पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप ; वीरमाता अनुराधा गोरे यांचा सणसणीत ‘प्रहार’ ; रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अखंड भारताची फाळणी झाली आणि २० ऑक्टोबर १९४७ पासून पाकिस्तान समवेत प्रदीर्घ युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून आपला प्रदेश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. अन्यथा पाकव्याप्त कश्मीर हे दुखणे भारतीय लष्कराने तेंव्हाच मिटविले असते, अशा शब्दांत कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले प्रखर विचार मांडले. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या’ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन मागाठाणे पोलीस चौकी जवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी, साहित्यिक मंगलाताई खाडिलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या शुभहस्ते कोविडप्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले. यावेळी बोलतांना अनुराधा गोरे यांनी आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांची माहिती आपल्याला नसावी, याबद्दल खंत व्यक्त केली. आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले. रेखाताई बोऱ्हाडे यांच्या पुस्तकातील लिखाणाचे तोंडभरून कौतुक करुन अनुराधा गोरे यांनी पैशांपेक्षा खरी श्रीमंती कशात आहे, हे रेखाताईंनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे असेही सांगितले. मंगलाताई खाडिलकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात रेखाताई बोऱ्हाडे यांच्या लेखनशैली चा मुक्तकंठाने गौरव करुन हे लिखाण आपल्या ह्रुदयातून आले असल्याने ते अतीशय उत्तम झाले आहे, अशा शब्दांत शाबासकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात रेखाताईंनी कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई, रेखाताईंच्या भगिनी लताताई पाटील यांचीही रेखिताईंच्या कार्याला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. रेखाताईंनी आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीची मिमांसा आणि आपला प्रवास थोडक्यात सांगून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे सुहास मांजरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. श्री. बसवंत यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. मिथून पाटील यांनी सूत्रसंचालन तर कन्या सौ. शिवानी बोऱ्हाडे धुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Similar Posts
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअभिनेते विजय कदम यांना दादा कोंडके पुरस्कार ; जागतिक रंगभूमी दिनी शानदार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या ह्रुदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नांवाने देण्यात येणारा पहिला दादा कोंडके पुरस्कार ख्यातनाम विनोदी अभिनेते विजय कदम यांना जाहीर करण्यात आला. ‘अवतरण अकादमी’च्या विद्यमाने जागतिक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय11 तारखेच्या न्यायालयीन सुनावणी नंतर मुहूर्त अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक – मंत्रिमंडळाचे गठण लांबणीवर
मुंबई/ बंडखोर आमदारांच्या पात्र अपात्र तेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतरच मंत्री मंडळाचे गठण होणार आहे.त्यामुळे 11 तारखेच्या नंतरच मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल असे दिसतेमहाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले आहे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचा शपथविधी झालेला आहे शिवाय सरकारने विश्वास दर्शक ठराव सुधा जिंकलेला आहे आता फक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयप्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
मुंबई- मुंबई बँक निवडणुकीतील मजूर प्रवर्ग प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा अटक पूर्व जमीन अर्ज आज सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र त्याना मंगळवार पर्यंत अटक करू नये असे आदेश दिले आहेत. प्रवीण दरेकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्चं न्यायालयात जाणार आहेत.प्रवीण दरेकर यांनी ट्रेंड युनियनच्या बनावट सदस्यत्वाचा वापर करून, मुंबई बँकेचे संचालकपद…
शिक्षणाच्या आयचा घो!-बाल भारतीची नवी कोरी लाखो पुस्तके रद्दीत विकण्याचा निर्णय- शिक्षणमंत्री अंधारात?
मुंबई/शिक्षण हा भावी आयुष्याचा पाया आहे असे म्हटले जाते.आणि ते खरेच आहे.कारण शिक्षण घेतले तरच माणसाला पुढे नोकरी धंदा मिळतो आणि स्वतःच्या पायावर उभे राहता येते.सध्या कोरोंनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत .त्यामुळे बालभारतीने चक्क नवीन छापलेली अभ्यासक्रमाची लाखो पुस्तकेच रद्दीत काढण्याचा निर्णय घेला आहे त्यांच्या या निर्णयामुळे शैक्षणीक वर्तुळात मोठी खळबळ माजली आहेपाठ्य पुस्तकात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता…
