: मुंबई – सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गंभीर आरोप करून त्यांना ईडी च्या तावडीत देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र सोमय्यानं येवढी माहिती कुठून मिळते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती .अखेर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करताना या सगळ्या मागे रामदास कदम असल्याचे संगितले .रामदास कदम यांचा एक खास माणूस आणि सेनेचा कार्यकर्ता प्रसाद कर्वे यानेच आर टी आय च्या माध्यमातून माहिती कडून ती किरीट सोमय्या यांना पुरवली .त्यामुळेच बेहिशोबी मालमतेमधून अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट उभा राहिला . त्याची माहिती सोमय्यानं देण्यात आली असे खेडेकर यांनी संगितले .मात्र रामदास कदम यांनी खेडेकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत . तर या घटनेमुळे कोकणातील शिवसेनेत मोठी खळबळ मजली आहे
Similar Posts
गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेची समुद्रात लक्ष्मण रेषा
मुंबई/गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेक जण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी प्रयत्न करतात. यामध्ये अपघाताचा धोका असतो, शिवाय नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात. यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित करण्यात येणार आहे. त्यामुळे अगदी खोलवर विसर्जन होऊ शकणार नाहीमुंबई महापालिकेच्या…
स्वामी समर्थ श्रीचा विश्वनाथ विजेता
मुंबईच्या स्पर्धेवर ठाण्याचे वर्चस्व, महिलांच्या शरीरसौष्ठवात मनिषा हळदणकर अव्वल मुंबई, दि. ११ (क्री.प्र.)- खेळाडूंना आपल्या कष्टाची किंमत आणि आदर देणार्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सांगलीचा विश्वनाथ बकाली विजेता ठरला. आमदार महेश सावंत यांच्या कल्पनेतून झालेल्या या थरारक स्पर्धेत दिव्यांगांच्या गटात रत्नागिरीच्या गणेश गोसावीने तर महिलांच्या गटात ठाण्याच्या मनिषा…
राज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजना ही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कणेरी मठ येथील संत समावेश कार्यक्रमात उपस्थित प्रबोधनकारांना आवाहन देशी गायींना पालनपोषणासाठी प्रति दिन 50 रू. आणि राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान कोल्हापूर, (जिमाका) : राज्य शासनाने गोरगरीबांसाठी, महिलांसाठी तसेच जेष्ठांसाठी, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले. अशा या योजना राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनातून करावे असे आवाहन…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपुन्हा अंबानी कुटुंब टार्गेट- ठार मारण्याची धमकी
मुंबई/ भारतातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे त्यामुळे उद्योग जगतात मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी दहिसर मधून एका संशयिताला अटक केली आहेसंपूर्ण देश काल स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत होता याच दरम्यान सकाळी 8 चां सुमारास रिलायन्स फाउंडेशनच्या मुंबईतील रुग्णालयात फोन आला आणि फोन करणाऱ्याने…
डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हाधिकारीपदी रुजू! ठाणे, चंद्रपुर, अकोला येथे केले वैशिष्ट्यपूर्ण काम! मावळत्या जिल्हाअधिकाऱ्यांनी केले स्वागत!
रायगड(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी सौ.निधी चौधरी यांची बदली झाल्याने रायगड जिल्हाधिकारी पदाची सुत्रे आज डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्वीकारली आहेत. रायगडचा पुर्व जिल्हाअधिकारी सौ. निधी चौधरी यांनी आज रायगड जिल्हाअधिकारी पदी रुजु झालेले नवीन जिल्हाअधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांचे स्वागत केले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणून काम केले आहे. भाप्रसे…
आठवड्यातून ३ दिवस मंत्रालयात थांबा – मुख्यमंत्र्यांचे सर्व खात्याच्या मंत्र्यांना आदेश
मुंबई – राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर या सरकारचा कारभार लोकाभिमुख व्हावा म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत . त्यानुसार आठवड्यातून किमान ३ दिवस तरी मंत्र्यांनी मंत्रालयात थांबावे असे आदेश सर्व मंत्र्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सर्व मंत्र्यांना मुंबईत थांबणे आणि मंत्रालयात येणाऱ्या लोकांची कामे करणे बंधनकारक असेलराज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची…
