: मुंबई/ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्त्यावरचे खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी याबाबत १५दिवसात पथके तयार करण्यात येतील असे सांगितले होते . पण आता मात्र दोन ते तीन आठवड्यात खड्डे बुजविण्यासाठी काम करावे लागेल असे आयुक्त म्हणत आहे .त्यामुळे आयुक्तांनी स्वतःचाच आदेश कसा खड्ड्यात घातला असे मुंबईकर म्हणत आहेत. मुंबईच्या रस्त्यावरचे ४० हजार खड्डे बुजवल्याबद्दल पालिका प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे.पण पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत त्याचे काय? आयुक्तांनी मात्र याबाबत पावसाला तसेच मुंबईच्या वाढत्या वाहतुकीला जबाबदार धरले आहे पण कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्या मुळेच पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत याबाबत पालिका आयुक्त का बोलत नाहीत किंवा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी का लावीत नाहीत? ब्लॅक लिस्ट केलेल्या कंत्राटदारांना च पुन्हा पुन्हा रस्त्याची कामे का दिली जातात . यात पालिकेतील कोण कोणत्या अधिकाऱ्यांची आर्थिक मिली भागात आहे याची पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे मुंबईतील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे .
Similar Posts
पालिकेचे सिटी ब्युटी फायर
मुंबई/सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई या पालिकेच्या घोषणेनंतर मुंबई किती सुंदर आणि किती स्वच्छ झाली हे त्या परमेश्वरालाच ठाऊक ! पण आता शहरातील क्लीन अप मार्शल ना मात्र एक नवी ओळख मिळणार आहे.कारण त्यांच्या जकेटवर यापुढे क्लीन अप मार्शल ऐवजी सिटी ब्युटी फायर असे लीहले जाणार आहे.आता ही नवी ओळख तरी सफाई कामगारांच्या पचनी पडते की…
नालेसफाईची ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात- अधिकारी आणि कंत्राटदाराचा पालिकेच्या तिजोरीवर दरोडा
मुंबई – नालेसफाई म्हणजे निव्वळ हातसफाई हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे . नालेसफाईच्या कंत्राटदार कशा प्रकारे चुना लावतात यावर मुंबई जनसत्ताने अनेकवेळा प्रकाश झोत टाकला आहे. सध्या पश्चिम उपनगरातील नाल्यांच्या डागडुजीसाठी काढल्या जाणाऱ्या ५६ कोटींची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडणार आहेत हि उधळपट्टी कशासाठी असा सवाल आता मुंबईकर करीत आहेत.पश्चिम उपनगरातील वांद्रे,खार, विलेपार्ले, सांताक्रूझ,अंधेरी, गोरेगाव…
पालिका ७ ठिकाणी जलतरण तलाव बांधणार
मुंबई – सध्या मुंबईत सात ठिकाणी जलतरण तलाव असतानाही मुंबई महापालिकेने मुंबईत आणखी ७ जलतरण तलाव बांधण्याचा निर्णय घेतल्याने हि उधळपट्टी कशाला असा संतप्त अवलं मुंबईकर विचारीत आहेत दहिसर येथील कांदरपाडा जलतरण तलाव, मालाड (पश्चिम) येथील चाचा नेहरू मैदान जलतरण तलाव, अंधेरी (पश्चिम) येथील गिल्बर्ट हिल जलतरण तलाव, अंधेरी (पूर्व) येथील कोंडिविटा गाव जलतरण तलाव,…
राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात पालिका तोडणार
मुंबई – राणे आणि शिवसेनेतील संघर्ष आता हातघाईवर आला आहे पालिकेने राणेंच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम 15 दिवसात तुम्ही तोडा अन्यथा आम्ही तोडू अशी राणेंना नोटीस बजावली आहे.नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झालेले असल्याने पालिकेने त्यांना नोटीस बजावली होती . त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी बंगल्यात जाऊन बंगल्याची पाहणी केली होती . मात्र आमच्या बंगल्यात कोणतेही…
गणेश दर्शनाचा गोडवा भेटी गाठी वाढवा
राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी काय करतील याचा नेम नाही.सध्या महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरू आहे.अशावेळी गणपतीच्या दर्शनाला निमित्ताने कोणाच्याही घरी जाता येते मग तो मित्र असो की शत्रु असो ! हाच एक मोका असतो त्याच्या घरी जाऊन त्याला आपलेसे करण्याचा ! त्यामुळे ही दर्शन डिप्लोमसी निश्चितपणे फायदेशीर ठरू शकते. महाराष्ट्रात सध्या भाजप शिंदे गट एकत्र आलेले असले तरी…
कार्यकारी अभियंता पाडुरंग दाभाडे निवृत्त होणार
मुंबई- आपल्या चांगल्या कामाने व मनमिळावू स्वभावाने सहकारी कर्मचाऱ्यांमध्ये लोकप्रिय कार्यकारी अभियंता पांडुरंग नामदेव दाभाडे लवकरच निवृत्त होणार आहेत ते पर्जन्य जलवाहिनी विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत. 1990 साली रस्ते विभागात रुजू झालेल्या पांडुरंग दाभाडे यांनी पुढे दक्षता विभाग, इमारत कारखाने आदी विभागात काम केले. पर्जन्य जलवाहिनी शहर कार्यकारी अभियता असा यशस्वी कर्तव्य बजावले. …
