पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप ; वीरमाता अनुराधा गोरे यांचा सणसणीत ‘प्रहार’ ; रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अखंड भारताची फाळणी झाली आणि २० ऑक्टोबर १९४७ पासून पाकिस्तान समवेत प्रदीर्घ युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून आपला प्रदेश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. अन्यथा पाकव्याप्त कश्मीर हे दुखणे भारतीय लष्कराने तेंव्हाच मिटविले असते, अशा शब्दांत कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले प्रखर विचार मांडले. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या’ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन मागाठाणे पोलीस चौकी जवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी, साहित्यिक मंगलाताई खाडिलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या शुभहस्ते कोविडप्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले. यावेळी बोलतांना अनुराधा गोरे यांनी आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांची माहिती आपल्याला नसावी, याबद्दल खंत व्यक्त केली. आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले. रेखाताई बोऱ्हाडे यांच्या पुस्तकातील लिखाणाचे तोंडभरून कौतुक करुन अनुराधा गोरे यांनी पैशांपेक्षा खरी श्रीमंती कशात आहे, हे रेखाताईंनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे असेही सांगितले. मंगलाताई खाडिलकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात रेखाताई बोऱ्हाडे यांच्या लेखनशैली चा मुक्तकंठाने गौरव करुन हे लिखाण आपल्या ह्रुदयातून आले असल्याने ते अतीशय उत्तम झाले आहे, अशा शब्दांत शाबासकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात रेखाताईंनी कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई, रेखाताईंच्या भगिनी लताताई पाटील यांचीही रेखिताईंच्या कार्याला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. रेखाताईंनी आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीची मिमांसा आणि आपला प्रवास थोडक्यात सांगून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे सुहास मांजरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. श्री. बसवंत यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. मिथून पाटील यांनी सूत्रसंचालन तर कन्या सौ. शिवानी बोऱ्हाडे धुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Similar Posts
विरोधी पक्षांची सरकारे पाडनारे हे तर सिरीयल किलर- केजरीवाल यांचा केंद्रावर आरोप
दिल्ली/ भाजपने केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा,मणिपूर,बिहार आणि मेघालय इथली सरकार पडली आहेत . त्यासाठी साडेपाच हजार कोटी खर्च करून 277 आमदार विकत घेतले असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा सरकारवर केला आहे .अबकारी धोरण बदलल्यपासून भाजप आणि आम्आदमी पक्षात वाढ सुरू झाले . त्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या घरावर ई…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईदादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलिसांची मुजोरी
मुंबई/ रेल्वेचे सर्वाधिक गर्दीचे स्टेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दादर रेल्वे स्थानकात टॅक्सीवाले आणि वाहतूक पोलीस यांच्या मुजोरी मुळे प्रवासी खूप, हैराण, ,झाले आहेत . कारण दादर पूर्व परिसरात रेल्वे स्थानकाच्या नजदीक,असलेल्या टॅक्सी स्टँड वर जवळची म्हणजेच परेल,नायगाव भोईवाडा येथील भाडी टॅक्सीवाले घेत नाहीत वास्तविक भाडे नाकारणे हा कायद्याने गुन्हा आहे तरी जवळचे भाडे घेतले जात…
रायगड भुषण किशोर गायकवाड यांचा वाढदिवशी सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन; दिग्गजांची उपस्थितीती! सामाजिक क्षेत्रात गायकवाड यांचा ठसा!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील डिकसल येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा रिपाइं (आठवले) गटाचे तालुका उपाध्यक्ष यांचा वाढदिवशी डिकसल परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा हस्ते पार पडले आहे. यावेळी या वाढदिवसा निमित्त लहानशा चिमुकल्याचा जीवावर उदार होवुन जीव वाचविणारे शुरवीर मयुर शेळके याचा तसेच नेरळचे नवनिर्वाचित…
बाप्पा निघाले- विसर्जनासाठी 18000 पोलिसांची सुरक्षा
मुंबई – आज अनंत चतुर्थी आहे . शहरातील छोट्या मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे आज विसर्जन होणार आहे . मुंबईत विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणूक निघतात . या मिरवणुकांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि विसर्जनाला गालबोट लागू नये म्हणून मुंबईत प्रचंड सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. राज्य राखीव दलाच्या १८ तुकड्यांसह मुंबई पोलीस दलातील १८ हजार…
भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहेइंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न…
गद्दारी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला दुग्ध विकास मंत्र्यांची कार्यकर्त्यांना चिथावणी
नागपूर/ आजकाल राजकीय नेत्यांना कोणताही ताळतंत्र राहिलेला नाही किमान मंत्रीपदावर असलेल्या नेत्याने तरी संयम राखायला हवा पण तेही नाही मंत्रीही बेलगाम झाले आहेत .काँग्रेसच्या एका मंत्र्याने चक्क पक्ष कार्यकर्त्यांना चिथावणी दिली आहे की कुठल्याही काँग्रेस नेत्याने पक्षात गदारी केली की सरळ त्याला लाथा घाला पुढचं मी बघेननागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेवाळ्यात विकास मंत्री आणि काँग्रेसचे नेते…
