मिरज : मिरजेत ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७, रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद याने ९० लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक साजिद पटेल यांनी पोलिसात दिली आहे.ॲक्सिस बँकेत नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत याने खातेदारांशी चांगली ओळख करत म्युच्युअल फंडसह बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास सांगितले. काही खातेदारांच्या बँक खात्यांचा मोबाइल क्रमांकही परस्पर बदलला. तोहिद शरिकमसलत याने इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरील रक्कम आपल्या मित्रांच्या चार वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून परस्पर काढून घेतली.याबाबत खातेदारांनी रकमेसाठी तगादा सुरू केल्यानंतर तोहिद याने मिरजेतून पलायन केले. त्यामुळे संतप्त ग्राहक व बँक अधिकाऱ्यांचे वादावादीचे प्रकार घडले. बँक ग्राहक अमिना नजीर अहमद शेख यांच्या खात्यावरील ६ लाख रुपये, गणी गोदाड यांचे १२ लाख, हुसेन बेपारी यांचे २३ लाख, शिराज कोतवाल यांचे २३ लाख, वाहिद शरीकमसलत यांचे ११ लाख, मेहेबूब मुलाणी यांचे २ लाख, रमेश सेवानी यांचे १६ लाख व अनिल पाटील यांचे २ लाख अशा नऊ खातेदारांच्या खात्यावरील ९० लाखांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार आहे. बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोहिद शरिकमसलत याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Similar Posts
कोरोना गेल्याने देशभर होळीचा होळीचा उत्साह शिगेला मुंबईत धम्माल
कलरफुल रंगपंचमीमुंबई/ करोना मुळे गेली दोन वर्ष देशातील जनतेला कोणताही सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला नाही मात्र यंदा करोना गेल्याने देशभर मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली .मुंबईमध्ये तर होळी आणि रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोचला होता त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने मुंबईत कलरफुल रंगपंचमी साजरी करण्यात आली .शासनाने यावेळी होळी बाबत काही नियमावली केली…
पालिका कर्मचाऱ्यांकडून घर घर तिरंगा फेरीचे आयोजन
मुंबई – पंतप्रधान मोदी यांनी यंदाच्या ७८ व्य स्वातंत्र्य दिनी घर घर तिरंगा या ही मोहीम राबवण्याचे देशवासियांना आव्हान केले आहे . या मोहिमे अंतर्गत देशभर घरघर तिरंगा लावण्यात येणार आहे तसेच सर्वत्र फेऱ्या काढून तिरंग्याचे महत्व लोकांना जपण्याचे आव्हान केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या जी दक्षिण विभागातील पालिका कर्मचाऱ्यांनी घर घर…
आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का? मुख्यमंत्री
मुंबई/ जे राजकीय पक्ष सातत्याने मंदिरे उघडण्याची मागणी करीत आहेत त्यांना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या साक्षीनेच चांगलेच झापले ते म्हणाले की आरोग्य केंद्र ही सुधा मंदिरच आहेत मग ही आरोग्य केंद्र बंद करून मंदिरे उघडायची का असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना केला.पूर्व पश्चिम डोंबिवलीला जोडणाऱ्या कोपर पुलाचे काल मुख्यमंत्र्यांनी ऑन लाईन उद्घाटन…
अडाणी समूहाला मोठा झटका नार्वे वेल्थ फंडाने सर्व शेअर विकले
नॉर्वे वेल्थ फंडचे ईएसजी रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ईएसजी शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ईएसजी म्हणजे,…
धरावीत विषारी टुथपेस्तने घेतला तरुणीचा बळी
: मुंबई घरातील वापरच्या वस्तु काळजीपूर्वक रित्या योगी ठेवल्या नाहीत तर काय घडू शकते याचे एक भयंकर उदाहरण धरावीत समोर आले आहे धारावीतील एका घरात बाथरूम मध्ये कोलगेत आणि उंदीर मारायची पेस्ट एकाच ठिकाणी ठेवण्यात आली होती मात्र सकाळी घरातील अफसणा नावच्या तरुणीने घाईघाईने कोलगेट येवजी उंदीर मारायची पेस्टचुकून बीआरएसएचवर घेतली आणि डात घासले मात्र…
डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये अद्ययावत सुरक्षा यंत्रणा उभारण्याची गरज !
गेल्या दशकात डिजिटल अर्थव्यवस्थेने आपण अभूतपूर्व यश मिळवलेले आहे. मात्र त्याचवेळी डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावर बोकाळल्याने सर्वसामान्यांमध्ये त्याची धास्ती, भिती वाढत आहे. डिजिटल यंत्रणेच्या माध्यमातून बेकायदेशीर कर्जांची ‘ॲप्स’ निर्माण झाली असून ‘डिजिटल ॲरेस्ट’ची प्रकरणे प्रचंड वाढताना दिसत आहेत. जनसामान्यांचे प्रबोधन केले जात असले तरी गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी डिजिटल अर्थव्यवस्थेच्या सुरक्षा यंत्रणा व धोरणात…
