मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .
Similar Posts
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
ठाकरेबंधु एकत्र येण्यावर अखेर शिक्कामोर्तब ?
मुंबई/ महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होईल आणि आम्ही संदेश नव्हे तर सरळ बातमी देऊ असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना मनसे एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंचे ऐक्य आता दृष्टीपथा असल्याचे स्पष्ट झाले आहेगेल्या काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा सुरू होत्या त्याची सुरुवात राज ठाकरे यांनी त्यांच्या…
रायगड मधील रोह्यात मोठा शस्त्रसाठा जप्त
रोहा – रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली. एका घरातून पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला. यामध्ये बंदूक, रिवॉल्वर, तलवारी चॉपर, चाकू, दारूगोळा आदींचा समावेश आहे. रायगड पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.सोमवारी जानेवारी रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई…
काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद- फडणवीस, शेलार यांचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई -सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर आज फडणवीस आणि आशिष शेलार या भाजप नेत्यांनी जोरदार प्रतिहल्ला केला. सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे टक्केवारीची दुकानदारी बंद होतील याची ठाकरेंना भीती वाटतेय म्हणून त्यांची आदळ आपट सुरु आहे असे फडणवीस यांनी सांगितले तर २५ वर्षात २२ हजार कोटी खर्च करून मुंबईकरांना खड्डे तुम्ही दिलेत असा…
नायजेरियन निग्रोचा १५ जणांवर प्राणघातक हल्ला उच्च न्यायालय परिसरातील धक्कादायक घटना
मुंबईची सुरक्षा राम भरोसे – कुलाबात धुडगुस मुंबई -मुंबईतील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून ,अत्यंत सुरक्षित परिसर अशी ओळख असलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या मागे दिवसा ढवळ्या एका नायजेरियन निग्रोने १५ जणांवर चाकू हल्ला केल्याने मोठी खळबळ माजली आहे .जखमींना जी टी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून हल्लेखोर निग्रोला अटक करण्यात आली आहे .मुंबईमध्ये मोठ्या…
७० वर्षांवरील जेष्ठांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार
नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने आज एक महत्वाचा निर्णय घेतला . आयुष्मान भारत योजनेंतर्गत आता ७० वर्षांवरील जेष्ठ नाग्रीकानाही या योजनेचा अतिरिक्त लालाभ मिळणार आहेकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ६ कोटी वृद्ध लोक याचा लाभ घेत आहेत. ते म्हणाले की, घरातील एकापेक्षा जास्त वृद्ध व्यक्ती ७० वर्षांपेक्षा जास्त वयाची असल्यास,…
