मुंबई/ गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत आहे .या पावसामुळे पालघर,ठाणे,रायगड,रत्नागिरी ,नाशिक ,सातारा, सांगली ‘ कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांना पुर आला असून नदीकाठच्या गावांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे तसेच पुढील 48 तासात पालघर,ठाणे,आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे .तर अन्य काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील सूर्य नदी आणि धारण ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने जिल्ह्यातील वसई,विरार, नाला सोपारा, स्फले, केलवे, पालघर, बोईसर आदी परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय दरम्यान वसई परिसरात भुसंखलन होऊन चौघांचा मृत्यू झाला.ता तिघे जखमी आहेत. तर नालासोपारा स्टेशन परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे या जिल्ह्यातील तानसा,वैतरणा या मुख्य नाद्यांसह त्यांच्या उपनद्या दुधदी भरून वाहत आहेत. तर रायगड जिल्ह्यातील कर्जत,नागोठणे,पाली,खोपोली,पेन पनवेल, रोहा आदी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी,अंबा, काळं,कुंडलिक या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्यामुळे खेड आणि चिपळूण शहरात पुराचे पाणी शिरले आहे नाशिक मध्येही तुफान पाऊस पडत असल्याने गोदावरी नदी दुधडी भरून वाहत आहे परिणामी नदीकाठच्या काही गावांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे शहराला पाणीपुरवठा करणारी गंगापूर धरणही ओव्हरफ्लो झाल्याने या धारणा मधील पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे .
Similar Posts
पालिकेची प्रतिबंधित प्लास्टिक विरोधी कारवाई सुरू एफ – नॉर्थ प्रभागात तीनशे किलोचा साठा जप्त
मुंबई/प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने प्लास्टिक पिशव्यांच्या वापरांना बंदी घातली होती तरीसुद्धा मुंबईत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा प्लास्टिकच्या इतर वस्तू विकल्या जातात .त्यामुळे या बेकायदा प्लास्टिक विक्रीला आळा घालण्यासाठी मुंबई महापालिकेच्या अनुज्ञापन विभागाने प्लास्टिक विरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. पालिका एफ नॉर्थ प्रभागाच्या अनुज्ञापन विभागाने माटुंगा येथे…
राज्यपालांच्या हस्ते डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते रविवारी (दि. २४) विविध क्षेत्रातील १० मान्यवरांना उल्लेखनीय समाज सेवेसाठी भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्रदान करण्यात आले. डॉ एपीजे अब्दुल कलाम ग्लोबल फाउंडेशनतर्फे देण्यात आलेल्या या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शमीम खान प्रामुख्याने उपस्थित होते. सनदी लेखापाल विजयशरद…
कृषी उद्योगातील परिवर्तनासाठी एआयएम कॉन्क्लेव्ह सज्ज
मुंबई, – भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (AIM B2B ) बीटूबी परिषद आयोजित केली आहे.एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ही परिषद आयोजित करण्यात…
फरारी निलेश चव्हाणला नेपाळ मधून अटक – वैष्णवीच्या बळाचा ताबा तिच्या आईकडे
पुणे/वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वैष्णवीच्या आई-वडिलांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावणारा निलेश चव्हाण याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे निलेश च्या अटकेमुळे आगवणे कुटुंबातील अनेक रहस्य उघडकीस येण्याची शक्यता आहे दरम्यान वैष्णवीच्या छोट्या बाळाचा ताबा तिची आई स्वाती कस्पटे यांना देण्यात येणार आहे. पुण्यातील विवाहीत तरुणी वैष्णवी हगवणे हिने १६ मे रोजी गळफास घेऊन आपलं…
चाव्या कोणाकडेही असुदेत तिजोरीचे मालक आपणच! चंद्रकांत पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल महायुतीत तणाव
पुणे/राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलं. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे…
सावरकरांची बदनामी प्रकरणात राहुल गांधी निर्दोष सुटणार ?
पुणे/पुण्यातील एमपी एम एल ए कोर्टाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल असलेल्या मानहानिकारक बाबीच्या खटल्यात एक धक्कादायक निर्णय दिला आहे. न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने फिर्यादीची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेमध्ये राहुल गांधींवर मानहानिचा दावा करण्यात आला होता. तसेच त्यांच्या भाषणाची सीडी पुरावा म्हणून सादर करण्यात आली होती. पण ऐन…
