मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत त्यातील 70 मुंबई शहरात 104 पूर्व उपनगरात आणि 163 पश्चिम उपनगरात आहेत आणि नेहमी प्रमाणे या सर्व इमारतींना पालिकेने नोटीस दिलेली आहे पण नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपली का? या धोकादायक इमारतींचा पुनरविकास वर्षणंवर्ष रखडलेला आहे.आज काल बिल्डर लोक ज्या पद्धतीने जागा हडप करीत आहेत ते पाहता लोकांच्या मनात भीती आहे जर आपण पुनर्विकास करण्यासाठी आपली इमारत एखाद्या बिल्डरच्या हवाली केली तर तो आपल्याला पुन्हा घर देईल की नाही याची लोकांच्या मनात खात्री नाही त्यामुळे लोक आपली राहतो जागा सोडायला तयार नाहीत बिल्डिंग पदुला असली तरी त्यातच राहतात त्यामुळे अशा मोडकळीस आलेल्या इमारती मधील रहिवाश्यांना पालिकेने किंवा सरकारने विश्वास द्यायला हवा.त्यांना लेखी स्वरूपात सरकारकडून आश्वासन मिळायला हवे.तरच लोक मोडकळीस आलेल्या इमारती खाली करतील दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यातील बहुतेक खाजगी मालकाच्या आहेत आणि हे मालक काही मोडकळीस आलेल्या इमारतीकडे लक्ष देत नाहीत उलट त्यांचा या इमारतीमधील जुन्या भाडेकरूंना हाकलून इमारतीची जागा कोट्यवधी रुपयांना बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि म्हणूनच लोक इमारती खाली करीत नाहीत परिणामी मुंबईतील मोडकळीस आलेल्या ईमारतीय प्रश्न पावसाळ्यात खूपच गंभीर बनत आहे म्हाडा किंवा एस आर ए या सरकारी गृहनिर्माण संस्थांवर लोकांचा विश्वास नाही कारण एस आर ए योजने अंतर्गत ज्या ज्या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत त्याला त्याला दहा दहा वर्ष झाली तरी ते पूर्ण झालेले नाहीत परिणामी लोक संक्रमण शिबिरातील खुराड्या मध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत .ज्यांनी संक्रमण शिबिरातील खोल्या घेतल्या नाहीत त्यांची बिल्डर भाडी थकवतोय अशी आज परिस्थिती आहे म्हणूनच धोकादायक इमारतींमधील लोक आपली घरे खाली करीत नाहीत परिणामी पावसाळ्यात मोठे अपघात होतात आणि लोकांचा जीव जातो त्यामुळे ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे .
Similar Posts
मत चोरीचा वाद चिघळला! विरोधक निवडणूक आयुक्तांवर महा अभियोग आणण्याच्या तयारीत
नवी दिल्ली/काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदार याद्यांमधील बनावट मतदारांचा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीत आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने संगनमत करून मतांची चोरी केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने हे आरोप सातत्याने फेटाळून लावले होते. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी पत्रकार परिषद…
कर्जतमधील नांदगाव व ओलमण येथिल शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश!!!! आमदारांचा उपस्थितीत निवासस्थानी झाला प्रवेश!
कर्जत तालुक्यांतील ओलमन आणि नांदगाव ग्रामपंचायती मधील शेकाप आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आज सेनेचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांचा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला, यावेळी या सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत करताना कर्जतचे आमदार महेंद्रशेठ थोरवे, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे व अन्य पदाधिकारी व प्रवेशकर्ते दिसत आहेत.
पुतळा दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आपटला अटक
कल्याण – मागच्या आठवड्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद आहे. जयदीप…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन
दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि…
मुंबईत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा मेगा लिगल सर्व्हिस कॅम्प यशस्वी; शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचल्या
मुंबई, २२ फेब्रुवारी २०२६: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मुंबई शहर-उपनगर आणि जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मेगा लिगल सर्व्हिस कॅम्प’ उपक्रम आज वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड येथे यशस्वीपणे संपन्न झाला. ‘शासकीय योजना आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी जनतेला उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा कॅम्प राबवण्यात आला.कार्यक्रमाला मुंबई…
जयंत पाटील यांची ईडीकडून साडेनऊ तास चौकशी
मुंबई, -तब्बल साडेनऊ तासांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीची चौकशी संपली आहे. चौकशी संपल्यानंतर जयंत पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये दाखल झाले. कार्यालयामध्ये दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला, तसंच त्यांचे आभार मानले.ईडीच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं दिली. ईडीकडे आता प्रश्न शिल्लक नसतील. चौकशीदरम्यान आपलं अर्ध पुस्तक वाचून झालं. माझा या कंपनीशी…
