‘तेजोवलयांकित शारदा’ कार्यक्रमात असंख्य नामधारकांनी व्यक्त केल्या भावना. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या निधनानंतर तब्बल १० वर्षे शारदा माईंनी जीवनविद्या मिशनच्या सर्व नामधारकांवर प्रेम केले. माईंनी आपल्या जगण्यातून “जीवनविद्या ही जगायची असते” हा कानमंत्र दिला. आज शारदामाई जरी शरीराने आपल्यामध्ये नसल्या तरी त्या आठवणींच्या आणि ज्ञानाच्या रुपाने सर्व नामधारकांच्या ह्रुदयात कायम राहणार आहेत. म्हणूनच शारदामाईंचे सद्गुण अंगिकारणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशा शब्दांत सद्गुरु श्री वामनराव पै यांचे सुपूत्र प्रल्हाददादा पै यांनी श्रद्धांजली वाहिली. जीवनविद्या मिशनचे प्रणेते सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई पै यांचे २५ जानेवारी रोजी महानिर्वाण झाले. वयाच्या ९७ व्या वर्षी माईंनी अखेरचा श्वास घेतला. जीवनविद्या ज्यांच्या मुळे सद्गुरु श्री वामनराव पै यांना स्फुरली त्या माईंचे वृद्धापकाळाने निधन झाले. जीवनविद्या मिशनच्या वतीने दादर येथील योगी सभागृहात शारदामाईंना आदरांजली वाहण्यासाठी ‘तेजोवलयांकिता शारदा’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी असंख्य नामधारकांनी व्हिडिओ च्या माध्यमातून तसेच प्रत्यक्षात माईंच्या आठवणींना उजाळा दिला. हरीपाठ, संगीत जीवनविद्येच्या माध्यमातून माईंना संगीतपुष्प अर्पण करण्यात आले. तसेच यावेळी नातसून प्रिया निखिल पै यांनी शारदा माईंच्या असंख्य आठवणी नामधारकांसमोर मांडल्या. पण एक आजी सासू म्हणून नाही तर शारदामाई यांचे एक स्त्री म्हणून एक अनोखे वेगळेपण होते हे त्यांनी सांगितले. शारदामाईंकडून प्रत्येक स्त्रीने शिकावे, अशी भावना यावेळी प्रिया पै यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास सद्गुरु आणि माई यांची कन्या मालन कामत पै, नातू निखिल पै, स्वप्निल कामत, नातसून प्रिया आणि पणतू यश हे उपस्थित होते.
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयलोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल ब्रिज मनसेने घेतलेल्या सह्यांच्ग्या मोहिमे मुळे पुन्हा प्रकाश झोतात आला आहे.वरळी परिसराला जोड़णारा आणि दादर,प्रभादेवी, एल्फिंस्टन,नाम जोशी मार्ग या विभागातील लोकांना रहदारीचा मुख्य मार्ग असलेला लोअर परेल ब्रिजचे काम चार वर्ष होत आली तरीही पूर्ण…
महायुतीत फोडाफोडी सुरूचएकनाथ शिंदेंचा सख्खा भाचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत
मुंबई/महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने अनेक पक्ष प्रवेश होताना दिसत आहेत. दरम्यान, मुंबईत महायुतीत दोस्टी कुस्ती होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. त्यांचे सख्खे भाचे आशिष माने यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी…
मुजोर व्यापाऱ्यांना पालिकेचा दणका – मालमत्ता कराएवढी दंडाची रक्कम आकारताच दुकानावर मराठी पाट्या लागल्या
मुंबई/या देशात मुंबईला फक्त सोन्याची कोंबडी समजली जाते. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील लोक इथे येऊन पैसे कमवतात परंतु मुंबई बद्दल त्यांना कधीही प्रेम किंवा असता वाटली नाही मुंबईत यायचं पैसे कमवायचे आणि आपापल्या गावी जायचं त्यांनी कधी मराठी भाषेचा आदर केला नाही की महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आदर केला नाही सर्वात जास्त मुजोरी इथले व्यापाऱ्यांची होती त्यांचा हितला…
कल्याणच्या लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी
कल्याण/ रेल्वे प्रवासासाठी दोन डोस ची सक्ती तसेच कोरोनची वाढती भीती यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे आणि याच वाढत्या गर्दीमुळे काही लसीकरण केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडत आहेत काल कल्याणच्या हॉली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली सुरवातीला बाचाबाची होऊन नंतर शिवीगाळ झाली आणि त्या नंतर…
पहिल्या टप्प्यात देशभर उत्साही मतदन महाराष्ट्रात ५५.२९ टक्के
मुंबई/लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले तर महाराष्ट्रातील ५ लोकसभा मतदार संघात सरासरी ५५.२९ टक्के मतदान झालेमहाराष्ट्रात सर्वाधिक ६५ ट क्के मतदान गडचिरोली_ चिमूर मध्ये झाले.तर सर्वात कमी मतदान नागपूर मधे ४७ ट क्के झाले.महाराष्ट्रात जरी कमी मतदान झाले असले तरी ईशान्य भारतात ६५ ट क्क्याहून अधिक मतदान झाले पश्चिम बंगाल मधे…
शिवसेनेच्या निवडून आलेल्या संख्या 100 वर
मुंबई महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या आता 100 वर पोहोचली आहे. 2017 मध्ये कुर्ला प्रभाग क्र. 159 मध्ये निवडून आलेले भाजपचे प्रकाश देवजी मोरे यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने शिवसेनेच्या कोमल जामसंडेकर यांची नगरसेवक म्हणून निवड झाली आहे.त्यामुळे शिवसेनेच्या निवडून आलेल्या 98 नगरसेवकांसह व दोन स्वीकृत नगरसेवकांसह नगरसेवकांची संख्या 100 वर…
