मणिपूरमध्ये सुरक्षा दलाच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला – दोन जवान शहीद
इम्फाळ : मणिपूर राज्यातील विष्णूपूर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी आसाम रायफल्सच्या वाहनावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर, तीन जण जखमी झाले आहेत. ही घटना नांबोल सबल लेइकाई भागात सायंकाळी ६ वाजता घडली. आसाम रायफल्सचे जवान इम्फाळहून विष्णूपूरला निघाले होते. पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.प्रकरणाची…
