; शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे कथन केले गमक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेंव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगताना दंतकथांमुळे ज्या घटना घडल्याच नाहीत त्या घटना लोकांमध्ये पसरविण्यात येत आहेत, असे परखडपणे सांगितले. मातीसाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर मातीसाठी कसे मरावे, हे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, लेझीम पथक, तुतारी वादन, लहान मुलांच्या वेशभूषा, रांगोळ्या, ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे हा शिवजन्मोत्सव आयोजित केला होता. संघटनेचे अध्यक्ष शांताराम रामचंद्र चाळके, उपाध्यक्ष संजय विठोबा चव्हाण, सरचिटणीस राजेश गजानन दाभोळकर, सल्लागार सुबोध सखाराम सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.
Similar Posts
बांद्रा ईस्टमध्ये मोठी बुलडोझर कारवाई
मुंबई — देवेंद्र फडणवीस यांच्या राज्य सरकार महापालिकेतल भाजप नेतृत्वात आता “भू-माफिया” व अवैध अतिक्रमणाविरोधात कठोर पावले उचलली जात असल्याची भूमिका मुंबईत पुन्हा एकदा समोर आली. बांद्रा टर्मिनसच्या कामाला अडथळा आणणाऱ्या अवैध बांधकामांवर न्यायालयीन आदेशानुसार आणि रेल्वे अधिकार्यांच्या परवानगीने बांद्रा (बांडा) ईस्टमधील सुमारे 8 एकर भूभागावर मोठ्या प्रमाणावर तोडफोड व हटवणे कार्यवाही सुरू करण्यात आली…
लोकार्पण सोहळा : संकल्प जनकल्याणाचा
मुंबई, : “लोकार्पण सोहळा.. संकल्प जनकल्याणाचा..” या घोषणेखाली शिवसेना उपनेते व आमदार श्री. मनोज जामसुतकर यांच्या हस्ते डॉ. बाळासाहेब आंबेडकर मार्ग, पेनिनसुला (सेल्सेट २७) येथील नवनिर्मित ‘दिवंगत कै. शरद (आप्पा) केशव पवार उद्यान (नियोजित)’ आणि करमणूक केंद्राचे भव्य उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभाग क्रमांक-२०८ चे नगरसेवक रमाकांत रहाटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण…
रखडलेल्या प्रकल्पांबाबत आयुक्तांना आदित्यचे पत्र
ठाकरे – शिंदे गटात विकासकामांच्या श्रेयवादावरून लढाईमुंबई – पंतप्रधान मोदी हे १९ जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत . या दौऱ्यात त्यांच्या हस्ते पालिकेच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे . मात्र यातील काही कामे महाविकास आघाडीच्या काळात सुरु झाली आहेत . पण आता मात्र ती रखडली आहेत . या रखडलेल्या कामांबाबत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी…
मुख्यमंत्रिपदावरून दोन नेत्यांमध्ये संघर्ष पेटलाकर्नाटकातील काँग्रेस सरकार संकटात
बंगळुरु: कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये आरपारची लढाई सुरु झाली आहे. दोन बलाढ्य नेत्यांमध्ये संघर्ष पेटल्यानं कर्नाटकात काँग्रेस समोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळे आता हा विषय दिल्लीत हायकमांडसमोर जाणार आहे. तिथेच या प्रश्नाचा निकाल लागेल.दोननेत्यांमध्ये थेट संघर्ष निर्माण झाल्यानं राज्यातील काँग्रेस दुभंगली आहे….
८० लाखांचे बक्षीस असलेल्या२ नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर
गडचिरोली/केंद्र सरकारने देशाला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ ही अखेरची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशातच आता सुरक्षा दलांना छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत सविस्तर…
महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा
मुंबई – महाशिवरात्री निमित्त भाविकांना शिव मंदिरात वेळेवर जात यावे यासाठी बेस्टने विशेष बससेवा सुरु केली आहे.दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त यंदा त्र्यंबकेश्वर मंदिर रात्रभर खुले राहणार आहेयंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे… त्यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु आहे…महाशिवरात्रीसाठी मुंबईतील महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावं.. यासाठी बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे…. संजय…
