देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.
Similar Posts
गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर मंडपात मुखदर्शन नाही आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी
मुंबई – गणेश भक्तांच्या लाडक्या बापचे आगमन आता काही तासांवर आलेले असतानाच राजी सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यंदा गणेशाचे दर्शन मंडपात घेण्या येवजी ऑन लाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावं असे सांगण्यात आले आहे तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकणा बंदी असेल त्यामुळे बाप्पा वाजत गाजत न येतं अत्यंत साधेपणाने येणार आणि तितक्याच…
विधानसभा निवडणुकीतील पहिली मोठी कारवाई सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या गाडीतून पाच कोटींची रोकड जप्त
पुणे/निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जाते ही गोष्ट आता काही नवीन नाही महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीत ही मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाणार अशी आतापासूनच चर्चा होती त्या चर्चेला आता कुस्ती मिळाली आहे कारण पुण्यातील खेड/शिवापुर मार्गावर एका बड्या नेत्याच्या गाडीतून पोलिसांनी पाच कोटींची रक्कम जप्त केलेली आहे हा…
बिहार विधानसभा निवडणुकीत भरघोस मतदान मात्र हिंसक घटनांनी मतदानाला गालबोट
पाटणा/बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यातील १२१ जागांवर मतदान ६५ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. बिहारमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पहिल्या टप्प्यात मतदान वाढलं आहे. जन सुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी वाढलेलं मतदान लक्षात घेता मोठा दावा केला आहे. प्रशांत किशोर यांच्या दाव्यानुसार गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी झालेलं अधिक मतदान…
रामदास कदम यांच्या या मागणी नंतर पुन्हा एकदा शिवसेनेच्या दोन गटात मोठा वाद
मुंबई/दिशा सालियन या मृत्यू प्रकरणात न्यायालयात गेलेल्या दिशाच्या वडिलांची नार्को टेस्ट करण्याची मागणी होत असतानाच आता आदित्य ठाकरे यांचीही नारकोटेस्ट करा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केली आहे रामदास कदम यांनी म्हटले आहे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या सर्व नेत्यांना संपवण्याचे कटकारस्थान उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्याची शिक्षा त्यांना…
आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई – आशिया खंडातील सर्वात श्रीमंत अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. सध्या सध्या पालिकेवर प्रशासक असल्याने या अर्थसंकल्पात मुंबैकरांच्या वाट्याला काही भरीव मदत मिळेल असे वाटत नाही. तरीही मुंबईकर जनतेचे या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेले आहे. अर्थसंकल्पात मालमत्ताकर किंवा पाणी पट्टी तसेच इतर नागरी सुविशांवर करवाद होण्याची शक्यता आहे
सुधारित वक्त बोर्ड कायद्याचा पहिला दणका बेकायदेशीर भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना अटक
अहमदाबाद/वक्फ बोर्ड सुधारित कायद्याचा सर्वात पहिला झटका आमदाबाद मधील पाच जणांना बसला आहे . वक्फ बोर्डाचे ट्रस्टी असल्याचे भासवून वक्फ बोर्डाच्या जमिनीवरील घरे आणि दुकानांचे सतरा वर्ष भाडे वसूल करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहेशहरातील गायकवाड हवेली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, कांचनी मशीद ट्रस्ट आणि शाह बडा कसम ट्रस्टच्या मालकीच्या जमिनीवरील सुमारे १००…
