सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना तोंड देत रोजच्या गरजा भागवताना पैशाची भासणारी चणचण ! या सर्वातून वाटचाल करताना माणसाची चांगलीच दमछाक होते आहे .आणि असे असतानाही माणूस जगण्यासाठी रोजच्या रोज परिस्थितीशी संघर्ष करीत आहे .आणि हे सर्व प्रत्येक वर्षी तो अनुभवत असल्याने आता ही सगळी संकटे त्याच्या रोजच्या जिवणाचाच एक भाग बनली आहेत. या संकटाचा माणूस कसाही सामना करू शकतो पण समोर आणखी एक भयानक संकट उभे आहे आणि ते म्हणजे कोरोणाचे संकट! कोरोणाची तीव्रता किती भयंकर असते ते माणसाने 2020 पासून तब्बल दीड वर्ष अनुभवली भारतात जवळपास दीड कोटी लोकांना करोन झाला होता त्यातील साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला .ज्यांचा कोरोनातून मृत्यू झाला ते सुटले पण त्यांच्या कुटुंबाचे जे हाल, झाले त्याच्या आठवणीने सुधा अंगावर काटा येतो, कोरोनाच्या वेळी झालेल्या लोकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली . पैसा अभावी मुलाबाळांचे शिक्षण बुडाले.जे लोक भाड्याने राहत होते त्यांना घरभाडे थकल्याने बेघर व्हावे लागले त्यातच कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी डॉक्टर लोकांना लुबडत होते त्यामुळे जगणे मुश्किल झाले होत 2021 चां शेवटच्या टप्प्यात लसीकरण सुरू झालं आणि हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध उठवले आणि 2022 पासून जनजीवन पूर्वपदावर आले. करोनातून जे वाचले त्यांच्यासाठी उर्वरित आयुष्य हा एक प्रकारे बोनस च म्हणावा लागेल आणि म्हणूनच वर्षभराने पुन्हा करोना परतल्याने जगातील प्रत्येक माणूस भयभीत आहे.पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येऊ नये यासाठी माणूस ईश्वराकडे प्रार्थना करतोय
Similar Posts
संदीप बाळासाहेब बर्गे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन
मुंबई/ मुंबई जनसत्ता साप्ताहिक आणि न्यूज पोर्टल चे संपादक किसनराव जाधव यांचे मेव्हणे संदीप बाळासाहेब बर्गे यांचे २७ जानेवारी रोजी वयाच्या ३५ वया वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले ते बेस्ट विभागात कामाला होते.अत्यंत शांत आणि मनमिळाऊ स्वभावाचे असलेले संदीप बर्गे यांचं अत्यंत कमी वयात निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांच्या पश्चात…
बोमई विरुद्ध महाराष्ट्रात संताप
मुंबई/ सांगली जिल्ह्यातील. 42 गावे कर्नाटकात येणार आहेत असे विधान केल्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे . दरम्यान महाराष्ट्राची एक इंचही जामीन कर्नाटकला देणार नाही उलट कर्नाटकात असलेला मराठी भाषिक प्रदेश कायदेशीर मार्गाने महाराष्ट्रात असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर फडणवीस यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे…
कॉंग्रेसच्या राज्यात केंद्राकडून येणार्या १ रुपयातील फक्त १५ पैसे लोकांपर्यंत पोहचायचे – पंतप्रधान
यवतमाळ-पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. महिला बचत गटाच्या कार्यक्रमासाठी ते आज यवतमाळला आले. यावेळी हजारो कोटींच्या विकासकामाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही नाव न घेता टीका केली. त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. तसेच त्यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. “तुम्ही आठवा, इंडिया आघाडीचं जेव्हा…
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले होते .पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या निवडणुकीचा…
सुडाच्या राजकारणाचा मीच शेवट करणार- नारायण राणे
कणकवली – सर्व अटी आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच मालवणचा नीलरत्न बंगला बांधलेला आहे. त्यामुळे हा बंगला कुणीही तोडू शकत नाही ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी या बंगल्यावर कारवाई करून दाखवावी असे जाहीर आव्हान नारायण राणे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या सुडाच्या राजकारणाचा शेवट सुधा मीच करणार आहे असेही त्यांनी सांगितले.आज…
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू सत्ताधारी व विरोधक आमने सामने
मुंबई/महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला आता विरोधी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेतला जात आहे त्यामुळे या नव्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेतशिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये सी बी एस इ पॅटर्न करण्याची घोषणा करतात नव्या वादाला तोंड फुटले आहे कारण सीबीएसई पॅटर्नमुळे एस एस…
