; शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे कथन केले गमक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेंव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगताना दंतकथांमुळे ज्या घटना घडल्याच नाहीत त्या घटना लोकांमध्ये पसरविण्यात येत आहेत, असे परखडपणे सांगितले. मातीसाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर मातीसाठी कसे मरावे, हे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, लेझीम पथक, तुतारी वादन, लहान मुलांच्या वेशभूषा, रांगोळ्या, ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे हा शिवजन्मोत्सव आयोजित केला होता. संघटनेचे अध्यक्ष शांताराम रामचंद्र चाळके, उपाध्यक्ष संजय विठोबा चव्हाण, सरचिटणीस राजेश गजानन दाभोळकर, सल्लागार सुबोध सखाराम सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.
Similar Posts
मुंबईत आज २७४ कोरोना बाधितांची नोंद
मुंबई – एकीकडे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना मुंबईतील रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. आज मुंबईत नवीन २७४ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर२१६ रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी आज 13 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईत आज कोरोनामुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही.मुंबईत एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1635 वर पोहोचली आहे. आतापर्यंत रुग्णालयात…
दुध भेसळखोरांविरोधात कठोर कारवाईसाठी राज्याचा स्वतंत्र कायदा करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्ह्यासाठी केंद्राला शिफारस करणार मुंबई, दि. 25 : – दुध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध…
राजने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! महायुतीत शिंदे एकाकी
मुंबई /सतत दिल्ली दरबारी धाव घेऊन आपले महत्व वाढवण्याचा खटाटोप करणाऱ्या उपमुखमंत्री शिंदे यांना, फडणवीसांनी जबरदस्त शह देत ठाकरे बंधुशी संपर्क वाढवलाय. त्यामुळे शिंदेंची राजकीय कोंडी झालीय.आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरें यांना फोन केला होता.तर दुसरीकडे सर्व जागा आम्हीच जिंकू . ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये आमचाच महापौर असेल असे म्हणत…
रात्री दहाच्या आत होळी पेटवावी लागणार -डी जे वर बंदी होळी वर कडक निर्बंध
मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.मात्र कोरोनचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी करीन करोना पूर्णपणे गेलेला नाही म्हणूनच यंदाही होळी वर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार यंदा दहाच्या आता होळी पेटवावी लागणार आहे तसेच डिजे वर बंदी घालण्यात आली आहेकरोना आता जवळपास गेलेला आहे .मात्र…
मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार –मला थोडा वेळ द्या हा प्रश्न आपण अभ्यास करून नक्कीच सोडवू–राष्ट्रपती
दिल्ली/ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाची जी कोंडी झाली होती ती आता राष्ट्रपतींच्या भेटीनंतर फुटण्याची शक्यता आहे काल संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली . यावेळी राष्ट्रपतींनी या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काल सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले यावेळी संभाजी राजे यांनी…
कारण जोहरच्या पार्टीत दुसऱ्यांदा कोरोनाचा उद्रेक- अनेक सेलिब्रेटींना करोनाची लागण
मास्क बाबतचा निर्णय 15 दिवसात!मुंबई/ करोना पुन्हा एकदा भारतात परतला असून देशात 24 700 करोना रुग्णांची नोट झाली आहे . तर महाराष्ट्रात दिवसालाजवळपास दीड हजार करोना बधितांची नोंद होत आहे त्यामुळे येत्या 15 दिवसात मास्क सक्तीचा निर्णय सरकार घेणार आहे असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले .करेनाची वाढती लोकसंख्या पाहता गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स…
