: मुंबई/ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्त्यावरचे खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी याबाबत १५दिवसात पथके तयार करण्यात येतील असे सांगितले होते . पण आता मात्र दोन ते तीन आठवड्यात खड्डे बुजविण्यासाठी काम करावे लागेल असे आयुक्त म्हणत आहे .त्यामुळे आयुक्तांनी स्वतःचाच आदेश कसा खड्ड्यात घातला असे मुंबईकर म्हणत आहेत. मुंबईच्या रस्त्यावरचे ४० हजार खड्डे बुजवल्याबद्दल पालिका प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे.पण पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत त्याचे काय? आयुक्तांनी मात्र याबाबत पावसाला तसेच मुंबईच्या वाढत्या वाहतुकीला जबाबदार धरले आहे पण कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्या मुळेच पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत याबाबत पालिका आयुक्त का बोलत नाहीत किंवा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी का लावीत नाहीत? ब्लॅक लिस्ट केलेल्या कंत्राटदारांना च पुन्हा पुन्हा रस्त्याची कामे का दिली जातात . यात पालिकेतील कोण कोणत्या अधिकाऱ्यांची आर्थिक मिली भागात आहे याची पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे मुंबईतील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे .
Similar Posts
मुंबईत पुन्हा अग्नी तांडव कमला इमारतीला लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू १५ जखमी
मुंबई / करी रोड येथे इमारतीला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच काल भाटिया हॉस्पिटल लगतच्या कमला इमारती मधील १८ वया मजल्यावर भीषण आग लागून ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर १५ जन जखमी असून त्यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे अग्निशमन दलाच्या १२ गाड्यांनी ही आग विझवण्यासाठी अग्नी शमन दलाच्या १२ बंबांनी प्रयत्नांची शिकस्त करून आग…
निवडणुकीचा पेच
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील दोन आठवड्यात जाहीर करा हा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश कायदेशीर दृष्ट्या किती जरी योग्य आला तरी ओबीसी आरक्षना शिवाय निवडणुका होऊ द्यायचा नाहीत ही राज्यातील सर्वच राजकीय पक्षांची भूमिका पाहता निवडणुका घेण्याबाबत अडचण आहे . शिवाय पावसाळ्यात निवडणुका घेणे शक्य नाही कारण तसे केले तर पावसामुळे निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्या निवडणूक…
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ची भेट
मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आढावा घेतला व सूचना केल्या. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या 5000 सीसीटीव्हीद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते याबाबत आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार…
नाशिकमध्ये काँग्रेस तोंडघशी- बापाची माघार – बेटा अपक्ष
नाशिक – विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदार संघासाठी काँग्रेसने सुधीर तांबे याना उमेदवारी दिली होती पण त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरलेच नाही त्यांच्या ऐवजी त्यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आणि आपण महाविकास आघाडीचाच उमेदवार आहोत असे सांगू लागले इतकेच नव्हे तर पाठींब्यासाठी आपण भाजप नेत्यानाही आग्रह करणार आहोत असे सांगितले आहे त्यामुळे…
पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी विकसित केलेले तंत्रज्ञानाचा वापर
मुंबईतील रस्त्यांचा हिट फॉर्म्युला पालिका वापरनार मुंबई : मुंबई महापालिकेच्या अभियंत्याने विकसित केलेले अल्ट्रा थिन व्हाइट टॉपिंग हे तंत्रज्ञान देशात अव्वल ठरले आहे. पालिकेचे कार्यकारी अभियंता डाॅ. विशाल ठोंबरे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात रस्त्याचा पाया डांबरी रस्त्याप्रमाणे बनवता येतो, तसेच वरील भाग काँक्रीटचा असतो. आयआयटी मुंबईतून पीएच.डी. करीत असताना ठोंबरेंनी या तंत्रज्ञानावर…
इकबाल सिंग चहल याना केंद्रात प्रमोशन
मुंबई/ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अत्यंत विश्वासातील अधिकारी अशी ओळख आलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांची आता केंद्रात सचिवपदी नियुक्ती होणार आहे कोविड काळात चहल यांनी केलेल्या कामाची संपूर्ण देशाने दाखल घेतली होती त्यामुळे त्यांना केंद्राच्या अपाईटमेंट कमिटीने केंद्रात सचिव पदी बढती दिली आहे एकूण 9 अधिकाऱ्यांचे देशभरातील राज्या मधून केंद्रात प्रमोशन झाले आहे…
