मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .
Similar Posts
परमवीर सिंग अहमदाबाद मधून भाजप नेत्यांच्या मदतीने परदेशात पळाला- नाना पाटोळे
मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात एक प्रमुख आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग हे गुजरात मधील अहमदाबाद येथून परदेशात पळाले त्यासाठी त्यांना भाजपच्या नेत्यांनी मदत केली असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी केला आहे.एका पत्रकार परिषदेत बोलताना परमवीर सिंग हे सापडल्यास अनेक गोष्टी उजेडात येतील आणि राज्य सरकारला बदनाम करण्याचे भाजपचे…
राज्यातील ९० व्यक्ती , ४० संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर -१० जून रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा
मुंबई, समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने दरवर्षी सन्मानित करण्यात येते. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यंदा राज्यातील ९० व्यक्ती व ४० संस्थांचा समावेश असून एकूण १३० पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.या पुरस्कारांचे वितरण सोहळा दिनांक १० जून २०२५…
दक्षिण कोरियात चेंगराचेंगरीत 150 लोक ठार
सेऊल/ दक्षिण कोरियाची राजधानी सेवूल येथे हेलॉइन उत्सवा दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 150 लोकांचा मृत्यू झाला तर 200 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत .हेलोईन उत्सव हा दक्षिण कोरियात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो काल त्यासाठी हॅमिल्टन हॉटेल परिसरात हजारो लोकांची गर्दी झाली होती . पण हा मार्केट परिसर आहे इथले रस्ते अरुंद आहेत आणि त्याच्या दुतर्फा…
जन गण मन”च्या अगोदर वंदे मातरम् बंधनकारककेंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/देशभरात प्रत्येक सरकार कार्यक्रमात आता जन-गण-मन या राष्ट्रगीतापूर्वी, वंदे मातरम गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय जाहीर केला आहे. प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये वंदे मातरमच्या संपूर्ण सहा कडव्यांचं गायन किंवा वादन अनिवार्य करण्यात आलं आहे. याबद्दल गृह मंत्रालयानं 10 पानांचा सविस्तर आदेश जाहीर करून हे सर्व नियम स्पष्ट केले आहेत….
अनंत चतुर्थदशी गणेश विसर्जनासाठी पालिकेची जोरदार तयारी 25 हजार अधिकारी कर्मचारी तैनात
मुंबई -यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला असला तरी पालिका आणि पोलिस प्र्शासणणे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवलेला होता त्याच बरोबर विसर्जनस्थीही पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . कोरोंना निर्बंधामुळे यंदा पालिका कर्मचारीच बाप्पाचे विसर्जन करणार आहेत त्यासाठी पालिकेच्या 24 विभागांमध्ये 25 हजार कर्मचारी अधिकारी तैनात केले जाणार आहेत .गर्दी टाळण्यासाठी पालिकेने 173 कृत्रिम तलावांची…
देशातील १२ राज्यांमधील मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण सुरू! निवडणूक आयोग सक्रिय
नवी दिल्ली/गेल्या काही दिवसांपासून मतदार याद्यांमधील घोळ आणि मतदानात झालेल्या कथित मतचोरीच्या आरोपांमुळे देशभरातील राजकारण ढवळून निघालं आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी केली आहे. निवडणूक आयोगाने संपूर्ण देशभरात मतदार याद्यांचं पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील घोषणा सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, निवडणूक…
