पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप ; वीरमाता अनुराधा गोरे यांचा सणसणीत ‘प्रहार’ ; रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अखंड भारताची फाळणी झाली आणि २० ऑक्टोबर १९४७ पासून पाकिस्तान समवेत प्रदीर्घ युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून आपला प्रदेश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. अन्यथा पाकव्याप्त कश्मीर हे दुखणे भारतीय लष्कराने तेंव्हाच मिटविले असते, अशा शब्दांत कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले प्रखर विचार मांडले. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या’ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन मागाठाणे पोलीस चौकी जवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी, साहित्यिक मंगलाताई खाडिलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या शुभहस्ते कोविडप्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले. यावेळी बोलतांना अनुराधा गोरे यांनी आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांची माहिती आपल्याला नसावी, याबद्दल खंत व्यक्त केली. आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले. रेखाताई बोऱ्हाडे यांच्या पुस्तकातील लिखाणाचे तोंडभरून कौतुक करुन अनुराधा गोरे यांनी पैशांपेक्षा खरी श्रीमंती कशात आहे, हे रेखाताईंनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे असेही सांगितले. मंगलाताई खाडिलकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात रेखाताई बोऱ्हाडे यांच्या लेखनशैली चा मुक्तकंठाने गौरव करुन हे लिखाण आपल्या ह्रुदयातून आले असल्याने ते अतीशय उत्तम झाले आहे, अशा शब्दांत शाबासकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात रेखाताईंनी कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई, रेखाताईंच्या भगिनी लताताई पाटील यांचीही रेखिताईंच्या कार्याला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. रेखाताईंनी आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीची मिमांसा आणि आपला प्रवास थोडक्यात सांगून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे सुहास मांजरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. श्री. बसवंत यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. मिथून पाटील यांनी सूत्रसंचालन तर कन्या सौ. शिवानी बोऱ्हाडे धुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Similar Posts
करोना काळातील पालिकेच्या 12 हजार कोटींच्या घोटाळ्याची कॅग कडून चौकशी होणार
मुंबई/ कोरॉना काळात मुंबई महापालिकेत 12 हजार कोटींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश सरकारने कॅगला दिलेत त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग (कंट्रोल ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. कोरोना काळात लोकांची गैरसोय होऊ…
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
हेलिकॉप्टर किती सुरक्षित?
भारताचे हवाई दल हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असल्याचे सांगितले जाते. आणि हवाई दलाकडे वेगवेगळ्या प्रकारची लढाऊ आणि मालवाहू विमाने तसेच हेली कॉफ्टर आहेत त्यातील बहुतेक ही विदेशी बनावटीची असल्याने तांत्रिकदृष्ट्या ती परिपूर्ण आहेत. असे असतानाही लष्कराच्या हेली कॉफ्टरणा वारंवार अपघात होणे ही खरोखरच चिंतेची बाब म्हणावी लागेल.बुधवारी तामिळनाडू मधील कुन्नुर येथील भीषण अपघाताने पुन्हा एकदा…
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात प्रकृती चिंताजनक
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागलं.. त्यानंतर त्यांना माहीमच्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोहर जोशी यांच्यावर आयसीयु मध्ये उपचार सुरू आहेत अशी माहिती मिळते.थोड्याच वेळात हिंदुजा रुग्णालयाकडून अधिकृत माहिती देखील दिली जाणार आहे. दरम्यान, जोशी यांची विचारपूस करण्यासाठी उद्धव…
हिंदुत्वाची लढाई तीव्र राज ठाकरे अयोध्येला जाणार
मुंबई/ सेना भाजप मध्ये सुरू झालेल्या हिंदुत्वाचा लढाईत आता मनसेने उडी घेतलेली असल्याने ही लढाई आता अधिक तीव्र होणार आहे.तर हिंदूंना आता तयारीत रहा अशी साद घालून राज ठाकरे येत्या 5 तारखेला अयोध्येला जायला निघालेले आहेत त्यामुळे वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहेमनसेने मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी 3 तारखेपर्यंत चां altumetam दिला आहे टी तारखेला भोंगे उतरवले…
दादर मध्ये मनसे विरूद्ध शिवसेना पुन्हा संघर्ष उफळणार
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शहराच्या प्रमुख भागात नाका तिथे शाखा ही संकल्पना राबवण्याचा आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिला होता त्यानुसार मनसेचे कार्यकर्ते तयारीला लागले आहेत.त्यानुसार शिवसेना ठाकरे गटावर दबाव वाढवण्यासाठी मनसेने सेना भवनाच्या जवळ असलेल्या जिप्सी हॉटेल जवळ शाखा उघडण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांच्या १४ जून रोजी वाढ दिवशी स्वतः राज ठाकरे…
