देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.
Similar Posts
निवडणूका पुढे ढकलण्यास नकार ; सरकारची विनंती निवडणूक आयोगाने फेटाळली
: मुंबई – जिल्हा परिषदा आणि नगर पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलवयात अशी अर्जी सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती पण सादर निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होत असल्याने त्यांचे वेळापत्रक बदलता येणार नाही . निवडणुका ठरलेल्या तारखेलच होतील असे म्हणत निवडणूक आयोग ने सरकारची विनंती फेटाळली आहे .त्यामुळे आता 5 जिल्हा परिषदा आणि 33 नगर…
खबरदार ! मराठा आंदोलकांना त्रास द्याल तर याद राखा – जरंगे पाटील यांचा इशारा
जालना -मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सुरू असलेले आंदोलन शमवण्यासाठी न्या. शिंदे समितीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. मात्र, उपोषणावर असलेल्या मनोज जरांगे यांनी सरकारचा निर्णय अमान्य असल्याचे म्हटले आहे. सरकार ने घेतलेले आजचा एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही आणि वाटू देणार नाहीत, असेही मनोज जरांगे यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन…
लोकसभेसाठी कॉंग्रेसच्या ३९ उमेदवारांची नवे जाहीर
नवी दिल्ली – काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उमेदवारीबाबत असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. राहुल गांधी यांना पुन्हा वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी सध्या याच मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. काँग्रेसने आतापर्यंत 39 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या…
जामनेर आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्धासाठी सज्जपृथ्वीराज आणि शिवराज पुन्हा एकाच मैदानात उतरणार _ देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या निमित्ताने जामनेरमध्ये दिग्गजांच्या लढती
जळगाव, दि. १३ (क्री.प्र.)- जळगावच्या जामनेर तालुक्यात येत्या १६ फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कुस्तीयुद्ध रंगणार आहे. ‘शरीर तंदुरुस्त, खेळच सर्वोत्तम’ हा संदेश देत ‘नमो कुस्ती महाकुंभ-२ मध्ये देवाभाऊ केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ, उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, शिवराज राक्षेसह भारतातील नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवानांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जामनेरमध्ये कुस्तीच्या…
लाडकी बहीण योजनेचा जी आर काढला
मुंबई : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविताना महिला भगिनींना सहजासहजी या योजनेचा लाभ मिळावा म्हणून शासनाकडून नवनवीन बदल केले जात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनीही या योजनेसाठी सातत्याने महिला भगिंनींना आवाहन केलं आहे. ही योजना प्रभावीपणे आणि पारदर्शक राबविण्यावर सरकारचा भर असून शासनस्तरावर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय सविचांना घेऊन समिती…
एकनाथ खडसे पुन्हा भाजपात – मुलगी रोहिणी मात्र राष्ट्रवादीतच
जळगाव – एकीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या १५ दिवसात भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत. तर दुसरीकडे खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांनी शरद पवारांच्या पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. आता शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार आहेत.भा जपकडून…
