‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम राहणार आहेत. म्हणूनच शारदामाईंचे सद्गुण अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी श्रद्धांजली वाहिली. जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई पै यांचे २५ जानेवारी रोजी महानिर्वाण झाले. वयाच्या ९७ व्या वर्षी माईंनी अखेरचा श्वास घेतला. जीवनविद्या ज्यांच्या मुळे सद्गुरु श्री वामनराव पै यांना स्फुरली त्या माईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. जीवनविद्या मिशनच्या वतीने दादर येथील योगी सभागृहात शारदामाईंना आदरांजली वाहण्यासाठी ‘तेजोवलयांकिता शारदा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य नामधारकांनी व्हिडिओ च्या माध्यमातून तसेच प्रत्यक्षात माईंच्या आठवणींना उजाळा दिला. हरीपाठ, संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून माईंना संगीतपुष्प अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी नातसून प्रिया निखिल पै यांनी शारदा माईंच्या असंख्य आठवणी नामधारकांसमोर मांडल्या. पण एक आजी सासू म्हणून नाही तर शारदामाई यांचे एक स्त्री म्हणून एक अनोखे वेगळेपण होते हे त्यांनी सांगितले. शारदामाईंकडून प्रत्येक स्त्रीने शिकावे, अशी भावना यावेळी प्रिया पै यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास सद्गुरु आणि माई यांची कन्या मालन कामत पै, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया आणि पणतू यश हे उपस्थित होते.
Similar Posts
हरिहरेश्व्रच्या समुद्रात सापडलेल्या शस्त्राच्या बोटीने सुरक्षा यंत्रणेची झोप उडवली
राज्यात हायअलर्टमुंबई – एन सणासुदीच्या काळातच मुंबई आणि आसपासच्या परिसरात मोठा घातपात घडवण्याचे दहशतवादी संघटनेचे मनसुबे असल्याचे पुन्हा एकदा स्पस्ट झाले असून काल रायगड जिल्ह्यातील हरिहरे श्वर च्या समुद्रात एक बेवारस बोट सापडली या बोटीत ३ एके ४७ रायफल आणि काही काडतुसे आढळली आहेत त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे…
राज ठाकरे यांची निवडणूक निकालावर शंका
मुंबई/सत्ताधारी महायुतीने ईव्हीएम च्या मदतीने विधानसभा निवडणूक जिंकली असा आत्तापर्यंत विरोधी पक्षातील नेते आरोप करीत होते परंतु आज मात्र महायुतीच्या जवळ असलेल्या मनसेनेही महायुतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत शंका उपस्थित केले आहे हा निकाल कसा लागला याचा खुद्द निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारांना ही धक्का बसला असल्याचे…
निवडणुका झाल्या आता देशातील जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या
गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लोकशाहीच्या निवडणुकांचा धूम धडाका निकालानंतर संपलेला आहे त्यामुळे आता सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्षातले लोक असो त्यांनी लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला हवे लोकांचे प्रश्न म्हणजे धर्म असता राम मंदिर मज्जिद चर्च हे लोकांचे प्रश्न होऊ शकत नाहीत तर लोकांची मूलभूत प्रश्न आहेत महागाई बेरोजगारी देशाची सुरक्षा महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न…
मुख्यमंत्र्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी पोहचले आहेत. राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सहकुटुंब पोहचले आहेत. या भेटीदरम्यान मागील काही दिवसात झालेल्या घडामोडींच्या संदर्भात देखील आजच्या भेटीत चर्चा होण्याची…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकरोना काळात मंत्र्यांच्या आजारपणात खाजगी हॉस्पिटलचा 1कोटी 40 लाख खर्च -मंत्र्यांचा आजार जनता बेजार
मुंबई/ करोना काळात गरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देणारे मंत्री स्वतः मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी तिजोरीवर भर टाकीत होते सरकार मधील तब्बल 18 मंत्र्यांनी 1लाख 40 हजाराचे बिल केले आहे.करोना काळात लोकांची हलत खराब झाली होती एकतर काम धंदा गेला तर दुसरीकडे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांना खाजगी रुग्णालये खिसा कापून शोषण…
राजा रघुवंशी प्रकरणाचा पर्दाफाश पत्नीने केली सुपारी देऊन पतीची हत्या
इंदौर : मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले रघुवंशी दाम्पत्य बेपता झाल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पत्नी सोनम हिनेच पती राजा रघुवंशी याची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेशातील तिघा जणांना सुपारी देण्यात आली होती. या प्रकरणात सोनमचा प्रियकर राज कुशवाहा देखील सामील असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज या…
