पाकव्याप्त कश्मीर हे तत्कालीन सरकारच्या धोरणाचे पाप ; वीरमाता अनुराधा गोरे यांचा सणसणीत ‘प्रहार’ ; रेखाताई बोऱ्हाडे यांच्या ‘ओंजळीतील फुले’ पुस्तकाचे शानदार प्रकाशन मुंबई, दि. (प्रतिनिधी) : अखंड भारताची फाळणी झाली आणि २० ऑक्टोबर १९४७ पासून पाकिस्तान समवेत प्रदीर्घ युद्ध झाले. या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून आपला प्रदेश मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्कालीन सरकारच्या बोटचेप्या धोरणामुळे भारतीय सैन्याला माघार घ्यावी लागली. अन्यथा पाकव्याप्त कश्मीर हे दुखणे भारतीय लष्कराने तेंव्हाच मिटविले असते, अशा शब्दांत कँप्टन विनायक गोरे यांच्या मातोश्री आणि ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ वीरमाता अनुराधा गोरे यांनी आपले प्रखर विचार मांडले. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई बोऱ्हाडे यांनी लिहिलेल्या’ओंजळीतील फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन मागाठाणे पोलीस चौकी जवळील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या शानदार समारंभात वीरमाता अनुराधा गोरे, सुप्रसिद्ध संवादिनी, साहित्यिक मंगलाताई खाडिलकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांच्या शुभहस्ते कोविडप्रतिबंधक नियमांचे पालन करुन करण्यात आले. यावेळी बोलतांना अनुराधा गोरे यांनी आपल्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर प्राणांची बाजी लावून लढणाऱ्या आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांची माहिती आपल्याला नसावी, याबद्दल खंत व्यक्त केली. आजही देशासाठी सीमेवर लढण्याची गरज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सैन्यात भरती व्हावे असे आवाहन ही त्यांनी केले. रेखाताई बोऱ्हाडे यांच्या पुस्तकातील लिखाणाचे तोंडभरून कौतुक करुन अनुराधा गोरे यांनी पैशांपेक्षा खरी श्रीमंती कशात आहे, हे रेखाताईंनी आपल्या पुस्तकातून दाखवून दिले आहे असेही सांगितले. मंगलाताई खाडिलकर यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणात रेखाताई बोऱ्हाडे यांच्या लेखनशैली चा मुक्तकंठाने गौरव करुन हे लिखाण आपल्या ह्रुदयातून आले असल्याने ते अतीशय उत्तम झाले आहे, अशा शब्दांत शाबासकी दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात रेखाताईंनी कोरोनाच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याची माहिती देऊन त्यांचे नवीन भूमिकेबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख मनोहर देसाई, रेखाताईंच्या भगिनी लताताई पाटील यांचीही रेखिताईंच्या कार्याला शुभेच्छा देणारी भाषणे झाली. रेखाताईंनी आपल्या प्रास्ताविकात पुस्तकाच्या निर्मितीची मिमांसा आणि आपला प्रवास थोडक्यात सांगून समाजाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस दलात उत्कृष्ट सेवा बजावणारे सुहास मांजरे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. श्री. बसवंत यांनी त्यांच्या वतीने सत्कार स्वीकारला. मिथून पाटील यांनी सूत्रसंचालन तर कन्या सौ. शिवानी बोऱ्हाडे धुळे यांनी आभार प्रदर्शन केले.
Similar Posts
गडकरींच्या लेटर बॉम्ब नंतर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
मुंबई/ वाशिम जिल्ह्यात रस्त्यांच्या कामात शिवसेना कार्यकर्त्यांनी अडथळे आणल्यामुळे कामे रखडत आहेत ही बाब केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री समजताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता चौकशीचे आदेश दिलेले आहेत.दरम्यान या घटनेची काँग्रेसने सुधा गंभीर दखल घेतली असून या मुद्द्यावर गडकरींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय…
छत्रपती संभाजीनगर’ नामांतराचा स्टेटस ठेवल्यामुळे- कुटूंबियांना मारहाण
औरंगाबाद – जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर झाले आहे. केंद्र सरकारकडून या निर्णयाला मंजरी देण्यात आली. बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा गावात ही घटना घडली आहे. रुपेश गायकवाड यांनी आपल्या मित्राने ठेवलेले छत्रपती संभाजीनगर नावाचे व्हाट्सअप स्टेटस आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करून ठेवले होते. हे व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गायकवाड यांच्या घरावर ओळखीच्या 13…
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नवीन कामगार कायद्यांबाबत कार्यकर्त्यांसाठी महत्वपूर्ण कार्यशाळा संपन्न
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने ४४ कामगार कायद्याचे रूपांतर चार लेबर कोडमध्ये केले आहे. ऑक्टोबर २०२१ पासून देशभर हे नवीन लेबर कोड लागू होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर इंडियन इन्स्टिट्युट ऑफ वर्कर्स एज्युकेशनच्या सहकार्याने मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईस युनियनने ४ ऑक्टोबर २०२१ रोजी बलार्ड पिअर येथील मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप सभागृहात कामगार…
महाराष्ट्रातील सहकार चळवळीला दिशा मिळेल
भाजपा विधानपरिषद गटनेतेआ. प्रविण दरेकरांना विश्वास पुणे- ‘सकाळ’ माध्यम समुहातर्फे पुण्यात बॅंकिंग व साखर उद्योगासाठी दोन दिवसीय ‘सहकार महापरिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. आज या महापरिषदेचे उदघाटन माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकरही उपस्थित होते. या महापरिषदेत बोलताना आमदार प्रविण दरेकर यांनी शरद पवार आणि…
पुण्यातील शाळेत ६० विध्यार्थ्यांना किचडीतून विषबाधा
पुणे – पुण्याच्या हुतात्मा राजगुरूविद्यालयात ६० विध्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याने खळबळ माजली आहे या सर्व विध्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी चौकशीचे आदश देण्यात आले आहेत राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचं आरोग्य नीट राहवं म्हणून यात कडधान्यदेखील दिले जातात. मात्र विद्यार्थ्यांना दुपारी शाळेत दिलेला पोषण आहारच त्यांच्यासाठी…
करोनाचा मृत्युदर नियंत्रणात ठेवण्यात डॉक्टरांचे योगदान अद्भुत’ – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी — कृतज्ञता सोहळ्यात राज्यपालांकडून नामवंत डॉक्टरांचा राजभवन येथे सत्कार-
जगात करोनाचे थैमान सुरु असताना भारतात कदाचित सर्वाधिक मृत्युदर राहील अशी परिस्थिती होती. परंतु पीपीई किट परिधान करून डॉक्टर्स, निवासी डॉक्टर तसेच नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मी यांसह सर्व करोना योद्ध्यांनी समर्पण भावनेने अद्भुत काम केल्यामुळेच देशातील मृत्युदर नियंत्रणात राहिला असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारींच्या पुढाकाराने राजभवन येथे आयोजित ‘कृतज्ञता’…
