देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण त्या अगोदर देशातली स्थिती सुधारायला हवी देशातलं वातावरण शांततेच आणि सौहारदाच असायला हवं. पण आज तरी देशात तसं वातावरण नाही. आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्या विषयी लोकांच्या मनात काही फारशी चांगली भावना नाही. अगोदर आपल्या घरातलं बघा आणि नंतर बाहेरच्या जगाकडे लक्ष द्या असं लोकांना वाटते. त्यात काहीही चुकीचे नाही. एकीकडे मोदींचे परदेश दौरे सुरू असतानाच इकडे भारतात 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरू आहे आणि त्यासाठी 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत. शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे सर्व विरोधी पक्ष नेत्यांची एक मोठी बैठक झाली या बैठकीला नितीश कुमार पासून शरद पवारांपर्यंत आणि ममता पासून उद्धव ठाकरे पर्यंत अनेक नेते उपस्थित होते. मोदींच्या विरोधात विरोधी पक्षाची ही एकजूट निश्चितपणे समाधानकारक असली तरी हे विरोधी नेते किती दिवस एकत्र राहतील याबाबत लोकांच्या मनात शंका आहे. तसे पाहता विरोधी पक्षाच्या ऐक्याचा हा काही पहिला प्रयोग नाही. यापूर्वीही असे प्रयोग झालेले आहेत अगदी जनता पार्टीच्या काळापासून आतापर्यंत अनेक वेळा विरोधक एकत्र आले केंद्रात त्यांनी सत्ताही स्थापन केली पण त्यांचे ऐक्य फार काळ टिकू शकले नाही कारण विरोधी पक्षातील प्रत्येक नेत्याची एक महत्वकांक्षा आहे आणि याच महत्त्वकांक्षामुळे नेतृत्वाचा प्रश्न प्रत्येक वेळी उभा राहतो आणि त्यामुळेच ऐक्य मोडते त्यामुळे लोकांचा विरोधी पक्षाच्या ऐक्यावर अजिबात विश्वास नाही. आताही जे 17 विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत त्यातील बहुतेक नेते हे फुटीर आहेत स्वतः नितीश कुमार यांनी अनेक वेळा पक्षांतर केलेले आहे. तर शरद पवार आणि ममता बॅनर्जी काँग्रेस मधले फुटीर आहेत केजरीवाल यांनी तर अण्णांच्या पाठीत खंजीर खुपसलेला आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आता केवळ नाममात्र राहिलेली आहे हेमंत सोरेन यांच्या पक्षाला झारखंड बाहेर कोणी ओळखत नाही. मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला यांची ही जवळपास अशीच स्थिती आहे. राहता राहिला प्रश्न काँग्रेसचा तर भारतात अजूनही काही लोकांच्या मनात काँग्रेस विषयी आपुलकी आहे आणि त्यातूनच भारतातील पाच राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे पण आज सर्व राज्यांमध्ये काँग्रेसची पक्ष संघटना खिळखीळ झालेली आहे त्यामुळे आम्ही एकट्याने मोदींना टक्कर देऊ शकत नाही हे काँग्रेसने यापूर्वीच कबूल केलेले आहे अशा परिस्थितीत बुडत्याला काडीचा आधार या म्हणीनुसार काँग्रेस विरोधी पक्षांच्या गोतावळ्यात सामील झालेली आहे. काँग्रेसचे ममता बॅनर्जी अखिलेश यादव आणि केजरीवाल यांच्याशी अजिबात पटत नाही त्यामुळे काँग्रेस या सर्वांसोबत एकत्र राहील का हाच खरा प्रश्न आहे.
Similar Posts
जरांगे पुन्हा उपोषण करणार
जालना/मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांसाठी चार जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मात्र आपल्या समाजाने ज्याला पाडायचे आहे त्याला जरूर पाडावे असे मात्र मी समाजाला सांगितलेले आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या सोयऱ्यांबाबतच्या मागणीचा पुनरुचार केला आहेजरागे पाटील यांनी सांगितले की कुणबी…
शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी वाढवलेली नाही- रामदास कदम यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई/गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागून राहिलेले शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे दसरा मेळावे गुरुवारी मुंबईत पार पडले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांपेक्षा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे दसरा मेळाव्याचे शो स्टॉपर ठरले आहे….
सेना भाजपच्या दोन्ही माजी आमदारांचा विजय पक्का
मुंबई/ विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून जे आमदार निवडून द्यायचे आहेत त्यात शिवसेनेचे उमेदवार सुनील शिंदे आणि भाजपा उमेदवार राजहंस सिंह यांचा विजय पक्का मानला जात आहे .कारण विजयासाठी जो ७७ मतांचा कोटा आवश्यक आहे तो दोघांकडेही आहे सेनेकडे ९९ तर भाजपकडे ८३ नगरसेवक आहेत त्यामुळे सुनील शिंदे आणि राजहंस सिंह या दोन्ही…
हिंदीच्या सक्ती बाबत मनसेचा सरकारला इशारा
मुंबई/शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेने विरोध केला आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस लॉबी कडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे .तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे….
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
जळगाव मध्ये रेल्वे दुर्घटना १२ प्रवाशांचा मृत्यू १५ जखमी
पाचोरा – जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली, त्यानंतर अनेकांनी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या, आग लागल्याची अफवा पसरताच ३० ते ३५ जणांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यातच समोरून बंगळुरू एक्स्प्रेस येत होती. या एक्स्प्रेसनं पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडले यात १२ जणांचा मृत्यू झाला तर १५…
