: मुंबई/ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी रस्त्यावरचे खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश दिल्यानंतर पालिका आयुक्तांनी याबाबत १५दिवसात पथके तयार करण्यात येतील असे सांगितले होते . पण आता मात्र दोन ते तीन आठवड्यात खड्डे बुजविण्यासाठी काम करावे लागेल असे आयुक्त म्हणत आहे .त्यामुळे आयुक्तांनी स्वतःचाच आदेश कसा खड्ड्यात घातला असे मुंबईकर म्हणत आहेत. मुंबईच्या रस्त्यावरचे ४० हजार खड्डे बुजवल्याबद्दल पालिका प्रशासन आपली पाठ थोपटून घेत आहे.पण पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत त्याचे काय? आयुक्तांनी मात्र याबाबत पावसाला तसेच मुंबईच्या वाढत्या वाहतुकीला जबाबदार धरले आहे पण कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्या मुळेच पुन्हा पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत आहेत याबाबत पालिका आयुक्त का बोलत नाहीत किंवा रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी का लावीत नाहीत? ब्लॅक लिस्ट केलेल्या कंत्राटदारांना च पुन्हा पुन्हा रस्त्याची कामे का दिली जातात . यात पालिकेतील कोण कोणत्या अधिकाऱ्यांची आर्थिक मिली भागात आहे याची पालिका आयुक्तांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी असे मुंबईतील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी म्हटले आहे .
Similar Posts
400 अनधिकृत फेरीवाले हटविले-पालिकेच्या तीन वार्डची प्रथमच संयुक्त कार्रवाई मौलाना शौकत अली रोड वरील 400 अनधिकृत फेरीवाले हटविले
मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत संवेदनशील विभाग म्हणून संबोधल्या जाणार्या पालिकेच्या सी,डी आणि ई विभागात विभागलेल्या मौलाना शौकत अली रोड वरील जवळपास 70 अधिकारी कर्मचारी,10 वाहने यांनी 400 अनधिकृत फेरीवाले जेसीबीच्या सहाय्याने हटविल्याने अनधिकृत फेरीवाले आणि रस्यावर अनधिकृत बांधकाम करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.या कार्रवाईत अनधिकृतपणेरस्त्यावर अतिक्रमण करीत फेरीवाले,फर्निचर,लादी,भंगार चे साहित्य उभे करणा-या विक्रेत्यांवर जेसीबीच्या सहाय्याने तोड़क…
पालिकेचे सिटी ब्युटी फायर
मुंबई/सुंदर मुंबई स्वच्छ मुंबई या पालिकेच्या घोषणेनंतर मुंबई किती सुंदर आणि किती स्वच्छ झाली हे त्या परमेश्वरालाच ठाऊक ! पण आता शहरातील क्लीन अप मार्शल ना मात्र एक नवी ओळख मिळणार आहे.कारण त्यांच्या जकेटवर यापुढे क्लीन अप मार्शल ऐवजी सिटी ब्युटी फायर असे लीहले जाणार आहे.आता ही नवी ओळख तरी सफाई कामगारांच्या पचनी पडते की…
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील डिलाईरोड भागात नागरिक पाण्यासाठी त्रस्त पालिका अधिकारी सुस्त
मुंबई/ मध्य मुंबईतील मराठी माणसाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या डिलाईरोड सारख्या गिरण गावातील लोकांना पाण्यासाठी झगडावे लागते आहे ही अत्यंत शरमेची बाब आहे असे मनसेचे वार्ड क्रमांक 199 चे शाखा अध्यक्ष मारुती दळवी यांनी म्हटले आहे .याबाबत दळवी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून डिलाईरोडच्या ना म जोशी मार्गावरील गोवर्धन बिल्डिंग आणि आसपासच्या ईमारती भागात…
पोलिओ डोस कामात अनधिकृत व्यक्तीचा वावर ?
विरारमध्ये पोलिओ डोसबाबत मोठी मोहीम राबविली जात असून आरोग्यसेविका घराघरात जाऊन तपासणी व चौकशी करत असताना काही अल्पवयीन व्यक्तीची या कामावर अनधिकृतपणे बेकायदापणे नियुक्ती केल्याचे जाणवते पोलिओ डोसबाबत इमारतीत घराघरात जाऊन मार्किंग केले जात आहे. हे मार्किंग करण्याचे काम कोणतेही नियुक्तपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींकडे सोपविल्याचे विरारमध्ये पहायला मिळते. कोणतेही नियुक्तीपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या…
महापौर कार्यालयातील फाईल गहाळ भाजपची पोलिसांकडे तक्रार
मुंबई/ महापौर कार्यालयातून औषध खरेदी प्रस्तावाची जी फाईल गहाळ झाली त्या प्रकरणी भाजपने सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून या प्रकरणात महापौर कार्यालयातील सर्वांची चौकशी होणार आहे.पालिका रुग्णालय आणि दवाखाने यांच्यासाठी औषध खरेदी बाबतचा एक प्रस्ताव स्थायी समिती मधील काही जेष्ठ नगरसेवकांनी त्रुटी दाखवून उपसूचना पुन्हा महापौर कार्यालयाकडे पाठवला होता पण तो तिथे ८ महिने…
लसीचे दोन डोस घेऊनही त्यांना कोरोनाणें गाठले के ई एम च्या २२ वैद्यकीय विद्यार्थ्यांना करोना
मुंबई/ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभर मोठ्या प्रमाणावर मोफत लसीकरण मोहीम राबवली जात आहे मात्र लसीचे दोन डोस घेऊनही के ई एम मधल्या २२वैद्यकीय विद्यार्थ्यांना करोना झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून या सर्वांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .या घटनेनंतर सरकारची चिंता वाढली असून मास्क वापरण्या बाबत कुणीही हलगर्जीपणा करू नये तसेच सरकारने जी…
