मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात नाही बरे वाहतूक पोलिसांकडे तक्रार करायला गेल्यास ते तक्रार घेत नाहीत . उलट प्रवाशनाच दमदाटी करतात शनिवारी रात्री 10.30 वाजता पत्रकार सोनू जाधव यांनी स्टँड वरच्या एका टॅक्सी चालकाला टी बी हॉस्पिटल जाणा है असे सांगितले पण जवळचे भाडे असल्याने टॅक्सी वाल्याने नकार दिला त्यामुळे जाधव यांनी ट्रॅफिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला .पण त्याच वेळी त्या ठिकाणी दुसरा ट्रॅफिक पोलिस आला आणि त्याने जाधव याना दमदाटी करीत धमकी दिली मारण्यासाठी अंगावर धावला . अखेर जाधव याना चालत घरी जावे लागले जाधव यांनी सदर प्रकरणी वाहतूक मांटुगा पोलीस निरीक्षक हरिदास तसेच वाहतूक पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे .
Similar Posts
मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे बालिश आव्हान-राणा दांपत्याची नौटंकी सुरूच
मुंबई/ उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे पोरकट आव्हान नवनीत राणा यांनी केल्यामुळे महाराष्ट्र खोखो हसत त्यांच्या या बालिशपणा ची थट्टा उडवत आहे .सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जमीन मंजूर केल्यानंतर रवी राणा यांची तुरुंगातून दुसऱ्या दिवशी सुटका झाली पण नवनित राणा मात्र प्रकृतीच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात अँडमिट होत्या…
लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका
मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून…
डाव्यांची ३० वर्षांची सत्ता उलथवून टाकल- केरळच्या तिरुअनंतपुरम महापालिकेवर भाजपा प्रणित एन डी ए चा झेंडा
तिरुअनंतपुरम/केरळच्या पालिका निवडणूकीत तिरुअनंतपुरम महानगरपालिकेवर ३० सत्ता गाजवणाऱ्या डाव्या आघाडीचा (एलडीएफ) मोठा पराभव झाला आहे.तिरुअनंतपुरम महानगरपालिकेवर भाजप आणि एनडीएचा दणदणीत विजय झाला आहे. या विजयासाठी मेहनत घेणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पीएम मोदी यांनी अभिनंदन करीत केरळ राजकारणासाठी हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावरील पोस्ट मध्ये लिहीले आहे की तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्य भाजपा-एनडीएला जो…
गोळीबारात जखमी झालेल्या शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
कल्याण -भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला शिंदे गटाचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांना आज ठाण्याच्या ज्युपिटर हॅास्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. महेश गायकवाड शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल २४ दिवसानंतर आज…
भोईवाड्यात एस आर ए च्या इमारतींना गळती वर्ष झाले तरी तक्रार अर्जाची दखल नाही- छत कमजोर झाल्याने कोसळण्याचा धोका
मुंबई – एस आर ए अर्थात स्लम रिहॅबलेशन ऑथरेटी! ज्याला मराठीत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणतात . पण झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्याच्या नावाखाली एस आर ए आणि बिल्डर यांची अभद्र युती कशा प्रकारे लोकांची फसवणूक करीत आहे आणि निकृष्ट बांधकाम असलेल्या इमारतींमध्ये लोकांना सदनिका देऊन कशाप्रकारे त्यांच्या जीवाशी खेळत आहेत याचे भयंकर उदाहरण मुंबईच्या परेल – भोईवाडा…
गुड गोइंग! नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळाचा पाठींबा -आता खरी लढाई सुरू
मुंबई,/ नवाब मलिक यांनी एन सी बी आणि वानखेडे यांच्या विरोधात सुरू केलेली लढाई आता भाजप नेत्यांविरोधात येऊन ठेपली असून या लढाईत मलिक एकाकी असतील असे आतापर्यंत वाटत होते पण आता मात्र संपूर्ण मंत्रिमंडळाने मालिकांच्या लढाईला पाठींबा दिलेला आहे त्यामुळे आता खऱ्या अर्थाने ही लढाई भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात सुरू होणार आहेगेल्या काही दिवसांपासून…
