: मुंबई/ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्त्यावरचे खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी याबाबत १५दिवसात पथके तयार करण्यात येतील असे सांगितले होते . पण आता मात्र दोन ते तीन आठवड्यात खड्डे बुजविण्यासाठी काम करावे लागेल असे आयुक्त म्हणत आहे .त्यामुळे आयुक्तांनी स्वतःचाच आदेश कसा खड्ड्यात घातला असे मुंबईकर म्हणत आहेत. मुंबईच्या रस्त्यावरचे ४० हजार खड्डे बुजवल्याबद्दल पालिका प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे.पण पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत त्याचे काय? आयुक्तांनी मात्र याबाबत पावसाला तसेच मुंबईच्या वाढत्या वाहतुकीला जबाबदार धरले आहे पण कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्या मुळेच पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत याबाबत पालिका आयुक्त का बोलत नाहीत किंवा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी का लावीत नाहीत? ब्लॅक लिस्ट केलेल्या कंत्राटदारांना च पुन्हा पुन्हा रस्त्याची कामे का दिली जातात . यात पालिकेतील कोण कोणत्या अधिकाऱ्यांची आर्थिक मिली भागात आहे याची पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे मुंबईतील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे .
Similar Posts
ऑन लाईन नोंदणीची दंडेली केल्यामुळे मुंबईकरांमध्ये संतापाची लाट
मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई शहर करोना मोठा हॉट स्पॉट बनलेले असताना मुंबई महानगर पालिकेच्या लसीकरण मोहिमेचा अक्षरशः फज्जा उडाला आहे एकीकडे लसीचा तुटवडा तर दुसरीकडे लसिकरणासाठी जी ऑन लाईन नोंदणीची सक्ती करण्यात आलेली आहे त्या शक्तीमुळे लोक हैराण झालेत कारण ऑन लाईन नोंदणी करूनही अनेकांना मॅसेज च आलेला नसल्याने अनेकांना लसीकरण केंद्रावरून निराश होऊन परत…
मान्सून महाराष्ट्रात दाखल पहिल्याच पावसात मुंबईची झाली तुंबाई
मुंबई :मुंबई – महाराष्ट्रातील जनता गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पावसाची वाट पाहत होती तो पाऊस रविवारी पहाटे पासून कोसळू लागला. पहिल्याच पावसात मुंबईच्या अनेक भागात पाणी तुंबले भायखळा.,परेल,मिलन , अंधेरी आणि दहिसर सबवेत पाणी तुंबल्याने तिथली वाहतूक बंद करण्यात आली होतीभारतीय हवामान विभागानं मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा केली आहे. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश,…
दादर मधील भूखंड पालिकेने गमावला
मुंबई – पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबईतील अनेक सरकारी भूखंडावर अतिक्रमणे झालेली आहेत. आणि हे भूखंड पालिकेला गमवावे लागले आहेत . आताही दादर सारख्या मध्य मुंबईतील २ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. कारण १० वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देऊनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली नाही त्यामुळे या भूखंडावरील आरक्षण रद्द…
राजं ठाकरे यांनी घेतली जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट
ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत…
मुलुंड मध्ये अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा
मुंबई/ पालिकेच्या टी विभागातील नंदनवन इंडस्ट्रियल इस्टेट परिसरातील २० गाळ्यांच्या मागच्या व पुदच्या बाजूस करण्यात आलेले सुमारे ८ हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम पालिकेने तोडले आहे.उपयुक्त देविदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने ही कारवाई केली या कारवाईत पालिकेच्या ३५ कर्मचारी नी भाग घेतला तसेच २४ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी होते पालिकेने तीन वेळा नोटीस…
जगावर पुन्हा कोरोनाचे संकट- राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या सूचना
दिल्ली – जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले असून चीनमध्ये कोरोनाचे १० लाख रुग्ण असल्याची माहिती उघडीस आली आहे . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व राज्यांना कोरोना नियमांचे नव्याने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा अशी विंनती आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केली आहे. आज आरोग्य…
