मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी पाऊस पडतो तर कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात अधिक पाऊस पडत असल्याने या भागातील निवडणुका पावसाळ्यानंतर होणार आहेत . मुंबई ही कोकण प्रातांशी जोडलेली असल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक पावसाळा नंतर होणार आहे या दरम्यान प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड निहाय आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे .दुर्दैवाने ही निवडणूक ओबीसी आरक्षण शिवाय होणार असल्याने ओबीसींवर खुल्या प्रभातून निवडणूक लढवण्याची पाळी आली आहे.
Similar Posts
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी अधिकाधिक कृत्रिम तलावांची उभारणी
महानगरपालिका आणि मुंबईतील गणेश समन्वय समितीची संयुक्त बैठक परळ येथील ‘एफ दक्षिण’ विभाग कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीत मुंबईतील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य, समन्वय समिती सदस्य, पदाधिकाऱयांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना केल्या. या सूचना समजून घेतल्यानंतर उप आयुक्त (परिमंडळ २) तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून यंदाच्या गणेशोत्सवाबाबत सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली….
संभाजी ब्रिगेडच्या अध्यक्षांवर हल्ला मराठा क्रांती मोर्चा मैदानात
सोलापूर/अक्कलकोट (सोलापूर) येथे रविवारी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर काळी शाई फेकून धक्कादायक हल्ला करण्यात आला. फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असताना त्यांच्या गाडीसमोर काही लोकांनी आक्रमकपणे शाई फेकली आणि त्यांना खाली खेचून धक्काबुक्की केली. या हल्ल्यामागे भाजपशी संबंधित शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचं समोर आलं आहे. दीपक…
झोपडपट्ट्यांचा विकास करण्यामागे सरकारचे मतांचे राजकारण
मुंबई/ महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यानुसार झोपडपट्टी पुर्विकास योजेने अंतर्गत मुंबईतील १२ हजार झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६५ लाख झोपडपट्टीवासीयांना केवळ दोन लाख पन्नास हजरत पक्के घर दिले जाणार आहे.एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किती झोल झपटे झाले आहेत ते ठाऊक असताना सरकार पुन्हा एकदा बिल्डरांच्या फायद्यासाठी अशी योजना राबवत आहे.मात्र ही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकरोडपती आमदारांवर कर्जबाजारी सरकारची उधळपट्टी- आमदारांच्या घराना जनतेचा विरोध
मुंबई/ महाराष्ट्रातील 300 आमदारांना मुंबईत कायम स्वरुपी 300 घरे देण्याचा सरकारच्या निर्णयाला आता जनतेतून मोठा विरोध होऊ लागला आहे.केवळ जनताच नव्हे तर भाजप आणि मनसेने सुधा सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र आमदारांना फुकट घरे दिली जाणार नाहीत तर त्यासाठी त्यांना किमान 70 लाख रुपये मोजावे लागतील अशी…
BMC ने विद्याविहार उड्डाणपूलाला वेग, अभिजीत बांगरांची पाहणी; २५ जूनपूर्वी पूर्णत्वाची मुदत
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एन’ विभाग हद्दीत घाटकोपर परिसरातील विद्याविहार रेल्वे स्थानकावर पूर्व-पश्चिम जोडणारा उड्डाणपूल BMC च्या पूल विभागाकडून उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या कामाची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, कामांना गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.या दोन मार्गिकांच्या उड्डाणपुलाचे संपूर्ण काम २५ जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे….
भाजपचे पक्ष निरीक्षक निर्मला सीतारामन व विजय रूपांनी मुंबईत येणार !- ४ डिसेंबरला भाजप विधी मंडळ पक्षाची बैठक
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवता आला नाही. महायुती अर्थात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने १ मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला तयार केला आहे.आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे….
