मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी जे 27 हजार प्रस्तावित करण्यात आले आहेत ते कुठून आणणार त्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जनतेच्या खिशात हात घालायला लागणार याचा पालिका आयुक्तांना आणि शिंदे सरकारला विसर पडलेला आला तरी लोकांना मात्र आज ना उद्या पालिका आपला खिसा कापणार याची कल्पना आहे. त्यामुळे जरी करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला तरी मुंबईकरांच्या मनातली भीती कायम आहे. मुंबईच्या विकास कामांसाठी 247 कोटी 80 लाखांची तरतूद आहे सागरी प्रकल्पासाठी 3545 कोटींची तरतूद आहे तोट्यात असलेल्या बेस्ट साठी 800 कोटी दिले जाणार आहेत म्हणे महसुली स्त्रोत वाढवणार? ते कसे काय हे मात्र सांगण्यात आलेले नाही हा एक मात्र आहे झोल मार्गाने पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा पैसा जर थांबवला तर आर्थिक तूट भरून निघेल पण त्यासाठी प्रत्येक प्रकल्पाची मॉनिटरी योग्य रित्या व्हायला हवी पण ती करणार कोण ? सवाल सरकारचा तर त्यांना फक्त पालिका निवडणुक जिंकायची आहे त्यासाठी पालिकेच्या तिजोरीला आग लावायची ? सगळ्या राजकीय पक्षणा ओळखून आहेत
Similar Posts
मुंबईच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा – खुद्द कंत्राटदारांचेच मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: शहराच्या सुशोभीकरणात स्ट्रीट फर्निचर घोटाळा झाला असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यात आता खुद्द सुशोभीकरण करणारे कंत्राटदारदेखील सामील झाले असून सुशोभिकरणाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. अशा प्रकारचे पत्रच साई सिद्धी इंफ्रा या कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांना लिहिले असून पुरावे सादर केले आहेत.साताक्रूज येथील मिलन सबवेच्या सुशोभीकरण करण्यासाठी साई सिद्धी इंफ्रा या कंपनीला पालिकेचे…
भिवंडीतील भादवड इथं मनसेतील वाद चव्हाट्यावर, मनसैनिकाच्या पत्नीने केली मनसेच्या शहर अध्यक्षाच्या विरोधात तक्रार..
भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे…
धक्कादायक! अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंदरच्या विरोधात साक्ष देणार
मुंबई – अश्लील व्हिडीओ तयार केल्या प्रकरणी सध्या अटकेत असलेला राज कुंदरा याच्या विरोधात आता त्याची अभिनेत्री पत्नीच साक्षीदार बनल्याने राजच्या गळ्या भोवतीचा फास अधिकच घट्ट आवळला गेला आहे . शिल्पा शेट्टी हिच्यासह 43 साक्षीदार आहेत या प्रकरणात पोलिसांनी 1467 पानाचे आरोपपत्र बनवले असून त्यात साक्षीदारांसह हजारो ईमेल वॉटसअप चॅट अदीचा समावेश आहे . शिल्पा…
देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजपा सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का ?
सरदार उधम’ ऑस्कर यादीतून वगळणे स्वातंत्र्य लढ्याच्या जाज्वल्य इतिहासाचा अपमान!: मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२१ ‘सरदार उधम’ चित्रपटात ब्रिटिशांबद्दल द्वेष दाखवण्यात आला असल्याचे कारण देत ज्युरींनी हा चित्रपट ऑस्कर नामांकनातून वगळणे हा १३० कोटी भारतीयांचा अपमान आहे. सरदार उधमसिंह हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या जाज्वल्य इतिसाहातील एक सोनेरी अध्याय आहे. ब्रिटींशांबद्दलचा कळवळा दाखवून उधमसिंह यांच्या देशप्रेमाचा, त्यांच्या…
जरांगे पुन्हा उपोषण करणार
जालना/मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांसाठी चार जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मात्र आपल्या समाजाने ज्याला पाडायचे आहे त्याला जरूर पाडावे असे मात्र मी समाजाला सांगितलेले आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या सोयऱ्यांबाबतच्या मागणीचा पुनरुचार केला आहेजरागे पाटील यांनी सांगितले की कुणबी…
आम्ही घरात बसून सरकार चालवत नाही- मुख्यमंत्री शिंदे
कन्नड/ शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आता लोकांना सरकारकडे जावे लागणार नाही तर सरकारच लोकांपर्यंत पोचणार आहे शिंदे फडणवीस सरकारकडून या योजनेची सुरुवात झाली आहेशुक्रवारी कन्नड येथे झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की आम्ही काम करणारे लोक आहोत घरात बसून सरकार चालवणारे नाही असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला तसेच त्यांनी आतापर्यंत…
