मुंबई, दि. (प्रतिनिधी) : बोरिवली पूर्व भागातील राजेंद्रनगर येथील राजेंद्रनगर झुणका भाकर केंद्राच्या चौकाचे ‘गणेशभक्त प्रताप दाजी रात चौक’ असे नामकरण करण्यात आले आहे. यानिमित्ताने सध्याच्या राजकारणात एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे असलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष ‘हम साथ साथ है’ च्या भूमिकेत असल्याचे कळते. सप्टेंबर २०१३ मध्ये राजेंद्रनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गेली चाळीस वर्षे नेतृत्व करणारे गणेशभक्त प्रताप दाजी रात यांचे आकस्मिक निधन झाले. ते शिवसेनेचे शाखाप्रमुख होते आणि विविध संघटनांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. प्रताप रात यांच्या निधनानंतर भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आसावरीताई पाटील यांनी मुंबई महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने शिवसैनिकाचा प्रस्ताव ठेवल्यानंतर शिवसेनेचे स्वप्नील टेंबवलकर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी नामकरणाचा प्रस्ताव ठेवला. महानगरपालिकेने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर चौकाचे नामकरण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार गोपाळ शेट्टी आणि शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरुरकर, विशाखा राऊत यांच्यासह बाळ राणे, शाम कदम, मनोहर देसाई, चेतन कदम, शर्मिला शिंदे, कांचन सार्दळ, अशोक परब, राजा खोपकर यांच्यासह शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते भेटले. या निमित्ताने पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होईल का? ‘हम साथ साथ है’चा प्रयोग यापुढे सुरु राहणार का? असे प्रश्न लोक एकमेकांना विचारतांना दिसत आहेत.
Similar Posts
सुधाकरराव, अधिस्वीकृती आणि विलासराव ! –
सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री असतांना प्रकाश देशमुख हे मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष होते आणि मी कार्यवाह होतो. रत्नागिरी येथे मंत्रिमंडळ बैठक होती. मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत जिल्हा माहिती अधिकारी यांच्या सहीच्या प्रवेश पत्रिकेशिवाय प्रवेश नव्हता. प्रकाश देशमुख आणि योगेश त्रिवेदी यांनी या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या सर्वच अधिस्वीकृती पत्रिकाधारक…
नीट परीक्षेचे लातूर कनेक्शन उघडकीसनांदेड मधून २ शिक्षकांना अटक
लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आज होणारी नीट पीजी परीक्षापुढे ढकलण्याचा मोठा निर्णय आरोग्य मंत्रालयानं घेतला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात बिहार कनेक्शननंतर आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी दोन शिक्षकांना नांदेड एटीएसनं ताब्यात घेतलं आहे. अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एकजण लातूरमध्ये तर दुसरा सोलापूर येथे कार्यरत…
डाॅक्टर, मला नेमकं काय झालंय ?
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग एका वेगळ्या विषयावर आज लेख लिहितोय.आपण आजारी आहोत हे कसं ओळखावं ? कोणत्या आजाराची लक्षण कशी ओळखायची ?असे काही प्रश्न आणि त्याला मिळालेली उत्तरे यातून या लेख पुढे जाणार आहे. असे पेशंट आले आणि त्यांच्या तक्रारी सांगू लागले की, हसावं की रडावं कळतच नाही.अशा रुग्णांना मी एक साधा प्रश्न…
जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना मुख्यमंत्र्यांकडून दणका
पुणे/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिलं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. देवेंद्र फडणवीस त्यांनी भूमिका मांडली. “ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोकं या प्रकारचा आरोप करु शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात…
धक्कादायक! पालिका शाळेतील १३हजार मुलांना मधुमेह रक्तदाब
मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी…
पालिका अभियंत्याला लाच घेताना ए सी बी कडून रंगेहात अटक
मंबई / पालिकेच्या विविध विभागाकडे कंत्राटदारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांची कामे असतात .मात्र ही कामे वेळेत करून देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडून मोठी लाच मागितली जाते. काही जण काम करून घेण्याची घाई असते ते लोक लाच देऊन ताबडतोब काम करून घेतात .पण काही लोक मात्र लाच न देता लाच मागण्याच्या विरुद्ध लाच लुचपत विभागाकडे तक्रार करतात आणि…
