मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून मागील निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी मोठा विजय मिळवला होता तसेच आपल्या सरकारच्या काळात त्यांनी या मतदार संघात अनेक कामेही केलीत त्यामुळे आदित्य कडून हा मतदार संघ हिसकावण्याच्या भाजपचा प्रयत्न आहे . त्याची सुरुवात आज दहीहंडी ने करण्यात आली
Similar Posts
अजित पवार गटातील नाराजी चव्हाट्यावर – लोणावळ्यात १३७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मुंबई- लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आता कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रसच्या अजित पवार गटाची जागावाटपावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्लाय माहितीनुसार, अजित पवार गटाची येत्या 5 आणि 6 तारखेला जागावाटपावर मॅरेथॉन बैठक पार पडणार आहे. अजित पवार गटात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी…
.. आणि योगेश वसंत त्रिवेदी यांची ‘गुरुजी’ अशी ओळख झाली
■ सदानंद शिंदे★ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांचे दुसरे पुस्तक ‘गुरुजी’ हे लवकरच प्रकाशित होत आहे. मंत्रालय आणि विधानमंडळ परिसरात तसेच विविध राजकीय पक्ष कार्यालयांपासून सर्वत्र योगेश वसंत त्रिवेदी हे ‘गुरुजी’ म्हणून परिचित आहेत. परंतु ‘गुरुजी’ हे नांव कसे रुढ झाले ? ज्येष्ठ पत्रकार सदानंद गौरु शिंदे यांनी सुमारे पंचवीस वर्षापूर्वी योगेश वसंत त्रिवेदी…
माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा दणदणीत विजय – शिंदेसेनेत गेलेल्या रुपल राजेश कुसळें यांचा पराभव!
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्र. 199 मधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भव्य विजय मिळवला! त्यांना 12786 मते मिळाली, तर शिंदे गटाच्या रुपल राजेश कुसळे यांना11097 मते मिळाली. लढत चुरशीची झाली. थोडया मतांच्या फरकाने किशोरी पेडणेकरांनी त्यांचा चांगलाच धक्का दिला! रुपल कुसळे या माजी शाखाप्रमुख राजेश कुसळेंच्या पत्नी…
बी डी डी चाळ पुनर्वसन प्रकल्पामुळे लोक महाविकास आघाडीच्या पाठीशी–नायगाव, वडाळा, दादर भागातील भाजपचा जनाधार वाढविण्यात आमदार आपयशी ?
उलट फडणवीस आणि दरेकर यांनी नायगाव मध्ये येऊनही त्याचा भाजपला फायदा घेता आला नाही. मुंबई/ फडणवीस,दरेकर यांच्या सारख्या हुशार,अभ्यासू आणि लोकप्रिय नेत्यांचे मार्गदर्शन मिळूनही दुसऱ्या पक्षातून भाजप मध्ये आलेल्या नेत्यांना त्यांच्या मतदार संघात भाजपचा जनाधार वाढवता आलेला नाही त्यामुळे भाजपा नेतृत्व अशा लोकांवर नाराज आहे.दादर,नायगाव,शिवडी, वडाळा,हा गिरणगाव शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र हा बालेकिल्ला शिवसेनेच्या हातून…
डिलाई रोड मधील शिवसेनेचा पोलिंग एजंट आणि नागरीक हरि याचा मृत्यू
मुंबई/सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा मतदार संघाचे महाराष्ट्रातल्या 13 मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्याचे मतदान झाले. मात्र या मतदानाच्या वेळी डीलाय रोड मध्ये एक दुर्दैवी घटना घडली . डीलाई रोडच्या बीडीडी चाळ क्रमांक 20 जवळ असलेल्या मतदान केंद्रावर शिवसेनेचा पोलिंग एजंट म्हणून हजर असलेल्या मनोहर नलगे काका यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळ…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणारदिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
