सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना तोंड देत रोजच्या गरजा भागवताना पैशाची भासणारी चणचण ! या सर्वातून वाटचाल करताना माणसाची चांगलीच दमछाक होते आहे .आणि असे असतानाही माणूस जगण्यासाठी रोजच्या रोज परिस्थितीशी संघर्ष करीत आहे .आणि हे सर्व प्रत्येक वर्षी तो अनुभवत असल्याने आता ही सगळी संकटे त्याच्या रोजच्या जिवणाचाच एक भाग बनली आहेत. या संकटाचा माणूस कसाही सामना करू शकतो पण समोर आणखी एक भयानक संकट उभे आहे आणि ते म्हणजे कोरोणाचे संकट! कोरोणाची तीव्रता किती भयंकर असते ते माणसाने 2020 पासून तब्बल दीड वर्ष अनुभवली भारतात जवळपास दीड कोटी लोकांना करोन झाला होता त्यातील साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला .ज्यांचा कोरोनातून मृत्यू झाला ते सुटले पण त्यांच्या कुटुंबाचे जे हाल, झाले त्याच्या आठवणीने सुधा अंगावर काटा येतो, कोरोनाच्या वेळी झालेल्या लोकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली . पैसा अभावी मुलाबाळांचे शिक्षण बुडाले.जे लोक भाड्याने राहत होते त्यांना घरभाडे थकल्याने बेघर व्हावे लागले त्यातच कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी डॉक्टर लोकांना लुबडत होते त्यामुळे जगणे मुश्किल झाले होत 2021 चां शेवटच्या टप्प्यात लसीकरण सुरू झालं आणि हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध उठवले आणि 2022 पासून जनजीवन पूर्वपदावर आले. करोनातून जे वाचले त्यांच्यासाठी उर्वरित आयुष्य हा एक प्रकारे बोनस च म्हणावा लागेल आणि म्हणूनच वर्षभराने पुन्हा करोना परतल्याने जगातील प्रत्येक माणूस भयभीत आहे.पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येऊ नये यासाठी माणूस ईश्वराकडे प्रार्थना करतोय
Similar Posts
विधान परिषद निवडणूक मुंबईतील दोन्ही जागा ठाकरे गटाने जिंकल्या- कोकणची जागा भाजपला तर नाशिकची शिंदे गटाला
मुंबई/विधान परिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीत मुंबई शिक्षक मतदार संघ आणि मुंबई पदवीधर मतदार संघात ठाकरे गटाची दोन्ही उमेदवार विजयी झाले. तर कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे निवडून आले. नाशिक शिक्षक मतदार संघातून शिंदे गटाचे किशोर दराडे विजयी झाले२६ जून रोजी विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक झाली होती. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या ठाकरे…
पश्चिम महाराष्ट्रात भाजपला खिंडार – धैर्यसिंग मोहिते पाटील पवारांच्या राष्ट्रवादीत
माडा – भाजपचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत अकलूज येथे त्यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मोहिते पाटील यांनी आपली भूमिका मांडली. आपण शरद पवार यांच्यासोबत येण्याचा निर्णय का घेतला? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. धैर्यशील मोहिते…
महाराष्ट्रात महायुतीच्या विजयात समाजसेवक सुरेश यादव यांचा सहभाग
मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या दणदणीत विजयात काही सहानुभूतीपूर्ण व्यक्ती समोर आले आहेत. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीला जिंकण्यासाठी अनेकांमध्ये एका शक्तीची चर्चा आहे. यात रामदेवबाबाचे शिष्य सुरेश यादव असे त्यांचे नाव आघाडीवर असून, ते पतंजली योगपीठ मुंबई, भारत स्वाभिमानचे विद्यमान प्रभारी असून वर्षानुवर्षे सेवा देत आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश यादव…
बंगळुरू चेंगराचींगरी ! पोलीस आयुक्तांसह ६ पोलिस निलंबित – आरसीबीच्या ४ पदाधिकाऱ्यांना अटक
मुंबई : बंगळुरू चेंगराचेंगरीसंबंधी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बंगळुरू शहराच्या पोलिस आयुक्तांना त्यांनी निलंबित केलं आहे. तसेच अतिरिक्त पोलिस आयुक्त, एसीपी, डीसीपी यांच्यासह स्थानिक पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षकालाही निलंबित केलं आहे. त्याचसोबत आरसीबी संघ आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १८…
घाटकोपर होर्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेचे पोलीस आयुक्त निलंबित
मुंबई/घाटकोपर होल्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वेच्या जीआरपी चे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांच्यावर कामात गलथानपणा केल्याचा आरोप ठेवून त्याना निलंबित करण्यात आले आहे13 मे रोजी घाटकोपर मध्ये एका पेट्रोल पंपावर मोठे लोखंडी होर्डिंग पडून १३ जणांचा मृत्यू झाला होता तर ७० लोक जखमी झाले होते .या घटनेची सरकारने गंभीर दखल घेऊन चौकशी समिती नेमली होती .तर…
अतिरेकी संघटनेशी संबंधिताना अटक
पालघर- अल कायदा आणि आयसिसी संबंध असल्याचा सबळ पुरावे च्या आधारे राष्ट्रीय तपास यंत्रणेने बोईसर च्या सोमनाथ पॅराडाईज कॉम्प्लेक्स मध्ये राहत असलेला उच्चशिक्षित हमराज शेख वय 24 यास अटक केली आहे. ऑनलाइन मोहिमेद्वारे युवकांची दिशाभूल करण्याचे काम करीत होते असे निष्पन्न झाले शनिवार पासून छापासत्र सुरू असून मंगरूळच्या सॉफ्टवेअर इंजिनियर मोहम्मद अरिफ यालाहि ताब्यात घेतले.
