पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप ; वीरमाता अनुराधा गोरे यांचा सणसणीत ‘प्रहार’ ; रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अखंड भारताची फाळणी झाली आणि २० ऑक्टोबर १९४७ पासून पाकिस्तान समवेत प्रदीर्घ युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून आपला प्रदेश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. अन्यथा पाकव्याप्त कश्मीर हे दुखणे भारतीय लष्कराने तेंव्हाच मिटविले असते, अशा शब्दांत कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले प्रखर विचार मांडले. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या’ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन मागाठाणे पोलीस चौकी जवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी, साहित्यिक मंगलाताई खाडिलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या शुभहस्ते कोविडप्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले. यावेळी बोलतांना अनुराधा गोरे यांनी आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांची माहिती आपल्याला नसावी, याबद्दल खंत व्यक्त केली. आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले. रेखाताई बोऱ्हाडे यांच्या पुस्तकातील लिखाणाचे तोंडभरून कौतुक करुन अनुराधा गोरे यांनी पैशांपेक्षा खरी श्रीमंती कशात आहे, हे रेखाताईंनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे असेही सांगितले. मंगलाताई खाडिलकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात रेखाताई बोऱ्हाडे यांच्या लेखनशैली चा मुक्तकंठाने गौरव करुन हे लिखाण आपल्या ह्रुदयातून आले असल्याने ते अतीशय उत्तम झाले आहे, अशा शब्दांत शाबासकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात रेखाताईंनी कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई, रेखाताईंच्या भगिनी लताताई पाटील यांचीही रेखिताईंच्या कार्याला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. रेखाताईंनी आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीची मिमांसा आणि आपला प्रवास थोडक्यात सांगून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे सुहास मांजरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. श्री. बसवंत यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. मिथून पाटील यांनी सूत्रसंचालन तर कन्या सौ. शिवानी बोऱ्हाडे धुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Similar Posts
शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवरगुन्हा दाखल करणार – देवेंद्र फडणवीस
मुंबई -: शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे, तर शेतकऱ्यांच्या सिबील स्कोरचा बाऊ करण्याऱ्या बँकांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत.सरकारची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषीमंत्र्यांनी सर्व…
आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते वानखेडे यांची क्रुझ वरील रेड ही बोगस होती तसेच ते मुस्लिम आहेत त्यांचा पहिला विवाह मुस्लिम पद्धतीने झाला होता त्यांची आई वडील आणि पहिली पत्नी मुस्लिम होती त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट सुधा बनावट होते असा आरोप करून त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.शिवाय…
ताज्या बातम्या | नवी मुंबई | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईमुंबईतील पालिकेची निवडणूक पावसाळ्यानंतर
मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायलयाने एक महत्वाचा आदेश दिला आहे त्यानुसार ज्या भागात कमी पाऊस पडतो त्या भागात तत्काळ निवडणुका घ्याव्यात आणि ज्या भागात अधिक पाऊस पडतो त्या भागात पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यात आले आहेत . त्यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर होणार आहेत कारण तिथे कमी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे दरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शिवसेनेला या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहेसंभाजी राजे यांनी हातावर शिवबंधन बांधण्यास…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जेल मधील मुक्काम वाढणार
दिल्ली – अनिल देशमुख प्रकरणाचा तपास सीबीआय कडून काढून काढून घ्यावा आणि तो एस आय टी कडे सोपवावा अशी मागणी करणारी राज्या सरकारची याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली . त्यामुळे हा तपास यापुढे सीबीआय कडेच राहणार आहे . सरकारला हा फार मोठा धक्का आहे.१०० कोटींची खंडणी आणि पोलिसांच्या बदल्या व नियुक्त्या यांमध्ये घोटाळा केल्या प्रकरणी…
रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे आज प्रकाशन ; वीरमाता अनुराधा गोरे आणि मंगलाताई खाडिलकर यांचे मार्गदर्शन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, राजा शिवछत्रपती परिवारच्या मुंबई संपर्क प्रमुख सौ. रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या विविध लेखांचा संग्रह असलेले ‘ओंजळीतील फुले’ हे पुस्तक उद्या, शनिवार, २३ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात येऊन एका छोटेखानी समारंभात प्रकाशित करण्यात येणार आहे. शहीद…
