पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरूढ वक्तव्य करीत असल्याने आघाडीत सध्या ताळमेळ नसल्याचे दिसत आहे . त्यातच मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हटल्यामुळे कोंग्रेस राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली होते आणि आता संजय राऊत यांच्या या विधांनाणे आणखीनच दुरावा वाढण्याची शक्यता आहे . दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची जी स्वतंत्र भेट घेतली त्याकडेही कोंग्रेस राष्ट्रवादी चे नेते संशयाने बघत आहेत
Similar Posts
शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
पुणे: अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन करत ,कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा…
पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात
नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी विरोध केल्यामुळे सावरकर प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी नाशिक मध्ये ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले आहेत शिवाय त्यांच्या या तीव्र विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवाब मलिक याना ३ मार्च पर्यंत ई डी कोठडी
मुंबई/ महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन ठेपलेल्या आहे .कारण कुर्ल्यातील जमीन घोटाळा प्रकरणी काल ई डी ने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे आणि 7 तासाच्या चौकशीनंतर अटक केली. न्यायालयाने मलिक यांना 3 मार्च पर्यंत ई डी कोठडी दिली आहे. दरम्यान या कारवाईच्या…
बुधवारपासून स्वामी समर्थच्या व्यावसायिक कबड्डीचा आवाज – बलाढ्य 12 संघ एकमेकांशी भिडणार
मुंबई, दि. ५ (क्री.प्र.)- एकापेक्षा एक कबड्डीपटू… शेरास सव्वाशेर असे तगडे संघ… कबड्डीचा आवाज वाढवणारा दमदार सोहळा… एकेका गुणासाठी चढाई- पकडींची होणारी ठस्सन… संघांना लक्षाधिश करणारे मान आणि सन्मान… कबड्डीपटू,कबड्डीप्रेमी आणि कबड्डी संघटकांना प्रेमात पाडणारे दिमाखदार आयोजन… सारेच काही एका मॅटवर पाहण्याची रोमहर्षक संधी कबड्डीप्रेमींना लाभणार आहे ती प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या कबड्डी स्पर्धेत….
आबू आझमी तपास यंत्रणांच्या रडारवर
मुंबई/ समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी हे आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्या मुंबई लखनौ सह 20 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात काही बेहिशोबी मलमतेबाबत ची माहिती आयकर विभागला मिळाल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता ते ई डी सारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते .
