सरत्या वर्षाचा कटू गोड आठवणींना मागे टाकून 2023 या नव वर्षात पदार्पण करताना माणसाने निश्चितपणे स्वतःसाठी आपल्या कुटुंबासाठी काहीतरी संकल्प केले असतील . पण या वर्षात त्याची पूर्तता होईल की नाही याची मात्र काहीच शास्वती दिसत नाही. आणि त्याची कारणेही तशीच आहेत.माणसाचे जीवन दिवसेंदिवस खडतर आणि तितकेच आव्हानात्मक बनत चालले आहे. महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार आणि या सर्वांना तोंड देत रोजच्या गरजा भागवताना पैशाची भासणारी चणचण ! या सर्वातून वाटचाल करताना माणसाची चांगलीच दमछाक होते आहे .आणि असे असतानाही माणूस जगण्यासाठी रोजच्या रोज परिस्थितीशी संघर्ष करीत आहे .आणि हे सर्व प्रत्येक वर्षी तो अनुभवत असल्याने आता ही सगळी संकटे त्याच्या रोजच्या जिवणाचाच एक भाग बनली आहेत. या संकटाचा माणूस कसाही सामना करू शकतो पण समोर आणखी एक भयानक संकट उभे आहे आणि ते म्हणजे कोरोणाचे संकट! कोरोणाची तीव्रता किती भयंकर असते ते माणसाने 2020 पासून तब्बल दीड वर्ष अनुभवली भारतात जवळपास दीड कोटी लोकांना करोन झाला होता त्यातील साडेचार लाख लोकांचा मृत्यू झाला .ज्यांचा कोरोनातून मृत्यू झाला ते सुटले पण त्यांच्या कुटुंबाचे जे हाल, झाले त्याच्या आठवणीने सुधा अंगावर काटा येतो, कोरोनाच्या वेळी झालेल्या लोकडाऊन मुळे उद्योग धंदे बंद पडले कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्याने ते बेरोजगार झाले त्यामुळे कुटुंबावर उपासमारीची पाळी आली . पैसा अभावी मुलाबाळांचे शिक्षण बुडाले.जे लोक भाड्याने राहत होते त्यांना घरभाडे थकल्याने बेघर व्हावे लागले त्यातच कोरोना काळात उपचाराच्या नावाखाली काही ठिकाणी डॉक्टर लोकांना लुबडत होते त्यामुळे जगणे मुश्किल झाले होत 2021 चां शेवटच्या टप्प्यात लसीकरण सुरू झालं आणि हळू हळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसे सरकारने कोरोना काळात लावलेले निर्बंध उठवले आणि 2022 पासून जनजीवन पूर्वपदावर आले. करोनातून जे वाचले त्यांच्यासाठी उर्वरित आयुष्य हा एक प्रकारे बोनस च म्हणावा लागेल आणि म्हणूनच वर्षभराने पुन्हा करोना परतल्याने जगातील प्रत्येक माणूस भयभीत आहे.पुन्हा 2020 सारखी परिस्थिती येऊ नये यासाठी माणूस ईश्वराकडे प्रार्थना करतोय
Similar Posts
उपराष्ट्रपदाची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी हालचाली
नवी दिल्ली/उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीएनं महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचं नाव जाहीर केलं आहे. भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांची भेट झालेली आहे, चर्चा सुरु आहेत, असं म्हणत एनडीए उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करेल असे संकेत दिले होते. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस…
मी फक्त शरद पवारांचे ऐकतो राऊतांचा अजितदादांवर पलटवार
मुंबई – ऑपरेशन लोटसबाबत मी लिहलेलं सत्य कोणाला बोचत असेल तर त्याला मी काय करू. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. खरं बोलल्यामुळे कोणी मला लक्ष्य करत असेल तरी मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलत आणि लिहीत राहणार. माझ्या विश्वसनीयतेवर शंका उपस्थित करण्याचा अधिकार कोणालाही नाही. फक्त शरद पवार यांनी माझ्या विश्वसनीयतेबाबत शंका उपस्थित केली…
५० लाखांचे इनाम असलेला कुख्यात मावो वादी मिलिंद तेलतुंबडेचा खेळ खल्लास
गडचिरोलीत २६ माओ वाद्यांचे एन्काऊंटरगडचिरोली/ सरकार आणि सुरक्षा दलांसाठी मोठी डोकेदुखी ठरलेल्या २६ माओ वाद्यांना गडचिरोलीच्या जंगलात कंठ स्नान घालण्यात अखेर सुरक्षा दलांना यश आले असून शनिवारी झालेल्या चकमकीत २६ माओ वादी ठार झाले ज्यात माओ वाद्यांचा कमांडर आणि ज्याच्यावर ५० लाखांचे इनाम होते अशा मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. तसेच मृतांमध्ये ६ महिला माओ…
मुख्यमंत्र्यांचा राणेंना इशारा–जुने व्हायरस पुन्हा येत आहेत त्यांचा बंदोबस्त करावा लागेल .
मुंबई /मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लागण्याची भाषा करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून राणेंना चांगलाच दणका दिला होता.मात्र शिवसेना आणि भाजपच्या राडेबाजी मध्ये मुख्यमंत्री गप्प होते पण काल एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राणेंचे नाव न घेता त्यांना इशारा दिलाय की जुने व्हायरस पुन्हा आले आहेत आणि त्यांचा साईड इफेक्ट सुधा जाणवू…
पदक कांस्य, पण मनुने रचला सोनेरी इतिहास
जो आनंद चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार्या नील आर्मस्ट्राँगच्या चेहर्यावर होता, जे आनंदाश्रू सर्वप्रथम एव्हरेस्ट सर करणार्या तेनसिंग शेर्पाच्या डोळ्यात होते, त्याच भावना आज मनु भाकरच्या देहबोलीत दिसल्या. तिच्या पाणावलेल्या कडा सारं काही सांगून गेल्या. हिंदुस्थानी ऑलिम्पिकच्या इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी पहिली महिला म्हणून मनुने पराक्रम केला. पदक कांस्य असले तरी तिने आज इतिहासाचे सोनेरी पान…
मुंकुद लिमिटेड अस्थापनातील दडपशाहीला उत्तर दिले जाईल – विश्वास उटगी
मुकंद ली. या कंपनीने एम आय डी सी च्या मालकीची कळवा येथे असलेली लिझ वर भुसंपदित कायद्याखाली मिळालेली जमीन – ‘करण्याचा बेकायदेशीर घाट घातलेला आहे आणि त्याला कळवा मुकद एम्प्लांईज संघटनेने विरोध करून त्याबाबत मा. उच्च न्यायालयात रीट पीटिशन क्रमांक (st. 6081of 2021) दाखल केलेला आहे. सदर बेकायदेशीर जमीनविक्री ही येथील कामगार, महाराष्ट्र सरकार…
