मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’ च्या भूमिकेत असल्याचे कळते. सप्टेंबर २०१३ मध्ये राजेंद्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेली चाळीस वर्षे नेतृत्व करणारे गणेशभक्त प्रताप दाजी रात यांचे आकस्मिक निधन झाले. ते शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि विविध संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. प्रताप रात यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आसावरीताई पाटील यांनी मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने शिवसैनिकाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी नामकरणाचा प्रस्ताव ठेवला. महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चौकाचे नामकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी आणि शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, विशाखा राऊत यांच्यासह बाळ राणे, शाम कदम, मनोहर देसाई, चेतन कदम, शर्मिला शिंदे, कांचन सार्दळ, अशोक परब, राजा खोपकर यांच्यासह शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भेटले. या निमित्ताने पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल का? ‘हम साथ साथ है’चा प्रयोग यापुढे सुरु राहणार का? असे प्रश्न लोक एकमेकांना विचारतांना दिसत आहेत.
Similar Posts
पालिका आयुक्त चहल याना ईडीची नोटीस
मुंबई – कोरोना काळात कोवीड सेंटरच्या नियमबाह्य खर्चा प्रकरणी पालिका आयुक्त इकबालसिंग चहल याना ईडीने नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे . चहल सोमवारी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर हजार होतील आणि त्यांची चौकशी करण्यात येईल लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीने जून २०२० ते मार्च २०२२ पर्यंत कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून काम…
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची भेट
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार…
तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये !
मुंबई, दि. १८ डिसेंबर २५छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा नयेत,असा सक्त सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल विभागाचे स्वतंत्र डाटा सेंटर आणि महसूल विभागाच्या तांत्रिक सक्षमीकरणाबाबतच्या उच्चस्तरीय बैठकीत केली. ते म्हणाले,”जमिनीचा डाटा हा अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असून त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि विभागाच्या सक्षमीकरणासाठी अधिकाऱ्यांनी तयारी करावी. महसूल विभागाला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी अधिकाऱ्यांनी…
आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर मुद्दाम चाल ढकल – कायदे तज्ञांचा सभापतींवर गंभीर आरोप
मुंबई -शिवसेनेत बंडखोरी केलेल्या आमदारांची सुनावणी लवकरच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहे. ५६ दिवस ५६ आमदारांची बाजू राहुल नार्वेकर ऐकणार आहेत. त्यानंतर राहुल नार्वेकर आपला निर्णय जाहीर करू शकतात. पण, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी राहुल नार्वेकर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. आमदार अपात्रतेचा निकाल लवकर लागू नये, म्हणून योजना तयार केल्या जात आहेत,…
वन नेशन वन इलेक्शनला देशभरातून विरोध सुरू
नवी दिल्ली/मोदींनी एक मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार वन नेशन वन इलेक्शन हा प्रस्ताव तयार करून लवकरच त्याला लोकसभेत मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर इलेक्शन कायदा अस्तित्वात येईल मात्र याला देशातील विरोधी पक्षाने तसेच अनेक सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे याचे कारण वन नेशन वन इलेक्शन ही प्रक्रिया अत्यंत किचकट त्याचबरोबर व्यापक असल्याने तसेच निवडणूक…
मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट टँकर माफिया कडून- आशिष शेलार
: मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट केल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. एसआयटी मार्फत बेकायदेशीर पाणी उपसाची चौकशी करण्यात आली आहे.: मुंबईत तीन हजार कोटींच्या पाण्याची लूट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील या बेकायदा पाणी उपशाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी…
