देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.
Similar Posts
रिक्षामध्ये गॅस रिफिलिंगचा जीवघेणा खेळ
औरंगाबाद- रिक्षामध्ये जीवघेणे खेळ समाजकंटकाकडून खेळला जात आहे. अवैद्य छोट्या सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरला जातोय आणि हा गैरप्रकारे उद्योग सुरू आहे आजूबाजूला भर नागरी वस्ती मध्ये चालू आहे. अशा ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? याचा हे व्हिडिओ समोर आले आहे. व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी बाकी मात्र…
पालिका मुख्यालयात एसआयटी कडून कोविड घोटाळ्याची चौकशी सुरु
घोटाळ्यातील पालिका अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेमुंबई -मुंबईतील कथित कोविड घोटाळा प्रकरणात एसआयटी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका मुख्यालयात एसआयटीच्या पथकाने चौकशी केली आहे. जवळपास एक ते दीड तास या पथकाने विविध विभागातील कारभाराची माहिती घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच एसआयटी पथकाने सुधार विभागातील सहआयुक्तांकडे मुंबई महापालिकेतील कारभारा संदर्भात चौकशी केली. कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेच्या 12 हजार कोटींच्या…
महापालिकांची नवी आरक्षण सोडत 29 जुलैला
मुंबई / ओबीसी आरक्षणामुळे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे जुनी सोडत रद्द करण्यात आली असून नवी सोडत 29 जुलैला काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत सोडतीचा कार्यक्रमही आता जाहीर झाला असून ५ ते ८ ऑगस्टपर्यंत अंतिम आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये अनुसुचित जाती आणि जमातीचं आरक्षण सोडत कायम राहणार आहे. कारण…
ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक वज्रेश्वरी शाखेचा दैनंदिन व्यवहार वाढणार! , कामकाजात शाखा व्यवस्थापकांचे विशेष लक्ष!
भिवंडी दि 12(आकाश गायकवाड ) तालुक्यातील वज्रेश्वरी येथील दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा पूर्वीपासूनच आहे.या बँकेचे कार्यक्षेत्र मोठे आहे.याचे कारण सर्व सामान्य लोकांची म्हणजेच,विशेषतः शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते.या शाखेचे व्यवस्थापक ठाणे येथील रहिवासी असणारे रविंद्र पाटील ,यांनी काही दिवसांपासून आपल्या शाखा व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.त्यांची एकूण कामाची पद्धत आणि खातेदारांबरोबर सुसंवाद…
मराठी माणसालाच मुंबईमधे उपाऱ्यासारखे राहावे लागते.. महाराष्ट्राच्या हितासाठी.. मुंबईमधे तिसऱ्या आघाडीची घोषणा
मुंबईसह महाराष्ट्रात परप्रांतीयांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. उलट मराठी माणसालाच मुंबईमधे उपाऱ्यासारखे राहावे लागते आहे. या आणि अशा अनेक गोष्टी दररोज मोठ्या शहरी भागात घडत असताना आपण पाहतो. काही राजकीय पक्ष मराठी च्या आकसापोटी तर काही दिखाव्याच्या मराठी च्या प्रेमापोटी सोयीची भूमिका घेऊन प्रत्यक्षात राजकारण करत असतात. खर तर मराठी साठी अनेक वर्षांपासून अनेक वेगवेगळ्या…
क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे भव्य प्रकाशन!
वसई/प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रात घडणार्या गुन्हेगारी विषयक तसेच सामाजिक घडामोडींचा वेध घेत वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या ‘क्राईम संध्या’ वृत्त पत्राच्या 2022 च्या दैनंदिनी डायरीचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त संजयकुमार पाटील यांच्या हस्ते या क्राईम संध्या पालघर दैनंदिनी डायरी 2022चे प्रकाशन करण्यात आले. पोलीस आणि जनता…
