देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.
Similar Posts
मुंबईस्थीत एसव्हीपी ग्लोबलची ओमानमधील प्रकल्पात 150 दशलक्ष यु एस डॉलरची गुंतवणूक
मुंबई, ता. 18 (प्रतिनिधी): भारताचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना, देशातील सर्वात मोठी व मुंबईस्थीत कॉम्पॅक्ट कॉटन यार्न उत्पादक एसव्हीपी ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेडने ओमानमधील त्याच्या मोठ्या कापड निर्मिती प्रकल्पात प्रत्यक्ष व्यावसायिक कामकाज सुरू करण्याची घोषणा केली आहे. या समूहाने ओमानच्या ‘सोहर फ्री ट्रेड झोन’ येथील प्रकल्पात १.५. लाख स्पिंडल आणि ३,५०० रोटर्स सुविधा उभारण्यासाठी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनव्या सरकारचे राज्यातील जनतेला पाहिले गिफ्ट पेट्रोल डिझेल स्वस्त
मुंबई/महाराष्ट्रातील नवे सरकार आता कामाला लागले आहे.जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय राबवायला सुरुवात केली आहे कारण काल राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे .पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रती लिटर 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे या दर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईसंजय पांडे चार महिण्यात चमत्कार करणार काय ?
मुंबई/ संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे १९८६ चां बेचचे आय पी एस अधिकारी असलेल्या संजय पांडे यांनी पोलीस दलात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत तसेच गुन्हेगारीच्या अनेक प्रकरणांचा छडा लावला आहे.एक नॉन करपटड पोलीस अधिकारी अशी त्यांची ओळख असल्याने मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची वर्णी लागली. पांडे कर्तबगार असूनही…
मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट टँकर माफिया कडून- आशिष शेलार
: मुंबई तीन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीच्या पाण्याची लूट केल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. एसआयटी मार्फत बेकायदेशीर पाणी उपसाची चौकशी करण्यात आली आहे.: मुंबईत तीन हजार कोटींच्या पाण्याची लूट होत असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईतील या बेकायदा पाणी उपशाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी शेलार यांनी…
अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरतेसाठी ” टाटांचे” मोठे योगदान
टाटा उद्योग समूहाच्या एअर इंडिया या कंपनीने गेल्या सप्ताहात जागतिक पातळीवर आर्थिक इतिहास नोंदवला. त्यामुळे केवळ अमेरिकेतच नाही तर युरोपातही लाखो रोजगारांची निर्मिती होणार आहे. याबरोबरच भारताने तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होण्याकडे एक मोठे पाउल टाकले आहे. या अभूतपूर्व ऐतिहासिक घडामोडीचा हा धांडोळा. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये गेल्या सप्ताहात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दैदिप्यमान इतिहास…
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल…
