मिरज : मिरजेत ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७, रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद याने ९० लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक साजिद पटेल यांनी पोलिसात दिली आहे.ॲक्सिस बँकेत नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत याने खातेदारांशी चांगली ओळख करत म्युच्युअल फंडसह बँकेच्या विविध योजनांत पैसे गुंतविण्यास सांगितले. काही खातेदारांच्या बँक खात्यांचा मोबाइल क्रमांकही परस्पर बदलला. तोहिद शरिकमसलत याने इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून खातेदारांच्या खात्यावरील रक्कम आपल्या मित्रांच्या चार वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून परस्पर काढून घेतली.याबाबत खातेदारांनी रकमेसाठी तगादा सुरू केल्यानंतर तोहिद याने मिरजेतून पलायन केले. त्यामुळे संतप्त ग्राहक व बँक अधिकाऱ्यांचे वादावादीचे प्रकार घडले. बँक ग्राहक अमिना नजीर अहमद शेख यांच्या खात्यावरील ६ लाख रुपये, गणी गोदाड यांचे १२ लाख, हुसेन बेपारी यांचे २३ लाख, शिराज कोतवाल यांचे २३ लाख, वाहिद शरीकमसलत यांचे ११ लाख, मेहेबूब मुलाणी यांचे २ लाख, रमेश सेवानी यांचे १६ लाख व अनिल पाटील यांचे २ लाख अशा नऊ खातेदारांच्या खात्यावरील ९० लाखांची रक्कम परस्पर काढून फसवणूक केल्याची तक्रार आहे. बँक व्यवस्थापनाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तोहिद शरिकमसलत याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Similar Posts
अरे वेड्यानो भाऊबीज परत घेतली जात नाही – लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीसांची विरोधकांवर टीका
जळगाव – लाडकी बहीण योजनेवरून काहीजण म्हणाले की पैसे परत घेतले जातील, अरे वेड्यांनो भाऊबीज दिली तर ती परत घेतली जात नाही, असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले. तर त्यांनी आमदार रवी राणा व शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांची अप्रत्यक्ष कानउघाडणी केली. जळगावात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे बोलताना फडणवीस म्हणाले…
बेहराम पाड्याचा जहांगीर पूरी कधी करणार चार माळ्याच्या झोपड्या कधी तुटणार- मुंबईत योगी पॅटण वापरा .
मुंबई/ बांद्रा रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या बेहरम पाड्यात अनेक चार माळ्यांच्या झोपड्या उभ्या आहेत.पालिकेत 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे तरीही या चार माळ्याच्या झोपड्या उभ्या राहिल्या आणि वाढत चालल्या आहेत पालिका अधिकाऱ्यांना ही अनधिकृत बांधकामे दिसत नाहीत का ? सत्ताधारी शिवसेनेचे नेते आणि पालिका अधिकारी यांचे डोळे फुटले आहेत का ? काही वर्षांपूर्वी इथल्या झोपड्यांना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकोणाचे आमदार पात्र कोणाचे अपात्र आज न्यायालयात फैसला
दिल्ली / सरकार आणि शिवसेनेतील उरलेल्या आमदारांचे भवितव्य ठरविण्याच आजच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे . मात्र आज सुनावणी होईल की नाही याबाबत शंका असल्याने या सूनवणीबानातचे सस्पेन्स वाढले आहेएकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड केले होते त्यांच्या सोबत शिवसेनेचे 39 आमदार गेले होते त्यानंतर शिवसेनेने शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या विरोधात सभापती…
एस टी कामगारांचा संप मागे
मुंबई/ राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या सेवेत विलीन करून घ्या तसेच त्यांचे थकीत वेतन आणि महागाई भत्ता बाबत तातडीने निर्णय घ्या या मागण्यांसाठी एन दिवाळीच्या तोंडावर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी जो संप पुकारला होता तो आज सरकार बरोबर झालेल्या चर्चे नंतर मागे घेण्यात आला त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने सुटकेचा निःश्वास टाकला आहे .एस…
प्रभू राम मांसाहारी होते आव्हाडांचे वादग्रस्त विधान – अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या चिंतन शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळला आहे….
राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा
मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद…
