोज परिस्थितीशी संघर्ष करीत आहे .आणि हे सर्व प्रत्येक वर्षी तो अनुभवत असल्याने आता ही सगळी संकटे त्याच्या रोजच्या जिवणाचाच एक भाग बनली आहेत. या संकटाचा माणूस कसाही सामना करू शकतो पण समोर आणखी एक भयानक संकट उभे आहे आणि ते म्हणजे कोरोणाचे संकट! कोरोणाची तीव्रता किती भयंकर असते ते माणसाने 2020 पासून तब्बल दीड वर्ष अनुभवली भारतात जवळपास दीड कोटी लोकांना करोन झाला होता त्यातील साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला .ज्यांचा कोरोनातून मृत्यू झाला ते सुटले पण त्यांच्या कुटुंबाचे जे हाल, झाले त्याच्या आठवणीने सुधा अंगावर काटा येतो, कोरोनाच्या वेळी झालेल्या लोकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली . पैसा अभावी मुलाबाळांचे शिक्षण बुडाले.जे लोक भाड्याने राहत होते त्यांना घरभाडे थकल्याने बेघर व्हावे लागले त्यातच कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी डॉक्टर लोकांना लुबडत होते त्यामुळे जगणे मुश्किल झाले होत 2021 चां शेवटच्या टप्प्यात लसीकरण सुरू झालं आणि हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध उठवले आणि 2022 पासून जनजीवन पूर्वपदावर आले. करोनातून जे वाचले त्यांच्यासाठी उर्वरित आयुष्य हा एक प्रकारे बोनस च म्हणावा लागेल आणि म्हणूनच वर्षभराने पुन्हा करोना परतल्याने जगातील प्रत्येक माणूस भयभीत आहे.पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येऊ नये यासाठी माणूस ईश्वराकडे प्रार्थना करतोय
Similar Posts
काँग्रेसच्या राज्यात मुख्यमंत्री पदाचा भाव ५०० कोटी नवज्योत सिद्धूच्या विधानाने खळबळ
चंदिगढ/काँग्रेसच्या नेत्या आणि पंजाब सरकारमधील माजी मंत्री नवज्योत कौर सिद्धू यांनी एक खळबळजनक विधान केले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. पंजाबमध्ये मुख्यमंत्री बनण्यासाठी ५०० कोटी रुपये लागतात असं नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. भाजप आणि आम आदमी पार्टीने यामुळे काँग्रेसची कार्यपद्धतीचे काळे सत्य…
राज ठाकरे झाले कोरोनामुक्त
मुंबई/ महाराष्ट्र नाव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या मातोश्री कुंदाताई ठाकरे आणि भगिनी जयवती ताई देशपांडे यांना करोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांना २३ऑक्टोबरला लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्यावर यशस्वी उपचार झाले आणि शुक्रवारी त्यांची पुन्हा करोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आल्याने सर्वांनी ईश्वराचे आभार मानले करोना मुळेच राज…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईमांसाहाराच्या जाहिराती बघायच्या नसतील तर टिव्ही बंद करा – जैन समाजाच्या याचिका करत्याना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मांसाहाराच्या जाहिराती ज्यांना बघायच्या नसतील त्यांनी टिव्ही बंद करावा पण जे मांसाहारी आहेत त्यांच्या अधिकारांवर गदा आणण्याची मागणी करू नये अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने जैन समाजातील याचिका कर्त्या लोकांना फटकारले आहे .मांसाहाराच्या जाहिरातीमुळे शांततेत आणि गोपनीय जीवन जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन होते . त्यामुळे मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालावी. या मागणीसाठी श्री विश्वस्त…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा १० जानेवारीला फैसला
दिल्ली महाराष्ट्रात जो सत्ता संघर्ष सुरु आहे त्यावर सरवोचच न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र हि सुनावणी ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवावी अशी मागणी शैवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे त्यावर आता १० जानेवारीला सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे याच सुनावणीत तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा फैसला होण्याचीही शक्यता आहे ठाकरे गटाला ही केस…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याचे 11 फ्लॅट ई. डी . कडून जप्त- मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला ई डी ची धडक
मुंबई/ शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ई डी ने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे 11 फ्लॅट जप्त करून थेट मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला च धडक दिली आहेठाणे येथील वर्तक नगर मध्ये असलेल्या नीलांबरी सोसायटी मधील पुष्पक ग्रुपचे फ्लॅट आहेत .त्यातील11 फ्लॅट हे मुख्यमंत्री ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे आहेत असे ई…
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
