मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .
Similar Posts
गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर मंडपात मुखदर्शन नाही आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी
मुंबई – गणेश भक्तांच्या लाडक्या बापचे आगमन आता काही तासांवर आलेले असतानाच राजी सरकारने गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली असून यंदा गणेशाचे दर्शन मंडपात घेण्या येवजी ऑन लाइन किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून घ्यावं असे सांगण्यात आले आहे तसेच गणेशाचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणूकणा बंदी असेल त्यामुळे बाप्पा वाजत गाजत न येतं अत्यंत साधेपणाने येणार आणि तितक्याच…
ठाणे महापालिकेला लवकरच मिळणार वाढीव 100 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा
ठाणे, ता. २०. ठाणे महापालिकेच्या सद्यस्थितीत भातसा धरणातून होत असलेल्या 200 द.ल.लि. प्रतिदिन पाणीपुरवठ्यामध्ये 100 द.ल.लि वाढ करण्यासाठी नवीन पंपीग मशीन पिसे येथे बसविण्यात येत आहे. जुने पाच पंप हे 600 अश्वशक्तीचे (horsepower) होते, ते बदलून वाढीव क्षमतेचे (1150 अश्वशक्तीचे) पाच पंप नव्याने बसविण्याचे काम सुरू असून लवकरच हे काम पूर्णत्वास येत आहे, यामुळे ठाणे…
मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे बंधनकारक! प्रशासनाचा आदेश
जळगाव/ उद्या नगर पंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकीत मतदान करण्यासाठी खाजगी आणि सरकारी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना भर पगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे.असा आदेश प्रशासनाने काढला असून हा आदेश न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचाराने जोर धरला असून शेवटच्या दोन दिवसांवर ही निवडणूक आली आहे. तब्बल ९ वर्षानंतर बहुतांश नगरपालिकांच्या निवडणुका…
मतदारसंघ हा आमदार/खासदारसंघ नाही ! –
भारतातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना भारत परीसिमन आयोग (डीलिमिटेशन कमिशन ऑफ इंडिया) च्या माध्यमातून करण्यात आली. या नवीन मतदारसंघांच्या पुनर्रचनेनुसार २००९ पासून लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या राज्य निवडणूक आयोगाचे तत्कालीन आयुक्त नंदलाल हे भारत परीसिमन आयोगाचे सदस्य होते. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ पत्रकार वसंतरावदादा देशपांडे आणि मी नेहमी चर्चा…
अग्निपथ कधी विझनार
भारतात पूर्वी राजा महाराजांचे शासन असायचे त्यामुळे राजा ठरवेल ते धोरण आणि बांधील ते तोरण अशी परिस्थिती होती.आता राजेशाही जाऊन लोकशाही आली आहे. पण ती नावाला आहे कारण या लोकशाहीचा कारभार राजेशाही पेक्षाही वाईट आहे पूर्वी राजाची मनमानी असायची आता पंतप्रधान महाराजांची मनमानी आहे पूर्वी राजाच्या कमरेला तलवार असायची आता पंतप्रधान महाराजांच्या कनवटीला राक्षसी बहुमत…
पूनम महजनचे भाजपाने अखेर तिकीट कापलेउत्तर मध्य मुंबईतून उज्वल निकम
मुंबई/ उत्तर मध्य मुंबईतून भाजपाचे तिकीट कोणाला मिळणार पूनम महाजन की आशिष शेलार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती पूनमचे तर पोस्टरही लागले होते पण आज दोघांनाही डावलून भाजपाने ज्येष्ठ विधी तज्ञ उज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देऊन सर्वानाच चकित केले.उत्तर मध्य मुंबई मधून काँग्रेसने वर्ष गायकवाड याना तिकीट दिले आहे त्यामुळे भाजपा उमेदवाराबाबत…
