मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .
Similar Posts
मुंबई बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकारी पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकारी पॅनलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलेमुंबई बँकेचे अध्यक्ष व विधानसभा परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आणि बँकेचे ज्येष्ठ संचालक शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी 21 पैकी 17 जागांवर निवडून आले. आता केवळ चार जागांवर निवडणूक होणे बाकी आहे.बिनविरोध विजयी उमेदवारप्रवीण दरेकर,…
लोकल ट्रेन प्रवसाच्या परवानगीची जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर
मुंबई/ १५ऑगस्ट पासून लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याचा राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे त्याच्या अमलबजावणी जबाबदारी पालिकेच्या खांद्यावर टाकण्यात आली असून याबाबत प्रवाशांना ऑन लाईन व ऑफ लाईन परवानगी पत्र देण्याची प्रक्रिया पालिका पार पाडणार आहे .क्यू आर कोड असलेल्या या परवानगी रेल्वेच्या तिकीटावर खिडकीवर प्रवाशांना रेल्वे पास मिळू शकेल .ऑन…
संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यातील गैरप्रकार प्रकरणी चौकशी सुरू – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
मुंबई, : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामकाजातील आर्थिक गैरप्रकारांबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून विविध पातळ्यांवर चौकशी सुरू आहे. कारखाना भाडे तत्वावर देताना केलेल्या त्रिपक्षीय करारातील अटींचा भंग झाला असल्यास साखर आयुक्तांकडे लवाद प्रक्रियेअंतर्गत (आर्बिट्रेशन) प्रकरण चालविण्याची कार्यवाहीही करण्यात येईल, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली….
ऊस उत्पादकांना दिलासा! एफ आरपी एक रखमी देण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई/राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी टप्प्याटप्प्याने देण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून यापुढे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी एक रकमी द्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहे त्यामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहेराज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना ऊस उत्पादकांना टप्प्याटप्प्याने एफ आर पी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या निर्णयाविरुद्ध स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू…
जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी
मुंबई, -तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच त्यांचे आभार मानले.ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झालं. माझा या कंपनीशी…
गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर धर्मांतर
वडोदरा/ हिंदुस्थानातील गरिबीचा फायदा घेऊन हजारो हिंदूंचे धर्मांतर केले जाते.पूर्वी इस्लामी आक्रमण कर्ते तलवारीच्या जोरावर गरीब हिंदूंचे धर्मांतर करीत असतं पण आता मात्र पैशाच्या जोरावर धर्मांतर केले जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून असे धर्मांतर ताबडतोब थांबवावे आणि दोषींवर…
