देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.
Similar Posts
२५ फेब्रुवारीला मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प
मुंबई/मुंबई महापालिका अर्थसंकल्प दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर होतो. मात्र महापौर निवडणुकीसह, स्थायी समिती व अन्य समिती अध्यक्ष तसेच सदस्य निवडणूक प्रक्रियेमुळे अर्थसंकल्प लांबणीवर पडला होता. अखेर हा अर्थसंकल्प २५ फेब्रुवारीला सादर होणार आहे. नव्या स्थायी समिती अध्यक्षांसोबत महापालिकेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समिती सभेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्र
तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याच भान ठेवासरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष अधिक तीव्रमुंबई/ पूरग्रस्त भागातील आता मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ राज्यपालांचे सुद्धा दौरे सुरू झाल्याने सरकार विरूद्ध राज्यपाल हा संघर्ष अधिक तीव्र झाला असून काल त्याची ठिणगी पडली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावताना तुम्ही मुख्यमंत्री नाहीत याचे भान ठेवा असे सांगितले .तसेच राज्यपाल राज्यात दोन सत्ताकेंद्र…
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल – अजित पवार गटाचा भाजपला इशारा
मुंबई : राज्यातील महायुतीत काहीही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर हा जननायक कुणाला भारी पडेल ?
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे भाजपला करता आले नाही ते राज ठाकरे यांनी एका सभेत करून दाखवले.त्यामुळे भाजपतील स्थानिक नेते धास्तावले आहेत.कारण महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणे इथल्या भाजप नेत्यांना शक्य नाही याची आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलीच प्रचती आली.कारण काँग्रेस राष्ट्रवादी मधून भाजपात जे उपरे आले .ते बिनकामाचे ठरले.फक्त तोंडाच्या वाफा घालवण्या पलीकडे त्यांच्या हातून काहीच…
कोकणातील रिफायनरीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये रण पेटले
राजापूर -रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राच्या विकास महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या शंकांचे निरसन करू, असेही फडणवीस यांनी म्हटले. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील…
