मुंबईत 337 धोकादायक इमारती आहेत त्यातील 70 मुंबई शहरात 104 पूर्व उपनगरात आणि 163 पश्चिम उपनगरात आहेत आणि नेहमी प्रमाणे या सर्व इमारतींना पालिकेने नोटीस दिलेली आहे पण नोटीस देऊन पालिकेची जबाबदारी संपली का? या धोकादायक इमारतींचा पुनरविकास वर्षणंवर्ष रखडलेला आहे.आज काल बिल्डर लोक ज्या पद्धतीने जागा हडप करीत आहेत ते पाहता लोकांच्या मनात भीती आहे जर आपण पुनर्विकास करण्यासाठी आपली इमारत एखाद्या बिल्डरच्या हवाली केली तर तो आपल्याला पुन्हा घर देईल की नाही याची लोकांच्या मनात खात्री नाही त्यामुळे लोक आपली राहतो जागा सोडायला तयार नाहीत बिल्डिंग पदुला असली तरी त्यातच राहतात त्यामुळे अशा मोडकळीस आलेल्या इमारती मधील रहिवाश्यांना पालिकेने किंवा सरकारने विश्वास द्यायला हवा.त्यांना लेखी स्वरूपात सरकारकडून आश्वासन मिळायला हवे.तरच लोक मोडकळीस आलेल्या इमारती खाली करतील दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणात ज्या मोडकळीस आलेल्या इमारती आहेत त्यातील बहुतेक खाजगी मालकाच्या आहेत आणि हे मालक काही मोडकळीस आलेल्या इमारतीकडे लक्ष देत नाहीत उलट त्यांचा या इमारतीमधील जुन्या भाडेकरूंना हाकलून इमारतीची जागा कोट्यवधी रुपयांना बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव आहे आणि म्हणूनच लोक इमारती खाली करीत नाहीत परिणामी मुंबईतील मोडकळीस आलेल्या ईमारतीय प्रश्न पावसाळ्यात खूपच गंभीर बनत आहे म्हाडा किंवा एस आर ए या सरकारी गृहनिर्माण संस्थांवर लोकांचा विश्वास नाही कारण एस आर ए योजने अंतर्गत ज्या ज्या भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवले जात आहेत त्याला त्याला दहा दहा वर्ष झाली तरी ते पूर्ण झालेले नाहीत परिणामी लोक संक्रमण शिबिरातील खुराड्या मध्ये हलाखीचे जीवन जगत आहेत .ज्यांनी संक्रमण शिबिरातील खोल्या घेतल्या नाहीत त्यांची बिल्डर भाडी थकवतोय अशी आज परिस्थिती आहे म्हणूनच धोकादायक इमारतींमधील लोक आपली घरे खाली करीत नाहीत परिणामी पावसाळ्यात मोठे अपघात होतात आणि लोकांचा जीव जातो त्यामुळे ही परिस्थिती बदलणे गरजेचे आहे .
Similar Posts
शरद पवारांच्या खुलाशामुळे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले -थेट विलीनीकरण शक्य नाही
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यं पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता बारगळण्याची शक्यता आहे.कारण शरद पवारांनीच आता थेट विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितल्याने एस टी कामगारांचे अक्षरशः धाबे दणाणले आहे.एस टी कामगारांच्या संपाबाबत न्यायालयाच्या आदेशाने जी समिती स्थापन झाली आहे टी १२आठवड्यात विलीनीकरण बाबत सरकारला अहवाल देणार आहे .त्यामुळे सरकार या विलीनीकरणाच्या…
राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार केंद्राकडून 700 कोटींची मदत
दौर्याचे राजकारण सुरू मुंबई/ महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्र सरकारं महाराष्ट्राला 700 कोटींची मदत करणार आहे असे काल कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यानी लोकसभेत सांगितले तर राज्य सरकार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या मदातिकडे लागले आहेमहाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आता हळू हळू नियंत्रणात येत आहे कारण पावसाचा जोर काहीसा कमी…
घरच्यांनी केलेला सन्मान हा पद्म पुरस्कारासमान ; योगेश वसंत त्रिवेदी आणि मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक गरज म्हणून मी आणि मुकुंद कुलकर्णी मुंबईच्या सागरात पोहत असलो तरी आणि शरीराने जरी मुंबईत असलो तरी मनाने आम्ही अंबरनाथ मध्येच आहोत. त्यामुळे ज्या ज्या व्यासपीठावर संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही अंबरनाथची बाजू, प्रश्न विविध प्रकारचे मुद्दे मांडत असतो….
शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च मागे घेणार ?
मुंबई – मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातील शेतकरी प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाल्याने आज हा मोर्चा स्थगित केला जाण्याची शक्यता आहे.भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तासांच्या…
केंद्रीय मंत्र्याच्या विधानानंतर राज ठाकरे संतप्तबॉम्बे विरुद्ध मुंबई वाद वाढणार
मुंबई/आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण याच मुंबई आणि बॉम्बेचा वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. याचं कारण म्हणजे दोन दिवसांपूर्वी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमात केलेले एक वक्तव्य. “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार मानतो” असं ते म्हणाले. या…
विरारमध्ये इमारत कोसळून 15 जणांचा मृत्यू
विरार /विरारच्या नारंगी येथील रमाबाई अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा मागील भाग कोसळून भीषण दुर्घटना घडली. यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी पाहणी करून बचाव कार्याचा आढावा घेतला. इमारतीचा शेजारील चाळीवर कोसळल्याने चाळ उद्ध्वस्त झाली असून, अनेक रहिवासी ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची शक्यता आहे.कोसळलेल्या इमारतीच्या अपार्टमेंटमध्ये एकूण ५० सदनिका…
