; शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे कथन केले गमक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेंव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या यशस्वीतेचे गमक सांगून नव्या पिढीला अशा पद्धतीने वागण्याचा सल्ला दिला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अपरिचित साम्राज्याचा इतिहास या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी राजू देसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूराजे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगताना दंतकथांमुळे ज्या घटना घडल्याच नाहीत त्या घटना लोकांमध्ये पसरविण्यात येत आहेत, असे परखडपणे सांगितले. मातीसाठी कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तर मातीसाठी कसे मरावे, हे छत्रपती शंभूराजे यांनी आपल्या आयुष्यातून दाखवून दिले. शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, लेझीम पथक, तुतारी वादन, लहान मुलांच्या वेशभूषा, रांगोळ्या, ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त संजय मुखर्जी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे हा शिवजन्मोत्सव आयोजित केला होता. संघटनेचे अध्यक्ष शांताराम रामचंद्र चाळके, उपाध्यक्ष संजय विठोबा चव्हाण, सरचिटणीस राजेश गजानन दाभोळकर, सल्लागार सुबोध सखाराम सुर्वे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी रवींद्र पवार यांनी सूत्रसंचालन केले.
Similar Posts
भाजपा शासित राज्यांमध्ये जर बंगालींचा छळ होत असेल तर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे – दरमहा ५ हजार देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा
कोलकाता/ज्या राज्यात डबल इंजिन सरकार आहे, तिथे बंगाली भाषिकांना त्रास दिला जात आहे. परराज्यात गेलेल्या बंगाली लोकांची संख्या जवळपास २२ लाख आहे. या सर्वांनी पुन्हा आपल्या राज्यात यावे, परराज्यात ज्या बंगाली भाषिकांचा छळ होतोय, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे. त्यांच्या मदतीसाठी श्रमोश्री योजना सुरू करण्यात येईल आणि त्यांना आर्थिक मदतही दिली जाईल अशी घोषणा पश्चिम बंगालच्या…
एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे…
लाडकी बहीण योजनेत महिलांची अडवणूक करणाऱ्यांवरकठोर कारवाई करणार- मुख्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना तंबी
मुंबई – लाडकी बहिण योजनेसंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध करुन देणे, फॉर्म भरुन देण्याचे निमित्त करुन निर्माण होणारे दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत. नोंदणीसाठी रांगा लावण्याची गरज पडणार नाही यादृष्टीने चोख नियोजन करावे. लाडक्या बहिणींची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाहीयाची काळजी घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा राज्यात मोठा गाजावाजा झाला. अनेक महिलांनी या…
मुंबई जनसत्ताच्या दणक्याने ग्रॅन्टरोड मधील फेरीवाल्यांवर कारवाई होणार – सहायक आयुवत शरद उघडे यांचे आश्वासन
मुंबई- फेरीवाल्यांच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या दयनीय अवस्थेबाबत मुंबई जनसत्ताने अनेक वेळा आवाज उठवलेला आहे. काही दिवसांपूर्वी ग्रॅन्टरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला असलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात असाच आवाज उठवलेला होता .अखेर महापालिकेच्या सहायक आयुक्त शरद उघडे यांच्या कडे या बेकायदेशीर फेरीवाल्यांची कारवाई करण्यासाठी मुंबई जनसताने बातमी द्वारे मागिणी केली असता . बातमीची दखल घेत पालिका डी प्रभागाचे अतिक्रमण…
संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा
मुंबई, संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली.मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन आज रवींद्र नाट्य मंदिरच्या लघुनाट्य गृहात सांस्कृतिक मंत्री एँड…
राज्यपालांच्या हस्ते शेतकऱ्यांसाठी ‘वंदे किसान ॲप’चे लोकार्पण
कृषी क्षेत्रात प्रगती झाली नसती तर करोना काळात उपासमारी झाली असती शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपालांची सूचना कृषी उत्पादने व कृषी आधारित वस्तूंचे भौगोलिक मानांकन होऊन त्यावर पेटंट मिळविले तर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे दुप्पट ते चौपट दाम मिळेल असे सांगून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे नवीनतम ज्ञान देश विदेशातून मिळविले पाहिजे,…
