मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी जे 27 हजार प्रस्तावित करण्यात आले आहेत ते कुठून आणणार त्यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने जनतेच्या खिशात हात घालायला लागणार याचा पालिका आयुक्तांना आणि शिंदे सरकारला विसर पडलेला आला तरी लोकांना मात्र आज ना उद्या पालिका आपला खिसा कापणार याची कल्पना आहे. त्यामुळे जरी करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आला तरी मुंबईकरांच्या मनातली भीती कायम आहे. मुंबईच्या विकास कामांसाठी 247 कोटी 80 लाखांची तरतूद आहे सागरी प्रकल्पासाठी 3545 कोटींची तरतूद आहे तोट्यात असलेल्या बेस्ट साठी 800 कोटी दिले जाणार आहेत म्हणे महसुली स्त्रोत वाढवणार? ते कसे काय हे मात्र सांगण्यात आलेले नाही हा एक मात्र आहे झोल मार्गाने पालिका अधिकाऱ्यांच्या खिशात जाणारा पैसा जर थांबवला तर आर्थिक तूट भरून निघेल पण त्यासाठी प्रत्येक प्रकल्पाची मॉनिटरी योग्य रित्या व्हायला हवी पण ती करणार कोण ? सवाल सरकारचा तर त्यांना फक्त पालिका निवडणुक जिंकायची आहे त्यासाठी पालिकेच्या तिजोरीला आग लावायची ? सगळ्या राजकीय पक्षणा ओळखून आहेत
Similar Posts
केरळमध्ये रांगोळीने भगवा ध्वज व ऑपरेशन सिन्दुर रेखाटणाऱ्या संघाच्या २७ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
त्रिवेंद्रम/केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी आरएसएसच्या २७ स्वयंसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या रांगोळीमधून ऑपरेशन सिंदूर आणि भगव्या ध्वजाचं चित्र रेखाटण्यात आलं होतंमंदिर समितीने सांगितले की,…
दहीहंडीला गालबोट ६५ हुन अधिक गोविंदा जखमी
मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गोपाळकाला साजरा करण्यात आला. मुंबईत वेगवेगळ्या भागात हंडी फोडताना ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झालेतमुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली….
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअभिनेते विजय कदम यांना दादा कोंडके पुरस्कार ; जागतिक रंगभूमी दिनी शानदार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या ह्रुदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नांवाने देण्यात येणारा पहिला दादा कोंडके पुरस्कार ख्यातनाम विनोदी अभिनेते विजय कदम यांना जाहीर करण्यात आला. ‘अवतरण अकादमी’च्या विद्यमाने जागतिक…
अमेरिकेचे अपयश चीनच्या नेतृत्वकांक्षेला उभारी देणारे ?
गेल्या दोन दशकांमध्ये अमेरिका किंवा इंग्लंड या देशांच्या नेतृत्वाला आर्थिक व अन्य पातळीवर अपयशाची किनार लाभत आहे. याचवेळी जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षेला घुमारे फुटत आहेत. रशियाच्या मदतीने चीनचा हा नेतृत्व उदय होत असून येणारे दशक त्याची दिशा ठरवेल अशी सद्यस्थिती आहे. या नव्या जागतिक घडामोडींचा हा धांडोळा. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक पातळीवर विविध…
मराठीतून माध्यमिक शिक्षण झाल्याने पालिकेने नोकरी नाकारली
मुंबई/ एकीकडे मराठी माणसांच्या मतांवर निवडून यायचे आणि दुसरीकडे मराठीतून माध्यमिक शिक्षण घेतले म्हणून नोकरी नाकारायचा असा भयंकर प्रकार उघडकीस आला आहे आणि हा संतापजनक प्रकार मुंबई महापालिकेत घडला आहे .योगेश परदेशी यांनी डी एड केले तसेच एम ए ची पदवी घेतली पण त्याचे माध्यमिक म्हणजे दहावी पर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातून झाल्याने पालिकेने त्याला नोकरी…
आरोप भयंकर पण संशयास्पद!
भाजपला सतेमधे येण्याची खूपच घाई झालेली आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून सरकार कोसळण्याच्या तारखा दिल्या जात होत्या पण आता लोकांचा विरोधी पक्षांच्या तरखांवर विश्वासाचं राहिलेला नाही.त्यामुळे आता काही 5 वर्ष हे सरकार पडणार नाही याची खात्री भाजपच्या नेत्यांना पटली आहे त्यामुळे आत तारखा देण्याचे प्रकार थांबले असून आता बदनामीची मोहीम सुरू झाली आहे त्यासाठी किरीट…
