मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’ च्या भूमिकेत असल्याचे कळते. सप्टेंबर २०१३ मध्ये राजेंद्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेली चाळीस वर्षे नेतृत्व करणारे गणेशभक्त प्रताप दाजी रात यांचे आकस्मिक निधन झाले. ते शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि विविध संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. प्रताप रात यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आसावरीताई पाटील यांनी मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने शिवसैनिकाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी नामकरणाचा प्रस्ताव ठेवला. महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चौकाचे नामकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी आणि शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, विशाखा राऊत यांच्यासह बाळ राणे, शाम कदम, मनोहर देसाई, चेतन कदम, शर्मिला शिंदे, कांचन सार्दळ, अशोक परब, राजा खोपकर यांच्यासह शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भेटले. या निमित्ताने पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल का? ‘हम साथ साथ है’चा प्रयोग यापुढे सुरु राहणार का? असे प्रश्न लोक एकमेकांना विचारतांना दिसत आहेत.
Similar Posts
विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळलाराजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न…
पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहात पेटीएम पेमेंट बँकेवर काही निर्बंध लादले. याचा नेमका परिणाम काय होणार आहे याचा घेतलेला हा मागोवा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सप्ताहामध्ये डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेवर अत्यंत महत्त्वाचे पाच निर्बंध जारी केले. या निर्बंधानुसार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 पासून पेटीएम पेमेंट बँक कोणत्याही मुदत ठेवी…
तुम्ही इतकी वर्ष सत्तेत राहून महाराष्ट्राला काय दिले ? शरद पवार व उद्धव ठाकरे यांना अमित शहांचा सवाल
अकोला – यांना त्यांच्या मुलाशिवाय काहीच दिसत नाही, असा खोचक टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. याशिवाय अमित शाह यांनी इंडिया आघाडी आणि शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 10 वर्षे केंद्रात मंत्री असताना महाराष्ट्रासाटी किती निधी मिळाला, असा सवाल अमित शाह यांनी शरद पवारांना विचारला आहे.अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा…
पत्रकारांवरील हल्ले निंदनीय – राज्यपाल रमेश बैस
मुंबई,- राज्यात अलीकडच्या काळात पत्रकारांवरी झालेले हल्ले अतिशय निंदनीय असून, हल्लेखोर कितीही प्रभावशाली असतील, तरीही त्यांना कायद्यानुसार योग्य शासन झाले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवारी येथे केले. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला कोठेही स्थान नाही, असे राज्यपालांनी सांगितले.ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा ‘आचार्य अत्रे पुरस्कार’ राज्यपाल बैस यांच्या…
तर तुला चपलेने मारू!लालूच्या मुलीने राजकारण आणि कुटुंबाची साथ सोडली
..पाटणा/ बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लालूंच्या कुटुंबातील कलह समोर आला आहे. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली…
